मंगळवार, ३१ मार्च, २०२०

मुलगी परदेशातून परतल्याची माहिती डॉक्टरनी लपवली,रुग्णालय केलं सील


पनवेल | कोरोनाची लागण झाली आहे किंवा प्रवास करुन आले असले तरी त्या लपवण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. असाच आणखी एक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. साई बाल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर महेश मोहिते यांनी त्यांची मुलगी अमेरिकेतून परत आली होती हे लपवले. त्यामूळे पोलिसांनी त्यांचे रुग्णालय सील करण्यात आले आहे.

नवीन पनवेलमधील सेक्टर-१९ मध्ये साई बाल रुग्णालय आहे. हे रुग्णालय डॉक्टर महेश मोहिते चालवतात. त्यांची कन्या अमेरिकेहून परत आली होती. त्यामूळे शासनाच्या निर्देशानुसार तीने १४ दिवस क्वॉरंटाईनमध्ये राहणे आवश्यक होते. परंतू, तसे केले नाही तसेच मुलीच्या सानिध्यात असतानाही त्यांनी रुग्णालयात लहान मुलांवर उपचार केले होते.

याची माहिती कळताच पनवेल मगापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नोटीस पाठवत रुग्णालय बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच, त्यांनी कोणकोणत्या लहान बाळांवर उपचार केले आणि कोणाच्या संपर्कात आले याची माहिती पोलिस घेत आहेत.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांनी साधला सरपंचांशी संवाद

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांनी साधला सरपंचांशी संवाद

कराड: देशभरात तसेच राज्यात कोरोंना ग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील सरपंचांशी फोनवरून संवाद साधत गावातील सद्य परिस्थितीची माहिती घेतली. तसेच शासनाने ज्या समित्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक गावात केल्या आहेत त्या समितीबाबतीत कश्या पद्धतीने कामकाज सुरू आहे याचीही माहिती घेतली. याचसोबत शासनाच्या ज्या योजना सदया सुरू आहेत त्याबद्दल सरपंचांना माहिती दिली, की गावात ज्या लोकांकडे दारिद्र्य रेषेखालील कार्ड आहे अश्या लोकांना 5 किलो राशन मोफत मिळणार आहे तसेच उज्वला योजनेमार्फत 3 महिन्यात 3 गॅसच्या टाक्या मोफत मिळणार आहेत अश्या काही शासकीय योजनांची माहिती आ. चव्हाण यांनी सरपंचांना दिली. गावातील लोकांना या योजनांचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करावेत तसेच कोरोना बद्दल ग्रामस्थांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायती कडून विविध उपक्रम राबविले जावेत अश्याही सूचना आ. चव्हाण यांनी सरपंचांना दिल्या व कोणतीही गावात अडचण आल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण सद्य परिस्थिति बद्दल राज्यातील सचिवांसोबत रोज बोलून राज्याचा आढावा घेत आहेत तसेच त्यांना उपयुक्त अश्या सूचना सुद्धा देत आहेत. याचसोबत आ. चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील आढावा घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख तसेच आरोग्य अधिकारी यांच्याशी सुद्धा वेळोवेळी फोनवरून संवाद साधत चालू घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. याच संवादाचा भाग म्हणून आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील सर्व सरपंचांशी फोनवरून संवाद साधला, या सरपंचांच्या संवादाला सर्वच सरपंचांनी उत्साहाने प्रतिसाद देत बाबांशी बोलताना या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

धक्कादायक : कोरोनाचे १४०० संशयित; 'या' कार्यक्रमासाठी झाले होते जमा

दिल्लीच्या निजामुद्दीन भागातून कोरोनाबद्दल एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या धार्मिक कार्यक्रमासाठी २०० हून अधिक लोक उपस्थित होते आणि कोणत्याही परवानगीशिवाय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नंतर त्यांच्यात कोव्हिड-१९ ची लक्षणे दिसू लागली. सध्या १४०० संशयितांना तेथून हलविण्यात आले आहे आणि आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, लॉकडाउन असून देखील इतका मोठा कार्यक्रम आयोजित झालाच कसा आणि एकाच ठिकाणी एवढी लोकं जमा झाली कशी? कार्यक्रमानंतर, जेव्हा सुमारे ३०० लोकांना सारखीच लक्षणे दिसू लागली, तेव्हा प्रशासनाने त्वरित कारवाई करत या लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवलं. या सर्वांची तपासणी केली जाणार असून जर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल आणि उर्वरित लोकांना पुढील काही दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल.

ही बातमी समोर येताच निजामुद्दीनमध्ये जोरदार बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. निजामुद्दीन दर्ग्याच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात पॅरामिलिटरी आणि दिल्ली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागामार्फत निजामुद्दीन येथे आरोग्य शिबिरही उभारले गेले आहे. निजामुद्दीनमधील एका इमारतीत बरेच परदेशी विद्वानही राहतात. त्यांना तिथेच राहण्यास सांगण्यात आले आहे.अशी माहिती मिळाली आहे की, हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्याचवेळी तेलंगणात कोरोना संक्रमणामुळे ६ लोकांचा मृत्यू झाला आणि हे सहाही जण निजामुद्दीन औलियातील तबलीगी जमात सहभागी होते. या गोष्टीची जेव्हा खात्री झाली तेव्हा सर्वच राज्यातील प्रशासनाला मोठा धक्का बसला.


या बातमीनंतर वेगवेगळ्या राज्य सरकारांनी तात्काळ पावलं उचलली आहेत, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये १२०० लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर यूपी पोलिस मुख्यालयाने १८ जिल्ह्यांसाठी विशेष निर्देश दिले आहेत की, त्या लोकांवर लक्ष ठेवावे किंवा त्या लोकांना शोधून काढावे जे या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सामील झाले होते. सोमवारी आरोग्य मंत्रालयाचे सहसचिवांनी सांगितले की, देशात कोरोना सध्या लोकल ट्रान्समिशनच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे.

भाईंदरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण; कुटुंबातील सर्वजण पॉझिटिव्ह

मीरा- भाईंदरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण;  कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह

भाईंदरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याच्या कुटुंबातील अन्य ५ सदस्यांनाही रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. हा रुग्ण ५५ वर्षांचा असून तीन आठवड्याभरापूर्वी तो पुण्याला जाऊन आला होता. या रुग्णाने मुलगी व मुलाच्या लग्नपत्रिका अनेकांना वाटल्या आहेत. त्याच्या संपर्कातील नागरिकांची शोधाशोध सुरू आहे.

मीरा रोडमध्ये राहणारा ५५ वर्षांचा रुग्ण हा आधी खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. डॉक्टरांना संशय वाटल्याने शुक्रवारी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले. एका खाजगी लॅबने शनिवारी सायंकाळी कोरोनाची लागण झाल्याचा चाचणी अहवाल दिल्यानंतर त्याला पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयासह शहरातील अन्य काही बड्या खाजगी रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिला.

अकेर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास कोकीळाबेन रुग्णालयात त्याला दाखल केले. त्याच्यासह त्याच्या मुलासही दाखल केले आहे.
त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले़

लग्नपत्रिका वाटण्यासाठी आला होता मुंबईत

रुग्ण वा त्याच्या कुटुंबियातील कुणीही परदेशातून आलेले नाही. मुलगा व मुलीचे लग्न असल्याने रुग्णाने पुण्याला लग्नपत्रिका देण्यासाठी प्रवास केला होता. शिवाय शहरात व मुंबईत अनेकांना पत्रिका वाटल्या. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मात्र तो घरातच असल्याचे सांगण्यात आले. रुग्णाने कुठे प्रवास केला व पत्रिका दिल्या याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.

साताऱ्यात ९ तर कराडमध्ये ४ रुग्ण कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण २ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच पुणे, मुंबईवरून आलेल्या काहींना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दि. १५ मार्च नंतर परदेश प्रवास करुन आलेले ७ प्रवासी कोरोना अनुमानित म्हणुन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील विलगीकरण कक्षात दि.२८ मार्च रोजी ४८ वर्षीय पुरुषास ताप व श्वसनास त्रास होत असल्याने, दि.२९ मार्च रोजी ८० वर्षीय पुरुष व ४ वर्षीय मुलास श्वसनास त्रास व खोकला असल्याने आणि आज दि.३० मार्च रोजी एका वर्षाच्या मुलीस ताप व खोकला आल्याने दाखल केले आहे

ह्या सर्व 4 रुग्णांना कोरोनाचे अनुमानित रुग्ण म्हणून दाखल केले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासण्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असून उपचार चालु आहेत. हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील उपचार ठरवण्यात येतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तसेच सातारा जिल्हयातील १ पुरुष व १ महिला असे दोन रहिवाशी इस्लामपुर येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना देखील अनुमानित रुग्ण म्हणुन आज दाखल करून घेण्यात आले. सदर कोरोनासंशयितांचे घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

बाधितांचा आकडा २२० वर

राज्यातील करोना बाधितांचा आकडा आता २२० झाला आहे. काल दिवसभरात १७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर २ जणांचा आज मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संख्या खालीलप्रमाणे:

मुंबई - ९२

पुणे -४२

सांगली-२५

मुंबई एमएमआर-२४

नागपूर-१६

यवतमाळ-४

अहमदनगर-५

सातारा-२

कोल्हापूर-३

औरंगाबाद-१

रत्नागिरी-

सिंधुदुर्ग-१

कोल्हापूर-१

गोंदिया -१

जळगाव-१

बुलढाणा-१

एकूण-२२०


सोमवार, ३० मार्च, २०२०

"कोरोना" विरूध्द लढायचं असेल तर 'अशी' वाढवा 'इम्यूनिटी', वयानुसार हवं 'खाणं-पिणं', जाणून घ्या

कोविड 19 वर लढा देण्यासाठी अनेक शहरे लॉकडाऊन केली आहेत. अशा परिस्थितीत, घरी असताना स्वत: ला निरोगी ठेवण्यासाठी काय खावे, काय खाऊ नये, हा मोठा प्रश्न आहे. आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी खाणे गरजेचे आहे ते माहित असणे गरजेचे आहे.

आपण कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरातून कार्य करण्यास सुरवात केली असेल किंवा घरामध्ये स्वत: ला अलग केले असेल तर या वेळेचा चांगला वापर करा. आपला आहार आणि दिनचर्या नियमित केल्यामुळे केवळ कोरोना संसर्गाचा धोका कमी होत नाही तर रोग प्रतिकारशक्ती वाढवून रोगांपासून अंतर राखणे शक्य होते. आहार तज्ञ डॉ इशी खोसला काय म्हणतात ते जाणून घ्या

काय करायला हवे

- आपल्या आहारात फळ आणि भाज्या मुख्यत्वे समाविष्ट करा.
- पचन आणि रोग प्रतिकारशक्तीचा थेट संबंध आहे. त्यामुळे हलके अन्न खा.
- तुळशी, गिलोय, आवळा, हळदीचा वापर करा. कडुलिंबाचा वापर करा. तुळशीचा चहा फायदेशीर आहे.
- देसी तूप प्रतिकारशक्तीसाठी खूप चांगले आहे. यावेळी आपण थोडेसे तुप घेऊ शकता. नारळाच्या तेलाचे सेवन देखील फायदेशीर आहे.
- आरोग्याच्या दृष्टीने व्हिटॅमिन डी, बी 12, जस्त, लोह, सेलेनियम यासारखे पौष्टिक पदार्थ महत्वाचे आहेत. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल. व्हिटॅमिन बी 12 दुधाच्या उत्पादनांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते, तर हिरव्या पालेभाज्या, सोयाबीनचे आणि सुकामेवा जस्त, लोह आणि सेलेनियम या खनिज पदार्थांसाठी खावेत.
- लसूण अँटिऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे. त्यात आढळणारे सेलिसिन नावाचे संयुगे संक्रमणाशी लढायला मदत करते, प्रतिकारशक्ती वाढवते आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवते.

वेळेवर जेवा, पण कॅलरीबद्दलही सजग रहा, कारण जेव्हा चालणे किंवा शारीरिक क्रिया कमी केली जाते आणि व्यायामाचा नियमित अवलंब केला जाऊ शकत नाही तेव्हा खाण्याची गरज कमी होते. रोगांशी लढण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत आवश्यक आहे. हे नैसर्गिक पदार्थ तसेच पूरक पदार्थांद्वारेही घेतले जाऊ शकते. लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादी लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.

काय करु नका
मांस खाऊ नका.
धूम्रपान सोडा.
बाहेर तळलेल्या गोष्टी कमी घ्या.
चहा-कॉफी केक-पेस्ट्री टाळा.

1 ते 10 वर्ष
स्वच्छता ठेवा.
कोकाकोला पेय, साखर सिरप आणि बाजाराच्या फळांचा रस देखील देऊ नका.
आई-वडिलांनी मुलांना कँडी, चॉकलेटसारखे गोड पदार्थ देऊन त्यांना आनंद देऊ नका.
मुलांना योगा शिकवा आणि ते नियमितपणे करण्यास प्रवृत्त करा.

10 ते 40 वर्ष
फायबर समृद्ध खा. आठवड्यातून एक दिवस उपवास करा.
सूर्यनमस्कारासह फुफ्फुसांना बळकटी देण्यासाठी भ्रामरी प्राणायाम करा.
घरी व्यायाम करा.
घरी हेल्दी डिश बनवा.

40 ते 60 वर्ष
नियमित योग आणि व्यायाम सुरू ठेवा.
डॉक्टर आणि आहारतज्ञांशी संपर्कात रहा.
नियमपुर्वक औषधे घ्या. रक्तदाब आणि साखर पातळी तपासत रहा.

60 वर्षानंतर
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिक्विड आहार घ्यावा.
यासाठी तुळशी, बडीशेप, वेलची आणि जिरे पाणी घ्या.
शरीरावर डिटॉक्सिफाई करण्यासाठी भाज्यांचा रस घ्या.
प्रोबायोटिक्स घ्या.

जर ते आपल्यास अनुकूल असेल तर इडली, डोसा, कांजी इत्यादी यीस्ट पदार्थ घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योगा करा.

तळमावले : पतसंस्था ठरताहेत ग्रामीण भागातील लोकांना "आधार"



तळमावले /वार्ताहर

 भारत देशामधील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दि.25 मार्च 2020 पासून केंद्रशासनाने 21 दिवस संपूर्ण देशामध्ये लाॅकडाऊन लागू केले आहे. सदर आदेशानुसार देशातील बॅंका चालू ठेवण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि सदर आदेशामध्ये राज्यातील पतसंस्थांचा समावेश नाही. पतसंस्था याही वित्तीय संस्था आहेत. तथापि पोलिस प्रशासनाकडून संस्थेमध्ये जाण्यास कर्मच्याऱ्यांना मज्जाव करण्यात येत आहे. असे दिसून येते. काही अपवाद वगळता प्रशासनाकडून सहकार्य मिळत आहे.

लाॅकडाऊन मुळे ‘गडया आपला गावच बरा’ असे म्हणत बहुतांशी मंडळी आहे त्या परिस्थितीत गावी परतली आहेत. ग्रामीण भागामध्ये मोठी गावे वगळता बॅंका नाहीत. तसेच लाॅक डाऊन मुळे लोकांना इतरत्र जाताही येत नाही. त्यामुळे लोकांना पतसंस्था, मल्टीस्टेट सोसायटी यामधून पैसे काढण्याशिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागातील लोकांचे पैसे हे पतसंस्थामध्येच आहेत. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, दवाखान्यासाठी त्यांना पतसंस्था शिवाय पर्याय नाही. यासाठी पतसंस्था चालू असाव्यात अशी मागणी ग्रामीण भागातील लोकांकडून होत आहे.

कारण मुंबईहून आलेली लोकं ही आहे त्या परिस्थितीत आली आहेत. तसेच ग्रामीण भागामध्ये नेट व अन्य सुविधा नसल्यामुळे नेटबॅंकींग, एटीएम अशा सुविधा देखील नाहीत. त्यामुळे त्यांना पतसंस्था हाच एकमेव पर्याय आहे. परंतू काही ठिकाणी पतसंस्थांची कार्यालये उघडण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट राज्य यांच्या पुणे कार्यालयातून कोव्हीड 19 च्या पाश्र्वभूमीवर पतसंस्थांचे कामकाज सुरु ठेवणेबाबत स्वतंत्र जीआर काढला आहे. यानुसार तरी संस्था चालू ठेवण्यास सहकार्य होईल अशी अपेक्षा ग्रामीण भागातील संस्था चालकांनी व्यक्त केली आहे. कारण ग्रामीण भागातील लोकांना अशा प्रकारच्या आणीबाणीच्या काळात मदतीसाठी पतसंस्था हा एकमेव आधार असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, आजही ग्रामीण भागामध्ये लोकांना मास्क मिळत नाहीत अशावेळी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांनी स्थानिक महिलांकडून मास्क बनवून घेतले आहेत आणि हे मास्क सर्व कर्मचारी, संचालक, सल्लागार आणि त्यांचे कुटूंबीय, मान्याचीवाडी (गुढे) या वाडीतील प्रत्येक घरामध्ये दिले आहेत. तसेच अजून इतर वाडया वस्त्यामध्ये वाटप करण्याचे प्रयत्न आहेत. सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच शिवसमर्थ संस्था आणि परिवार यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अशाप्रकारचे काम प्रत्येक वाडी वस्तीवरील सामाजिक संस्था, मंडळे यांनी करायला हवे अशीही अपेक्षा अॅड.जनार्दन बोत्रे यांनी व्यक्त केले आहे.   


  • लोकांना सेवा मिळावी हाच हेतू:

  • कोव्हीड 19 चा प्रार्दूभाव झाल्यापासून केंद्र व राज्य सरकारने काळजी घेण्याबाबत ज्या आदर्श सुचना केल्या आहेत. त्यानुसार आम्ही शाखेमध्ये कमीत कमी कर्मचारी, संस्थेत प्रवेश करतेवेळी सॅनिटायझर चा वापर, कर्मचारी वर्गाला मास्क इ. गोष्टी पुरवल्या आहेत. तसेच सोशल डिस्टींक्शन बाबत देखील सुचना केल्या आहेत.

  • ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या गरजेच्यावेळी पैसा मिळाला पाहिजे त्यांना अडचण निर्माण होवू नये या एकाच भावनेतून आम्ही संस्थेच्या माध्यमातून संचारबंदी, लाॅकडाउन इ. बाबींचे उल्लंघन न होता सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. व आमच्या संस्थेची सर्व कार्यालये जास्तीत जास्त कशी सेवा देतील याकडे लक्ष दिले आहे.

  • - अॅड.जनार्दन बोत्रे, संस्थापक अध्यक्ष, दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि; तळमावले

सांगली : एका कुटुंबातील 24 जणांना कोरोनाची लागण, 2 वर्षीय चिमुकल्याचा पण समावेश

सांगलीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आत्ता २४ झाला आहे आहे. एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाचा विळखा पडला आहे. नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आलेला २ वर्षांचा मुलगा त्याच कुटुंबातील असून यापूर्वी देखील या घरातील लहान मुलांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. मात्र त्यावेळी ते निगेटिव्ह होते. काल तिघांचे रिपोर्ट पाठवले त्यात एका मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

सांगलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील नातेवाईकांसह २४ जण आहेत. तर पेट वडगाव येथील महिला इस्लामपूर येथील रुग्णाची नातेवाईक आहे. या सर्व रुग्णांवर मिरजमधील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

मिरजमध्ये उपचार घेणाऱ्या संख्या २५ वर पोहचली आहे.
संख्या वाढत असताना दिलासादायक माहिती सांगली जिल्हातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण याआधीही महाराष्ट्रात अनेक कोरोनाबाधितांवर उपचार होऊन त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे.

रविवार, २९ मार्च, २०२०

पाटण :- बाटलीतून पेट्रोल विक्री करणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

बाटली अथवा कॅनमधून पेट्रोल विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश असतानाही नाडे नवारस्ता, ता. पाटण येथील तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंपावर कर्मचारी बेकायदेशीर प्लास्टिक बाटलीतून पेट्रोल विक्री केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पेट्रोलपंप कर्मचार्‍यांंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचारी विकास जयवंत चव्हाण रा. गमेवाडी, ता. कराड व शाखाप्रमुख नारायण लक्ष्मण जाधव रा. गव्हानवाडी, ता. पाटण याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेट्रोल पंप मालक-चालक आणि प्रांताधिकारी यांच्या समेवत झालेल्या बैठकीत शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून पेट्रोल विक्री करावी.

कोणालाही बाटली अथवा कॅनमधून पेट्रोल देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

शनिवारी रात्री पाटण तालुका खरेदी-विक्री संघाच्या म्हावशी व नाडे नवारस्ता येथील पेट्रोल पंपांना पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी अचानक भेटी दिल्या. त्यावेळी नाडे-नवारस्ता येथील पंपावर कर्मचारी कॅन व प्लास्टिक बाटलीतून पेट्रोल देत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पेट्रोल घेणारे ग्राहक पळून गेले.

मात्र, याबाबत विचारणा केली असता कर्मचारी समाधानकारक उत्तर देता आले नाही. याप्रकरणी पाटण येथील पुरवठा शाखेचे उप लेखापाल महादेव अष्टेकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संतोष कोळी करीत आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 196 - राजेश टोपे


मुंबई प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 196 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कालपर्यंत 186 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यात आज (रविवारी) आणखी दहा नव्या रुग्णांची भर पडली.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची विभागनिहाय आकडेवारी देखील टोपे यांनी दिली. मुंबई व ठाणे परिसर 107, पुणे 37, नागपूर 13, अहमदनगर 03, रत्नागिरी 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03, मिरज 25, सातारा 02, सिंधुदुर्ग 01, कोल्हापूर 01, जळगाव 01, बुलढाणा 01 असे हे रुग्ण आढळून आल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात एकूण सहा कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून हे सर्वजण मुंबईतील होते, अशी माहिती टोपे यांनी दिली.

काय होणार 29 एप्रिलला खरंच का होणार जगाचा अंत? नासाने सांगितलं।सत्य

नवी दिल्ली : भारतासह जगातील सर्व देश सध्या चीनमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसशी झुंज देत आहेत. कोरोनामुळे दिवसेंदिवत मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. या सगळ्यात आणखी एक खगोलशास्त्रीय घटनेने लोक घाबरले आहेत. सोशल मीडियावर असे अनेक रिपोर्ट्स येत आहेत, ज्यात असा दावा केला जात आहे की, 29 एप्रिलपर्यंत जगाचा विनाश होणार आहे. या बातम्यांचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे समोर आले आहे.

का केला जात आहे दावा?

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (NASA) ने काही दिवसांपूर्वी असा खुलासा केला होता की, एक उल्का किंवा लघूग्रह वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत आहे.असंही सांगितलं जात आहे की, हा लघूग्रह पृथ्वीवरील सर्वात उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखराहूनही मोठा आहे. या उल्केचा वेग हा 31,319 किलोमिटर प्रतितास इतका आहे. म्हणजे जवळपास 8.72 किलोमीटर प्रति सेंकद या वेगाने येत आहे.

काय आहे सत्य?

अर्थात, 29 एप्रिल रोजी, एक प्रचंड उल्का पृथ्वीच्या दिशेने येणार आहे. नासाच्या मते, सुमारे 2 हजार फूट क्षेत्रासह जेओ 25 नावाचे एक उल्का भूमीपासून 1.8 दशलक्ष किमी अंतरावर जाईल. गेल्या 400 वर्षात किंवा येत्या 500 वर्षात इतक्या जवळून कोणताच उल्का गेला नाही आहे. नासाने असेही म्हटले आहे की, हा उल्का चंद्रापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 4 पट जास्त वाढेल. मात्र या हा उल्का पृथ्वीला स्पर्श करणार नाही आहे. 2013 मध्ये जवळपास 20 मिटर रूंद अशी एक उल्का पृथ्वीच्या कक्षेत आदळली होती. तर एक 40 मिटरची उल्का 1908 मध्ये सायबेरियाच्या कक्षेत आदळली होती. या उल्कापासून पृथ्वीवर कोणताही धोका असणार नाही. त्यामुळे, या अफवांवर विश्वास ठेवू नका.

सावधगिरी बाळगा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बातम्या खोट्या आहेत. त्यामुळे तुम्हीही यावर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता पडताळून घ्या. तसेच, तुम्ही असे मेसेज कोणालाही फॉरवर्ड करू नका, यामुळं समाजात अशांतता पसरू शकते.

स्पेनच्या प्रिन्सेसचाही घेतला कोरोनाने जीव.


स्पेनची प्रिन्सेस मारिया टेरेसा  यांचा कोरोनाव्हायरसमुळे  मृत्यू झाला आहे. त्यांचा भाऊ प्रिन्स सिक्सो एनरिक दे बॉरबॉन यांनी सोशल मीडियावर आपल्या बहिणीच्या मृत्यूबाबत सांगितलं आहे. जगातील शाही कुटुंबातील कोरोनाव्हायरसमुळे होणारा हा पहिला मृत्यू आहे.

स्पेनचे राजा फिलिप यांची चुलत बहीण आणि बॉरबॉन-पार्माची प्रिन्सेस मारिया टेरेसा यांचा शनिवारी कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. 86 वर्षीय मारिया या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान गुरुवारी झालं. गेले 3 दिवस त्या वेंटिलेटरवर होत्या. मारिया यांचा भाऊ प्रिन्स सिक्स्तो एनरिक दे बॉरबॉन यांनी फेसबुक पोस्टमार्फत आपल्या बहिणीच्या मृत्यूबाबत सांगितलं आहे.

या फेसबुक पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, पॅरिमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी माद्रिदमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.

हे देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, आतापर्यंतचा आकडा 193 वर

जगभरात इटलीनंतर स्पेनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झालेत. स्पेनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे शनिवारपर्यंत एकूण 5,982 जणांचा मृत्यू झाला आहे. 73 हजार पेक्षा जास्त जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. स्पेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, देशात कोरोनाव्हायरसने तिसरा टप्पाही ओलांडला आहे, मात्र आता प्रकरणं कमी आहेत.

स्पेनमध्ये दररोज सरासरी 8 हजारपेक्षा जास्त प्रकरणं समोर येत आहेत. माद्रिद सर्वात प्रभावित क्षेत्र आहे, जिथं 2,757 लोकांचा मृत्यू झाला आहे, 21,520 जणांना व्हायरसची लागण झाली आहे.

मुंबईहून ढेबेवाडी येणारी कार पलटी, दोघे जण जखमी

मुंबईहून ढेबेवाडीकडे निघालेली कार खोडशी  येथे उलटून अपघात झाला. चालकाचा ताबा सुटूल्यानी ही दुर्घटना घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. दोघे जखमी पाटण तालुक्यातील असून पुणे-बंगळूर महामार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला.
चंद्रकांत घारे (वय ४२, रा. घारेवाडी)बाजीराव विठ्ठल यादव (वय ५२, रा. बनपूरी), 
अशी जखमींची नावे आहेत. तर अश्विन नंदकुमार मोहिते (वय ३२, रा. भुंईज) असे चालकाचे नाव आहे.
या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी महामार्ग पोलिस, महामार्ग मदत केंद्राचे पथक आणि कराड शहर पोलिसांच्या मदतीने जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

शनिवार, २८ मार्च, २०२०

धक्कादायक:.नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला झाला कोरोना

नवी मुंबई : मुंबई आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहे. नवी मुंबईत एका कुटुंबातल्या दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या कुटुंबातल्या तिघांना या आधीच कोरोनाची लागण झाली आहे. नवी मुंबईतला हा 8वा कोरोनाबाधित रुग्ण आहे. आता या चौघांवरही मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवी मुंबईत आज विदेशातून आलेले 95 नागरीक आढळून आलेत. त्या सगळ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

नवी मुंबईतल्या एका मशिदीमध्ये फिलिपाईन्सचा नागरीक आला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्याच्यामुळे मशिदीतल्या मौलानांना लागण झाली. नंतर त्यांचा मुलगा, सून आणि आता नातवालाही लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

8 कोरोना बाधित रुग्ण

-- 1 फिलिपाईन्स नागरिकांचा मृत्यू

-- 690 नागरिक होम कोरोंटाइन मध्ये

-- 9 नागरिक कस्तुरबा रुग्णालयात सध्या दाखल

-- 8 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत

-- 81 जण अलगिकरण कक्षात उपचार घेताहेत

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये आज पुन्हा भर पडली आहे. दिवसभरात 9 रुग्णांची नोंद झाली. त्यांना भाभा रुग्णालयात आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 86 झाली आहे. काल मुंबईत एका डॉक्टरचा मृत्यू झाला. त्यामुळे एकाच शहरात आतापर्यंत 5 मृत्यू झाले आहेत. राज्यातच नाही तर देशात हा सगळ्यात जास्त आकडा आहे.

मुंबईत आज सापडलेल्या 9 कोरोनाग्रस्तांमध्ये 3 महिला आणि 6 पुरुष आहेत. यातल्या तिघांना कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात तर 6 जणांना कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत.

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या १४७ वर, एकाच कुटुंबातील १२ जणांना लागण

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. आज सांगलीत आणखी १२ रूग्ण कोरोना पॉजिटिव्ह आल्याने हा आकडा आज १२ ने वाढला. सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ११ वरुन २३ वर पोहोचली आहे. आज ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांच्यामध्ये ६ महिला आणि ६ पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील व्यक्ती आहेत. सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चिंतेचं वातावरण आहे. तर नागपुरात ही आज नवे ५ रुग्ण आढळले आहेत.महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.राज्यसरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करत आहे.

देशभरात ७३० हून अधिक जणांना कोरोनीची लागण झाली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७० लोकांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

ढेबेवाडी : मानसातला देव."खरचं पोलीस कर्मचाऱ्यांना सलाम !"



तळमावले:-
दिवसरात्र आपल्या सेवेसाठी डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आज पुन्हा एकदा माणसातला देव पाहायला मिळत आहे. देशावर मोठं संकट असताना, सगळ्यांनी पळ काढला पण पोलीसवर्ग मात्र न भिता तसाच तिथे काम करत राहिला. यांच्या बद्दल बोलावे तेवढं थोडच आहे.
आपल्या गावातील एकादी व्यक्ती मुंबई / पुण्यावरून आलेला असेल तर आपण विशेष काळजी घेतो.अशा परिस्थिती पण पोलीसवर्ग सध्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करत असताना दिसत आहे ते आपल्यासाठी दिवस - रात्र एवढं पळतात, आपणही त्यांच्या साठी काहीतरी केलं पाहिजे. सध्या पूर्ण देशामध्ये कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. सर्व शहरे गावोगावी सध्या बंद पाळला जात आहे. अशा परिस्थिती मध्ये पोलीस कर्मचारी सध्या आपली सेवा करत आहे. दिवसभर उन्हामध्ये तापत आहे. नाष्टा चहा पाण्याची सर्व हॉटेल लॉक - डाऊन केलेली आहेत.आपल्याला जमेल अशी आपल्या माणसातल्या देवासाठी चहा, नाष्टा, पाणी याची सोय कृपया करावी. आणि त्यांना सहकार्य करावे, गर्दी करणं टाळावं. त्यांना न इलाजाने लाठीचार्ज करावा लागेल असे वागू नये. गावभर उगाच फिरू नये. आपल्यामुळे संसर्ग वाढेल असे काहीच करू नये अत्यावश्यक कामा शिवाय घरातून बाहेर पडू नये. सरकार ने दिलेल्या सर्व सूचना पाळाव्यात. आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे त्यांना पण थोडा मोकळा श्वास घेण्यास मदत होईल.  
  पोलिसाबरोबर हुज्जत घालू नका त्यानां त्याचे काम करू द्या 
कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे

धक्कादायक : फक्त 20 मिनिटांत पसरतोय कोरोना, घरातच थांबा नाहीतर...

केरळ :- कासारगोडमधील  येथे क्त एका व्यक्तीमुळे 20 मिनिटात 4 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. कासरगोडमध्ये कोरोनाव्हायरसचा आढळलेला दुसरा रुग्ण 2 दुबईहून भारतात आला होता. 16 मार्चला त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. त्याने चाचणीसाठी स्वॅबचा नमुना दिला, त्यानंतर त्याला घरी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला. तो स्वत:ला आयसोलेट करून घेण्यापूर्वी 20 मिनिटांमध्येच त्याने तब्बल 4 जणांना कोरोना संक्रमित केलं. आयसोलेशनपूर्वी विमानतळाहून कारमधून घेऊन जाणारा त्याचा मित्र, त्यानंतर घरी आई, पत्नी आणि मुलगा त्याच्या संपर्कात आले. हे चारही जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या रुग्णांवरही आता उपचार सुरू करण्यात आलं आहे.

घरात थांबण्याची गरज

भारतात कोरोना अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळं सध्या कोरोना हा परदेशातून येणाऱ्या व्यक्तींना होत आहे. मात्र जर कोरोनाग्रस्त व्यक्ती इतरांच्या संपर्कात आल्यास, याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. त्यामुळं लोकांना घरतच राहण्याचे आवाहन सतत केले जात आहे. याआधी मोदींनी 22 मार्च रोजी एका दिवसाचा लॉक डाऊन जाहीर केला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी लोकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर गर्दी केली. त्यामुळं आता 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे.

वेगाने पसरतोय कोरोना

WHOने जाहीर केलेल्या आकडेवारीत पहिल्या कोरोना रुग्णानंतर 64 दिवसांनी 1 लाख रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मात्र केवळ 11 दिवसात दुसऱ्या टप्प्यात कोरोना पसरला. आता कोरोना इतका झपाट्याने वाढत आहे की, केवळ 4 दिवसांत 1 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही परिस्थिती धक्कादायक असून, यातून बाहेर पडण्य3साठी लवकरात लवकरत उपाय योजना करणे आवश्यक आहे.

गुरुवार, २६ मार्च, २०२०

सातारा : 8 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा, २६ मार्च,  : कोविड-19 या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील 7 निकट सहवासितांचे तसेच एका 60 वर्षीय महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुनेही एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले होते त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तसेच फिनलॅड येथून प्रवास करुन आलेल्या 32 वर्षीय युवकाला अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

कोरोना : टोलवसुलीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाचे दिवसेंदिवस वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारनं लॉकडाऊननंतर आता आणखी विविध उपाययोजनांना सुरूवात केली आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक वस्तुंचा तुटवडा नागरिकांना जाणवू नये यासाठी आता देशभरातील सर्व टोलनाक्यांवरील टोलवसुलीला स्थगिती देत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

या निर्णयामुळे अत्यावश्यक वस्तुंच्या वाहतुकीतील मोठा अडथळा दूर होऊन वेळेचीही बचत होईल असं नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. देशातील सर्व राष्ट्रीय आणि राज्यमार्गांवरील टोलवसुली स्थगित करण्यात आली आहे. देशभरात सध्या कोरोनाबाधीतांची संख्या आता ६०६ झाली आहे, यात ४०च्यावर नागरिक हे परदेशी आहेत.

लॉकडाऊननंतर धान्याच्यी उपलब्धता करुन देण्यात येणाऱ्या अडचणींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी हा निर्णय़ घेण्यात आला.

दिलासादायक: सातारा त्या तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह एकही नवीन रुग्ण नाही

सातारा :l 
 जिल्ह्यात काेराेनाचे 16 संशीयत रुग्ण दाखल झाले हाेते. त्यातील दाेन जणांचे दाेन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या दाेन्ही रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुुरु आहेत.तसेच 14 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दि.२५ मार्च बुधवार सायंकाळी पाच पर्यंत काेराेनाबाबतचा काेणताही नवा रु्गण जिल्हा रुग्णालयात दाखल झालेला नाही अशी माहिती डाॅ. गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यातील कोरोना रिपोर्ट :

जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण : 16

रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले रुग्ण : 2
रिपोर्ट निगेटिव्ह आलेले रुग्ण : 14
रिपोर्टची प्रतीक्षा असलेले रुग्ण : 00
निगेटिव्ह रिपोर्टमुळे घरी सोडलेले रुग्ण : 10
रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण : 6
निरीक्षणाखाली असलेल्या व्यक्ती : 369
14 दिवसांचा कालावधी संपलेले रुग्ण : 121

घरातच निरीक्षणाखाली असलेले नागरिक : 248 रुग्णालयात दाखल रुग्ण : १६
रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले रुग्ण : २
रिपोर्ट निगेटिव्ह आलेले रुग्ण : १४
रिपोर्टची प्रतीक्षा असलेले रुग्ण : ००
निगेटिव्ह रिपोर्टमुळे घरी सोडलेले रुग्ण : १०
रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण : ६
निरीक्षणाखाली असलेल्या व्यक्ती : ३६९
१४ दिवसांचा कालावधी संपलेले रुग्ण : १२१
घरातच निरीक्षणाखाली असलेले नागरिक : २४८

कोरोना विषाणू हा अत्यांत लवचिक आहे. तो जर भारतातील उन्हाळ्यानंतर अस्तीत्वात राहिला तर माणसाकडून माणसात प्रसार होण्याचे प्रमाण वाढेल, असा इशारा भारतीय जीवशास्त्रज्ञांच्या पथकाने दिला आहे.

भारतीय पथकाला सार्स सीओव्ही 2च्या स्पाईक प्रोटीनमध्ये अन्य देशात आढळलेल्या विषाणूंच्या तुलनेत फरक आढळलेला आहे. याचा अर्थ तो मानवी पेशीत प्रवेश करताना आणि जोडताना त्याची वर्तणूक वेगळी असते. आता पर्यंत त्याची संसंर्ग क्षमता मोठी असल्याचे सिध्द झाले आहे. आणि जर तो येणाऱ्या भारतीय उन्हाळ्यात तगला तर तर माणसातून माणसाकडे होणऱ्या संसर्गाची संख्या वाढू शकते, असे डॉ. दिनेश गुप्ता यांनी सांगितले.ते दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरींग आणि बायोटेक्‍नॉलॉजी या इटलीत मुख्यालय असणाऱ्या संशोधन संस्थेचे प्रमुख आहेत. सार्स - सीओव्ही 2 हा विषाणू खूप लवविक आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग रोखणे हे खूप महत्वाचे आहे, असे सांगत डॉ. गुप्ता यांनी भारत सरकारने केलेल्या उपाय योजनांचे समर्थन केले.

वेगवेगळ्या स्थितीशी जुळवून घेण्याची त्यात तगून राहण्याची आणि मानवी पेशीत प्रवेश करण्याची विषाणूंची सर्वसाधारण प्रवृत्ती असते, असे मतही गुप्ता यांनी नोंदवले. भारत, इटली, वूहान, अमेरिका आणि नेपाळ अशा विविध ठिकाणच्या विषाणूंबाबत ही संस्था संशोधन करत आहे.

बुधवार, २५ मार्च, २०२०

मुंबईत ५ ठाण्यात १असे एकूण सहा नवे रुग्ण, महाराष्ट्रात आता १२२ करोनाग्रस्त

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर पोहचली आहे. मुंबई पाच तर ठाण्यात १ रुग्ण आढळ्याने ११७ वरुन ही संख्या १२२ वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. तीन तासात ६ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर पोहचली आहे.

नवी दिल्ली : प्रयोगशाळेत नव्हे तर नैसर्गिकरित्या 'कोरोना' व्हायरसची 'निर्मिती'

नवी दिल्ली :  - 

एका संशोधनानुसार कोरोना विषाणूच्या जीनोम सीक्वेन्सचा अभ्यास करताना समोर आले की, कोरोना विषाणू (सार्स-सीओव्ही -2) ची उत्पत्ती प्रयोगशाळेत नाही तर नैसर्गिकरित्या झाली आहे. अमेरिकेच्या स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटसह अन्य संस्थांमधील शास्त्रज्ञांनी देखील संशोधनात असे म्हटले आहे की कृत्रिमरित्या हा विषाणू तयार झाला आहे, याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही.

या अहवालात असेही म्हटले आहे की चिनी अधिकाऱ्यांनी आधीच या साथीच्या आजारास ओळखले होते. कोविड -१९ चे प्रकार झपाट्याने वाढत आहेत कारण हा विषाणू एका व्यक्तीच्या शरीरात आल्यानंतर दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरत आहे.हा विषाणू स्पाइक प्रोटीन तयार करतो, त्यास एखाद्या हुक सारखे वापरुन मानवी पेशीला एखाद्या कोल्ड ड्रिंकच्या डब्याप्रमाणे उघडतो आणि त्यात प्रवेश करतो.

नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतातून विकसित झाले हे स्पाइक्स

अहवालानुसार, या स्पाइक प्रोटीनला एखाद्या प्रयोगशाळेत अनुवांशिक अभियांत्रिकीसह विकसित करणे शक्य नाही. हे विज्ञानाच्या लोकप्रिय नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताद्वारे विकसित झाले आहे. हे आतापर्यंत ज्ञात असलेल्या कोणत्याही विषाणूच्या रचनेपेक्षा भिन्न आहे.

अफवांना विराम, सिद्धांतास बळकटी

कोरोना विषाणू एका चिनी प्रयोगशाळेतून बाहेर पडला आणि लोकांपर्यंत पोहोचला अशा अफवांना संशोधनाने विराम दिला आहे. त्याचबरोबर अमेरिकेकडून चीनमध्ये हा विषाणू पसरवल्याचा आरोपही नाकारण्यात येत आहे. या साथीच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर वैज्ञानिकांनी सांगितले होते की, हा विषाणू वन्यजीव (शक्यतो वटवाघूळ किंवा पॅंगोलिन) खाल्ल्याने कुण्या एका चिनी नागरिकापर्यंत पोहोचला आणि तेथून इतर मानवांना संसर्ग झाला. विषाणूची निर्मिती होण्याचे दोन गृहीते आहेत.

१) कुण्या एका जीवात निर्मित झाली आणि मानवामध्ये आला

हा विषाणू कुण्या एका जीवात नैसर्गिक निवडीद्वारे विकसित झाला आणि नंतर तो मानवांमध्ये आला. मागील कोरोना विषाणू 'सार्स' सिव्हेट (अंगावर ठिपके असलेला एक मांजराच्या जातीचा प्राणी) आणि 'मर्स' उंटातून आले होते. सध्याचा विषाणू वटवाघुळातून आला असावा असा विश्वास वर्तवण्यात आला आहे कारण तो त्यात आढळणाऱ्या विषाणूसारखाच आहे.

२) हा मनुष्यांमध्ये विकसित झाला असावा

असे मानण्याचे कारण की याच्याशी मिळताजुळता विषाणू पॅंगोलिन जीवात आढळतो. आणि मनुष्य या जीवांना खात असतो. त्यामुळे हा विषाणू मानवात येतो. हळूहळू नैसर्गिक निवड सिद्धांताद्वारे याने स्पाइक प्रोटीन बनविणे शिकले आणि मानवी पेशींमध्ये पोहोचण्याची क्षमता प्राप्त केली.

शहरवासीयांनी नाही पण ग्रामस्थांनी गांभीर्याने घेतले; संकट टाळण्यासाठी मान्याचीवाडीकरांनी गाव सीमाबंद केले

पाटण : तालुक्यातील कुंभारगाव येथील मान्याचीवाडीत गावाबहेरील लोकांना प्रवेशबंदी करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसपासून गावाचा बचाव करण्यासाठी हा निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला असून गावच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

कराड शहरापासून पंचवीस किलोमीटर असलेले कुंभारगाव,मान्याचीवाडी आता ग्रामस्थांनी संपूर्णपणे लॉकडाऊन केले आहे. जवळपास 550 लोकसंख्येच्या गावात मोठी बाजारपेठ आहे. कोरोना सारख्या रोगाशी लढण्यासाठी ग्रामस्थांनी भविष्यामध्ये रोगाची लागण आपल्या गावांमध्ये होऊ नये म्हणून गाव अक्षरशः लॉकडाऊन केले आहे.

AD

 या सोबतच गावातील तरुण सीमेवरील रस्त्यावर पहारा देणार आहेत. या धाडसी निर्णयाचे गावातील रहिवाशांनी स्वागत केले आहे.तसेच सर्वांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे

सातारा ; नागरिकांना पेट्राेल, डिझेल मिळणार नाही; काेणाला मिळणार ते वाचा

सातारा :-

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना संसर्ग वाढू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारे लोक प्रयत्न करत आहेत. साताऱ्यात कुठेही सामान्य नागरिकाला पेट्रोल मिळत नाही.

केवळ अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी कर्मचारी व्यक्ती, काेराेना नियंत्रण व निर्मुलनासाठी कार्य करणारी व्यक्ती, अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खाजगी व्यक्ती, वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती यांनाच पेट्राेल मिळेल अथवा द्यावे अशा सूचना सातारा जिल्हा पेट्राेल डिझेल पंप असाेसिएशन यांना दिल्या आहेत.

तसेच सातारा जिल्ह्यात दाेन रुग्णांचे अहवाल पाॅझिटेव्ह आले आहेत. जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहेनागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे..

मंगळवार, २४ मार्च, २०२०

चीन : कोरोना नंतर आता चीनमध्ये हंता व्हायरस; एकाचा मृत्यू

बीजिंग : करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या या करोना व्हायरसने अत्तापर्यंत जगभरात हजारो बळी घेतले आहे. त्यातच आता चीनमध्ये आणखीन एका व्हायरसची भर पडली आहे. 'हंता' नावाचा जीवघेणा व्हायरस चीनमध्ये पसरम्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

'हंता' नावाचा जीवघेणा व्हायरसमुळे चीनमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर 32 लोकांची तपासणी करण्यात येत आहे. आधीच कोरोनावर औषध न सापडल्यामुळे जगभरात 16 हजार पेक्षा जास्त लोकाना प्राण गमवावे लागले आहे. त्यात आता हंताची भर पडली आहे.

युन्नान प्रांतामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार युन्नान प्रांतामध्ये एका व्यक्तीचा हंता या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.हा व्यक्ती बसमधून प्रवास करत होता. या व्यक्तीला हंता व्हायरसची लागण झाली होती. यावेळी बसमध्ये 32 प्रवासी होते. आता त्यांची देखील तपासणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या या माहितीनुसार सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

सोमवार, २३ मार्च, २०२०

सातारा ; सापडला पहिला रुग्ण


सातारा: काल विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ४५ वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा संशयित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या महिलेचा रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून प्राप्त झाला असून ही महिला कोविड-१९ बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास १५ वर्षापासून आहे. त्यावर उपचार चालू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.

कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी.
- शेखर सिंह. जिल्हाधिकारी, सातारा

पहिली ते आठवीची परीक्षा रद्द नववी ते अकरावीची परीक्षा १५ एप्रिल नंतर


मुंबईः महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव पाहता, दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. खबरादारी म्हणून शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. दहावीच्या एका विषयाचा अखेरचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. याआधी दहावीची परीक्षा वेळेवर होणार असं सांगण्यात आलं होतं. 23 मार्चला होणारा भूगोल विषयाचा पेपर आता 31 मार्चनंतर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतचा निर्णय घेतला.

सोमवारी होणारा पेपर आता थेट 31 मार्च नंतर होणार असून 31 मार्चनंतर या पेपरच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

याआधी पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय वर्षा गायकवाड यांनी कालच जाहीर केला होता.

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी दहावीची परीक्षा सध्या सुरू आहे. सोमवारी 23 मार्चला भूगोल आणि सामाजिक शास्त्र -2 चा पेपर आहे. दहावी बोर्डाचा शेवटचा पेपर राहिला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला 3 मार्चपासून सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत ही परीक्षा नियोजित होती. मात्र राज्यात कोरोनाचं थैमान पाहता, शेवटचा पेपर लांबणीवर टाकला आहे.

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना याआधीच 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. तर नववी ते ११ची परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येणार आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात शिक्षण विभागाची बैठक बोलवली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शालेय शिक्षण विभागाने तीन निर्णय घेतले आहेत.

महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त, रुग्णसंख्या ८९; आणखी एक मृत्यू

मुंबई : 
महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत हा आकडा वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही ८९ झाली आहे. तर फिलीपीन्समधून मुंबईत आलेल्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या नागरिकाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. सुरुवातीला या नागरिकाची करोना चाचणी सकारात्मक आली होती. मात्र नंतर त्या नागरिकाला करोनाची लागण झाली नाही असं समजलं. मूत्रपिंडाचा त्रास आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाला.अत्यावश्यक सेवा वगळून सगळ्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. अशात महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या ७४ होती. मात्र १५ रुग्ण वाढल्याने ही संख्या ८९ वर पोहचली आहे.

रुग्णसंख्या वाढली आहे मात्र लोकांनी काळजी करु नये. शक्यतो घरी रहावं, घराबाहेर पडू नये. स्वयंशिस्त पाळावी अशी विनंती आणि आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. रविवारचा पूर्ण दिवस भारताने जनता कर्फ्यूचं पालन केलं. मात्र लोकल ट्रेन बंद असल्याने सोमवारच्या दिवशी खासगी वाहनांनी मुंबईत जाण्यासाठी गर्दी होते आहे. ही गर्दी करणं चुकीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. लोकांनी ३१ मार्च पर्यंत संयम पाळावा. आज जे अनावश्यक कारणाने मुंबईत जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असाही इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

23 मार्च पासून ग्राहकांचे मीटर रीडिंग घेऊ नये आणि बिल देऊ नये: उर्जामंत्र्यांनी केली मोठी घोषणा


मुंबई ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्यभरात उद्यापासून कलम 144 लागू करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर परिवहन अनिल परब यांनी एसटी बसची सेवा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. आता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलांसदर्भात मोठी घोषणा केली आहे.

'23 मार्च पासून ग्राहकांचे मीटर रीडिंग घेऊ नये आणि बिल देऊ नये. सगळे वीज बिल अॅव्हरेज देण्यात येईल. बिल भरले नसेल तरीही वीज पुरवठा खंडित करू नये. वीज कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वीज चोरी तक्रारीसाठी किंवा बिल तक्रार असल्यास ग्राहकांकडे जाऊ नये,' अशा सूचना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.

ग्रामीण महाराष्ट्राची लालपरी थांबणार!

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून ते 31 मार्चपर्यंत राज्य परिवहनची बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूक ठप्प होणार आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांनीही वर्क फ्रॉम होम..

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीही वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला आहे. दिवसभर निवासस्थानी राहत वाचन व इतर कामे करून त्यांनी कुंटुबीयांसमवेत आपला वेळ घालविला.

'स्वतःसहित कुटुंबातील सर्वांच्या तब्येतीची काळजी घ्या. घराबाहेर पडू नका'असे आवाहन यानिमित्ताने खासदार पाटील यांनी नागरिकांना केले आहे. तसेच काळजी घ्यायची पक्के ठरवू! आपण कोरोनाला नक्की हरवू! असे म्हणत खासदार पाटील यांनी जनतेला स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सारंग पाटील यांनीही वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडत आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला.


रविवार, २२ मार्च, २०२०

कुंभारगाव : शुकशुकाट; नागरिकांचा जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद


                  छायाचित्र: अजिंक्य माने

कुंभारगाव / मान्याचीवाडी :- 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला कुंभारगाव परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे कुंभारगाव,मान्याचीवाडी मध्ये शुकशुकाट होता सर्व दुकाने बंद होती. तसेच नागरिकानांही घरातच राहणे पसंद केले.कुंभारगाव परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळत कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला.परिसरातील ,आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा कार्यान्वित होती.त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

सर्व  बाजारपेेेठ हीी बंद करण्यात आल्याने जनता घराबाहेर पडलीच नाही. वडाप संघटनांनी एकजूट दाखवत जनता कर्फ्यूत सहभागी होत सहकार्य केले. एस.टी.आगाराने वाहतुक बंद ठेवत कोरोना विरोधातील कर्फ्यूला पाठिंबा दिला.

'कलम १४४' अंतर्गत महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केलं ते कलम नेमकं आहे तरी काय?

सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केले जाते. जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देतो. जमावबंदी लागू केल्यानंतर 4 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमू शकत नाहीत. तसेच शस्त्र घेऊन जाण्यास देखील बंदी असते.

कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकतात. त्या व्यक्तीला कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत अटक करण्यात येते. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्याला 1 वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र या शिक्षेसाठी जामीन मिळतो.

सीआरपीसी म्हणजेच भारतीय दंड विधान (Code of Criminal Procedure, 1973) भारतातील गुन्ह्यांसाठी कायदे आहेत.हे 1973 ला पारित करण्यात आले व 1 एप्रिल 1974 मध्ये लागू करण्यात आले. एखाद्या गुन्ह्यात आरोपी आणि पिडितासाठी जी प्रक्रिया राबवली जाते ती सीआरपीसीमध्ये देण्यात आलेली आहे.

मुंबई: 27 मार्चपासून पुन्हा जमावबंदी; पोलीस आयुक्तांचे आदेश


मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या पादूर्भावामुळे मुंबई शहर आणि उपनगरात जमाव बंदी करण्यात आलेली आहे. येत्या 27 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेली आहे.

सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने एकत्रित फिरणाऱ्या आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे.

राज्य सरकारकडून नागरिकांना अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना वारंवार करण्यात येत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असून रेल्वे स्टेशन,बस स्थानकावर प्रवास्यांची गर्दी कायम आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जमावबंदी संबंधी नव्याने आदेश जारी केले आहेत.

साताऱ्यात करोना संशयित आणखी तीन युवक शासकीय रुग्णालयात

सातारा - बहामा, दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे आलेला २७ वर्षीय युवक व काही वेळ त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र वय (२४ वर्षे ) या दोघांना सर्दी व खोकला असल्याने त्यांना शनिवारी (दि. २१) मार्च रोजी रात्री ११ वाजता जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.

तसेच कतार येथून प्रवास करुन आलेल्या २४ वर्षीय युवकाला घसा खवखवत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला रात्री १ वाजता विलगीकरण कक्षात दाखल केले. यापूर्वी काल दुपारी १२ वाजता चिली येथून आलेल्या २४ वर्षीय युवकास व रात्री १० वाजता दुबई येथून आलेल्या २९ वर्षीय युवकास दाखल करण्यात आले आहे. असे एकूण रात्री उशिरापर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण पाच रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल झाले आहे.

वरील पाचही रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील 'एनआयव्ही' कडे पाठविण्यात आले असून त्यांना कोरोना अनुमानित लक्षणे असल्याने त्यांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

शनिवार, २१ मार्च, २०२०

नवी मुंबईत : कामोठे आयुक्तांची अचानक भेट, 'होम क्वारन्टाईन' सदस्य घरी नसल्याने खळबळ

नवी मुंबई : कामोठे परिसरातील होम क्वारन्टाईन केलेले रहिवासी घराबाहेर पडून फिरताना दिसत आहेत. घरातील तिघेही जण बाहेर येऊन फिरत असल्याने, परिसरात धास्ती आहे. कामोठे परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. या कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा संभव असल्यामुळे, पनवेल महानगरपालिका प्रशासनाने या कुटुंबातील तिन्ही सदस्यांना होम क्वारन्टाईन म्हणजेच घरी राहण्यास सांगितले होते.

कोरोना संशयित क्वारन्टाईन करण्याऱ्या सदस्यांना घराबाहेर पडू न देण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, खुद्द पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख पोलिसांच्या मदतीने क्वारन्टाईन असणाऱ्या व्यक्तींच्या घरात जाऊन झडती घेण्याचे कार्य करत आहेत आज पोलिसांना घेऊन मनपा आयुक्तांनी घरातील सदस्यांना अचानक भेट दिली होती, पण सदस्यच घरी नसल्याने मोठा गोंधळ झाला. या तिन्ही दोषी सदस्यांवर गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सातारा : उद्या पेट्रोलपंप बंद..!


सातारा :- कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी गर्दी करणे टाळा, भेटणे टाळा असे आवाहन सारकातर्फे होत आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी 22 तारखेला जनता करफ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. याच आवाहनास प्रतिसाद म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व पेट्राेल पंप रविवारी (ता. 22) सकाळी सहा ते साेमवारी (ता. 23) सकाळी सहा पर्यंत बंद राहतील अशी माहिती सातारा जिल्हा पेट्राेलियम डीलर्सचे अध्यक्ष माेहन बढिये यांनी दिली.

सध्या अनेक शहरातही पेट्रोल पंप बंद राहतील अशी माहिती पसरली होती. पेट्रोल पंपवर गर्दी होऊ लागताच प्रसारमाध्यमातून या अफवा असल्याचे सांगितले गेले मग ही गर्दी ओसरली. पेट्रोलियम पदार्थ जीवनाश्यक यादीत असल्याने पंप सुरू राहणार आहेत.मात्र, प्रत्येक शहरानुसार यामध्ये वेगवेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात.

शुक्रवार, २० मार्च, २०२०

सातारा : विलगीकरण कक्षात असलेल्या 'त्या' युवकांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

सातारा, २० मार्च, : शारजाह {UAE}येथून प्रवास करुन आलेला सातारा जिल्ह्यातील 29 वर्षे युवकाला सर्दी व घसा दुखत असल्याने जिल्हा रुग्णालयात कोविड-19 या आजाराचा अनुमानित रुग्ण म्हणून 18 मार्च रोजी रात्री दाखल करण्यात आले होते.

तसेच सौदी अरेबिया येथून प्रवास करुन आलेला एक 22 वर्षीय युवकाला सर्दी व ताप असल्याने जिल्हा रुग्णालयात कोविड-19 या आजाराचा अनुमानित रुग्ण म्हणून 18 मार्च रोजी रात्री दाखल करण्यात आले होते. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडून प्राप्त झाले असून दोन्ही युवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

गुरुवार, १९ मार्च, २०२०

खूशखबर! केरळपाठोपाठ राजस्थानातील 3 रुग्णही ठणठणीत झाले, 'कोरोना'वरील उपचाराचं जयपूर मॉडेल


जयपूर, 16 मार्च : केरळनंतर (Kerala) आता राजस्थानमधील (Rajasthan) डॉक्टरांनाही कोरोनाव्हायरसवरील (Coronavirus) उपचाराचा लढा जिंकला आहे. जयपूरमधील (Jaipur) कोरोनाव्हायरसचे 3 रुग्ण आता बरे झालेत. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चच्या (Indian Council for Medical Research - ICMR) मार्गदर्शनानुसार सवाई मानसिंग रुग्णालयातील (SMS hospital) डॉक्टरांनी यशस्वी उपचार केलेत.

जगभरात कोरोनाव्हायरसची भीती आहे, मात्र भारतीयांसाठी ही दिलासादायक अशी बातमी आहे. जयपूरमधील COVID-19 चे 4 पैकी 3 रुग्ण बरे झालेत. याबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून डॉक्टरांचं कौतुक केलं आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, "एसएमस रुग्णालयातील 3 कोरोना रुग्ण बरं झालेत, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे. या तिघांचेही रिपोर्ट नेगेटिव्ह आलेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सर्वस्व पणाला लावलं, त्याचं मी मनापासून कौतुक करतो"

हे 'कोरोना'शी लढ्याचं 'केरळ मॉडेल', भारतातील पहिले 3 रुग्ण असे झाले व्हायरसमुक्त

जयपूरमधील डॉक्टरांनी इंडियन मेडिकल काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चशी सल्लामसलत करून उपचार केले. या रुग्णांना मलेरिया, स्वाइन फ्लू, एचआयव्ही औषधं देण्यात येणारी Lopinavir/Ritonavir ही औषधं देण्यात आली.

राजस्थानच्या आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंग यांनी इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितलं की, "SMS hospital आणि मेडिकल कॉलेजचे प्राचार्य सुधीर भंडारी यांच्या मार्गदर्शनाता आणि ICMR च्या देखरेखीत मलेरिया, स्वाईन फ्लू आणि एचआयव्हीची दोन औषधं वापरू पाहिली आणि हा उपचार यशस्वी ठरत असल्याचं दिसलं"

इटलीहून आलेल्या 2 पर्यटकांची टेस्ट नगेटिव्ह आली आहे. शिवाय दुबईहून राजस्थानमध्ये आलेल्या रुग्णाची टेस्टही नेगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह टेस्ट आलेल्या या रुग्णांना आता राजस्थान हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये (RUHS Hospital) शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.. या 3 रुग्णांव्यतिरिक्त स्पेनहून आलेल्या एका नागरिकालाही कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पुणे ; राष्ट्रवादीकडून पुणे पदवीधर सारंग बाबांना संधी?


सातारा : राज्यात लवकरच पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक पार पडणार आहे.या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत.तर अनेकांनी तिकिटासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत.

दरम्यान भाजपमध्ये या निवडणुकीसाठी अनेक नेते इच्छूक आहेत.त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून कमी नेते इच्छूक आहेत.दरम्यान आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे चिन्ह आहे.त्यातच आता राष्ट्रवादीकडून काही नेत्यांच्या नावाची शक्यता वर्तवली जात आहे.

सारंग पाटील आणि उमेश पाटील यांचे नाव सध्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे.सारंग पाटील हे खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव आहेत.गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्याकडून निसटता पराभव झाला होता .

दरम्यान असे असले तरी सारंग पाटील यांचे चांगले जाळे या मतदारसंघात तयार झाले आहे.त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.या मतदारसंघात सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील मतदारांचा समावेश होतो.

काळगाव ; लग्नात जपली सामाजिक बांधिलकी डाकेवाडीतील चिंचुलकर कुटूंबीयांची शाळेसाठी आर्थिक मदत



तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील आनंदा चिंचुलकर आणि परिवाराने लग्नसमारंभादिवशी जि.प.प्राथ.शाळेसाठी आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावरील कोरोनाचे सावट तसेच लग्नातील अनावश्यक खर्च टाळून चिंचुलकर कुटूंबियांनी लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला.
‘एक हाक माझ्या शाळेसाठी’ असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट डाकेवाडी यांच्यावीने डाॅ.संदीप डाकवे यांनी केले होते. त्यानुसार लोकसहभागातून जि.प.शाळा डाकेवाडीला रंगरंगोटी इतर भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या स्पर्धेत या शाळेला स्वच्छ, सुंदर आणि गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून पाटण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. अजूनही या शाळेला भौतिक सुविधांची तसेच आर्थिक मदतीची गरज असल्याचे मत या शाळेचे मुख्याध्यापक महादेव गेजगे आणि उपशिक्षक रणजित शिंदे यांनी केले आहे.
आपण या शाळेत शिकलो, आपलाही यात काही सहभाग असावा या हेतूने आनंदा विठ्ठल चिंचुलकर आणि त्यांच्या परिवाराने त्यांचा मुलगा कृष्णा आणि आनंदा पांडूरंग चाळके यांची कन्या स्वाती यांच्या विवाहानिमित्त आर्थिक मदत देणगी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडे सुपुर्द केली.
या वेळी शिवछत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष अधिक डाकवे, विकास डाकवे, आनंद डाकवे, नवनाथ जाधव, शिवाजी डाकवे (शेठ), विकास जाधव, पंढरीनाथ दुधडे, रविंद्र डाकवे, अंकुश डाकवे, शंकर चिंचुलकर, दिलीप डाकवे, भिमा डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपल्या आनंदाच्या प्रसंगी गावातील मुलांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी सहकार्य करणाऱ्या श्री.आनंदा चिंचुलकर आणि चिंचुलकर परिवाराच्या कृतीचे उपस्थितांमधून कौतुक होत आहे. अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकीची किनार लोकांनी जपावी तसेच शाळेसाठी लोकांनी आर्थिक मदत करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सातारा : करोनाचे दोन संशयित रुग्ण

सातारा - परदेशातून प्रवास करून आलेल्या दोन तरुणांमध्ये करोनासदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, २९ वर्षीय तरुण शारजाह (UAE) येथून प्रवास भारतात परतला होता. तर सौदी अरेबिया येथून प्रवास करुन आलेल्या २२ वर्षीय तरुण या दोघांना करोनासदृश्य लक्षणे आढळली होती. यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात 'एनआयव्ही'कडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे.हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

ऑडिट न करताच बँकांच्या आर्थिक पत्रकावर सह्या केल्यास C.A ठरणार दोषी

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अ‍ॅक्टप्रमाणे सीएंनी करायच्या कामकाजावर काही बंधने घातली आहेत. कायद्याच्या परिशिष्ट क्र. 2 मध्ये नमूद केलेली आहेत. ज्यामध्ये विशिष्ट रूपाने चार्टर्ड अकाउंटंट कुठल्या पत्रकावर स्वाक्षर्‍या करू शकतात याबाबतचा खुलासा केला आहे. बर्‍याचदा ऑडिट केलेले नसून सुद्धा बँका आर्थिक पत्रकांवर सीए च्या स्वाक्षरीचा आग्रह करतात.
त्यामुळेprepared on the basis of information received असा शेरा टाकून सीए मंडळींना त्या आर्थिक पत्रकावर सह्या करण्याची विनंती करण्यात येते. वरील नमूद केलेल्या कायद्यानुसार आर्थिक पत्रे लेखा परीक्षण केल्याशिवाय त्या सनदी लेखापाल (सीए) अथवा त्याच्या भागीदाराला प्रमाणित करता येणार नाहीत. म्हणजे जर सीएने ऑडिट केले नसेल, तर त्या Balnce sheet वर स्वाक्षरी करता येणार नाही. तसे केल्यास तो सीए दोषी मानला जाईल. अंदाजे आर्थिक पत्रके वा प्रोेजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी किंवा भविष्यातील व्यवहारावर मिळणारी कमाई दाखवण्यासाठी (estimated / project financial statements) जर सीए अथवा त्याचा भागीदार, ती पत्रके प्रमाणित करत असल्यास, तो सीए दोषी मानला जाईल. काहीफसव्या बुद्धीच्या लोकांचा चार्टर्ड अकाउंटंचे शिक्के आणि खोटी स्वाक्षरी बनविण्याच्या गुन्ह्याचा वाढता कल दिसून येतो. यावर आळा बसवण्यासाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफइंडिया लेखाशास्त्र व्यवसायाच्या नियामकांनी एक सक्रिय पाऊल म्हणून युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर र्(udin) आणला आहे. यामुळे सर्व प्रमाणित, सत्यापित केलेली पत्रके (udin) पोर्टलवर जावून त्याची खात्री संबंधितांना करता येईल. सर्व चार्टर्ड अकाउंटंट 1 जानेवारी 2019 पासून सर्व प्रमाणपत्र (udin) पोर्टलवर नोंदणीकृत करणे अनिवार्य आहे. सदर नियम व अटींची दखल सर्व संबंधितांनी घ्यावी असे आवाहन सातारा चार्टर्ड अकाउंटंट सभासद यांच्या हिताच्या दृष्टीने सातारा शाखेकडून करण्यात आले आहे.


बुधवार, १८ मार्च, २०२०

ढेबेवाडी: पाटण तालुक्यात कोरोनाचा रूग्ण नसल्याचा आरोग्य विभागाचा निर्वाळा



ढेबेवाडी : कोरोनाचे काही संशयीत रुग्ण सापडल्याची परिसरात अफवा आहे. असा रुग्ण पूर्ण तालुक्‍यात नाही. अशी माहिती पाटण तालुका आरोग्य अधिकारी आर. बी. पाटील यांनी दिली. कोरोनाचे रुग्ण सापडल्याची अफवा पसरली होती. येथील ग्रामीण रुग्णालयासह परिसरातील विविध आरोग्य केंद्रात लोक मोबाईलवरून संपर्क साधून त्याबद्दल जाणून घेत होते. मात्र ती निव्वळ आफवाच असल्याचे स्पष्ट झाले.

त्याबाबत पाटण तालुका आरोग्य अधिकारी पाटील म्हणाले,'पाटण तालुक्‍यात कोरोनाचा एकही संशयीत रुग्ण आढळलेला नाही. यात्रा किंवा नोकरीनिमित्ताने परदेशी गेलेले तालुक्‍यातील नागरिक घरी परतलेले आहेत, त्यांची विमानतळावर तपासणी झाली आहे. त्यानंतरच त्यांना घरी पाठवले आहे. त्यापैकी कुणालाही सर्दी,खोकला,ताप असा त्रास नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही'. अफवांवर विश्वास ठेवू नये असेही सांगितले.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...