रविवार, २२ मार्च, २०२०

'कलम १४४' अंतर्गत महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केलं ते कलम नेमकं आहे तरी काय?

सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केले जाते. जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देतो. जमावबंदी लागू केल्यानंतर 4 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एका ठिकाणी जमू शकत नाहीत. तसेच शस्त्र घेऊन जाण्यास देखील बंदी असते.

कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकतात. त्या व्यक्तीला कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत अटक करण्यात येते. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्याला 1 वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र या शिक्षेसाठी जामीन मिळतो.

सीआरपीसी म्हणजेच भारतीय दंड विधान (Code of Criminal Procedure, 1973) भारतातील गुन्ह्यांसाठी कायदे आहेत.हे 1973 ला पारित करण्यात आले व 1 एप्रिल 1974 मध्ये लागू करण्यात आले. एखाद्या गुन्ह्यात आरोपी आणि पिडितासाठी जी प्रक्रिया राबवली जाते ती सीआरपीसीमध्ये देण्यात आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...