मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

प्रा. कु. तेजश्री जाधव यांची ‘कृषी अधिकारीपदी निवड.

प्रा. कु. तेजश्री जाधव यांची ‘कृषी अधिकारीपदी  निवड.

दौलतनगर : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या प्रतिष्ठेच्या परीक्षेत यांनी घवघवीत यश संपादन करत ‘कृषी अधिकारी’ (Agriculture Officer) पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय यशामुळे दौलतनगर परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्या सध्या येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल (अध्यक्ष, मोरणा शिक्षण संस्था) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी प्रा. जाधव यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या भावी प्रशासकीय वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

तसेच, चे चेअरमन , युवा नेते , तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीनेही त्यांचे कौतुक करण्यात आले.

या गौरवास्पद यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य , सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्रा. तेजश्री जाधव यांच्या या यशामुळे महाविद्यालय व संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


प्रेरणादायी वाटचाल

ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे हे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. परिश्रम, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत व्यक्त होत आहे.

प्रा. कु. तेजश्री जाधव यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 

बनपुरीत एस.एस.सी. विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न.

बनपुरीत एस.एस.सी. विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न.

बनपुरी : येथील श्री नाईकबा विद्यामंदिर येथे दहावी (एस.एस.सी.) परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला एस.एस.सी. शुभचिंतन, वार्षिक पारितोषिक वितरण व नुतन जिल्हा परिषद सदस्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना प्रेरणा, आत्मविश्वास आणि सकारात्मक उर्जा देणारा हा कार्यक्रम विशेष ठरला.

कार्यक्रमाला नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्या प्रमुख उपस्थित होत्या. तसेच अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य (माजी सहसचिव प्रशासन, श्री स्वामी समर्थ विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) होते. युवा उद्योजक , सरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष , नाईकबा यात्रा कमिटी अध्यक्ष , मा. आनंदराव कंक आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात विधीवत सरस्वती पूजनाने करण्यात आली. मुख्याध्यापक श्री. कोळी एस. बी. यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले.

“परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक विचार हीच यशाची गुरुकिल्ली आहे,”
असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.

यावेळी मा. मृणालताई पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शिस्त, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावेत, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आर. के. भोसले यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासातील सातत्य, वाचनाची सवय आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे यश निश्चित मिळते, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात शाळेतील गुणवंत व विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांचा सत्कार होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि वातावरण भारावून गेले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश लोंढे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. शेख टी. एच. यांनी मानले. शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकूणच, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा आणि यशाचा आत्मविश्वास जागवणारा हा शुभचिंतन सोहळा बनपुरीत संस्मरणीय ठरला. 

पाटणचा पुढचा ‘सत्ता कर्णधार’ कोण? सभापती-उपसभापतीपदावरून जोरदार चर्चा! १३ जागांचा भक्कम बहुमत… पण सभापती कोण? पाटणमध्ये राजकीय सस्पेन्स शिगेला!

 पाटणचा पुढचा ‘सत्ता कर्णधार’ कोण? सभापती-उपसभापतीपदावरून जोरदार चर्चा!

पाटण - पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यश संपादन केले आहे. तालुक्यातील १४ गणांपैकी तब्बल १३ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने स्पष्ट बहुमत सिद्ध केले, तर केवळ १ सदस्य भाजपाकडून निवडून आला आहे. या भक्कम जनादेशानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांकडे.


🔶 सभापतीपदासाठी ‘सर्वसाधारण महिला खुला’ आरक्षण

यंदा पंचायत समिती सभापतीपदासाठी सर्वसाधारण महिला (खुला) प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील निवडून आलेल्या महिला सदस्यांमध्ये चुरस वाढली आहे.

सभापतीपदाच्या शर्यतीत पुढील नावे चर्चेत आहेत –

  • विद्या शिंदे (येराड गण)
  • सविता पवार (मुरूड गण)
  • अर्चना पाटील (मल्हारपेठ गण)
  • प्रियांका देसाई (मारूल हवेली गण)

या चारही सदस्यांनी आपल्या-आपल्या गणात भक्कम विजय मिळवत संघटन कौशल्य आणि जनसंपर्काची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे यापैकी कोणाला संधी मिळणार? याबाबत तालुक्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी आणि पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


🔷 उपसभापतीपदासाठी सचिन यादव आघाडीवर?

दरम्यान, उपसभापती पदासाठी ढेबेवाडी विभागातील कुंभारगाव गणातून निवडून आलेले सचिन यादव यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्तरावर त्यांना व्यापक पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. संघटन बांधणी आणि कार्यकर्त्यांशी सलोखा यामुळे त्यांचे नाव पुढे येत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.


 तालुक्याचे लक्ष एका निर्णयाकडे

पाटण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असले तरी सभापती आणि उपसभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ही निवड केवळ पदाची नसून, पुढील पाच वर्षांच्या सत्तेच्या समीकरणांची दिशा ठरवणारी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि हालचाली वाढल्या आहेत.

अंतिम शिक्कामोर्तब कोणाच्या नावावर होते आणि पाटण पंचायत समितीच्या सत्तेचा कारभार कोणाच्या हाती जातो!हे थोड्या दिवसात स्पष्ट होईल.

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

शिंदेवाडी येथे नवनिर्वाचित प्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात.

 शिंदेवाडी येथे नवनिर्वाचित प्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात.


दिनांक – 15 फेब्रुवारी 2026 शिंदेवाडी, चोरगेवाडी व आंबवडे परिसरात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या कु. मृणाल महेश पाटील आणि पंचायत समिती सदस्या सौ. संपदा संदीप जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात हा सोहळा संपन्न झाला.

सत्कारावेळी बोलताना कु. मृणाल पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही जिल्हा परिषद निवडणूक सोपी नव्हती. माझ्या विरोधात तगड्या उमेदवार होत्या. मात्र या भागात पालकमंत्री ना. श्री. शंभूराज देसाई साहेबांनी केलेल्या विकासकामांमुळे मतदारांनी विकासाला कौल देत मला आणि आमच्या गटातील दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले.”

त्यांनी पुढे सांगितले की, श्री. रविराज देसाई दादा, कारखान्याचे चेअरमन श्री. यशराज देसाई दादा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे वडील श्री. महेश पाटील साहेब यांच्या व्यापक जनसंपर्कामुळे ही निवडणूक सुलभ झाली. “आपण मला निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते आणि आपल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा पूर्ण प्रयत्न करेन,” असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी उद्योजक महेश पाटील साहेब, मनोज मोहिते बापू, शिवाजीराव शेवाळे आण्णा, जयवंत जानुगडे तात्या, विकास गिरीगोसावी, सुरेश सपकाळ, विक्रम जगदाळे, संदीप जाधव, लोकनियुक्त सरपंच मनोज पाटील, एकनाथराव जाधव, नाना साबळे, अतुल कंक, राजेंद्र हनबर, माजी सरपंच कृष्णात सुर्वे तसेच आंबवडे गावचे सरपंच, सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

“समर्थनात मिळालेल्या व विरोधात पडलेल्या प्रत्येक मताचा सन्मान जनसेवेच्या माध्यमातून राखला जाईल” - मृणालताई महेश पाटील.“मी तुमची लेक आहे…” — शब्द नव्हते ते नातं होतं; मंद्रुळकोळेत मृणालताईंचा ऐतिहासिक विजय

“मी तुमची लेक आहे…” — शब्द नव्हते ते नातं होतं; मंद्रुळकोळेत मृणालताईंचा ऐतिहासिक विजय

समर्थनात मिळालेल्या व विरोधात पडलेल्या प्रत्येक मताचा सन्मान जनसेवेच्या माध्यमातून राखला जाईल” — हा केवळ निवडणूकपश्चात दिलेला शब्द नव्हता, तर मंद्रुळकोळे गटातील जनतेशी बांधलेलं एक पवित्र नातं होतं.आणि या नात्यालाच जनतेनं मतांच्या रूपाने कौल दिला.


मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यांनी मिळवलेला विजय हा आकड्यांचा नव्हता, तर विश्वासाचा, भावनेचा आणि लेकीवर ठेवलेल्या भरोशाचा विजय होता.
जिल्हा परिषदेत निवडून गेलेल्या सर्वात कमी वयाच्या महिला उमेदवार म्हणून मृणालताईंनी इतिहास रचला आणि भाजपच्या तगड्या उमेदवार प्राची नरेंद्र पाटील यांना पराभवाचा धक्का दिला.

मतदान नव्हतं, आशेचं दान होतं…

साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूजशी संवाद साधताना मृणालताई म्हणाल्या,
“जनतेनं मला दिलेली संधी मी आयुष्यभर जपणार आहे. माझ्या बाजूने पडलेलं असो वा विरोधात — प्रत्येक मत माझ्यासाठी तितकंच पवित्र आहे. त्या प्रत्येक मताचा सन्मान मी माझ्या कामातून करेन.”

हे शब्द ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळलं — कारण जनतेनंही या निवडणुकीत मत नव्हे, तर आपली अपेक्षा, आपलं भविष्य आणि आपली लेक मतपेटीत टाकली होती.

विकासाच्या वाटेवरची लेक

पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या भागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य — विकासाची पायाभरणी मजबूत झाली.
“बरंच काम झालं आहे, काही कामं सुरू आहेत आणि जे अपूर्ण आहे ते पूर्ण करणं हीच माझी खरी कसोटी आहे,” असे सांगताना मृणालताईंच्या शब्दांत आत्मविश्वासही होता आणि जबाबदारीची जाणीवही.

वडिलांचा संस्कार, लेकीचा संकल्प

या विजयामागे मृणालताईंचे वडील उद्योजक महेश पाटील यांची निस्वार्थ सेवा, प्रचंड लोकसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी भक्कम आधार ठरली.
“आजपर्यंत माझ्या वडिलांनी या भागातील जनतेची सेवा केली, कोणताही स्वार्थ न ठेवता. त्या सेवेची परंपरा पुढे नेणं हीच माझी खरी ओळख असेल,” असे सांगताना मृणालताईंचा स्वर क्षणभर थरथरला.

“मी फक्त बनपुरीची लेक नाही…”

निवडणूक प्रचारादरम्यान मृणालताईंनी केलेलं आवाहन आजही प्रत्येक घरात चर्चेचा विषय आहे —
मी आता फक्त महेश पाटलांची किंवा बनपुरीची लेक राहिलेली नाही. मी या संपूर्ण विभागाची लेक म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. लेकीलाच आईवडिलांच्या घराची काळजी असते… मला सेवेची संधी द्या.

या शब्दांनी मंद्रुळकोळे गटातील मने जिंकली.

मंत्र्यांची साद आणि जनतेचा हुंकार

या भावनिक लढ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली साद निर्णायक ठरली —
“एक वेळ मला विधानसभेला मतदान करू नका, पण गट-तट विसरून तुमच्या लेकीच्या पाठीशी उभे राहा,” असे आवाहन त्यांनी केलं.
आणि जनतेनं ते मनावर घेतलं.

हा विजय एका घराचा नाही, संपूर्ण गटाचा आहे

भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल मृणालताईंनी मंद्रुळकोळे गटातील मतदार बंधू-भगिनींचे हात जोडून आभार मानले.
हा विजय सत्ता मिळवण्याचा नसून सेवेची जबाबदारी स्वीकारण्याचा आहे.

आज मंद्रुळकोळे गटात एक नवा विश्वास उगवला आहे —
लेक जिंकली आहे… आणि लेक कधीही आपल्या माणसांना विसरत नाही

मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

*कोयना दौलतची रणनिती निर्णायक! भाजपचा एकहाती डाव फसला, मंत्री देसाईंच्या भूमिकेवर जिल्हा परिषद सत्तेचा किल्ला*

कोयना दौलतची रणनिती निर्णायक! भाजपचा एकहाती डाव फसला, मंत्री देसाईंच्या भूमिकेवर जिल्हा परिषद सत्तेचा किल्ला 🔥

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान “पालकमंत्री कोणीही असूदे” अशी उपरोधिक टिप्पणी करत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना वारंवार डिवचले. मात्र, आता निकालानंतरचे राजकीय चित्र पाहता जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी देसाई यांचीच भूमिका निर्णायक ठरली आहे—हेच वास्तव समोर आले आहे.

जिल्हा परिषदेत एकूण ६५ गट असून बहुमतासाठी ३३ जागांची आवश्यकता आहे. निकालात भारतीय जनता पार्टी ला केवळ २७ जागा मिळाल्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस – २०, शिवसेना – १५, काँग्रेस – १, स्वाभिमानी पक्ष – १ अशी एकूण ३७ जागांची आघाडी तयार झाली आहे.
➡️ थोडक्यात, भाजपला स्वबळावर सत्ता मिळवण्यापासून रोखण्यात राष्ट्रवादी–शिवसेनेला यश आले आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच भाजपने महायुतीतील घटक पक्षांना डावलण्याची भूमिका घेतली. उलट, त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला. याच पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या महायुतीच्या बैठकीकडे भाजपच्या वरिष्ठांनी पाठ फिरवली.
याला प्रत्युत्तर म्हणून कोयना दौलत या देसाई यांच्या निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आला.
कोयना दौलतवर झालेल्या बैठकीत मंत्री मकरंद पाटील, खा.नितीन पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

 या बैठकीत जिल्हा परिषद निवडणूक एकत्रित लढण्याचा ठोस निर्णय झाला. त्यानुसार मतदारसंघनिहाय रणनिती ठरवण्यात आली—आणि त्याचे स्पष्ट पडसाद निकालात उमटले.

आता राष्ट्रवादी (२०) + शिवसेना (१५) = ३५ हे संख्याबळ सत्तेसाठी पुरेसे ठरत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील सत्ता कोयना दौलतवरील वाटाघाटी, समन्वय आणि रणनितीवरच अवलंबून राहणार, हे निश्चित आहे.

पाटणमध्ये सत्ता बदलली नाही—ती अधिक भक्कम झाली; आणि ‘शंभूराज देसाई पॅटर्न’ने तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला.


पाटणवर ‘शंभूराज देसाई पॅटर्न’ची सत्ता! पाटणकर गटाचा बालेकिल्ला जमीनदोस्त – शिवसेनेचा एकतर्फी भगवा फडकला


पाटण :साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज.
पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचा ‘शंभूराज देसाई पॅटर्न’ अक्षरशः फुल्ल चालला असून, पाटणकर गटाचा राजकीय सुपडा साफ झाल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच पाटणकरांच्या तथाकथित बालेकिल्ल्याला सुरुंग लागला असून, जनतेने निर्णायक कौल देत पालकमंत्री यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.

७ जिल्हा परिषद गटांपैकी ६ गटांवर शिवसेना–देसाई गटाने मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर भाजप–पाटणकर गटाला केवळ म्हावशी गटात कसाबसा विजय मिळवावा लागला. पंचायत समितीच्या १४ गणांपैकी १३ गणांवर मंत्री शंभूराज देसाई गटाचा भगवा फडकला, तर भाजपला फक्त एका म्हावशी गणावर समाधान मानावे लागले. हा निकाल म्हणजे पाटण तालुक्यातील सत्तासमीकरणांवरचा थेट ‘जनतेचा स्ट्राईक’ मानला जात आहे.

भाजपमध्ये प्रवेशानंतर पाटणकर गट मंत्री देसाई यांची घोडदौड रोखेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात देसाई गटाची वज्रमुठ अधिकच घट्ट झाली. या निवडणुकीत भाजपकडून , , यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. त्यामुळे जोरदार टक्कर अपेक्षित होती; पण पाटणकर जनतेने भाजपला स्पष्ट नकार देत देसाई यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला.

या निकालानंतर पाटण तालुक्यात विजयाचा गुलाल, ढोल-ताशे आणि जल्लोष उसळला. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. हा विजय केवळ संख्याबळाचा नाही, तर विकास, कामगिरी आणि नेतृत्वावर विश्वास दाखवणारा जनादेश आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
थोडक्यात, पाटणमध्ये सत्ता बदलली नाही—ती अधिक भक्कम झाली; आणि ‘शंभूराज देसाई पॅटर्न’ने तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला.

प्रा. कु. तेजश्री जाधव यांची ‘कृषी अधिकारीपदी निवड.

प्रा. कु. तेजश्री जाधव यांची ‘कृषी अधिकारीपदी  निवड. दौलतनगर : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झ...