-पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून* *काळगाव लघु पाटबंधारे तलाव- योजनेला* व्दितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता. पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्य.
दौलतनगर दि.22:- पाटण विधानसभा मतदारसंघातील काळगाव लघु पाटबंधारे तलाव अंतर्गत काळगाव गावाजवळील साखरी ओढयावर मातीचे धरण बांधण्यात आले असून या तलावामध्ये जादा पाणीसाठा होऊन या तलावामधील पाणीसाठयामधून काळगाव लघु पाटबंधारे तलावाचे परिसरातील गावांना शेतीसाठी पाणी मिळण्याकरीता काळगाव विभागाचेवतीने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. सुधारित प्रशासकीय अहवाल मान्यतेसाठी महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा विभागाकडे सादर केल्यापासून सतत पाठपुरावा केला असुन अखेर ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांना यश येवून जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकल्पासाठी 47.88 कोटी खर्चास व्दितीय प्रशासकीय मान्यता दिली असल्याचा शासन निर्णय जलसंपदा विभागाने नुकताच पारित केला असल्याची माहिती काळगाव पंचायत समिती गणाचे सदस्य पंजाबराव देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, काळगाव लघु पाटबंधारे तलाव हा प्रकल्प पाटण तालुक्यातील काळगाव गावाजवळील स्थानिक ओढा साखरी नाल्यावर असून सदर धरणाच्या कामास 25 वर्षापूर्वी सुरुवात झाली. तसेच धरणामध्ये पाणीसाठा करण्यात येत आहे.या प्रकल्पामध्ये एकूण 2.692 दलघमी इतका पाणीसाठा होत असून यामध्ये 2.562 इलघमी इतका पाणी साठा उपयुक्त आहे. दरम्यान सन 2011 नंतर निधीअभावी सदर धरणाचे काम बंद होते.दरम्यान ना.शंभूराज देसाई यांचेकडे काळगांव, भरेवाडी, लोहारवाडी, येळेवाडी,कुठरे,वाझोली,धामणी,सु
सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार काळगाव लघु पाटबंधारे तलावाचे परिसरातील 316 हे.क्षेत्र सिंचनाखाली येणार असून मुख्यत्वे काळगांव, भरेवाडी, लोहारवाडी, येळेवाडी व लीटलेवाडी या 5 गावांचा विकास होणार आहे. सद्य:स्थितीत प्रकल्प सुप्रमा मंजुर होताच ना.शंभूराज देसाई यांचे निर्देशानुसार काळगाव लघु पाटबंधारे तलावाच्या डाव्या पोहोच रस्ता तसेच को. प. बंधा-याच्या कामासही सुरुवात करणेत आलेली आहे. तसेच मंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडुन उर्वरित सांडवा कामे, मुख्य सिंचन विमोचक उजवा पोहोच रस्ता, उर्वरित को. प.बंधारा क्र. 4 ची इ. कामांच्या निविदा ही लवकरात लवकर करणेबाबत च्या सुचना पाटबंधारे विभागास देणेत आलेल्या आहेत. या प्रकल्पामुळे काळगाव भागामध्ये मोठ्या हरित क्रांतीमुळे शेतक-यांना पाण्याचा फायदा होवून लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. यासाठी काळगाव भागातील शेतकरी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांचे आभार मानत असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.