गुरुवार, ५ मार्च, २०२६

अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी रेखाटले महाराजस्व अभियानाचे पोस्टर.

तळमावले/वार्ताहर शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात होत असून हे अभियान शनिवार दि.7 मार्च, 2026 रोजी ढेबेवाडी, कुठरे, तळमावले या ठिकाणी होत आहे. हे अभियान पोहोचवण्यासाठी व त्याचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाटणचे तहसिलदार अनंत गुरव यांचे मार्गदर्शन आणि संकल्पनेनुसार तालुक्यातील अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांच्याकडून पोस्टर रेखाटून घेतले आहे. या पोस्टरमधील अक्षरे आणि छोटे लोगो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या चित्राचे तहसिलदार अनंत गुरव यांनी कौतुक केले आहे. या समाधान शिबीरात प्रलंबित फेरफार काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, लोकसेवा कायद्यानुसार सेवा, महसुल सुधारणाबाबत मार्गदर्शन, डिजिटल 7/12 जनजागृती, म.ज.न.संहिता 1966 मधील बदल इ.सेवा देण्यात येणार आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय पाटण, मंडळ अधिकारी, ग्राम महसुल अधिकरी व इतर सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिध्द असलेले अक्षरगणेशाकार संदीप डाकवे हे चांगले लिखाण ही करतात. त्यांनी शासनाच्या विविध योजनांवर विपुल लेखन केले आहे. यामध्ये महात्मा गांधी तंटाममुक्ती अभियान, बचत गट, जलयुक्त शिवार अभियान, लेक वाचवा, कृषी योजना, व्यसनमुक्ती इ.विविध अभियानावर लेखन केले आहे. केवळ लेखन न करता त्याला आपल्या कलात्मक संकल्पनेतून चांगली प्रसिध्दीही दिली आहे. यासाठी त्यांनी पोस्टर प्रकाशन, प्रसिध्द बातम्यांच्या कात्रणांचे प्रदर्शन, हस्तलिखित, व्यंगचित्रे इ.गोष्टींचा खुबीने वापर केला आहे. संदीप डाकवे यांनी जलयुक्त शिवार अभियानावर लिहलेल्या लेखांचे पुस्तक तत्कालिन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, आ.शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व अन्य मान्यवर यांनी केले आहे. शासनाच्या विविध योजना सातत्याने लोकापंर्यंत प्रभावीपणे पोहवण्याचे काम करत असलेल्या अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांच्या या अभिनव पोस्टरचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होवून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोपे व तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानावर लिखाण : स्वच्छ सर्वेक्षण लीग 2026 या विषयावर पत्रकार संदीप डाकवे सध्या लेखन करीत आहेत. यंदा या अभियानाला व्यापक प्रसिध्दी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या लेखमालेचे आतापर्यंत 30 भाग प्रसिध्द झाले असून या लेखमालेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १" : ७ मार्चपासून पाटण तालुक्यात भव्य प्रारंभ!


साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज पाटण - 

पाटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे २०२६ या कालावधीत राज्यभर "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १" राबविण्यात येणार असून त्याची सुरुवात शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ पासून होत आहे.

महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढणे, नवीन तरतुदींची जनजागृती करणे आणि डिजिटल सेवांचा प्रभावी वापर वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी श्री. सोपान टोंपे साहेब व तहसीलदार श्री. अनंत गुरव साहेब यांनी केले आहे.


 पाटण तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक

१️⃣ शनिवार, ७ मार्च २०२६ – ढेबेवाडी, कुठरे, तळमावले
२️⃣ शनिवार, १४ मार्च २०२६ – मल्हारपेठ, मारूल हवेली, चाफळ
३️⃣ शुक्रवार, १० एप्रिल २०२६ – म्हावशी,आवरडे तारळे

४️⃣ शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ – येराड, हेळवाक, मोरगिरी, मरळी,

५️⃣ शुक्रवार, ८ मे २०२६ – पाटण (नगरपरिषद हद्द)


६️⃣ शुक्रवार, १५ मे २०२६ – पाटण (ग्रामीण)


 शिबिरामध्ये उपलब्ध सेवा

🔹 प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे
🔹 अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क
🔹 लोकसेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा
🔹 अकृषक तरतुदीबाबत मार्गदर्शन
🔹 भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणे अद्ययावत करणे
🔹 Ease of Doing Business सुधारणा व नगरी सुविधा
🔹 ई-मोजणी सेवा
🔹 अॅग्रीस्टॅक नोंदणी
🔹 पी.एम. किसान योजना सेवा
🔹 तक्रार निवारण सेवा

 विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा

✔ रहिवासी दाखला

✔ उत्पन्न दाखला

✔ जात दाखला

✔ इतर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे

✔ लोकसेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा

या शिबिरामध्ये महसूल विषयक सेवांसोबतच शैक्षणिक दाखले (उदा. रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात दाखला इ.) काढण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेच्या वेळी होणारी धावपळ आता थांबणार आहे.

कॉलेज प्रवेश, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा आणि इतर शैक्षणिक कारणांसाठी आवश्यक असलेले दाखले आता आपल्या गावातच, एका दिवसात मिळणार असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



 अभियानाचे उद्दिष्ट

✔ महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांना Single Day Service Delivery
✔ महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी
✔ डिजिटल सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करणे
✔ नागरिकांना शासन सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देणे


प्रशासनाचे आवाहन

“तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने या शिबिरात सहभागी होऊन आपल्या महसूल विषयक समस्या त्वरित सोडवून घ्याव्यात,” असे प्रांताधिकारी श्री. सोपान टोंपे साहेब व तहसीलदार श्री. अनंत गुरव साहेब यांनी स्पष्ट केले आहे.

राजस्व प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचविण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून पाटण तालुक्यातील जनतेसाठी ही सुवर्णसंधी आहे.

 नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह नियोजित ठिकाणी उपस्थित राहावे आणि शासनाच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

कुंभारगावात वार्ड रचनेवरून संताप! तलाठींची मनमानी? ग्रामस्थ आक्रमक.

कुंभारगाव ता. पाटण  – ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर नव्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच वार्ड रचनेवरून कुंभारगावात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वार्ड रचना बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 पूर्वीची रचना कुंभारगाव ग्रामपंचायतीत एकूण ११ सदस्य आणि ४ वार्ड आहेत –
श्रीराम वार्ड
लक्ष्मी वार्ड
मरीआई वार्ड
नाईकबा वार्ड
मागील पंचवार्षिक निवडणुकीत –

श्रीरामवार्ड, लक्ष्मीवार्ड, मरीआई या प्रत्येक वार्डातून ३ सदस्य
नाईकबा वार्डातून २ सदस्य
अशी रचना होती.

  यंदा करण्यात आलेल्या बदलानुसार –
श्रीराम – ३ सदस्य
मरीआई – ३ सदस्य
नाईकबा – ३ सदस्य
लक्ष्मी – २ सदस्य
अशी नवीन विभागणी करण्यात आली आहे.

याबाबत भैरव दरा हा लक्ष्मीवार्ड मध्ये असलेला भाग लक्ष्मी वार्डातच राहावा या वार्डाला नाईकबा वार्ड मध्ये सामील केले आहे याबाबत भैरवडा येथील ग्रामस्थांना विश्वासात न देता हा निर्णय घेतलेला आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या
वार्ड रचनेबाबत कोणतीही पूर्वसूचना, नोटीस  देण्यात आली नाही.
नाईकबा वार्डातील मतदार संख्या कमी आहे कारण देत बदलाबाबत कोणतीही चर्चा न करता निर्णय लादण्यात आला.
हा निर्णय एकतर्फी आणि मनमानी पद्धतीने घेण्यात आल्याने लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाला आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर एका ग्रामस्थाने सांगितले की,“नाईकबा वार्डातील बदल आम्हाला मान्य नाही. आम्ही लवकरच तहसीलदार साहेबांकडे लेखी तक्रार अर्ज देणार आहोत. अर्ज दिल्यावर नाव छापा.”

याबाबत तलाठी बाळासाहेब गायकवाड साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही केवळ “कच्ची चिठ्ठी” असल्याचे सांगितले. नाईकबा वार्डातील बदलाबाबत विचारले असता त्यांनी,
“तुमचे तलाठी आकाश गुरव आहेत, त्यांना विचारा. ग्रामस्थांना का कळवले नाही ते तेच सांगतील,”
असे उत्तर दिल्याचे समजते.

दरम्यान, दोन तलाठींच्या परस्पर जबाबदारी ढकलण्याच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये अधिक संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांकडून लवकरच तहसीलदार, पाटण यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली जाणार असल्याचे समजते. जर प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही, तर गावात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
कुंभारगावातील ही वार्ड रचना प्रकरण आता केवळ प्रशासकीय निर्णय न राहता लोकशाही हक्क आणि पारदर्शकतेचा प्रश्न बनला आहे.
ग्रामस्थांचा आक्रोश वाढत असताना प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

मानखुर्द महाराष्ट्र नगरमध्ये पाणीटंचाईचा स्फोट!शिवप्रेरणा वेल्फेअर असोसिएशनचे थेट एम वॉर्ड मुख्य जलअभियंत्याकडे निवेदन.

 
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांचे हाल अपरंपार वाढले आहेत. विशेषतः शिवप्रेरणा  वेल्फेअर असोसिएशन, विजय लक्ष्मी चाळ, विश्वकर्मा चाळ, राजगड चाळ या भागांतील रहिवाशांना या पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे.

नळाला अनियमित व कमी दाबाने पाणी येणे, काही वेळा अनेक दिवस पाणीपुरवठा खंडित राहणे, यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवप्रेरणा वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष संभाजी थोपटे व सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अंकुश चोरघे यांनी थेट च्या एम वॉर्ड कार्यालयात जाऊन मुख्य जलअभियंता मा. ढवळे साहेब यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन सादर करून महाराष्ट्र नगर परिसरातील पाणी समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले. नागरिकांच्या रोजच्या हालअपेष्टा, अस्वच्छ पाण्याचा धोका याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली.

मुख्य जलअभियंता मा. ढवळे साहेब यांनी या निवेदनाची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच आजच संबंधित विभागाचे अभियंते (S.E) व (J.E) यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांनी या हालचालीचे स्वागत केले असून, प्रशासनाने दिलेले आश्वासन लवकरात लवकर कृतीत उतरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मानखुर्द महाराष्ट्र नगरातील पाणीप्रश्नावर आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाटणच्या खोऱ्यात तीर्थ क्षेत्र श्री धारेश्वर मठ(मंदिर).

तळमावले = श्री क्षेत्र धारेश्वर मठ (मंदिर) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दिवशी खुर्द येथे हे मठ (मंदिर) आहे हे पाटण पासून 17 किलोमीटर अंतरावर आहे याचे वैशिष्ट्य हे अत्यंत जागृत आणि रहस्यमय स्वयंभू महादेवाचे स्थान मानले जाते या ठिकाणी निसर्ग रम्य वातावरण आहे उंच डोंगर कपारीत तीर्थक्षेत्र श्री धारेश्वर मठ (मंदिर) असून पाटण वरून जाताना नागमोडी वळणे असून डोंगराच्या पायथ्यापासून तीव्र घाट चालू होतो ही वेडी वाकडी वळणे घेत उंच ठिकाणी धारेश्वर मठ मंदिर दिसून येतो या उंच डोंगरावर अत्यंत प्राचीन गुफा असून येथे श्रीराम, पाचपांडव, विभि षण, हनुमान, यांनी लिंग पूजा अनुष्ठान केलेले आहे गंगा भगीरथी, गंगोत्री, जमनात्रि कुंड, सप्त जलदेवता, केदारनाथ, लक्ष्मण, वीरभद्र व आदे श्ववर बाबा तीर्थक्षेत्र असून आदीश्वरचरणी शिर अर्पण करून शिव रक्षा मिळवण्यासाठी श्री प्रभूरामानी कपिला षष्ठीस असते तेव्हा पाषाणमई श्रीरामाचे शिरातून व करवत उपक्षेत्रातील धडातून दुग्धगंगा येते त्या पर्वकाळात दुधासारखे असलेले जल हे एरवी साधे पाणी दिसते ते कधी आटत नाही तेजल गुरु तीर्थ म्हणून साठ गाव पाटण परगना विविध प्रांतातील वीरशैव भक्त माहेश्वर तथा भाविक जण आपापल्या गावातील देवांना तसेच घरच्या देव देवतांना अभिषेक करण्याकरता येथील पाणी नेतात संतती -संपत्ती दायक अशा आदी मठ संस्थान धारेश्वर महाशिवतीर्थ क्षेत्रामध्ये पर्यावरण आदी गुरुपीठ असल्याने असल्याने हे "प्रयागसम" पवित्र क्षेत्र आहे राजापूरला गंगा येथे तेव्हा येथील धार कमी होते या धारेच्या पाण्यामुळे त्वचारोग बरे होतात या पाण्याला शेवळ होत नाही येथे गणपती नाही केवळ तो द्वादिश लिंग युक्त कलश गुरु गादी म्हणून परंपरेने आग्र पूजेचा मान आहे श्रीम दुज्जनीय सध्दमृ सिंहासनाचे वृष्टी सूत्र नंदी गोत्रिय नंदी गोत्रिय कक्षिकांत उपसूत्रिय आदिमठ संस्थान श्री धारेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे या मठावर 33 शिवचार्य त्यापैकी 21 शिवचार्यांची समाधी येथील गुफेमध्ये असून पुणे- तीन, ढालगाव तीन, कसबे सागाव- दोन (कागल), कोडोली वारणा - एक, बागलकोट (बाळापुर) एक, शिवनगी - एक, घरेडी (सांगोला)-एक, काशी एक, वगैरे ठिकाणी समाध्या आहेत..
खासदार, मंत्री, तथा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत तीर्थक्षेत्र क आणि ब मधून रस्ते पाणीपुरवठा सार्वजनिक स्वच्छतागृह, सभागृह इत्यादी कामे झालेले आहेत परंतु घाट मार्गाचा विचार करता पूर्ण घाट मार्गावर संरक्षक बॅरगेट लावणे आवश्यक आहे . वार्षिक यात्रा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देव दीपावलीच्या लक्ष दीपोत्सव, मानाची काटेपालखी हे येथील यात्रेचे वैशिष्ट्य आहे .. या ठिकाणी दर महिन्याच्या अमावस्या दिवशी श्री धारेश्वर मठ मंदिरात स्वयंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक, महाआरती केल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यादरम्यान श्री क्षेत्र धारेश्वर देवस्थानचे मठाधीकारी राष्ट्रसंत ज्ञानराज पद्मभास्कर धर्मरक्षक श्री,ष, ब्र,१०८ डॉ, निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज येणाऱ्या भक्तांसाठी उपस्थित राहून समस्या व अडचणी जाणून घेत त्याबाबतीत योग्य मार्गदर्शन करतात , चौकट =. दरमहाआरोग्य,रक्तदान,संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते व ५१ ते५४ गायी वगोवंशाचे योग्य प्रकारे संगोपन केले जाते या पवित्र ठिकाणी शेती आहे परंतु पाण्याअभावी त्या शेतातून विविध प्रकारची पिके घेता येत नाहीत या ठिकाणी विहीर खोदून पाणी मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे पावसाळ्यातील अतिवृष्टी, भूस्खलन मध्ये असलेल्या पूर्वी असलेल्या विहिरी बुजून गेल्या आता २ नवीन विहिरी साठी पंचवीस लाख खर्च केले आहेत वीज व सौर प्रकल्प राबवून शेतीच्या माध्यमातून शेतीचा विकास साधला जाईल असे नूतन मठाअधिपती बालब्रह्मचारी श्री,ष,ब, बालयोगी आदिराज बाबा शिवाचार्य स्वामी यांच्याकडून सांगण्यात आले.

“तहानलेल्या जीवांसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार”सोनवडेतील विद्यार्थ्यांची ‘पक्ष्यांसाठी पाणपोई’—उन्हाळ्यात मानवतेचा हृदयस्पर्शी संदेश.


पाटण :
आजच्या वाढत्या तापमानामुळे माणसांप्रमाणेच पक्ष्यांनाही तीव्र पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे नद्या, ओढे आणि पाणवठे कोरडे पडत असून, पक्ष्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली “पक्ष्यांसाठी पाणपोई” हा उपक्रम हाती घेतला. शाळेच्या परिसरातील झाडांखाली तसेच झाडांवर मातीच्या भांड्यांमध्ये स्वच्छ पाणी आणि धान्य ठेवण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ शाळेपुरतेच मर्यादित न राहता, आपल्या घरासमोरही पाण्याची भांडी ठेवण्याचा संकल्प केला आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी दररोज त्या भांड्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारीही स्वतःवर घेतली आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ एकदिवसीय न राहता सातत्यपूर्ण सेवा कार्य ठरत आहे.
“पक्षी वाचवा, पर्यावरण वाचवा” असा प्रभावी संदेशही यामधून देण्यात आला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शरद शेजवळ सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की,

“अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणप्रेम आणि संवेदनशीलता विकसित होते. लहानशा कृतीतून मोठा बदल घडवता येतो, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.”

उन्हाळ्याच्या तडाख्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी सरसावलेले हे हात खऱ्या अर्थाने मानवतेचे प्रतीक ठरले आहेत. समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा नावीन्यपूर्ण उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या उपक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले असून, विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

तळमावले - संत निरंकारी मिशन मार्फत ग्रामीण रुग्णालय येथे स्वच्छता.

तळमावले 24.02.2026 संत निरंकारी मिशनमार्फत प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन अंतर्गत ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी डॉ. राजेंद्र यादव , डॉ. सौरभ खोडके, ढेबेवाडी ग्रामपंचायतिच्या सरपंच रुपाली पाटील, उपसरपंच अभिजित कडव, आण्णा कारंडे, संत निरंकारी मिशन प्रचारक दीपक कणसे, ढेबेवाडी ब्रँच मुखी उषाताई दिंडे, सेवादल इन्चार्ज अभिजित देशमुख, वनिता बडेकर यांच्यासह ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व संत निरंकारी मिशन अनुयायी यांची उपस्थिती होती. डॉ. राजेंद्र यादव म्हणाले की संत निरंकारी मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. सद्गुरूंच्या शिकवणीतून सर्व अनुयायी स्वयंप्रेरनेने मनोभावे सेवा करत आहेत. ही केलेली सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने केली गेली आहे. संत निरंकारी मंडळ ब्रँच ढेबेवाडी च्या सर्व सदस्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूचा सर्व परिसर स्वच्छ केल्यानंतर दिपक कणसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्संग कार्यक्रम संपन्न झाला. सदर अभियानास ग्रामपंचायत ढेबेवाडी व ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यकामाचे सूत्रसंचलन गोपी जाधव यांनी केले तर आभार उषाताई दिंडे यांनी मानले.

अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी रेखाटले महाराजस्व अभियानाचे पोस्टर.

तळमावले/वार्ताहर शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाच्या दुसऱ्या टप...