शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

कराडमधील उंडाळे परिसरात राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला.

कराडमधील उंडाळे परिसरात राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला.

कराड तालुक्यातील काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला चढवला.

तालुक्यातील शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन घराकडे परत येत असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात अधिराज यांना दुखापत झाली असून ते जखमी आहेत.

कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटातून उदयसिंह पाटील-उंडाळकर हे निवडणूक लढवत आहेत. शुक्रवारी रात्री या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिराज शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले होते. तेथून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ते परत येत होते.

धनाजी पाटील हे त्यांच्यासोबत होते. उंडाळे ते शेवाळेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेत अधिराज पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये अधिराज यांच्या पायाला जखमा झाल्या आहेत.

या घटनेनंतर धनाजी पाटील व अधिराज पाटील हे तातडीने लोकवस्तीत आले. त्यांना उपचारासाठी उंडाळेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

“मी तालुक्याचा मालक नाही, माझी मायबाप जनता मालक आहे!”अजूनही विरोधकांची हाऊस जिरली नसेल, तर ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आणखी मोठ्या फरकाने पराभव पाहायला मिळेल.”विरोधकांना इशारा देत शंभूराज देसाईंचा ढेबेवाडीत तुफान हल्लाबोल.

 “मी तालुक्याचा मालक नाही, माझी मायबाप जनता मालक आहे!”अजूनही विरोधकांची हाऊस जिरली नसेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आणखी मोठ्या फरकाने पराभव पाहायला मिळेल.”

विरोधकांना इशारा देत शंभूराज देसाईंचा ढेबेवाडीत तुफान हल्लाबोल.


विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवा, नाहीतर जनतेकडून चोख उत्तर मिळेल!**

पाटण तालुका म्हणजे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबावर संकट आलं, तर मी ढाल बनून समोर उभा राहीन—अशा ठाम आणि कडक शब्दांत राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

ढेबेवाडी येथील सांगता सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी या तालुक्याचा मालक नाही. माझी मायबाप जनता खरी मालक आहे. देसाई कुटुंबापूर्वी पाटण तालुका माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.”

विधानसभा निवडणुकीतील टीकेचा संदर्भ देताना ना. देसाई म्हणाले, “माझ्यावर आरोप झाले, टीका झाली, पण उत्तर मी दिलं नाही—जनतेनेच दिलं! आणि सत्यजित पाटणकरांचा तब्बल ३५ हजार मतांनी पराभव केला. अजूनही विरोधकांची हाऊस जिरली नसेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आणखी मोठ्या फरकाने पराभव पाहायला मिळेल.”

विरोधकांना थेट आव्हान देताना त्यांनी स्पष्ट सांगितले, “निवडणूक टीकेवर नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर लढूया! तुम्ही किती साकव बांधले? किती शाळा खोल्या उभारल्या? किती गावांना पाणी दिलं? पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले का? रस्ते केले का? आधी याची उत्तरं द्या. माझ्यावर टीका करताना लक्षात ठेवा—माझा एक कार्यकर्ता एकटाच तुम्हाला पुरून उरेल!”

उपमुख्यमंत्री यांच्या कार्यकाळातील लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’, महिलांसाठी एस.टी. प्रवास सवलत अशा योजनांमुळे महायुती सरकारने जनतेचा विश्वास जिंकला असल्याचे सांगितले.

मंद्रुळकोळे गटातील मतदारांना थेट आवाहन करताना ना. देसाई म्हणाले, “जिल्हा परिषदेसाठी मृणाल महेश पाटील, पंचायत समितीसाठी नितीन काळे आणि संपदा पवार यांना मतदान करा. या उमेदवारांना दिलेलं मत म्हणजे थेट शंभूराज देसाईंना दिलेलं मत आहे—हे लक्षात ठेवा!”

या सभेला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जि.प. उमेदवार मृणाल पाटील, पं.स. उमेदवार नितीन काळे, संपदा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे प्रदेश सचिव नरेश देसाई यांनीही शिवसेनेच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.

एकूणच पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आता “विकास विरुद्ध टीका” या थेट मुद्द्यावर रंगली असून, शंभूराज देसाईंच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.



गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०२६

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च.

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने आज दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. सदर रूट मार्च ढेबेवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मंद्रूलकोळे, ढेबेवाडी बाजारपेठ, मालदन, तळमावले बाजारपेठ व कुंभारगाव या गावांमधून काढण्यात आला. निवडणुकीच्या काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती करणे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा रूट मार्च घेण्यात आला. या रूट मार्चमध्ये ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे २ पोलीस अधिकारी, ०७ पोलीस अंमलदार तसेच ४० होमगार्ड जवान सहभागी झाले होते. रूट मार्च दरम्यान नागरिकांशी संवाद साधण्यात आला व शांतता व सहकार्य राखण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन.
सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पावन स्मृतींना आज कराड येथील **प्रितीसंगम** येथे उपमुख्यमंत्री **सुनेत्रा अजित पवार** यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे आगमन झाल्यावर त्यांनी थेट प्रितीसंगम गाठत, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावर आदरभाव आणि कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे जाणवत होती. यावेळी **मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील**, **राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर**, **खासदार सुनील तटकरे**, **खासदार नितीन पाटील**, **माजी खासदार श्रीनिवास पाटील**, **माजी आमदार बाळासाहेब पाटील**, **जिल्हाधिकारी संतोष पाटील**, **पोलीस अधीक्षक तुषार दोशी**, **कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव** कार्याध्यक्ष. संजयजी देसाई यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कराड व प्रितीसंगमाशी असलेले अतूट नाते महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासात अजरामर आहे. त्याच परंपरेचा आदर राखत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या पवित्र स्थळी उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांना महाराष्ट्राच्या राजकारणात स्व. यशवंतराव चव्हाण यांचे योगदान, त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि सामाजिक समतेसाठीचे कार्य यांची प्रकर्षाने आठवण झाली. प्रितीसंगम परिसरात काही काळ गंभीर आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

मालदनच्या मातीत परिवर्तनाचा एल्गार! जनसागर उसळला!..

मालदनच्या मातीत परिवर्तनाचा एल्गार! जनसागर उसळला!..

मालदन परिसरात राजकीय इतिहास घडला! मंद्रूळकोळे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कु. मृणाल महेश पाटील आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार मा. श्री. नितीन दत्तात्रय काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गावोगावातून, वाड्या-वस्त्यांतून आलेल्या जनतेने परिसर फुलून गेला आणि विजयाची नांदी दिली.

या ऐतिहासिक सभेला पालकमंत्री साहेबांनी उपस्थित राहून प्रभावी मार्गदर्शन केले. ढेबेवाडी विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला शब्द आणि उपस्थित जनतेच्या डोळ्यांतील विश्वास — हे दृश्य प्रत्येकाच्या काळजाला भिडणारे होते.

🗣️ सभेत बोलताना उमेदवार नितीन दत्तात्रय काळे यांनी भावना व्यक्त केल्या की,

“ही सभा केवळ राजकीय नव्हती, तर एक कुटुंब म्हणून आपण एकत्र आलो आहोत याची साक्ष होती.”

त्याचबरोबर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कु. मृणाल महेश पाटील व पंचायत समिती गणाचे उमेदवार  श्री.नितीन दत्तात्रय काळे तरुण, अभ्यासू आणि विकासाभिमुख उमेदवार यांच्या पाठीशी उभा असलेला हा जनसागर म्हणजे परिवर्तनाची स्पष्ट ग्वाही आहे.

  • रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षणासाठी ठोस विकास
  • ढेबेवाडी विभागाचा सर्वांगीण कायापालट
  • सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य

मंद्रूळकोळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या लेकीला आणि भावाला साथ द्या!
ही गर्दी, हा उत्साह आणि हा विश्वास एकच सांगतो — विजय निश्चित आहे!

🗳️ निशाणी: 🏹 धनुष्यबाण
📅 मतदान: ७ फेब्रुवारी २०२६

विकासासाठी मतदान करा, परिवर्तनासाठी एकवटून उभे रहा!

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

धावती लोकल पकडताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू **बदलापूर रेल्वे स्थानकात हृदय पिळवटून टाकणारी घटना**

धावती लोकल पकडताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू **बदलापूर रेल्वे स्थानकात हृदय पिळवटून टाकणारी घटना**
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या धावपळीत आज पुन्हा एक जिव निघून गेला. **बदलापूर रेल्वे स्थानक** येथे सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात तरुण महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना सकाळी **8 वाजून 11 मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) लोकल** पकडताना घडली. या अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव **चेतना चंद्रशेखर देवरुखकर (वय 28)** असे आहे. चेतना या बदलापूरमधील जुवेली परिसरात, **जगन्नाथ गॅलेक्सी** या इमारतीत वास्तव्यास होत्या. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. नव्या संसाराची स्वप्नं उराशी बाळगून त्या रोजच्या प्रवासासाठी लोकल पकडायला आल्या आणि क्षणात काळाने घाला घातला. प्रत्यक्षदर्शींनुसार, लोकल स्थानकात शिरत असताना चेतना धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या क्षणी तोल सुटला आणि त्या थेट रेल्वेखाली सापडल्या. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या प्रवाशांना काही क्षण सुचलेच नाही; एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने देवरुखकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाला अवघे वर्ष झाले असताना संसार उध्वस्त झाला; घरात शोककळा पसरली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेतील गर्दी, वेळेची घाई आणि धावती लोकल पकडण्याचा मोह — या साऱ्यांतून पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका निष्पाप जिवाची किंमत आज पुन्हा आपल्याला हादरवून गेली आहे. 🕯️ **चेतना देवरुखकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.** अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रवाशांनी संयम आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

मुंबई–नवी मुंबईत मंद्रुळकोळे गट🔶 शिवसेनेची निर्णायक सविचार सभा – परगावी असलेल्या मतदारांची ताकद एकवटणार!



🔥 मुंबई–नवी मुंबईत मंद्रुळकोळे गट

🔶 शिवसेनेची निर्णायक सविचार सभा – परगावी असलेल्या मतदारांची ताकद एकवटणार!

मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गट व मंद्रुळकोळे–सणबूर पंचायत समिती गणातील आगामी निवडणुका आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या असून, या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात वास्तव्यास असलेल्या मतदारांची भव्य आणि निर्णायक सविचार सभा आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार, नियोजन आणि रणनितीचा केंद्रबिंदू ठरणार असून, ना. श्री. शंभूराजे देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.

✦ उमेदवारांच्या विजयासाठी थेट रणनीती

या सभेत
🔸 कु. मृणाल महेश पाटील – मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गट
🔸 श्री. नितीन दत्तात्रय काळे – मंद्रुळकोळे पंचायत समिती गण
🔸 सौ. संपदा संदीप जाधव – सणबूर पंचायत समिती गण

या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी ठोस भूमिका, नियोजन आणि परगावी असलेल्या मतदारांची निर्णायक जबाबदारी यावर सखोल चर्चा होणार आहे.

✦ युवा नेतृत्वाचा स्पष्ट संदेश

या सविचार सभेला युवा उद्योजक श्री. महेश पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून,
“परगावी असलेले मतदान हेच या निवडणुकीतील गेमचेंजर ठरणार आहे” असा थेट आणि स्पष्ट संदेश या सभेतून दिला जाणार आहे.

✦ एकसंघ शक्तीचे प्रदर्शन

ग्रामीण विकास, जनतेचे प्रश्न आणि मंद्रुळकोळे गटाचे भविष्य या सगळ्यांसाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना भक्कम पाठबळ देण्यासाठी
➡️ मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील मंद्रुळकोळे गटातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जोरदार आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


🗓️ सविचार सभेचा तपशील

📌 दिनांक : रविवार, १ फेब्रुवारी २०२६
वेळ : सकाळी १०.३० वाजता
📍 स्थळ : श्री गणेश मंदिर हॉल, सेक्टर १९,
तीन टाकीजवळ, कोपरखैरणे, नवी मुंबई


🚩 ही सभा म्हणजे प्रचार नव्हे, तर मंद्रुळकोळे गटाच्या भविष्याचा निर्णायक आराखडा आहे!

👉 त्यामुळे एक मत – एक विचार – एकसंघ शिवसेना या ताकदीसाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे!असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कराडमधील उंडाळे परिसरात राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला.

कराडमधील उंडाळे परिसरात राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला. कराड तालु...