मालदन येथे दहावी निरोप समारंभ उत्साहात; मृणालताई पाटील व नितीनदादा काळे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
तर विविध गावांमध्ये आभार दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालदन, ता. पाटण – दहावी निरोप समारंभ व पारितोषिक वितरण
दि.17 फेब्रुवारी मालदन (ता. पाटण) येथील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल, मालदन येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या मा. कु. मृणाल महेश पाटील व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मा. श्री. नितीन काळे (दादा) प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, मेहनत आणि चिकाटी ठेवून उत्तम यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गुणवंत व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.
आभार दौऱ्याला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा परिषद सदस्या मा. कु. मृणाल महेश पाटील व पंचायत समिती सदस्या मा. सौ. संपदा संदीप जाधव यांच्या आभार दौऱ्याला विविध गावांत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केले.
हुंबरने, ता. पाटण
हुंबरने येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ग्रामस्थांनी मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला.
यावेळी गावातील प्रलंबित प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते व इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन देत सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
काहीर, ता. पाटण
काहीर येथेही आभार दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गावातील विविध समस्या व विकासकामांबाबत चर्चा करून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. ग्रामस्थांनी नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या.
आंबेघर, ता. पाटण
आंबेघर येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मान्यवरांनी गावातील अडचणी ऐकून घेतल्या व त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. सर्व ग्रामस्थांनी नव्या नेतृत्वाचे स्वागत करून विश्वास व्यक्त केला.
गोकुळ तर्फ मरळी, ता. पाटण
गोकुळ तर्फ मरळी येथेही आभार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
ग्रामस्थांनी सन्मानपूर्वक स्वागत करत गावाच्या विकासासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित सदस्यांनी सर्व प्रश्नांचा आढावा घेऊन लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
विकासाच्या दिशेने नवी वाटचाल
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या विकासकामे या निवडणुकीत यशाचे गमक असल्याचे जाणवले या संपूर्ण आभार दौऱ्यात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, विश्वास आणि अपेक्षा स्पष्टपणे जाणवत होत्या.
नवनिर्वाचित प्रतिनिधींनी “गाव विकास हीच प्राथमिकता” असल्याचे सांगत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव उपलब्ध राहण्याचा कु. मृणाल महेश पाटील यांनी निर्धार व्यक्त केला.
या दौऱ्यामुळे गावोगावी नव्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.

