बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

मानखुर्द महाराष्ट्र नगरमध्ये पाणीटंचाईचा स्फोट!शिवप्रेरणा वेल्फेअर असोसिएशनचे थेट एम वॉर्ड मुख्य जलअभियंत्याकडे निवेदन.

 
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांचे हाल अपरंपार वाढले आहेत. विशेषतः शिवप्रेरणा  वेल्फेअर असोसिएशन, विजय लक्ष्मी चाळ, विश्वकर्मा चाळ, राजगड चाळ या भागांतील रहिवाशांना या पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे.

नळाला अनियमित व कमी दाबाने पाणी येणे, काही वेळा अनेक दिवस पाणीपुरवठा खंडित राहणे, यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवप्रेरणा वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष संभाजी थोपटे व सामाजिक कार्यकर्ते युवा नेते अंकुश चोरघे यांनी थेट च्या एम वॉर्ड कार्यालयात जाऊन मुख्य जलअभियंता मा. ढवळे साहेब यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन सादर करून महाराष्ट्र नगर परिसरातील पाणी समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले. नागरिकांच्या रोजच्या हालअपेष्टा, अस्वच्छ पाण्याचा धोका याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली.

मुख्य जलअभियंता मा. ढवळे साहेब यांनी या निवेदनाची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच आजच संबंधित विभागाचे अभियंते (S.E) व (J.E) यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांनी या हालचालीचे स्वागत केले असून, प्रशासनाने दिलेले आश्वासन लवकरात लवकर कृतीत उतरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मानखुर्द महाराष्ट्र नगरातील पाणीप्रश्नावर आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाटणच्या खोऱ्यात तीर्थ क्षेत्र श्री धारेश्वर मठ(मंदिर).

तळमावले = श्री क्षेत्र धारेश्वर मठ (मंदिर) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दिवशी खुर्द येथे हे मठ (मंदिर) आहे हे पाटण पासून 17 किलोमीटर अंतरावर आहे याचे वैशिष्ट्य हे अत्यंत जागृत आणि रहस्यमय स्वयंभू महादेवाचे स्थान मानले जाते या ठिकाणी निसर्ग रम्य वातावरण आहे उंच डोंगर कपारीत तीर्थक्षेत्र श्री धारेश्वर मठ (मंदिर) असून पाटण वरून जाताना नागमोडी वळणे असून डोंगराच्या पायथ्यापासून तीव्र घाट चालू होतो ही वेडी वाकडी वळणे घेत उंच ठिकाणी धारेश्वर मठ मंदिर दिसून येतो या उंच डोंगरावर अत्यंत प्राचीन गुफा असून येथे श्रीराम, पाचपांडव, विभि षण, हनुमान, यांनी लिंग पूजा अनुष्ठान केलेले आहे गंगा भगीरथी, गंगोत्री, जमनात्रि कुंड, सप्त जलदेवता, केदारनाथ, लक्ष्मण, वीरभद्र व आदे श्ववर बाबा तीर्थक्षेत्र असून आदीश्वरचरणी शिर अर्पण करून शिव रक्षा मिळवण्यासाठी श्री प्रभूरामानी कपिला षष्ठीस असते तेव्हा पाषाणमई श्रीरामाचे शिरातून व करवत उपक्षेत्रातील धडातून दुग्धगंगा येते त्या पर्वकाळात दुधासारखे असलेले जल हे एरवी साधे पाणी दिसते ते कधी आटत नाही तेजल गुरु तीर्थ म्हणून साठ गाव पाटण परगना विविध प्रांतातील वीरशैव भक्त माहेश्वर तथा भाविक जण आपापल्या गावातील देवांना तसेच घरच्या देव देवतांना अभिषेक करण्याकरता येथील पाणी नेतात संतती -संपत्ती दायक अशा आदी मठ संस्थान धारेश्वर महाशिवतीर्थ क्षेत्रामध्ये पर्यावरण आदी गुरुपीठ असल्याने असल्याने हे "प्रयागसम" पवित्र क्षेत्र आहे राजापूरला गंगा येथे तेव्हा येथील धार कमी होते या धारेच्या पाण्यामुळे त्वचारोग बरे होतात या पाण्याला शेवळ होत नाही येथे गणपती नाही केवळ तो द्वादिश लिंग युक्त कलश गुरु गादी म्हणून परंपरेने आग्र पूजेचा मान आहे श्रीम दुज्जनीय सध्दमृ सिंहासनाचे वृष्टी सूत्र नंदी गोत्रिय नंदी गोत्रिय कक्षिकांत उपसूत्रिय आदिमठ संस्थान श्री धारेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे या मठावर 33 शिवचार्य त्यापैकी 21 शिवचार्यांची समाधी येथील गुफेमध्ये असून पुणे- तीन, ढालगाव तीन, कसबे सागाव- दोन (कागल), कोडोली वारणा - एक, बागलकोट (बाळापुर) एक, शिवनगी - एक, घरेडी (सांगोला)-एक, काशी एक, वगैरे ठिकाणी समाध्या आहेत..
खासदार, मंत्री, तथा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत तीर्थक्षेत्र क आणि ब मधून रस्ते पाणीपुरवठा सार्वजनिक स्वच्छतागृह, सभागृह इत्यादी कामे झालेले आहेत परंतु घाट मार्गाचा विचार करता पूर्ण घाट मार्गावर संरक्षक बॅरगेट लावणे आवश्यक आहे . वार्षिक यात्रा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देव दीपावलीच्या लक्ष दीपोत्सव, मानाची काटेपालखी हे येथील यात्रेचे वैशिष्ट्य आहे .. या ठिकाणी दर महिन्याच्या अमावस्या दिवशी श्री धारेश्वर मठ मंदिरात स्वयंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक, महाआरती केल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यादरम्यान श्री क्षेत्र धारेश्वर देवस्थानचे मठाधीकारी राष्ट्रसंत ज्ञानराज पद्मभास्कर धर्मरक्षक श्री,ष, ब्र,१०८ डॉ, निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज येणाऱ्या भक्तांसाठी उपस्थित राहून समस्या व अडचणी जाणून घेत त्याबाबतीत योग्य मार्गदर्शन करतात , चौकट =. दरमहाआरोग्य,रक्तदान,संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते व ५१ ते५४ गायी वगोवंशाचे योग्य प्रकारे संगोपन केले जाते या पवित्र ठिकाणी शेती आहे परंतु पाण्याअभावी त्या शेतातून विविध प्रकारची पिके घेता येत नाहीत या ठिकाणी विहीर खोदून पाणी मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे पावसाळ्यातील अतिवृष्टी, भूस्खलन मध्ये असलेल्या पूर्वी असलेल्या विहिरी बुजून गेल्या आता २ नवीन विहिरी साठी पंचवीस लाख खर्च केले आहेत वीज व सौर प्रकल्प राबवून शेतीच्या माध्यमातून शेतीचा विकास साधला जाईल असे नूतन मठाअधिपती बालब्रह्मचारी श्री,ष,ब, बालयोगी आदिराज बाबा शिवाचार्य स्वामी यांच्याकडून सांगण्यात आले.

“तहानलेल्या जीवांसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार”सोनवडेतील विद्यार्थ्यांची ‘पक्ष्यांसाठी पाणपोई’—उन्हाळ्यात मानवतेचा हृदयस्पर्शी संदेश.


पाटण :
आजच्या वाढत्या तापमानामुळे माणसांप्रमाणेच पक्ष्यांनाही तीव्र पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे नद्या, ओढे आणि पाणवठे कोरडे पडत असून, पक्ष्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली “पक्ष्यांसाठी पाणपोई” हा उपक्रम हाती घेतला. शाळेच्या परिसरातील झाडांखाली तसेच झाडांवर मातीच्या भांड्यांमध्ये स्वच्छ पाणी आणि धान्य ठेवण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ शाळेपुरतेच मर्यादित न राहता, आपल्या घरासमोरही पाण्याची भांडी ठेवण्याचा संकल्प केला आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी दररोज त्या भांड्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारीही स्वतःवर घेतली आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ एकदिवसीय न राहता सातत्यपूर्ण सेवा कार्य ठरत आहे.
“पक्षी वाचवा, पर्यावरण वाचवा” असा प्रभावी संदेशही यामधून देण्यात आला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शरद शेजवळ सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की,

“अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणप्रेम आणि संवेदनशीलता विकसित होते. लहानशा कृतीतून मोठा बदल घडवता येतो, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.”

उन्हाळ्याच्या तडाख्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी विद्यार्थ्यांनी सरसावलेले हे हात खऱ्या अर्थाने मानवतेचे प्रतीक ठरले आहेत. समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा नावीन्यपूर्ण उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या उपक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले असून, विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

तळमावले - संत निरंकारी मिशन मार्फत ग्रामीण रुग्णालय येथे स्वच्छता.

तळमावले 24.02.2026 संत निरंकारी मिशनमार्फत प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन अंतर्गत ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी डॉ. राजेंद्र यादव , डॉ. सौरभ खोडके, ढेबेवाडी ग्रामपंचायतिच्या सरपंच रुपाली पाटील, उपसरपंच अभिजित कडव, आण्णा कारंडे, संत निरंकारी मिशन प्रचारक दीपक कणसे, ढेबेवाडी ब्रँच मुखी उषाताई दिंडे, सेवादल इन्चार्ज अभिजित देशमुख, वनिता बडेकर यांच्यासह ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व संत निरंकारी मिशन अनुयायी यांची उपस्थिती होती. डॉ. राजेंद्र यादव म्हणाले की संत निरंकारी मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. सद्गुरूंच्या शिकवणीतून सर्व अनुयायी स्वयंप्रेरनेने मनोभावे सेवा करत आहेत. ही केलेली सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने केली गेली आहे. संत निरंकारी मंडळ ब्रँच ढेबेवाडी च्या सर्व सदस्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूचा सर्व परिसर स्वच्छ केल्यानंतर दिपक कणसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्संग कार्यक्रम संपन्न झाला. सदर अभियानास ग्रामपंचायत ढेबेवाडी व ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यकामाचे सूत्रसंचलन गोपी जाधव यांनी केले तर आभार उषाताई दिंडे यांनी मानले.

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨

🚨 कराड हादरले! मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा भांडाफोड; तिघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात 🚨

कराड : सातारा जिल्ह्यातील कराडलगतच्या मुंढे गावात बांगलादेशी घुसखोरांचा मोठा पर्दाफाश झाला असून कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत तिघा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई कराड पोलिसांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


🔎 कसा लागला मागोवा?

सध्या देशभर बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविषयी मोठी चर्चा सुरू असताना कराड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मुंढे येथील सह्याद्री रेसिडेन्सी या इमारतीत काही संशयित परदेशी नागरिक राहत आहेत.

पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांनी पथकासह तात्काळ धाड टाकली. चौकशीत बिलाल सलालउद्दीन मोल्ला याच्यासह तिघे जण गेल्या सहा महिन्यांपासून येथे राहत असल्याचे उघड झाले.


📌 मुंबईतून बनावट आधारकार्ड तयार

कसून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
या घुसखोरांनी मुंबईत बनावट पत्त्याचे आधारकार्ड तयार करून घेतल्याची कबुली दिली. कोणतीही वैध कागदपत्रे नसताना त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले.

अटक करण्यात आलेल्या नागरिकांची नावे:

  • बिलाल सलालउद्दीन मोल्ला
  • आयेशा अदिल शेख
  • नसरिन अब्दुलसालाय मोल्ला

(सर्व मूळ रहिवासी – बांगलादेश)


⚖️ आश्रय देणाऱ्यावरही गुन्हा

या बांगलादेशी नागरिकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा करण बापू कांबळे (वय 29) याच्यावरही कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदेशीररित्या देशात प्रवेश करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणे हा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


🚔 कराड पोलिसांची सतर्कता कौतुकास्पद

या कारवाईमुळे कराड शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलिसांनी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

घणसोलीचा दमदार आवाज महानगरपालिकेत !श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समितीवर निवड.


नवी मुंबई : 

घणसोली प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे युवा व अभ्यासू नगरसेवक श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे यांची नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती पदी निवड झाल्याने घणसोली परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्यांना सुलभ करण्यासाठी कार्य करणाऱ्या या महत्त्वपूर्ण समितीवर शिंदे यांची नियुक्ती ही त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची आणि लोकाभिमुख भूमिकेची पावती मानली जात आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, रुग्णालये व दवाखान्यांच्या सुविधा सुधारणा, औषधसाठा, स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी यांसारख्या जबाबदाऱ्या या समितीमार्फत पार पाडल्या जातात. त्यामुळे या पदाला विशेष महत्त्व आहे.

श्री. सौरभ शिंदे यांनी यापूर्वीही घणसोली परिसरात आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या निवडीमुळे प्रभाग ९ मधील आरोग्य सुविधांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

या निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनीही त्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

यावेळी बोलताना श्री.सौरभ ऋषीकांत शिंदे म्हणाले की “नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन अधिक परिणामकारक सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्यांना उत्तम आणि सुलभ आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न करेन,” 



घणसोली - नगरसेविका सौ.वैशालीताई सुनील मस्कर यांची महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी निवड.

घणसोली - नगरसेविका सौ.वैशालीताई सुनील मस्कर यांची महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी निवड.

घणसोली (प्रभाग क्रमांक ९) मधून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सौ. वैशालीताई सुनील मस्कर यांची च्या महिला व बालकल्याण समिती सदस्य पदी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

घणसोलीकरांनी दाखवलेला विश्वास आणि भरघोस मतांनी दिलेला कौल यामुळे वैशालीताईंना नगरसेविका पदाची जबाबदारी मिळाली होती. आता महिला व बालकल्याण समिती सदस्यपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आल्याने घणसोली प्रभागाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

यावेळी बोलताना सौ. वैशालीताई सुनील मस्कर म्हणाल्या की,“घणसोली प्रभाग क्रमांक ९ मधील जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. प्रभागातील महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. महिला सक्षमीकरण, बालकांच्या आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा, तसेच मूलभूत सोयीसुविधांच्या उभारणीवर माझा विशेष भर राहील.”

महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून परिसरातील अंगणवाडी सुविधा, आरोग्य सेवा, पोषण आहार योजना, महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, तसेच बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

घणसोली प्रभागातील पाणी, रस्ते, गटारे, स्वच्छता, उद्याने आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरही ठोस भूमिका घेत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

घणसोलीच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सौ. वैशालीताई मस्कर यांच्या या निवडीमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये महिला नेतृत्वाची नवी ताकद निर्माण झाली असून, आगामी काळात विकासकामांचा वेग अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मानखुर्द महाराष्ट्र नगरमध्ये पाणीटंचाईचा स्फोट!शिवप्रेरणा वेल्फेअर असोसिएशनचे थेट एम वॉर्ड मुख्य जलअभियंत्याकडे निवेदन.

  मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांचे हाल अपरंपार वाढले आहेत. ...