" साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज "
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शनिवार, १६ मे, २०२६
*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*
बुधवार, १३ मे, २०२६
*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*
गुरुवार, ७ मे, २०२६
मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार
मंद्रूळकोळे खुर्द प्रीमियर लीग स्पर्धेत विश्वनाथ फायटर्स स्पोर्ट्स विजेता.
मंगळवार, २८ एप्रिल, २०२६
मंद्रूळकोळे हादरले! रक्षा विसर्जन कार्यक्रमात मधमाश्यांचा भीषण हल्ला; १०-१२ जखमी
मंद्रूळकोळे हादरले! रक्षा विसर्जनात मधमाश्यांचा भीषण हल्ला; १०-१२ जखमी, स्मशानभूमीत एकच खळबळ.
कुमजाई पर्व न्यूज ढेबेवाडी | प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील मंद्रूळकोळे येथे रविवारी रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमावेळी मधमाश्यांच्या मोहोळाने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शांततेत पार पडणारा धार्मिक विधी काही क्षणांतच गोंधळात बदलला आणि सुमारे १० ते १२ जण जखमी झाले.
मंद्रूळकोळे येथील रहिवासी यांच्या निधनानंतर रविवार, दि. २६ रोजी सकाळी वांग नदीकाठी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विधीपूर्व तयारीसाठी १५ ते २० ग्रामस्थ स्मशानभूमी परिसरात उपस्थित होते.
तयारी सुरू असतानाच झाडावरील मधमाश्यांचे मोठे मोहोळ अचानक भडकले आणि त्यांनी उपस्थितांवर तुफानी हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे स्मशानभूमीत एकच धावपळ उडाली. स्वतःचा बचाव करण्यासाठी लोकांनी पळापळ केली. या घटनेत सुमारे १० ते १२ जणांना मधमाश्यांनी दंश केला.
जखमींना तातडीने ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच काही खाजगी दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार केल्याने सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, मूळ विसर्जन स्थळी धोका कायम असल्याचे लक्षात येताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तत्परता दाखवली. पुढील अनर्थ टाळण्यासाठी रक्षा अन्यत्र ढेबेवाडी वांग नदीकाठी नेऊन विसर्जन विधी शांततेत पार पाडण्यात आला.
गुरुवार, २३ एप्रिल, २०२६
*“छत्रपती महाराजस्व अभियानाचा धडाका — हजारो महसूल तक्रारींचा झटपट निपटारा”*
बुधवार, २२ एप्रिल, २०२६
“निर्णय बदलायला लावणारा माझा एकमेव मार्गदर्शक हरपला” — स्व. डॉ. दिलीपराव चव्हाणांना ना. शंभूराज देसाईंची भावपूर्ण श्रद्धांजली
कुंभारगाव (दि. २२ एप्रिल २०२६) : कुंभारगावचे सुपुत्र, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक स्वर्गीय डॉ. दिलीपराव चव्हाण यांच्या निधनाने संपूर्ण पाटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की. “स्व. डॉ. दिलीपराव चव्हाण हे केवळ नेते नव्हते, तर आमचे मार्गदर्शक, आधारवड होते,” असे म्हणत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
देसाई म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच पुण्यातील रुग्णालयात भेट झाली होती. “अर्धा तास त्यांनी माझ्याशी अगदी आत्मीयतेने संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी आशा होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला,” असे सांगताना त्यांचा आवाज भरून आला.
राजकीय जीवनातील सुरुवातीपासूनच डॉ. दिलीपराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले, असे सांगत देसाई पुढे म्हणाले, “माझे निर्णय बदलायला लावणारे जर कोणी असतील तर ते फक्त स्व. डॉ. दिलीपराव चव्हाण होते. त्यांनी नेहमीच विचारपूर्वक मार्गदर्शन केले आणि गटाच्या हिताचा विचार केला.”
पडत्या काळात खंबीरपणे सोबत उभे राहणारा नेता म्हणून त्यांनी डॉ. चव्हाण यांचे वर्णन केले. “चढत्या काळात अनेक जण सोबत असतात, पण पडत्या काळात खरे सहकारी ओळखू येतात — आणि डॉ. दिलीपराव चव्हाण हे असेच निष्ठावंत सहकारी होते,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
देसाई गटाच्या राजकीय वाटचालीत ढेबेवाडी व कुंभारगाव परिसराची जबाबदारी त्यांनी एकहाती सांभाळली, याची आठवण करून देताना देसाई म्हणाले, “ते म्हणायचे ‘डोंगराच्या अलीकडची काळजी करू नका’, त्यामुळे मी निर्धास्त असायचो. आज तो आधार हरपला आहे.”
या प्रसंगी काँग्रेस कमिटी अध्यक्ष अजित पाटील चिखलीकर, हिंदुराव पाटील, अॅड. डी.पी. जाधव, कारखान्याचे व्हाइस चेअरमन पांडुरंग नलावडे, विश्वनाथ पानसकर, विजय पवार, चंद्रकांत चाळके, दत्तात्रय चोरगे, संजय देसाई, संतोष मोरे, आनंदराव चव्हाण, राजेंद्र देसाई, देवबा वायचळ, अॅड. जनार्दन बोत्रे, विजय शिबे, विनायक सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वांनी स्व. डॉ. चव्हाण यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी देसाई यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व “या दुःखद प्रसंगी शासन व समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असा विश्वास दिला.
एक निष्ठावंत नेता, मार्गदर्शक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा व्यक्तिमत्त्व हरपल्याची खंत प्रत्येकाच्या मनात होती — आणि अश्रूंतूनच त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*
*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोर...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...