बुधवार, २२ जुलै, २०२६

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त* *सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती मा. श्री. संजय देसाई साहेब व संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूल, कुंभारगाव येथे विविध सामाजिक उपक्रमां अंतर्गत वृक्षारोपण व विद्यार्थांना खाऊ वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले* होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी *लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्कुल मधील विद्यार्थ्यांनी दादांच्या कार्या बद्दल मनोगत व्यक्त केले तसेच राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिनाच्या निमित्ताने भारताचा नकाशा रांगोळीच्या माध्यमातून काढुन त्यामध्ये निसर्गातील वस्तुचा वापर करून सुदंर आकर्षक डिझाइन तयार करून कडेला मेणबत्त्या ठेवून प्रज्वलित करण्यात आल्या तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी स्कुलच्या परिसरात  वृक्षारोपण करण्यात आले.* तसेच *विद्यार्थ्यांना खाऊ वाटप* केले दादांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. *संजिवन प्रतिष्ठानचे सचिव प्रा सचिन पुजारी सर आपल्या मनोगतात लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या कार्याची माहिती व अनुभव व्यक्त करून विनम्र अभिवादन*  केले 
 *सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण अर्थ व क्रिडा सभापती मा श्री संजय देसाई यांनी आपल्या मनोगतात म्हणाले कि, लोकनेते स्व. अजितदादा पवार यांनी सामाजिक, शैक्षणिक ,कृषी  विकासात्मक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.दादांनी घालून देण्यात आलेल्या विचारांचा वसा व  वारसा परंपरा इथुन पुढील काळात देखील आम्ही सदैव चालु ठेऊ असे आश्वासन दिले.* . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ खोत मॅडम यांनी केले व सुत्रसंचलन सौ वर्षा साळुंखे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सौ अर्चना पुजारी मॅडम यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढील प्रमाणे उपस्थित होते - 
मा श्री प्रशांत पाटील संचालक रयत साखर कारखाना शेवाळवाडी (म्हासोली) , श्री वसंतराव पतंगे शेठ (कापड व्यापारी) , श्री संजय गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य), श्री दिलीप देसाई (प्रगतशील शेतकरी), श्री सुनील धर्माधिकारी (सामाजिक कार्यकर्ते) , श्री विजय कचरे (माजी ग्रामपंचायत सदस्य),, श्री सोमनाथ गुरव (युवा उद्योजक), प्रा सचिन पुजारी सर तसेच नवभारत को आॉप क्रेडिट सोसायटी सर्व प्रशासकिय स्टाफ आणि संजिवन प्रतिष्ठानचे पदाधिकारी, नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संपूर्ण छायाचित्र व शुटिंग दै.कृष्णाकाठ व साप्ताहिक स्पंदनचे पत्रकार व कुंभारगाव सोसायटीचे संचालक मा श्री राजेंद्र पुजारी यांनी केले...

मंगळवार, १४ जुलै, २०२६

*मोरेवाडी हादरली! घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा धुडगूस, दोन गाभण शेळ्यांचा खात्मा,*



कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026
 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे  सोमवारी रात्रीच्या सुमारास घराजवळील शेडमध्ये घुसलेल्या बिबट्याने दोन गाभण शेळ्यांची शिकार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी  मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.

ही घटना शेतकरी शिवाजी केशव मोरे यांच्या घराजवळील शेडमध्ये रात्री घडली. नेहमीप्रमाणे शेळ्या शेडमध्ये बांधून शिवाजी मोरे झोपले होते. पहाटे उठून पाहिले असता शेडमध्ये रक्ताचा सडा आणि दोन गाभण शेळ्या मृतावस्थेत आढळल्या. बिबट्याने शेळ्यांच्या गळ्यावर आणि पोटावर हल्ला करून त्यांचा खात्मा केला.

घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोहर यादव यांनी भोसगावचे वनपाल रमेश कुंभार आणि कुंभारगावचे वनरक्षक शरद ताले यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत शेळ्यांचे फोटो आणि पुरावे गोळा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. वनविभागाकडून नुकसान भरपाईचे आश्वासन देण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पाटण तालुक्यातील या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.  जनावरे चारण्यासाठी बाहेर पडण्यास महिला-शेतकरी घाबरत आहेत.

घटनास्थळी आज सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या भागात वरचेवर या घटना घडत आहेत. त्यामुळे वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

गुरुवार, ९ जुलै, २०२६

*प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे डेंग्यू चिकनगुनिया जनजागृती अभियान*

*प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे डेंग्यू चिकनगुनिया जनजागृती अभियान* 
जून ते सप्टेंबर हा कालावधी डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल असतो. हा कालावधी पारेषण काळ म्हणून ओळखला जातो त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे आगमन  झाले. त्यामुळे मान्सून कालावधीत हवेत आर्द्रता अधिक असते. पावसाच्या कालावधीत डासांना अंडी घालण्यासाठी साचलेल्या पाण्यांची ठिकाणे, डबकी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. या कालावधीत सर्वत्र डासांचा उच्छाद सुरू असतो. एडिस एजिप्टाय, अॅनाफेलिस, क्युलेक्स या प्रमुख तीन डासांसह इतर डासही मोठ्या प्रमाणावर आढळतात.

 *डासांचे आयुष्य& जीवन क्रम* 

 *अंडी अळी-कोष - डास* 
 हा जीवनक्रम ८ दिवसांचा असतो.
नर डास पाना, फुलांचा रस पितो, मादी डास मनुष्य, जनावरांचे रक्त शोषते.
मादी डासाचे आयुष्य २१ ते २७दिवस, नर डासाचे आयुष्य ५ दिवस असते.
मादी डास एकावेळी १५० ते २०० अंडी घालते. हे डास जीवन कालावधीत १ हजार ते २ हजार अंडी घालते.
एडिस एजिप्टाय डासाची मादी साठवलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालते.
अॅनाफेलिस डासाची मादी साचलेल्या पाण्यात (डबकी वगैरे) अंडी घालते.
डास साधारणपणे ४ कि.मी. अंतरापर्यंत हवेतून उडत जाऊ शकतो.
डास १० मीटर उंचीपर्यंत उडतो. विशेष परिस्थितीत तो ४० ते १०० मीटर उंचीपर्यंत उडतो.


 *पट्टेरी एडिस* : तिरकी अॅनाफेलिस

एडिस डास (टायगर मॉस्क्युटो) दिवसा चावतो. या डासांच्या पायावर, शरीरावर पांढरे पट्टे असतात. या डासाची अळी पाण्यात स्प्रिंगप्रमाणे हालचाल करते. या डासाच्या मादीपासून डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका या आजारांचा प्रसार होतो. बाधित रुग्णाला चावलेला हा डास निरोगी माणसाला चावल्यानंतर विषाणूचा प्रसार होतो. मलेरिया अर्थात हिवताप या आजारास अॅनाफेलिस डासाची मादी कारणीभूत आहे. अॅनाफेलिस डास ४५ अंश कोनात (तिरका) बसतो. पावसामुळे नगरपालिका क्षेत्रासह जिल्हाभर डासांची घनता वाढू लागली आहे. दिवसा आणि रात्रीही डासांच्या झुंडी दिसून येतात. त्यामुळे आजाराचा धोका वाढला आहे.

 *चिकुनगुनियाही ठरू शकतो घातक* 

चिकुनगुनिया हा आजार विषाणूमुळे होतो. एडिस एजिप्टाय या डासाच्या मादीपासून त्याचा प्रसार होतो. तीव्र स्नायू आणि सांधेदुखीसह अचानक ताप येतो. चिकुनगुनिया तापामुळे काही टक्के रुग्णांमध्ये संधिवात होऊ शकतो. वृद्ध आणि कॉमोरबिड व्यक्तीसाटी घातक ठरू शकतो. विषाणूने दूषित असलेल्या एडिस एजिप्टाय या डासाची मादी चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांत चिकुनगुनियाची सुरुवात होते. सांधे व स्नायूदुखी या प्रमुख लक्षणासह डोकेदुखी, मळमळ, थकवा आणि पुरळ ही लक्षणेही असू शकतात. कोणताही उपचार किंवा लस नाही. वेदना, सूज आणि ताप यासारख्या लक्षणापासून मुक्त होण्यासाठीची औषधे दिली जातात. हा आजार १० ते १२ दिवस टिकतो आणि कमी होतो.

 *कोरडा दिवस... तो का पाळायचा?* 

अंड्यापासून डास तयार होण्याचा कालावधी (जीवनचक्र) ८ दिवसांचा आहे. हे जीवनचक्र तोडले तर डासांची उत्पत्ती थांबते. त्यासाठी आठवड्यातून एकदा ड्राय डे पाळावा, असे आवाहन केले जाते. पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून घासून, पुसून कोरडी करणे म्हणजेच ड्राय डे. ड्राय डे पाळल्यास डासांचे जीवनचक्र तुटते. एडिस, एजिप्टाय डासाची अंडी पाणी साठवण्याच्या भांड्याच्या कडेला चिकटलेली असतात. ४ महिने ते वर्षभर ही अंडी त्याच अवस्थेत राहू शकतात. त्यानंतर त्यांना पाणी मिळाले तर त्यांचे जीवनचक्र सुरू होते. त्यामुळे पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एकदा घासू-पुसून स्वच्छ व कोरडी करणे आवश्यक आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव चे
वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जाधव सर, व डॉ. क्षितिजा पाटील मॅडम याच्या 
मार्गदर्शना खाली

 श्री पंचक्रोशी दत्त विद्यामंदिर हेळगाव येथे 

 डास आळी प्रात्यक्षिक व गप्पी मासे  दाखण्यात आले श्री देशमुख सर यानी प्रास्ताविक केले  आरोग्य कर्मचारी यानी डेग्यु,चिकनगुण्या,मलेरिया किटक जन्य आजाराबाबत श्री पंचक्रोशी दत्त विद्यामंदिर हेळगाव येथे जनजागृती  व उपाय योजना बाबत माहिती सांगण्यात आली  तेव्हा उपस्थित आरोग्य सहाय्यक श्री जाधव राव साहेब, श्री धुमाळ रावसाहेब तसेच आरोग्य सहाय्यिका खाडे सिस्टर, तसेच लॅब टेक्निशियन श्री बंडगर आण्णा तसेच आरोग्य सेवक श्री एस.आर.बोंद्रे, श्री ए. एस.संकपाळ, श्री आर.बी.भोकरे तसेच आरोग्य सेविका एस.डी.कुंभार, तसेच आशा सेविका सर्व शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक उपस्थित होते

मंगळवार, २३ जून, २०२६

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई -
यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीडा या विभागातून यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती संस्थेची अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली आहे.

यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून वर्षभरामध्ये नावीन्यपूर्ण विविध उपक्रम राबवले जातात. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार देण्याचे  हे नववे वर्ष आहे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या निमित्ताने करण्यात येतो.

नवी मुंबई या ठिकाणी 15 ऑगस्ट 2026 रोजी सायं. 5 वाजता नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचा सामाजिक निशिगंधा कापडणीस, माधवी सूर्यवंशी ,अर्चना सदरे, नारायण म्हात्रे ,मेघा शिंपी , संध्या माने ,रमेश पाटील, आदित्य मोरे ,शरद निकम उद्योजक विभागातून अनिकेत पोखरकर, नितीन भोसले ,दीपक कोकाटे, संजय पाटील, रुपेश कोलते, ओमकार शिंदे, सचिन पवार क्रीडा विभागातून नमिता पाटील, राहुल पाटील वैद्यकीय सेवा विभागातून विशाल पाटील शिक्षण विभागातून भरत ढेरे कलाक्षेत्रातून नम्रता पाटील, शुभ्रा भोसले साहित्य क्षेत्रातून डॉक्टर सुनिता चव्हाण, सचिन अवघडे, बाळकृष्ण पाटील, संजय नायकवडी, पुनम खंडागळे पत्रकार क्षेत्रातून बबलू पेशकर आदी मान्यवरांचा  गौरव होणार आहे. सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे यांनी यशस्वी उद्योजक मुलाला घडवल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा ही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

रविवार, १४ जून, २०२६

*महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराबद्दल संदीप डाकवे यांचा माने परिवाराकडून सन्मान*


तळमावले/प्रतिनिधी :
माणसाच्या आयुष्यातील ७५ वे वर्ष म्हणजेच अमृतमहोत्सव हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. या आनंदाला सामाजिक कृतज्ञतेची जोड देत मान्याचीवाडी ( कुंभारगाव ) येथील माने परिवाराने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. विष्णु कृष्णा माने यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून, महाराष्ट्र शासनाचा 'राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार' मिळाल्याबद्दल पत्रकार संदीप डाकवे यांचा माने परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

विष्णु कृष्णा माने यांनी आपल्या आयुष्याची ७५ यशस्वी वर्षे पूर्ण केल्याबद्दल माने परिवाराने एका भव्य आणि कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात कला, साहित्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी अखंडपणे झटणाऱ्या संदीप डाकवे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. माने परिवारातील ज्येष्ठ सदस्य आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. डाकवे यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कौटुंबिक सोहळ्याला सामाजिक चळवळीची जोड दिल्याबद्दल परिसरामध्ये माने परिवाराचे कौतुक होत आहे. याप्रसंगी विष्णू माने, जिजाबाई माने, शरद माने, रेश्मा माने, प्रदीप माने व जयश्री माने यांच्यासह मान्याचीवाडीतील ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कृतज्ञतेने भारावलो : संदीप डाकवे
सत्काराला उत्तर देताना संदीप डाकवे भावुक झाले. ते म्हणाले, "विष्णु माने यांच्या अमृतमहोत्सवासारख्या अत्यंत पवित्र आणि कौटुंबिक सोहळ्यात माने परिवाराने माझ्या कार्याची दखल घेतली, हा माझ्यासाठी खूप मोलाचा क्षण आहे. या आपुलकीच्या सन्मानामुळे समाजात आणखी जोमाने कार्य करण्याची मोठी ऊर्जा मला मिळाली आहे."

गुरुवार, ११ जून, २०२६

*२० जूनपासून पाटण मतदारसंघात 'एसआयआर' (SIR) मोहीम; उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांची माहिती.* *मतदारयादी शुद्धीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – प्रांताधिकारी*



केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार याद्यांचे शुद्धीकरण, अद्ययावतीकरण व त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम २०२६ जाहीर केला आहे.महाराष्ट्रात या मोहिमेस २० जूनपासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, नव्या पात्र मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह बनविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २० ते २९ जून या कालावधीत गणना प्रपत्रांची छपाई, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच अन्य पूर्वतयारीची कामे केली जाणार आहेत. ३० जून ते २९ जुलै 2026 या कालावधीत २६१ पाटण विधानसभा मतदारसंघातील ४२४ मतदान केंद्रांवरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्रांचे वाटप करणार आहेत.

संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सज्ञान व्यक्तीने हे प्रपत्र भरून द्यावयाचे असून त्यामधील माहितीच्या आधारे मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करण्यात येणार आहे. भरलेली प्रपत्रे पुन्हा बीएलओंकडून संकलित केली जाणार आहेत. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरणही केले जाणार असून नवीन मतदान केंद्रांची निर्मिती, केंद्रांचे विलीनीकरण तसेच मतदान केंद्रांच्या नावात किंवा ठिकाणात आवश्यक बदल करण्यात येणार आहे.

२९ जुलै 2026 पर्यंत प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांच्या आधारे ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा ३ ऑक्टोबरपर्यंत केला जाणार असून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एसआयआर मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सन २००२ च्या मतदार यादीशी विद्यमान मतदारांचे मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण ३ लाख ९ हजार २२६ मतदारांपैकी २ लाख ७३ हजार ८५४ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून हे प्रमाण ८८.५६ टक्के इतके आहे. मात्र अद्याप ३५ हजार ३७२ मतदारांचे मॅपिंग पूर्ण होणे बाकी असल्याची माहिती टोम्पे यांनी दिली. सन २००२ मध्ये अन्यत्र वास्तव्यास असलेल्या मतदारांची जुनी नोंद उपलब्ध न होणे तसेच विवाहानंतर सासरी आलेल्या महिला व नवविवाहितांकडून माहेरच्या मतदार यादीतील नातेवाइकांची माहिती उपलब्ध न होणे, ही मॅपिंग प्रक्रियेतील प्रमुख अडचण असल्याचेही त्यांनी सांगितले.

मतदारयादी शुद्धीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – प्रांताधिकारी सोपान टोम्पे

मतदारयादी शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या या मोहिमेत नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही त्यांनी तातडीने संबंधित बीएलओंशी संपर्क साधून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी तसेच कुटुंबातील मयत, दुबार अथवा स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. मतदार यादीतील अचूकता वाढविणे आणि लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी देणे हा या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश असून, सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी केले आहे.


मंगळवार, २ जून, २०२६

*जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात*

*🏆 जिद्दीचा विजय, मेहनतीचे सुवर्ण फळ; मुंबईच्या लेकींची आसाममध्ये पदकांची बरसात*
कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि जिंकण्याची जिद्द यांच्या बळावर मुंबईच्या चार कन्यांनी आसामच्या भूमीवर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. आसाम येथे आयोजित करण्यात आलेल्या ३ऱ्या साऊथ आशियाई मर्दानी स्पोर्ट्स स्पर्धा तसेच ६व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत देवकर फिटनेस अँड स्पोर्ट्स क्लब, मुंबई आणि मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई शहर यांच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत एकूण १६ पदकांची कमाई केली. त्यांच्या या यशामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मर्दानी स्पोर्ट्स आणि पारंपरिक मर्दानी तसेच कराटे कुमिते आणि कराटे काता अश्या ४ प्रकार मध्ये स्पर्धेत *वैदेही घोलप* हिने २ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक जिंकत सर्वांगीण उत्कृष्ट कामगिरी केली. *रिया सिंग* हिने २ सुवर्ण व २ कांस्य पदकांची कमाई करत आपले कौशल्य सिद्ध केले. *अंजली दुबे* हिने १ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य पदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले, तर *तृष्णा राऊत* हिने २ सुवर्ण व २ कांस्य पदके जिंकून स्पर्धेत आपला ठसा उमटवला.

मर्दानी स्पोर्ट्स आणि कराटे या दोन्ही प्रकारांमध्ये या विद्यार्थीनींनी दाखवलेली शिस्त, आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्ती विशेष कौतुकास्पद ठरली. देशातील आणि दक्षिण आशियातील विविध राज्ये व देशांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांवर आपली मोहोर उमटवली.

या यशामागे प्रशिक्षक ऋषिकेश देवकर, श्रेयस खेडेकर, गणेश शिखरे आणि वैष्णवी कोकाटे यांचे अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या मेहनतीचे हे यशस्वी फलित असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाचे सचिव संतोष खंदारे तसेच तांत्रिक संचालक केतन आंधळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशाच प्रकारे यश संपादन करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

मुंबईच्या या जिद्दी कन्यांनी मिळवलेले यश हे केवळ पदकांपुरते मर्यादित नसून, ते युवा पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणारे आहे. त्यांची मेहनत, समर्पण आणि चिकाटी अनेक नवोदित खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या या यशामुळे मुंबई शहरासह संपूर्ण महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव अधिक उंचावला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...