रविवार, २६ एप्रिल, २०२०

सातारा ; कराड कोरोनाचा हाॅटस्पाॅट

सातारा ; कराड कोरोनाचा हाॅटस्पाॅट . शनिवारी दि.24 सकाळी ५ रुग्णांचे अहवाल पोझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा दुपारी नवे ७ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. शनिवारी विलगीकरण कक्षातील तब्बल 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या 12 जणांपैकी 10 जण कराड तालुक्यातील आहेत तर दोघे सांगली जिल्ह्यातील कासेगाव व कामेरी येथील आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३३ वर पोहोचली आहे.
आज सापडलेल्या बाधित रुग्णांमध्ये एक महिला, 3 वर्षांचा व 13 वर्षांचा अशा दोन मुलांंचा समावेश आहे. आज सापडलेल्या बाधितांमध्ये वनवासमाची येथील 5, आगाशिवनगर (मलकापूर) येथील 3,येथील प्रत्येकी एक, तर कासेगांव व कामेरी येथील प्रत्येकी एक अशा 12 जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान मलकापूरधील आगाशिवनगर येथे 4 आणि अहिल्यानगर येथे 2 असे 6 कोरोना रूग्ण सापडले आहेत. हे कृष्णा हॉस्पिटलच्या सिव्हिल डिपार्टमेंटमधील कर्मचारी आहेत. यातील कामेरी व कासेगाव येथील कर्मचारी वगळता अन्य मलकापूरमध्ये रहात आहेत. मलकापूरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने मलकापूर नगरपालिकेने घर टू घर सर्व्हे सुरू केला आहे. प्रत्येक परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.शनिवारी वनवासमाची येथील पाच जण व आगाशिवनगर (मलकापूर) येथे तीन जण कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 51 जणांना कृष्णा व कराड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विलगीकरण कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. रविवारपर्यंत त्यांचे अहवाल प्राप्‍त होतील, असे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.


शनिवार, २५ एप्रिल, २०२०

काळगाव;- मस्करवाडी येथील वीजेचा खांब धोकादायक अवस्थेत

मस्करवाडी येथील वीजेचा खांब धोकादायक अवस्थेत
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील मस्करवाडी (काळगांव) येथील वीजेचा खांब धोकादायक अवस्थेत आहे. जमिनीपासून काही अंतरावरच हा पोल जीर्ण झालेला आहे. खांबाला आधार देणाऱ्या बाजूच्या तारेमुळेच तो खांब उभा आहे. अन्यथा तो केव्हाही खाली पडू शकतो. सदरच्या खांबामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्रशासनाने व संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून सदर वीजेचा खांब बदलावा. जेणेकरुन भविष्यात होणारी हानी टाळली जावू शकते.
सदरचा खांब बदलण्याची मागणी मस्करवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

कोरोना आणि मानसिक आरोग्य : प्रा. सुरेश यादव सर

कुंभारगाव :(ता.पाटण)
कोरोना आणि मानसिक आरोग्य
“मन करा रे प्रसन्न
 सर्व सिद्धीचे कारण”
आज ‘कोवीड१९’ या विषाणूने जगात हाहाकार उडवला आहे.कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगाला हादरून सोडणार्‍या या आजाराने उद्योग धंदा पासून ते जागतिक अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरे दिले आहेत. आजच्या घडीला या विषाणू बद्दलच्या प्रश्नांची निश्चित उत्तर कोणापाशी नाही. हा इतका सर्वदूर पसरला आहे की तो जागतिक सामाजिक मानसिक आजार झाला आहे. कोरोनाची साथ जेवढ्या वेगाने पसरत आहे. त्यापेक्षाही जास्त वेगाने या आजारामुळे निर्माण झालेल्या मानसिक उलथापालथी ला आपण सामोरे जात आहोत. आज संपूर्ण जग जागतिकीकरणाने जवळ आलेले आहे. जगात सर्व देशांमध्ये जागतिक महासत्ता होण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे .सध्या जागतिकीकरणामुळे जग इतकं जवळ आला आहे ,की ही मानसिकता एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित राहिली नसून जागतिक ,सामाजिक ,मानसिकता असं व्यापक स्वरूप त्याला आलं आहे.
 या सुरक्षितेच्या परिस्थितीत जगभरातील माणसं श्रीमंत-गरीब शिक्षित-अशिक्षित लहान मोठे सगळेच कोणामुळे पुढे काय होईल हे माहीत नसलेल्या परिस्थितीमुळे घाबरलेल्या अवस्थेत जगत आहेत .या तलावात मानसिक आरोग्यावर खूप घातक परिणाम होत आहेत .या लोग डाऊन आणि विलगीकरण यामुळे तर या घातक परिणामांची व्याप्ती अजून वाढू शकते. आज समाजात आजूबाजूला कुटुंबात कोणीही खोकले ,शिंकले तरी नात्यांमध्ये संशयाची सुई फिरू लागली आहे .दरवाज्याची कडी, लिफ्टचे बटन ,दिव्याचे बटन ही आता संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. दारावरून जाणारा भाजीवाला, दुकानातून आणली दूधाची पिशवी ,किराणामाल ,बँकेतून आणलेले पैसे सुद्धा आपल्या संशय नजरेतून सुटलेली नाहीत. एवढी आपली मानसिकता धरू लागली आहे.
 खरी समस्या निर्माण झाली आहे ,ती मनाचे आरोग्य राखण्याची वातावरणातील नकारात्मकता आणि हे सर्व कधी संपणार याची चिंता यामुळे अनेकजण शरीरापेक्षा मनाने चिंतेत आहेत या संकटमय काळात आपल्याला मनाचे आरोग्य आणि  शारीरिक आरोग्य जितके महत्त्वाचे आहे, तितकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. १९१७-१८ च्या दरम्यान म्हणजे पहिल्या महायुद्धात यावेळी स्पॅनिश साथ येऊन गेली होती. त्यावेळी जगभरात साधारण पाच कोटी माणसं या आजाराच्या साठीत गेली होती. त्यावेळी सात लाख जणांना या आजारात प्राण गमावले होते. त्याच अमेरिकेची आज जगाला जागतिक महासत्ता म्हणून ओळख आहे. माणसाचे मन म्हणजे एक कल्पवृक्ष आहे. 
आजपर्यंत जगाने अनेक रोगाच्या साथी अनुभवलेले आहेत सूर्य अस्ताला गेला म्हणून काय झाले नवीन दिवस पुन्हा जाणारच आहे. आयुष्यात अशी अनेक वादळे आपल्याला अनुभवास मिळणार आहेत ,परंतु या वादळात सुद्धा आपली मुळे मातीत घट्ट रोवून ठेवता आली पाहिजेत. हा समाजात गरीब, श्रीमंत ,शेतकरी ,व्यापारी, उद्योगपती, विद्यार्थी म्हणजे सर्वच घटक आज चिंतेत आहेत. मिळकत नसल्यामुळे अनेक जणांना चिंतेने ग्रासलेले आहे. संशोधकांच्या निष्कर्षानुसार यांच्या काळात 70% कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. याच वेळी सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य आपल्याला राखता आलं पाहिजे. तनावाने आपली शारीरिक प्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यावेळी एखादी मोठी समस्या आपल्यापुढे उभी राहते. त्या वेळी त्यातून  एक संधी निर्माण होते. या संकटाच्या काळात आपण कुटुंबाबरोबर वेळ घालवणे, आपले आवडते छंद जोपासणे आपले नातेवाईक मित्र यांना जरूर फोन करून संवाद साधला पाहिजे .त्यामुळे आपले मन निश्चितच हलके होईल. त्याच प्रमाणे घरातच शारीरिक व्यायाम मध्ये प्राणायाम, सूर्यनमस्कार ,योगासने, ध्यान धारणा, मनन, चिंतन यांची सांगड घालता आली पाहिजे .
सर्वात जास्त घरात यादरम्यान अडचण आहे, ती लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांची त्यांना गुंतवून ठेवण्याची कला आपण करावी ,कुटुंबातील प्रत्येक सदस्याने समजून घेऊन कुटुंब एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करावा. परिस्थिती कधीही बदलू शकते, त्यामुळे प्रत्येकपरिस्थितीला तोंड द्यायची तयारी आपल्याला ठेवता आली पाहिजे.
सध्या वर्तमानपत्र, टीव्ही, प्रसारमाध्यमे समाजमाध्यमे यावर सर्वत्र फक्त ‘कोरोनाव्हायरस’ हा एकच विषय आहे. .आपण याबद्दल मानसिक दृष्ट्या इकडे इतके अतिसंवेदनशील झालो आहेत, की आपण आपल्या नकळत त्याबद्दलच जास्त वाचतो, तेच पाहतो ,तेच जास्त ऐकतो, क्षणोक्षणी सावध राहतो, एकच एका विषयाची चर्चा करत राहतो. जणू काही आपण जीवनाच्या इतर बाजू विसरून गेलो आहोत .याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करून बेफिकीर राहणे असं नव्हे तर टोकाची संवेदनशीलता कमी करणे .कोरोनांचे बळी म्हणजे क्रिकेटचा स्कोअर नव्हे ,आपल्या मानसिकतेत कोरोना व्यतिरिक्त इतर विषयांना ही पुरेसा वाव दिला ,तर नकारात्मक भावनांच्या छायेतून आपण बाहेर येऊ शकतो. 
‘कोवीड१९’ यामुळे जगात उलथापालथ झाली हे खरं असलं तरी त्यामुळे होणारी मानसिकता उलथापालथ आपण कमी करू या!
“ घरातच रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा” 
प्रा. सुरेश रघुनाथ यादव 
शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड

सोमवार, २० एप्रिल, २०२०

सातारा :- वाटचाल रेड झोनकडे ?

सातारा जिल्हा बनतोय रेड झोन ?

मागील काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 6  होती नंतर काही दिवस एकही रुग्ण सातारा जिल्ह्यात सापडला नाही मात्र त्यानंतर दि.15 रोजी एकाच दिवसात 4 नवीन रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती परंतु अचानक जिल्ह्यातील संख्या वाढून 11 वरती गेल्याने सातारा जिल्हा रेड झोनमध्ये जाण्याची भीति व्यक्त करण्यात आली होती.त्यातच दि.19 रविवारी अचानक कराड तालुक्यातील दोन तरूणांना कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आले आहेत. कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने साताऱ्याची वाटचाल रेड झोनच्या दिशने निघाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्गीत रूग्णांची संख्या एकूण 13 झाली आहे. यापूर्वी एका महिला रूग्णाचा अहवाल 14 आणि 15 दिवसानंतर निगेटिव्ह आला होता. ही महिला रुग्ण पूर्णपणे बरी झाल्याने त्यांना सोडण्यात आले आहे आणि एक बाधीत 35 वर्षीय युवक हा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील विलगीकरण कक्षात दाखल होता. या (35 वर्षीय) युवकाचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे, असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. दरम्‍यान पुष्‍पगुच्छ देउन या युवकाला काल दि.१८. डिस्चार्ज देण्यात आला.पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग आपली भूमिका समर्थपणे पार पाढत असले तरी जिल्हावरचे रेड झोनचे सावट दूर होणार की नाही हे आत्ता येणारा काळच ठरवेल.



रविवार, १९ एप्रिल, २०२०

कोरोना :- साताऱ्यात दोन नवे रुग्ण

सातारा: - तालुक्यातील उंब्रज जवळील चरेगाव आणि ओगलेवाडी जवळील बाबरमाची येथील दोन रुग्णांचे अहवाल आज पॉझीटीव्ह आले. त्यामुळे कराड तालुक्यातील पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या चार झाली आहे. दरम्यान संबंधित दोन्ही ठिकाणच्या संशयीताच्या संपर्कातील लोकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभागाकडुन कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
मागिल महिन्यात नागपूर वरून प्रवास करून आलेल्या 35 वर्षीय तरुणाला कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे घसा दुखत असल्यामुळे आणि तापामुळे दाखल केले होते आणि गेल्या महिन्यात पुण्यावरून आलेल्या 30 वर्षीय पुरुष त्याला ताप आणि घसा दुखत असल्यामुळे दाखल केले होते या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,
हे दोन रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

कुंभारगाव: अतिउत्साही तरूणाई सावधान नाहीतर खावी लागणार जेलची हवा.

कुंभारगाव,मान्याचीवाडी ; 

कोरोना व्हायरसमुळे केंद्र शासनाकडून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, अतिउत्साही तरूण कुंभारगाव भागातील नागरिकांकडून लॉकडाऊनची ऐशी-तैशी केली जात असल्याचे दृश्य आज शनिवारी पहायला मिळाले.त्यामुळे पोलिस प्रशासनाने रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांसह वाडीवस्ती भागातील अतिउत्साही तरूणाईला लाठी प्रसाद दिलेला आहे तरी काही सुधारणा होत नाही म्हणून विनाकारण फिरण्याऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करणार कोणाचीही गय करणार नाही असा इशारा ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांनी कुंभारगाव मान्याचीवाडी येथे बोलताना दिला आहे. पोलिसांनी आणखीन कडक पवित्रा घेतला आहे.कुंभारगाव परिसरातील तरूणाईसह ज्येष्ठांना देखील कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याचे पहायला मिळत आहे.

येथील नागरिक सर्रास घराबाहेर पडून एकत्र जमत आहेत. काही ठिकाणी असलेल्या चौकांमध्ये कट्ट्यांवर सभा भरत आहेत.पोलिसांकडून यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, स्थानिक नागरिक पोलिस गेल्यानंतर पुन्हा रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.कोरोना व्हायरसबाबत येथील नागरिकांना गांभीर्य नसल्याचे पहायला मिळत आहे. 


शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

अबब... 150 ची बाटली 400 ते 500 रुपयाला

काळगाव (ता.पाटण) परिसरातील डोंगरात रचलेल्या सापळ्यात काल दोन सप्लायर्स सापडले. दोघेही 20 ते 30 वयोगटातीलच आहेत.सहा. पो.निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काळगावच्या डोंगरातून सुरू असलेली अवैध दारू वाहतूक रोखून दुचाकी व विदेशी दारूच्या बाटल्या असा सुमारे 34 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघा युवकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.लॉकडाऊनमुळे शहरातील जनजीवन ठप्प आहे. प्रमुख चौक, बाजारपेठांमधील अत्यावश्यक वस्तूंची दुकानेच काय पिठाच्या गिरण्या शोधण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. भाजीपाल्यासाठी तासन् तास तिष्ठत राहावे लागत आहे. मात्र, दुसरीकडे दीडशेच्या 'विदेशी' बाटलीसाठी साडेचारशे, पाचशे रुपये गेले तरी बेहत्तर, पण ढोसायचीच...! 'संचारबंदी'तही दारू तस्करांनी गल्‍लोगल्‍ली बाजार मांडलाय त्याला आत्ता आळा बसेलअसे वाटते.कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने सर्वत्र 'जैसे थे'ची स्थिती आहे.रोजच्या गरजेच्या वस्तू मिळणेही महाकठीण बनले. बिनकामाचे घरातून बाहेर पडलेल्यांना चौकाचौकांत काठ्यांचा प्रसाद खावा मिळतो आहे तरी नागरिकांमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही.

जिल्हा लॉकडाऊन...? मग, दारूसाठा आला कोठून?

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असले, तरी सार्‍यांनाच समान न्याय या तत्त्वाचा काहीसा विसर पडल्याचे दिसून येते. शहर, जिल्ह्यात नेमका हाच विषय सार्‍यांनाच खटकणारा आहे. लॉकडाऊनमुळे औषधे दुकाने वगळता सर्वच व्यवहार ठप्प आहेत. हॉटेल्स, बार, परमिट रूम, वाईन शॉपी एव्हाना गावठी दारूची अड्डेही शंभर टक्के बंद असताना दारू तस्करांकडे देशी, विदेशी दारूचा जिल्ह्याला पुरेल एवढा दारूसाठा आला कोठून, हा सामान्यांचा सवाल आहे.

कुंभारगाव,चाळकेवाडी ; श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वतीने मोपत मास्क वाटप

कुंभारगाव / चाळकेवाडी (ता.पाटण) तालुक्यातील चाळकेवाडी (कुंभारगाव) येथील समाजसेवक चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वतीने करोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले,

कोरोना संकटाच्यावेळी आपण आपल्या गावासाठी, लोकांसाठी काय करु शकतो, या माणूसकीच्या विचारातून गावकऱ्यांना मोफत मास्क देण्याचे काम समाजसेवक चंद्रकांत चाळके साहेब यांनी केले आहे
कोणतेही संकट हे माणसातील लढण्याच्या शक्तीला प्रेरणा देणारे असते. अट एकच असते की तुम्ही त्या संकटाने विचलित न होता त्याला संधीच्या स्वरुपात पाहिले पाहीजे. मग त्या संकटातून तुमच्या लढण्याची क्षमता तर वाढतेच पण इतरांनाही ती सहायक, प्रेरक ठरते. 
आज सगळं जग कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. यात प्रत्येक जण आपल्यापरिने काही तरी योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रत्येक कुटुंबियांना घरोघरी जाऊन सुरक्षित अंतर ठेवून  मास्क वाटण्यात आले.या सामाजिक बांधीलकीतून मोफत मास्क देत गावकऱ्यांना मास्क वापरण्यासाठी जे प्रोत्साहन दिले ते निश्चितच कौतुकास्पद आहे. आशा परिस्थितीत खचून न जाता प्रत्येकाने आपल्यापरिने लढले पाहीजे, टिकुन राहीले पाहीजे ही प्रेरणा स्वतःच्या कृतीतुन चाळके साहेबांनी सहजतेने दाखवली आहे.
या कार्यत भैरवनाथ गणेश मंडळ,बाल गणेश मंडळ,कल्पतरू गणेश मंडळ,नागनाथ गणेश मंडळ,शिवशक्ती गणेश मंडळ,युवा शक्ती ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळ चाळकेवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यामुळे चाळकेवाडीतील नागरिकांमधून समाधान वक्त केलं जातं आहे​.


बुधवार, १५ एप्रिल, २०२०

सातारा ; तीन नवे कोरोना रुग्ण

कराड :कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी मयत झालेल्या रुग्णाच्या एका नातेवाईक आणि ओगलेवाडी परिसरातील एका रेल्वे कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आज सायंकाळी समोर आली. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील डेरवण परिसरातील एकाची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

कराड तालुक्यातील मुंबईहून आलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकास कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच ओगलेवाडी परिसरातील रेल्वे विभागाच्या एका कर्मचाऱ्याची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.

तळमावले ; लोकनेते बाळासाहेब देसाई यांना डाॅ.संदीप डाकवे यांचा असाही सलाम


तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांची एकाचवेळी रेखाटन, ठिपके, शब्द, स्क्रीबलिंग, पेपर कटींग आर्ट अशा चित्रकलेच्या विविध माध्यमातून 5 वेगवेगळी चित्रे रेखाटत अनोखी आदरांजली डाॅ.संदीप डाकवे यांनी वाहिली आहे. दि.23 एप्रिल रोजी बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी आहे, या पाश्र्वभूमीवर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी ही चित्रे साकारली आहेत. लाॅकडाऊन मुळे सर्व बाजारपेठा बंद आहेत, अशावेळी घरी उपलब्ध असलेल्या चित्रकलेल्या साहित्यातून डाॅ.संदीप डाकवे यांनी ही चित्रे तयार केली आहेत. कोरोना च्या पाश्र्वभूमीवर लोकनेते बाळासाहेब देसाई यांची चित्रे रेखाटून आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे.
मरळी (ता.पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे वैशिष्टयपूर्ण स्मारक पाहून सदर चित्रे रेखाटण्याची कल्पना डाॅ.संदीप डाकवे यांच्या मनामध्ये आली आणि ती प्रत्यक्षात उतरवली आहे. लाॅकडाऊनच्या काळातील वेळेचा संदीप डाकवे यांनी असा सदुपयोग केला आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे साहित्य व कलाप्रेमी आहेत. चित्रप्रदर्शन, वर्तमानपत्र कात्रण प्रदर्शन, हस्तलिखित प्रकाशन, रांगोळी प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन अशा विविध प्रसंगी ना.शंभूराज देसाई यांनी आवर्जून उपस्थित राहून डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे, कलात्मक दृष्टीकोनाचे, सामाजिक बांधिलकी जपणाÚया कलाविषयक गोष्टींचे नेहमीच भरभरुन कौतुक केले आहे.
अखिल भारतीय विश्वविक्रमांची नोंद घेणाÚया ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात दोनदा नाव नोंदवलेले डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमातूतन केरळ पुरग्रस्तांना रु.21,000/-, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज व माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना प्रत्येकी रु.5,000/-, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रु.3,000/-, भारत के वीर या खात्यात रु.1,000/- अशी रोख मदत केली आहे. संदीपच्या या वैविध्यपूर्ण उपक्रमांची दखल प्रिंट मिडीयासह टीव्ही 9 मराठी, झी 24 तास, ए एम न्यूज तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांनी घेतली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या साकारलेल्या विविध चित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चैकटीत: डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेले वैविध्यपूर्ण कलात्मक उपक्रम:
शब्दातून चित्रे, व्यंगचित्रे, खडूतन अष्टविनायक, मोरपीस व जाळीदार पिंपळाच्या पानावर कलाकृती, पुस्तकांची आकर्षक मुखपृष्ठे, कॅलीग्राफीतून जवानांना सलाम, वारीचे पोस्टर रेखाटून शुभेच्छा, एक दिवा जवानांसाठी, अक्षरातून विठ्ठल कलाकृती, भिंतीवर वारीचे चित्र, पेपर कटींग आर्ट, रांगोळी रेखाटन, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश, पोस्टर रेखाटन, 83 चित्रे रेखाटून शुभेच्छा इ.

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

सातारा : अत्यावश्यक सेवेची दुकाने ठरविक वेळेपुरती चालू राहणार

सातारा ; कोरोना विषाणूचा वाढत असणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सातारा जिल्हात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातीलआत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील तर अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.


जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावानंतर अत्यावश्यक सेवेची चालू ठेवलेली सर्व दुकाने . किराणा सामान, दुध, औषध दुकाने, कृषि सेवा केंद्रे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दि. 11 एप्रिल पासून पुढील आदेश मिळेपर्यंत रोज सकाळी 8 ते सकाळी 11 वाजेपर्यंत, व सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंतच चालू राहतील. तथापि भाजीपाला विक्री केंद्रे फक्त सकाळी 8 ते 11 या वळेतच चालू राहतील. भाजीपाला केंद्रे संध्याकाळी चालू राहणार नाहीत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधितांचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार, दंड प्रक्रीया संहिताचे कलम 144, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.

काळगाव ; धामणी येथील युवकांकडून रक्तदान शिबीराचे आयोजन

धामणी येथील युवकांकडून रक्तदान शिबीराचे आयोजन

तळमावले/संदीप डाकवे 
पाटण ; तालुक्यातील धामणी येथील युवकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला. श्री दत्त विकास मंडळ (रजि.) यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमुर्ती स्पोर्टस् क्लब, (दत्त चैक) धामणी यांनी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते. सदर रक्तदान शिबीरामध्ये सोशल डिस्टन्स व शासनाच्या इतर मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले.
रक्तदान शिबीराची सुरुवात ज्येष्ठ नागरिक ज्ञानू मारुती सावंत यांनी श्रीफळ वाढवत केली. शिबीरात धामणीतील श्रीराम मित्र मंडळ, बाळसिध्द गणेश मंडळ, गणेश मित्र मंडळ, जोतिर्लिंग मित्र मंडळ, भराडीमाता नवरात्र उत्सव मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ या मंडळातील सर्व युवकांनी तसेच ग्रामपंचायत धामणी व ग्रामस्थ मंडळ धामणी यांनीदेखील सहभाग घेवून रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीर यशवंतराव चव्हाण ब्लड बॅंक कराड यांच्या सहकार्याने करण्यात आले.
नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या या युवकांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मुंबई : लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढला


मुंबई ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीत आणि उपाययोजनांबाबत माहितीही घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याची घोषणा केली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना, कोणत्याही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आजपर्यंत जे धैर्य दाखवले तसेच यापुढेही दाखवा,असे आवाहन केले

कोरोनाग्रस्तांची महाराष्ट्रातील संख्या वाढलेली आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचे प्रवेशद्वार आहे. आपण जेव्हा या रोगाच्या तपासण्या सुरु केल्या, तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतील देशांना बंदी होती. पण यादीत जे देश नव्हते त्यातील रुग्ण राज्यात मिसळले.आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत, ते भाग सील केले आहेत. आपल्याला जे रुग्ण सापडले आहेत, त्यांची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करत आहे. आता रुग्ण समोरुन येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजारांवर गेली आहे.


दुर्दैवाने कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, ती संख्या देखील वाढत आहे. ज्यांचे वय जास्त आहे त्यांना धोका वाढतो आहे. ज्यांना आधीपासून काही विकार आहेत अशा रुग्णांवर कोरोनाचा गंभीर परिणाम होतो आहे. त्याचबरोबर येत्या 14 एप्रिलला पुढील लॉकडाऊनची रुपरेषा सांगणार असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.

कराड ; 54 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु

सातारा : कृष्णा हॉस्पिटल, कराड दाखल असणाऱ्या 54 वर्षे पुरुष या कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पहाटे 5 वाजता मृत्यु झाला आहे.

ही व्यक्ती मुंबई येथे मत्स्य व्यवसाय करीत होता. तो 21 मार्च रोजी त्याच्या गावी आला. दि.30 मार्च रोजी त्याला खोकल्याचा त्रास सुरु झाला. 5 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटल, कराड दाखल करण्यात आले होते.

6 एप्रिल रोजी त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता व अहवालानुसार दि.7 एप्रिल रोजी हा रुग्ण कोविड-19 बाधित पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते.

या कोरोना बाधित 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यु हा प्राथमिक अंदाजानुसार कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

शेताची ही हाक मला सतत कानी येत असते : खा.श्रीनिवास पाटील

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला घरी राहून देशाला सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे आज प्रत्येकजण घरात बंदिस्त आहे. अनेकजण आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. तर अनेकजण वाचन, लेखन, चिंतन करत आहेत. असे असतानाच साताऱ्याचे खासदार आणि माजी प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पाटील हे मात्र मिळालेला वेळ शेतीच्या कामात सत्कारणी लावत आहेत.
श्रीनिवास पाटील यांनी फेसबुकवर फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये ते एका हाडाच्या शेतकऱ्याप्रमाणे शेतात काम करत आहेत. हे फोटो पोस्ट करताना खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत.

त्यात त्यांनी असे लहिले आहे की, “शेतातली माती शेतकऱ्याच्या मनात खोलवर उतरुन सतत संवाद साधत असते. कृषीसंस्कृतीची मुळं आपल्या मनात ही अशी घट्ट खोलवर रुजलेली आहेत, ती यामुळेच. मी शेतातच राहत असल्याने शेताची ही हाक मला सतत कानी येत असते. शेतात दिवसातून एकदा तरी फेरफटका मारल्याशिवाय दिनक्रम पुर्ण होत नाही. सध्या देशावर ओढावलेलं कोरोना विषाणूचं संकट मोठं आहे. अशावेळी शेती व शेतकऱ्यांचं महत्त्व अधिक प्रकर्षाने कळतंय.

तसेच कारखाने, मोठमोठी ऑफीसेस असं सगळं इथून तिथपर्यंत बंद आहे. उद्योजक, कामगार, गरीब, श्रीमंत असे सर्वजण घरातच आहेत. या काळात हा जगाचा पोशींदा आज सर्वांचा खऱ्या अर्थाने तारणहार झालाय. या कठीण काळात देखील आपण उपाशीपोटी नाही याचे श्रेय सर्वस्वी शेतकरी बांधवांचं आहे. एकीकडे वैद्यकीय व पोलीस यंत्रणा कोरोनाशी लढत असताना दुसरी बाजू बळीराजाने आपल्या मजबूत खांद्यावर टिकवून ठेवली आहे. म्हणूनच आपण शेती,माती आणि शेतकरी बंधू भगिनींप्रती कृतज्ञ असायलाच हवं. बळीराजाला शतशः वंदन”.

दरम्यान श्रीनिवास पाटील हे माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र आहेत. दोघेही शेतकऱ्याची मुल असल्याने दोघांनाही शेतीबाबत  प्रेम आहे. शरद पवारांना तर शेतीतली खडांंखडा माहिती असल्याने पवारांची महती ही कृषीतज्ञाला काही कमी नाही. मात्र त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील हे देखील शेतीत पारंगत असल्याचं आल त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे समोर आल आहे.

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

तळमावले ; स्पंदन ट्रस्ट तर्फे पोलीसांना मास्क वाटप


तळमावले/वार्ताहर
कोरोनाला आळा घालण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण जनतेला कोरोनाची लागण होवू नये यासाठी पोलीस कर्मचारी, डाॅक्टर, नर्सेस इतर प्रशासन अधिकारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी मास्क वाटप करण्यात आले.
‘वसा सामाजिक बांधिलकीचा’ हे ब्रीद वाक्य घेवून  पाटण तालुक्यातील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट काम करत आहे. ट्रस्ट च्यावतीने नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले जातात. सध्याच्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या कर्तव्य भावनेतून ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी वर्गांना मास्क वाटण्यात आले.
तळमावले बाजारतळावर बंदोबस्त करणारे ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे व त्यांचे सहकारी यांच्याकडे सोशल डिस्टन्स ठेवून मास्क देण्यात आले. मास्क वाटप करताना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, छायाचित्रकार अनिल देसाई, शंभूराज देसाई, पोलीस पाटील विजय सुतार, विशाल कोळेकर, संजय भुलुगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने डाॅ.संदीप डाकवे यांनी तळमावले येथील महालक्ष्मी शिवण क्लास च्या सौ.सुवर्णा देसाई यांच्याकडे मास्कचे कापड दिले. महालक्ष्मी शिवण क्लास कडून मास्क विनामूल्य देण्यात आले आहेत. याकामी त्यांना निशा देसाई व देसाई परिवारातील सदस्यांची मदत मिळाली. मास्क दिल्याबद्दल पोलीस वर्गाकडून ट्रस्टचे आभार मानन्यात आले.

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

तळमावले : मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शेती सहकारी क्रेडिट संस्था मर्या;तळमावले.यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

तळमावले / प्रतिनिधी
किती देता याला महत्त्व नाही. पण देणाऱ्याची ओंजळ संवेदनशीलतेने ओतप्रोत असेल, तर ती निश्चितच आगळी ठरते. याचाच प्रत्यय म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शेती सहकारी क्रेडिट संस्था मर्या;तळमावले.यांच्यावतीने जमा करण्यात आलेला निधी.

राज्यात कोरोनाने (कोविड-19) थैमान घातले असून, त्याचा प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आजाराने महाराष्ट्रात काही जणांचे बळी गेले आहेत. या लढाईत सर्वांनी एकत्र येण्यासह मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

या पार्श्वभूमीवर फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शेती सहकारी क्रेडिट संस्था मर्या;तळमावले या संस्थेच्या वतीने कोरोनाविरोधातील लढाईसाठी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश गृह राज्यमंत्री मा.नामदार शंभूराज देसाई (साहेब) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे संस्थापक/चेअरमन मा.अनिल निवृत्ती शिंदे(दादा),संचालक शिवाजी देसाई,महेश कोकाटे,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण,ओंकार शिंदे,संस्थेचे व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर,उपव्यवस्थापक शरद शिंदे,सुहास इंगळे उपस्थित होते

पारनेर : ग्रुप "ऍडमिन'सह तिघांना अटक, फेक मेसेज फिरवला

पारनेर ः सोशल मीडियावरून कोरोनाविषयाची खोटी माहिती पसरविल्याच्या आरोपावरून नांदूर पठार व पिंपळगाव रोठा येथील सोशल मीडियावरील एका ग्रुपच्या "ऍडमिन'सह तीन जणांना पारनेर पोलिसांनी अटक केली. हवालदार भालचंद्र दिवटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे."कोरोनाची लागण झालेली एक व्यक्ती गारगुंडी, अक्कलवाडी, वडगाव दर्या, पिंपळगाव रोठा परिसरात फिरत आहे. तो जवळ येऊन बोलतो, मला पाणी द्या किंवा आजची रात्र तुमच्याकडे मुक्काम करू द्या, असे म्हणतो, अंगावर थुंकतो तरी सावध व सतर्क राहा,' असा मेसेज नांदूर पठार येथील दत्ता भाऊ फ्रेंड सर्कल या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर रविवारी (ता. ०५) रोजी टाकण्यात आला होता. त्यामुळे जनतेत भीती पसरविल्याबद्दल, तसेच अफवा पसरविली म्हणून हा मेसेज टाकणारे मनोज जगताप (रा. पिंपळगाव रोठा), किरण बोंटे व ग्रुप ऍडमिन दत्तात्रय आग्रे (दोघे रा. नांदूर पठार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे.

दिलासादायक : साताऱ्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण कोरोनामुक्त दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कालपर्यंत ६ वर पोहोचली आहे. ग्रामिण भागातही कोरोना रुग्ण सापडल्याने नागरिकांच्या मनात घबराटीचे वातावरण पसरले आहे. मात्र जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण (४५वर्षीय महिला) आता ठणठणीत बरा झाला असल्याचे वृत्त आले आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरलेल्या महिलेचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील ही दिलासादायक बातमी आहे.दुबईहून आलेल्या ४५ वर्षीय महिला जिल्ह्यातील पहिली कोरोना पोझिटिव्ह रुग्ण ठरली होती.

दवाखान्यात दाखल झाल्यानंतर १५ व्या दिवशी सदर रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत ६ कोरोना पोझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील एकजणाचा इतर आजारातून मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी घरातून अनावश्यक कारणाकरता बाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘पेपर कटींग आर्ट’ मधून साकारले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पोट्रेट


तळमावले/वार्ताहर
गेले अनेक दिवसापासून देशासह राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅक्टर, नर्सेस, पोलीस, प्रशासन अधिकारी चांगले काम करत आहेत. अतिशय महत्त्वाच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशासनाला चांगल्या सुचना केल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर सलाम युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे. ‘पेपर कटींग आर्ट’ या आगळ्या वेगळ्या कलेच्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अनोखे पोटेªट तयार केले आहे. या पोटेªटच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाविरुध्द लढणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमला सलाम केला आहे. पेपर कटींग आर्टच्या माध्यामातून तयार केेलेल्या या पोटेªटची साईज 12 बाय 18 इंच इतकी आहे.
देशात 21दिवसाचा लाॅकडाऊन आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रशासन आणि नागरिकांना चांगले मार्गदर्शन करत आहेत. व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत. अशा वेळी बरेच कलावंत कलेतून घरीच करमणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. उध्दव ठाकरे यांना चित्रातून पण वेगळया पध्दतीने मानवंदना देण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांनी हे पोटे ट केले आहे. डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेची दखल ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात दोनदा घेतली गेली आहे.

प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन:

डाॅ. संदीप डाकवे यांनी घरात राहूनच ‘पेपर कटींग आर्ट’ मधून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अनोखे पोटे ट साकारले आहे. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये आपण घरीच राहून आपल्या कलागुणांना वाव द्यावा आणि कोरोनाविरुध्दच्या या लढयात सरकार आणि प्रशासन यांना साथ देवून हा लढा जिंकूया असे आवाहन युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन हटणार की नाही : वाचा सविस्तर

सध्या लोकांमध्ये अफवा पसरत आहेत की पाच दिवसांचा ब्रेक असेल मग लॉक डाऊन परत सुरू होईल, आता लॉक डाऊन हटणार नाही जोपर्यंत कोरोनाचा एकही पेशंट राहत नाही. WHO च्या नावाने अनेक खोटे मेसेज व्हायरल होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉक डाऊन हटणार की नाही हे बोलताना सांगितले की १५ एप्रिलनंतर महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊन उठणार असं कुणीही गृहीत धरू नये.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की १० एप्रिल नंतर लॉकडाऊन उठवायचा का या प्रक्रियेवर चर्चेला सुरवात होणार आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्युदर जास्त आहे. अशात दिवसागणिक महाराष्ट्र आणि मुख्यत्वे मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

या रुग्णांमध्ये रोज वाढ देखील होतेय, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे सरकारसाठी महाराष्ट्रात कोरोना लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेणं अडचणीचं झालंय.

एवढे सगळे सांगितल्यावर लॉक डाऊन वाढणार असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे जोपर्यंत सरकारचा कुणी अधिकृत व्यक्ती लॉक डाऊन विषयी सांगत नाही तोपर्यंत लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

सातारा : कॅलिफोर्नियावरुन आलेल्या रुग्णाचा मृत्यू जिल्ह्यातील पहिला बळी



सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कॅलिफोर्नियावरुन आलेल्या ६३ वर्षीय पुरुषाचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ४६ झाली आहे आज पहााटे मृत्यू झालेल्या रुग्णाला १४ दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काल पुुन्हा तपासणी केली असता तपासणीत या रुग्णाचे निगेटिव्ह आले होते. मात्र आज पहाटे या रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जिल्ह्यातील पहिला कोरोना बळी ठरला. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबाबतची माहिती दिली.

सातारा : ४ था कोरोना पोझिटिव्ह रुग्ण

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६९० वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही ४ वर पोहोचली असून आज एका ४५ वर्षीय रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे.

काल 4 एप्रिल रोजी कोरोना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या अनुमानित रुग्णांपैकी एका 54 वर्षीय पुरुष नागरिकाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. याचबरोबर 31 वर्षीय युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा अहवाल पुणे एन.आय.व्ही यांनी कळविले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण 4 झाली असून आज सातारा येथे 4 व कराड येथे 7 अनुमानित नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सातारच्या ग्रामीण भागातील असून वाळकेश्वर, मुंबई येथे मागील १४ वर्षापासून खाजगी कारचालक म्हणून एकटा राहत होता. ८ मार्च २०२० रोजी टेम्पोने गावी आला. दोन दिवसांपूर्वी ताप व सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यास मधूमेहाचा त्रास असून त्यावर उपचार चालू आहेत. सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असुन त्यावर मार्गदर्शक सुचनानुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत. या कोराना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व निकट सहवासितांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

रविवार, ५ एप्रिल, २०२०

थुंकी लावून फळे विकणाऱ्या माथेफिरूला अटक

मध्यप्रदेश  मधील  एक फळ विक्रेता थुंकी लावून फळे विकत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सत्य असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा फळ विक्रेता मध्य प्रदेशातील रायसेन येथील असून त्याचे नाव शेरू मियां आहे.

संबंदित पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश सिंह सिद्धू यांच्या माहितीनुसार हा फळ विक्रेता शेरू यांचे कुटुंबीय त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगत आहेत.

यामुळे त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. पोलिसांनी शेरूविरोधात कलम 269 आणि कलम 270 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शेरू यांच्या विरोधात शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. यानुसार केलेल्या तपासात हा व्हिडिओ खरा असल्याचे सिद्ध झाले आहे. फळांना थुंकी लावण्याचे हे प्रकरण 16 फेब्रुवारीचे आहे. शेरू यांची मुलगी सांगते, की तीच्या वडिलांची मानसिक स्थिती ठीक नाही. एक जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा संबंध कोरोनाशी जोडला जात आहे. शेरू मियांचा हा व्हायरल व्हिडियो सर्वप्रथम 16 फेब्रुवारीला टिकटॉक घेणाऱ्या दीपक नामदेव यांनी शुक्रवारी यासंदर्भात तक्रार नोंदवली होती.

तळमावले : शिवसमर्थ’ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ‘लाख’ मोलाची मदत


तळमावले/संदीप डाकवे
पाटण तालुक्यातील तळमावले येथील दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि;व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपमहाव्यव्स्थापक हेमंत तुपे व सहकारी यांनी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी पाटण तालुका पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी अशोक थोरात, पाटण तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी आर.बी.पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे पाटण तालुक्यातून कोरोना साठी केली गेलेली ही पहिली मदत आहे. ‘‘सामथ्र्य आहे चळवळीचे, जे जो करील तयाचे’’ या ब्रीद वाक्यानुसार 15 आॅगस्ट, 2006 पासून आर्थिक सेवा देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे.
कोरोनाने देशासह राज्यात थैमान घातले आहे. या विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी अनेकजण युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत. असे असताना संशयीत व बाधीत रुग्णांवर सुरु असलेले वैद्यकीय उपचार, औषध पुरवठा, गरिबांसाठी आवश्यक अन्न पुरवठा, अत्यावश्यक वैद्यकीय सेवासुविधा तातडीने उभारणी आदी बाबींसाठी मोठया आर्थिक तरतुदींची आवश्यकता आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सहकारी संस्था, सामाजिक संघटना यांनी आर्थिक मदत करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व प्रशासनाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि;तळमावले व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश देण्यात आला आहे.
याशिवाय संस्थेने ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत सुमारे 5 हजार मास्कचे वाटप केले असून 1 लाख मास्क वाटप करणार आहेत. तसेच प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा प्रसार करणारी दर्जेदार व्हिडीओ क्लीप तयार करुन ती सोशल मिडीया, स्थानिक चॅनेलवर प्रसारित केली आहे.  याशिवाय प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत शिवसमर्थ संस्था आणि परिवार नेहमी अग्रेसर असतो.  संस्थेच्या या सामाजिक बांधिलकीचे समाजाच्या विविध स्तरांतून कौतुक होत आहे.



प्रशासनला सहकार्य करावे:
दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि;तळमावले व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने देण्यात आलेल्या मदतीचा आदर्श घेत समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनीही प्रशासनाला मदत करावी. तसेच संस्थेच्या माध्यमातून प्रशासनाला जेवढे काही सहकार्य करता येईल यासाठी संस्था नेहमी पुढे आहे, असे मत संस्थेेचे संस्थापक 
अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांनी व्यक्त केले आहे.

मास्कची निर्मिती:
गरजू व होतकरु महिलांना घरबसल्या काम मिळावे या दृष्टीकोनातून स्थानिक महिलांच्या कडून मास्क बनवून घेत त्यांचे ग्रामीण भागात वितरण करण्यात आले आहे.

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

राज्यात 'कोरोना'चे ४७ नवीन रूग्ण आढळल्याने 'टेन्शन' वाढले

मुंबई | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तासागणिक वाढताना दिसत आहे. सद्यस्थितीला भारतात हा आकडा २००० च्या पुढे गेला असून महाराष्ट्रात हा आकडा आता ५०० च्या पुढे जात ५३७ झाला आहे. काल (३ एप्रिल) सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची देशातील संख्या ६८ वर पोहचली आहे.कोरोनाची लागण झाल्याची चाचणी करण्यासाठी गेल्या २४ तासांत देशात ८ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. दरम्यान, काल (३ एप्रिल) एका दिवसांत राज्यात ६७ रोपोना पॉझिटिव्ह झाले होते. तर आज (४ एप्रिल) ४७ नव्या रुग्णांची भर पडल्याने राज्यात चिंतेचे वातावरण अधिक निर्माण झाले आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील २८, ठाणे जिल्ह्यातील १५, पुण्यातील दोन, अमरावती व पिंपरी-चिंचवडमधील एकाचा समावेश आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना करता कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यातही मुंबईचा पहिला क्रमांक आहे.

महालक्ष्मीचं मंगळसूत्र तुटलं.. 22 हजार महिला होणार विधवा; सोशल मीडियावर अफवा

कोल्हापूर, 4 एप्रिल: राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अपवा पसरवल्या जात आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई बद्दल अशीच एक अफवा पसरली आहे.

'अंबाबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटलं असून त्या मंगळसूत्रातील 22 हजार मनी हरवले आहेत. त्यामुळे 22 हजार महिला विधवा होणार आहेत. मात्र त्यावर एक उपाय आहे. तो म्हणजे महिलांनी एक दोरा घेऊन तो पिवळा करून त्याच्यावर हळकुंड बांधून तो नवऱ्याकडून गळ्यात बांधवा, असा उपाय पुजाऱ्यांनी सांगितला आहे.' अशा अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच समाजकंटकांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे. याबाबत अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही अफवा असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.

दरम्यान, हा संदेश ज्या कुणी तयार करुन सोशल मीडियात पसरवा आहे. त्यांनी हेतू पुरस्तर समाजात भीती पसरवली, श्रीपुजकांबद्दल गैरसमज पसरवणे, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

नवी मुंबई : खारघर CRPF च्या आणखी सहा जवानांना कोरोना

नवी मुंबई - शहरातील खारघर भागात असलेल्या CRPF च्या आणखी सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही माहिती देण्यात आली असून नव्या रुग्णांची भर पडल्याने आता खारघर येथे तैनात असलेल्या CRPF च्या एकूण ११ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असलेल्या १२ जवानांपैकी ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, CRPF च्या १४६ जवान व अधिकाऱ्यांना काल रात्री उशिरा महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यातील सहा जणांची चाचणी कोरोना पॉसिटीव्ह आली असल्याचं समजलं आहे.

दरम्यान केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांसाठी प्रशासनातर्फे एमजीएम हॉस्पिटलमध्ये दोन स्वतंत्र विंग तयार करण्यात आले असूनआवश्यक असणा-या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या जवानांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आलेत.

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

कराडमध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण

महाराष्ट्रत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आज २४२ वर पोहोचला आहे. अशातच कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण ३ वर पोहोचली आहे.

दि. १ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी एक पुरु्ष रुग्णाचा (वय ३५ वर्ष) अहवाल हा कोरोना (कोविड १९) बाधित असल्याचे एन . आय . व्ही पुणे यांनी कळविले आहे. इतर १८ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

सदर कोरोना बाधित व्यक्ती मुंबईहून गावाकडे आल्याची माहिती मिळत आहे. गेले काही दिवस सदर व्यक्ती गावीच राहत होता. त्यामुळे आता संपर्कात आलेल्यांची प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम  युद्धपातळीवर सुरू आहे.

तळमावले : कपडे शिवणारे हात मास्क बनवतात तेव्हा..

कपडे शिवणारे हात मास्क बनवतात तेव्हा..
तळमावले/वार्ताहर
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूमुळे सर्वजण आपाआपल्या घरी आहेत. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लाॅकडाऊन केला आहे. काही अपवाद वगळता सर्वत्र शांततेत लाॅकडाऊन पाळण्यात येत आहे. याचा परिणाम उद्योगावर झाला आहे. महिला आपल्या घरगुती कामात मग्न आहेत.
घरात शिलाई मशीन असणाÚया स्त्रिया मशीन वर आपला वेळ घालवत आहेत. कुंभारगाव येथील सौ.सुवर्णा अनिल देसाई या एक कुशल महिला शिलाई कारागीर आहेत. त्यांनी काही वर्षापासून आपल्या परिसरातील महिला, मुली यांना मशीन क्लास अत्यंत अल्प दरात शिकवला आहे.
अनेक मंडळे यामध्ये जावून देखील त्यांनी महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी शिलाई मशीनची शिबीरे घेतली आहेत. त्यातून अनेक महिला स्वयंपूर्ण झाल्या आहेत.
सध्या कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण आहे. ग्रामीण भागात अजूनही मास्क मिळत नाहीत. आणि जरी उपलब्ध असले तरी ते अत्यंत महागडे आहेत. ग्रामीण भागातील लोक ते विकत घेूव शकत नाहीत. यामुळे सदर मास्क आपल्याला करता येतील का याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. या कल्पनेला मुर्त स्वरुप शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनामुळे आले. त्यांनी यासाठी मास्कचे कापड, लेस व इतर आवश्यक साहित्य त्यांना पुरवले. सौ. सुवर्णा देसाई यांनी या कापडाच्या माध्यमातून मास्क तयार करण्यास सुरुवात केली. मास्क हा शिलाईमधील नवीन प्रकार असला तरी सौ. देसाई यांना शिलाई कामाची आवड आणि कुटूंबियांची मिळणारी साथ यातून त्यांनी मास्क शिवायला सुरुवात केली.
घरातील दैनंदिन कामे केल्यानंतर फावल्या वेळेत त्या मास्क शिवण्याचे काम करतात. या वेळेत सुमारे 100 ते 150 मास्क त्या शिवतात. या मास्कना परिसरातून चांगली पसंतीदेखील मिळत आहे. सौ.सुवर्णा देसाई यांचे शिलाई कौशल्य यातून दिसून येते. मास्क शिवण्याच्या कामी त्यांना पती अनिल देसाई, मुलगी निशा देसाई, मुलगा शंभूराज देसाई हे मदत करत असतात. सदर मास्क हे ग्रामीण शिवसमर्थ संस्था आणि परिवार यांच्या वतीने मोफत वितरित करण्यात येणार आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.

सध्याचे वातावरण पाहता शासनाचे दिलेल्या सुचनांचे पालन करुन समाजासाठी आपल्याला काही करता येईल का? अशी भावना मनामध्ये निर्माण झाली. आणि त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लोकांना वापरता येतील असे अल्पदरातील मास्क आपण करावे असा निश्चय केला आािण त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे साहेब यांनी ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे.
-सौ.सुवर्णा देसाई

मुंबई : "कोरोना" मानखुर्द महाराष्ट्रनगर रामभोरोस

मानखुर्द महाराष्ट्र नगर 
कोरोना मुळे संपूर्ण जगात आहाःकार माजला असताना मुंबई मधील कोरोना ची संख्या वाढत चालली आहे झोपडपट्टी मध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत असे असताना मानखुर्द महाराष्ट्र नगर मध्ये सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो अशा चाळींना या संसर्गाचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे अशावेळी त्यावरती उपाययोजना म्हणून सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटायजरचा वापर शौचालय व त्यांचे दरवाजे कडी कोंयडे यांचे निर्जंतुकीकरण हे दररोज होणे गरजेचे असताना महाराष्ट्र नगर मध्ये कोणतीही प्रतिबंधक उपाय योजना करण्यात आलेली नाही रहिवाशांचे जीवन रामभरोसे अशी अवस्था झाली आहे.
मुळात ही सार्वजनिक शौचालय ज्या संस्थेने चालवण्यासाठी घेतली आहेत त्याचे पदाधिकारी कोरोना च्या भीतीने नगर सोडून गावी गेले आहेत.
 लाॅक डाऊनला बारा दिवस पूर्ण झाले तरी आजतागायत महापालिकेने सुद्धा यावर  कोणताही निर्णय घेतलेला नाही 
लोकप्रतिनिधीनी सुद्धा दखल घेतलेली नाही.त्यामुळे महाराष्ट्र नगर मधील रहिवाशांचे जीवन धोकादायक ठरू शकते.

बुधवार, १ एप्रिल, २०२०

पारनेरमध्ये एक हजारजण होम क्वॉरंटाईन

पारनेर - तालुक्यात परदेशवारी करून आले 21, राज्याच्या बाहेरून 197 तर जिल्ह्याच्या बाहेरून 16 हजार 249 जण आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य विभागाने तब्बल सुमारे तीन हजार 967 लोकांना होमक्वॉरोंटईन केले आहे. या लोकांनी आपआपल्या घरातच व तेही स्वतंत्र विलगीकरण कक्षात थांबावे, असा सल्ला त्यांना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यात एक मार्च ते 28 मार्च अखेर सुमारे 17 हजार 93 लोक तालुका , जिल्हा , राज्य तर काही परदेश वारी करूण आले आहेत. यात तालुक्याच्या बाहेरून आलेल्यांची संख्या अवघी 542 आहे तर जिल्हयाबाहेरून तसेच राज्य व परदेश वारी केलेल्यांची संख्या त्या मानाने मोठी आहे.या आकडेवारीत अजूनही भर पडणार आहे कारण अजूनही काही गावातील हा सर्वे करणे बाकी आहे.

तालुक्यातील अळकुटी, भाळवणी, निघोज, पळवे खुर्द, कान्हूर पठार, रूई छत्रपती व खडकवाडी अशी सात प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यांच्या मदतीने ही आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. आज अखेर तालुक्यातील तीन हजार 967 लोकांना होमकोरोंटाईन केले आहे. त्यांनी स्वतःहून घराच्या बाहेर पडू नये असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे. मात्र, यातील कोही लोक घराबाहेर पडताना दिसत आहे मला काहीच झाले नाही.

या भावनेतून अनेक ठिकाणी ही मंडळी जाताना आढळतात. मात्र जर कदाचित यातील एखादा व्यक्ती पॉजिटिव्ह निघाली तर त्याचा तालुक्ाला मोठा धोका आहे. तालुक्यातील ज्या लोकांना होमकोरोंटाईन केले आहे त्यांनी 14 दिवस आपली स्वताःची काळजी घ्यावी घराबाहेर पडू नये घरातही वेगळे थांबावे, स्वताःचे, कुटुंबाचे व समाजाचेही रक्षण करावे.

- डॉ. प्रकाश लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी.

साताऱ्यातील 11 तर कराडमधील चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह

करोनाचे अनुमानित रुग्ण म्हणून दाखल झालेले साताऱ्यातील 11 व कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधील 4 अशा पंधरा जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयात करोनाचे अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्या सातारा जिल्ह्यातील अनुमानित अकरा जणांचा ररिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

अनुमानित रुग्ण म्हणूनत्यांना दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्यातील 'एनआयव्ही'कडे तपासणीकरीता पाठविण्यात आले होतो. परदेशातून प्रवास करुन आलेले सात प्रवाशी, इस्लामपूर येथील करोना रुग्णाच्या संपर्कात आलेले दोन व इतर दोन असे एकूण 11 जणांचे आणि कराड - येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये करोना अनुमानित म्हणून उपचारासाठी दाखल झालेल्या चारही रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

पाटण : माजी सरपंचाच्या घरातच शिरला बिबट्या

मारुलहवेली, ता. पाटण :

येथील माजी सरपंच नितीन शिंदे यांच्या घरात सोमवारी रात्री बिबट्या शिरल्याची माहिती सारंग पाटील यांना मिळाल्यावर त्यांनी याची माहिती वन विभागाला आणि रोहन भाटे यांना दिली. भाटे यांनी परिक्षेत्र वनाधिकारी विलास काळे व जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांना माहिती दिली.

हाडा यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जायला सांगितल्यावर ते शिंदे यांच्या घराच्या परिसरात दाखल झाले. त्यावेळी घराच्या पोटमाळ्यावर बिबट्या बसलेला दिसला. त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, त्यात न सापडता बिबट्या पसार झाला.

रोहन भाटे, परिक्षेत्र वनाधिकारी काळे, वनरक्षक रमेश जाधवर, सौरभ लाड हे पिंजरा, वाघर व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते.बिबट्या सापळ्यात येत नसल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक महादेव मोहिते यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडील प्राण्यांना बेशुद्ध करण्याची बंदूक मागवण्यात आली. कोल्हापूर येथून वन विभागाचे डॉ. वाळवेकर व पथक बोलाविण्यात आले. मध्यरात्री दोन वाजता डॉ. वाळवेकर यांनी बिबट्याला इंजेक्‍शन मारले. मात्र, तो बेशुद्ध झाला नाही. त्यानंतर अनेक प्रयत्न करण्यात आले.

एक इंजेक्‍शन बिबट्याच्या उजव्या पायाच्या मांडीत लागले. पुन्हा दीड तासाने तेथेच इंजेक्‍शन लागले. मात्र, तरीही बिबट्या बेशुद्ध झाला नाही. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वाघर कौलावर अंथरुन त्या खालची कौले काढण्यात आली. त्याच वेळी बिबट्याने कौले काढलेल्या ठिकाणावरून पत्र्यावर आणि तेथून शेतात उडी मारून तो पसार झाला. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भागात पिंजरे लावण्यात आले आहेत. नितीन शिंदे, प्रकाश पाटील, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, डॉ. वाळवेकर व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...