शनिवार, ४ एप्रिल, २०२०

महालक्ष्मीचं मंगळसूत्र तुटलं.. 22 हजार महिला होणार विधवा; सोशल मीडियावर अफवा

कोल्हापूर, 4 एप्रिल: राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अपवा पसरवल्या जात आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई बद्दल अशीच एक अफवा पसरली आहे.

'अंबाबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटलं असून त्या मंगळसूत्रातील 22 हजार मनी हरवले आहेत. त्यामुळे 22 हजार महिला विधवा होणार आहेत. मात्र त्यावर एक उपाय आहे. तो म्हणजे महिलांनी एक दोरा घेऊन तो पिवळा करून त्याच्यावर हळकुंड बांधून तो नवऱ्याकडून गळ्यात बांधवा, असा उपाय पुजाऱ्यांनी सांगितला आहे.' अशा अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच समाजकंटकांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे. याबाबत अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही अफवा असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.

दरम्यान, हा संदेश ज्या कुणी तयार करुन सोशल मीडियात पसरवा आहे. त्यांनी हेतू पुरस्तर समाजात भीती पसरवली, श्रीपुजकांबद्दल गैरसमज पसरवणे, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...