शनिवार, ११ एप्रिल, २०२०

मुंबई : लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढला


मुंबई ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीत आणि उपाययोजनांबाबत माहितीही घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याची घोषणा केली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना, कोणत्याही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आजपर्यंत जे धैर्य दाखवले तसेच यापुढेही दाखवा,असे आवाहन केले

कोरोनाग्रस्तांची महाराष्ट्रातील संख्या वाढलेली आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचे प्रवेशद्वार आहे. आपण जेव्हा या रोगाच्या तपासण्या सुरु केल्या, तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतील देशांना बंदी होती. पण यादीत जे देश नव्हते त्यातील रुग्ण राज्यात मिसळले.आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत, ते भाग सील केले आहेत. आपल्याला जे रुग्ण सापडले आहेत, त्यांची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करत आहे. आता रुग्ण समोरुन येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजारांवर गेली आहे.


दुर्दैवाने कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, ती संख्या देखील वाढत आहे. ज्यांचे वय जास्त आहे त्यांना धोका वाढतो आहे. ज्यांना आधीपासून काही विकार आहेत अशा रुग्णांवर कोरोनाचा गंभीर परिणाम होतो आहे. त्याचबरोबर येत्या 14 एप्रिलला पुढील लॉकडाऊनची रुपरेषा सांगणार असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...