संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला धरणीमाता फौंडेशनचे निवेदन
*गणेशोत्सव साध्या पद्धतीने व पर्यावरण पुरक साजरा करा**- जिल्हाधिकारी शेखर सिंह*
रविवार, २९ ऑगस्ट, २०२१
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सरचिटणीसपदी जिल्हा परिषद सदस्य ॲड.उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर कार्यकारी समितीवर अजितराव पाटील-चिखलीकर यांची वर्णी
ॲड. उदयसिंह पाटील यांना आणखी बळ मिळावे, या हेतूने कॉंग्रेसने त्यांच्यावर राज्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे उंडाळकरांच्या रयत संघटनेत आनंदाचे वातावरण आहे. कॉंग्रेस पक्षाची मुलुख मैदान तोफ म्हणून परिचित असणारे अजितराव पाटील-चिखलीकर यांची कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीवर निवड करण्यात आली आहे.
शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१
मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी निश्चित आराखडा तयार करावा -; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी निश्चित आराखडा तयार करावा -; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा बैठकीत आढावा
मुंबई दि.२७ :- . .मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी निश्चित आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यास जर विकासकाने असमर्थता दर्शवली असेल किंवा विकासकाकडून प्रकल्पाच्या कामास विलंब होत असेल तर असे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना व विविध पर्यायांचा कसा अवलंब करता येईल याची कार्यपद्धती निश्चित करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांबाबत नियम सुसंगत हवे
कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांबाबत सुसंगत नियमावली तयार करून लोकांना दिलासा द्यावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बेघर झालेल्या लोकांची थकीत भाडे देण्यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही नियमांची शिथिलता व अंमलबजावणी, प्रकल्प कालबद्ध व विशिष्ट मर्यादित होण्यासाठी करावयाचे नियम याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापी, अद्यापही केंद्र शासनाने 2015 नंतर नुकसानभरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम 2019 च्या महापूरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.
*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर*
गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१
कुंभारगाव : सरपंच सौ.सारिका योगेश पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
*सातारा पर्यटकांची वाढती गर्दी पाहता कास पठारावर**पार्किंगची योग्य ती सुविधा व्हावी : खा. श्रीनिवास पाटील*
सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१
कुंभारगाव : त्या धोकादायक विजेच्या खांबाकडे महावितरणचा कानाडोळा
कुंभारगाव : त्या धोकादायक विजेच्या खांबाकडे महावितरणचा कानाडोळा
कुणाल माने : कुमजाई पर्व न्यूज
कुंभारगाव ता.पाटण- प्रतिकूल परिस्थितीतही रात्रीचा दिवस करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तळमावले महावितरण अधिकाऱ्यांनी मोहीम फत्ते केली आहे. तर दुसरीकडे कुंभारगाव मान्याचीवाडी येथील पुलाजवळ आलेल्या पोलचा पुरामुळे भराव वाहून गेल्याने पोल पूर्ण मोकळा झाला आहे या धोकादायक विजेच्या पोलबाबत वारंवार पाठपुरावा करूनही महावितरण अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
एखादी मोठी दुर्घटना अथवा जीवितहानी झाल्यावर महावितरणाला जाग येणार का? असा खडा सवाल ग्रामस्थ करत आहेत. संबंधित रस्ता रहदारीचा असल्याने दिवसभर नागरिकांची ये जा चालू असते त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे
वारंवार मागणी करूनही अद्यापही खांब बदलला गेला नसून याच खांबावर तारांचा झोळ खाली येत असून मोठी दुर्घटना अथवा जीवितहानी घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने महावितरण अधिकारी दुर्घटना अथवा जीवितहानी होण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.
शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१
*सातारा जिल्ह्यातील 623 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 54 बाधितांचा मृत्यू**612 जणांना दिला आज डिस्चार्ज*
शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१
*सातारा जिल्ह्यातील 597 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 17 बाधितांचा मृत्यू**661जणांना दिला आज डिस्चार्ज*
ढेबेवाडी : बिबट्याने मारली उडी आणि शेतकऱ्याचा जीवाचा थरकाप
गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१
*सातारा जिल्ह्यातील : 751 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू**797 जणांना दिला आज डिस्चार्ज*
बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१
*शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत चालू*
शिवसेना कुठरे विभागातून पूरग्रस्तांना मदत
शिवसेना कुठरे विभागातून पूरग्रस्तांना मदत
कुमजाई पर्व न्यूज / मनोज सावंत
तळमावले : पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना शिवसेना कुठरे विभागातून अन्नधान्य, कपडे आणि जिवनआवश्यक मदत देण्यात आली आहे.भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार दादा व मर्चंट सिंडिकेट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक श्री . अनिल शिंदे यांच्या पुढाकारातून दि.16 ऑगष्ट रोजी मदत देण्यात आली.पाटण तालुक्यातील कोयनानगर भागातील मिरगांव , बाजे , गोकुळनाला , आंबेघर, कामरगाव , ढोकावळे , हुंबरळी , नवजा तर ढेबेवाडी विभागातील जितकरवाडी , जोशीवाडी (काळगाव ) येथील लोकांना महाभयंकर फटका बसला . अतिवृष्टीने सलग दोन दिवस थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे .पाटण तालुका शिवसेना संघटक श्री . सुनिल पवार यांनी कोयना भागातील मिरगांव , बाजे, गोकूळनाला या जि .प. प्रा . शाळा कोयनानगर येथे तात्पुरते पुनर्वसन केलेल्या गावांना जीवनावश्यक वस्तूचे साहित्य त्यांच्या मागणीनुसार किराणा साहित्य , मसाले साहित्य , द्रोण- पत्रावळी ,चहाचे कप ,डिश व कपडे इ . वाटप करण्यात आले या योगदानामध्ये बाळकृष्ण केबल नेटवर्क तळमावले श्री . शिवाजी सुर्वे साहेब , शिवसेना पाटण तालुका संघटक श्री . बाबासो निवडुंगे , श्री .वसंत लोकरे भाऊ , शशिकांत शिंदे , साई प्रतिष्ठान बादेवाडी , रघुनाथ शिंदे , संजय जाधव , अधिकराव शिंदे , अनिल जाधव, रविंद्र चव्हाण , अनिल लोकरे , राहुल लोहार , जयवंत कदम , अनिल कदम , रणजीत पवार आदींचा समावेश होता .शिवसेना कुठरे विभागातून पूरग्रस्तांना मदत
सदर मदत ही शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख श्री .जयवंतराव शेलार (माऊली ) , मर्चंट सिंडीकेट संस्थेचे संस्थापक अनिल शिंदे साहेब , अंगणवाडी सेविका सौ . संगीता म्होहळकर , सौ . सुमन यादव मॅडम , समाजसेवक चंद्रकांत चाळके , संभाजी चाळके, बाबासो निवडुंगे , सुनिल पवार व शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आली .
शिवसेनेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे
पश्चिम महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय मदत दिली जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंगीकारून शिवसैनिक मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. याच विचारातून सामाजिक बांधिलकी जपत तातडीची मदत म्हणून अत्यावश्यक गरजेच्या वस्तू पाठविल्या जात आहेत, असे भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष श्री.अविनाश पवार दादा यांनी सांगितले.
मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१
*सावली प्रतिष्ठानचा ऑनलाइन निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*
सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१
*सातारा जिल्ह्यातील 569 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू*
तळमावले : धरणीमाता फाउंडेशन घेतंय पूरग्रस्तांची काळजी
ढेबेवाडी : उल्लेखनिय कामगिरी : पोलीस पाटलांचा गौरव
ढेबेवाडी : उल्लेखनिय कामगिरी : पोलीस पाटलांचा गौरव
कुमजाई पर्व वृत्तसेवा / मनोज सावंत
ढेबेवाडी ता.पाटण - ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संतोष पवार साहेब यांनी प्रशसंनीय व उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल वाझोली गावचे पोलीस पाटील विजय सुतार व मत्रेवाडी गावचे पोलीस पाटील भगवान मत्रे या दोन पोलीस पाटील यांचा यांनी केलेल्या कामगिरी बाबत त्यांना आज दि.15 ऑगस्ट अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाल श्रीफळ देवुन त्यांचा गौरव व अभिनंदन करून त्यांचे पाठीवर आज कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.
दि.22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे जिंती येथील जितकर वाडी येथे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये 23 कुटुंबातील 93 लोकांना तुटलेल्या पुलाला शिड्या लावत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस पाटील विजय सुतार व भगवान मत्रे यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली मौलिक कामगिरी बजावली होती .नैसर्गिक आपत्ती काळात योग्य कामगिरी बजावल्या बद्दल श्री संतोष पवार यांनी त्यांचा आज सत्कार करण्यात आला या वेळी सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
रविवार, १५ ऑगस्ट, २०२१
*सातारा जिल्ह्यातील 653 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*
काळगावं : वाझोलीतील पूल धोकादायक अवस्थेत
राज्यांअंतर्गत स्पर्धेत कुंभारगावतील शेतकरी पठ्याची दमदार कामगिरी : तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक
राज्यांअंतर्गत स्पर्धेत कुंभारगावतील शेतकरी पठ्याची दमदार कामगिरी : तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक
कुंभारगाव ता.पाटण - कृषिप्रधान देश असलेल्या भारतात आजही अनेक जण नापीक जमिनीला कंटाळून आत्महत्या करतात. तर काहीजण याच उजाड जमिनीत देखील आपल्या मेहनतीने सोने पिकवण्याची धमक बाळगतात.
व अशाच शेतकऱ्यांमुळे आपला देश अन्न धान्यात अग्रेसर राहतो. यातच पाटण तालुक्यात एक कौतुकास्पद गोष्ट घडली आहे. राज्य शासनाच्या पीक स्पर्धेत कुंभारगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र चव्हाण
यांनी पाटण तालुकास्तरावर प्रथम क्रमांक व जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकाविला. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.
अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात आली.
या स्पर्धेत कुंभारगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी सहभाग घेत रब्बी हंगामात आपल्या अडीच एकर शेतात ज्वारीचे पीक घेतले. व योग्य व्यवस्थापन करत हेक्टरी 56 क्विंटल 75 कि. उत्पन्न मिळवत पाटण तालुक्यातील प्रथम क्रमांक पटकाविला व सातारा जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला.
दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने विविध प्रयोग शेतात राबविल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. कोणत्याही पिकाच्या लागवडीचा / पेरणीचा कालावधी महत्त्वाचा असतो. योग्य नियोजन आणि सल्ला घेतला तर प्रत्येकजण भरघोस उतपादन घेऊ शकतो.
शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१
साताऱ्यात आज 52 हजारांपेक्षा अधिक लसीकरण, आज पर्यंतचे हे उच्चांकी लसीकरण जिल्हाधिकारी आणि सीईओ यांनी केले आरोग्य विभागाचे अभिनंदन*
*सातारा जिल्ह्यातील 785 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू*
धामणी : विद्युत खाते अपघाताची वाट पाहते का? ग्रामस्थांचा सवाल ?
शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१
सातारा अनलॉक : रविवारपासून दुकाने, मॉल,उपहारगृहे रात्री 10 पर्यंत खुली राहणार
*सातारा जिल्ह्यातील 1090 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 13 बाधितांचा मृत्यू*
*सावली प्रतिष्ठानचाऑनलाइन निबंध बक्षीस वितरण 15 ऑगस्ट रोजी*
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपात करण्याचा शासन निर्णय जाहीर
राज्यात देखील बहुतांश भागात मार्च, २०२० पासून ब-याच कालावधीसाठी शाळा बंद असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे, यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी देखील काही शैक्षणिक सुविधांचा वापर केलेला नाही व यामुळे शैक्षणिक संस्थांच्या खर्चात देखील काही प्रमाणात बचत झाली आहे. या पार्श्वभूमीवर व सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेले आदेश विचारात घेवून निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णय
· सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी.
· यापूर्वी ज्या पालकांनी पूर्ण फी भरली आहे, अशी अतिरीक्त फी पुढील महिन्यात किंवा तिमाही हप्त्यात किंवा पुढील वर्षी शाळा व्यवस्थापनाने समायोजित करावी किंवा याप्रमाणे फी समायोजित करणे शक्य नसल्यास फी परत करावी.
· कपात करण्यात आलेल्या फीबाबत विवाद निर्माण झाल्यास असा विवाद यथास्थिती संबंधित विभागीय शुल्क नियामक समितीकडे किंवा शासन निर्णय क्र. तक्रार-२०२०/ प्र.क्र.५०/एस.डी-४,दिनांक २६ फेब्रुवारी २०२० अन्वये गठीत विभागीय तक्रार निवारण समितीकडे दाखल करण्यात यावा व याबाबत विभागीय शुल्क नियामक समितीने किंवा विभागीय तक्रार निवारण समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील.
· कोव्हीड-१९ महामारीच्या काळात विद्यार्थ्याने शाळेची फी, थकीत फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापनाने अशा कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यास किंवा परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात येऊ नये किंवा अशा विद्यार्थ्यांचा निकाल देखील रोखून धरण्यात येऊ नये.
· हे आदेश सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांना लागू राहतील.
· हे आदेश तात्काळ परिणामाने अमलात येतील.
*सातारा जिल्ह्यातील 973 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू*
बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१
ग्रंथालय दिनाच्या निमित्ताने के.सी.कॉलेज येथे ऑनलाईन वेबीनार कार्यक्रम संपन्न
*सातारा जिल्ह्यातील 622 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 31 बाधितांचा मृत्यू*
मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१
ग्रामीण भागात ५ वी ते ७ वी आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू
ग्रामीण भागात ५ वी ते ७ वी आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू
मुंबई। महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात मोठा निर्णय काही दिवासांपूर्वी जाहीर केला होता. 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथील केल्यानंतर सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. राज्यातील ग्रामीण भागात (17 ऑगस्ट 2021) पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनानं आता परवानगी दिली आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त ठरवतील, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
दिनांक 17 ऑगस्ट,2021 पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच दिनांक 2 ऑगस्ट, 2021 रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
काय असतील शाळा सुरू होण्यापूर्वी नियम
1)शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
2) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
3) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
4) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
5) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
6) शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.
7) संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
8) वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात. शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं
जिल्हा बँकांच्या निवडणुकीची रणधुमाळी :15 बँकांसाठी सप्टेंबरमध्ये मतदान
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या ' महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने'ची अंमलबजावणी आणि त्यानंतरच्या कोरोनासाथीमुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयाने ज्या संस्थांच्या संदर्भात आदेश दिले होते अशा संस्था वगळून उर्वरित सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सहकार विभागाने ३१ ऑगस्ट २०२१ पर्यँत स्थगिती दिली होती. मात्र, विभागाने सोमवारी आदेश जारी करून निवडणुकीवरील स्थगिती उठवली.
निवडणुकीस पात्र असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत मतदार यादी तयार करण्यासाठी सभासद संस्थानी यापूर्वी सादर केलेले ठराव विचारात घेऊन बँकेची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती, त्या टप्प्यापासून पुढे तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून जिल्हा बँकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच घोषित केला जाईल. साधारणतः सप्टेंबरपर्यँत जिल्हा बँकांसाठी मतदान होऊ शकते,अशी माहिती सहकार विभागाकडून दिली.
निवडणूक होऊ घातलेल्या बँका
मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदूरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर,सोलापूर, नागपूर आणि बुलढाणा
सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडी जाहीर :राष्ट्रवादीचे बारा तर शिवसेना व काँग्रेसचे चार सदस्य समितीवर
सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडी जाहीर :राष्ट्रवादीचे बारा तर शिवसेना व काँग्रेसचे चार सदस्य समितीवर
सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची बहुप्रतिक्षीत यादी सोमवारी मंत्रालयातून जाहीर करण्यात आली. या निवडीचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले,
सातारा : सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची बहुप्रतिक्षीत यादी सोमवारी मंत्रालयातून जाहीर करण्यात आली. या निवडीचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, राष्ट्रवादीच्या बारा तर कॉंग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी चार सदस्यांना समितीवर संधी देण्यात आली आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून नियोजन समिती सदस्यांची यादी केव्हा जाहीर होणार याची राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती.मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर उपसचिवांनी याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी बी. जे. जगदाळे यांना सोमवारी दुपारी प्राप्त झाले. या समितीतील 20 सदस्यांमध्ये संसद व विधीमंडळ सदस्यांतून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांचा समावेश झाला आहे.
विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची निवडीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा अपेक्षेप्रमाणे प्रभाव दिसून आला. तब्बल सत्तेचाळीस दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने झालेली अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याच्या वृत्ताला नियोजन समितीच्या सूत्रांनी दुजोरा दिला. त्यानुसार आज सातारा जिल्ह्यातील नियोजन समितीची विशेष निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर झाली. अपेक्षेप्रमाणे महा विकास आघाडीचे संतुलित प्रतिबिंब जिल्हा पातळीवर कसे उमटेल याची विशेष काळजी घेण्यात आली. त्यानुसार ज्या पक्षाचा पालकमंत्री आहे. त्यांना जादा जागा दिल्या जातात. यामध्ये नामनिर्देशित सदस्यांमध्ये आमदार व खासदारांपैकी दोन सदस्य घेतले जातात.
नामनिर्देशित तज्ञ सदस्य म्हणून चार व विशेष निमंत्रित १४ सदस्यांचा समावेश केला जातो. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला १२, शिवसेनेला चार व काँग्रेसला चार सदस्य वाटणीला आले आहेत. यामध्ये संसद व विधीमंडळ सदस्यांतून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार मकरंद पाटील व दीपक चव्हाण यांच्या नावाचा समावेश केला आहे.
तसेच जिल्हा नियोजन समितीचे ज्ञान असलेले तज्ञ नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. विजयराव कणसे, शिवसेनेतून जयवंत शेलार यांचा समावेश केला आहे. विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये राष्ट्रवादीतून धैर्यशील अनपट, ॲड. श्यामराव गाढवे, सतीश चव्हाण, दीपक पवार, सुरेश्चंद्र उर्फ राजभाऊ काळे, सागर साळुंखे, प्रभाकर देशमुख, संतोष पाटील. काँग्रेसमधून अशोक गोडसे, जयवंतराव जगताप, हिंदूराव पाटील, शिवसेनेतून शेखर गोरे, राजेश कुंभारदरे, राहूल बर्गे यांच्या नावाचा समावेश आहे.
सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१
*सातारा जिल्ह्यातील 588 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू**973 जणांना दिला आज डिस्चार्ज*
*अतिवृष्टी बाधित तालुक्यातील पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात, बाधित असलेला या लाभा पासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी*- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*
रविवार, ८ ऑगस्ट, २०२१
*सातारा जिल्ह्यातील 657 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू**777 जणांना दिला आज डिस्चार्ज*
शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१
*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत किटचे वाटप*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...