धामणी : विद्युत खाते अपघाताची वाट पाहते का? ग्रामस्थांचा सवाल ?
प्रतिनिधी : मनोज सावंत
तळमावले ते काळगावंकडे जाणाऱ्या रस्त्यालगत धामणी गावच्या हद्दीत रामनगर कमानी जवळ रस्त्याच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला असणारे विद्युत खांब पूर्णपणे वाकलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे या खांबावरील विद्युत तारांचा ताण कमी झालेला जाणवतो. हे खांब अतिशय धोकादायक अवस्थेत आहे त्यामुळे कधी संकट ओढवेल सांगता येत नाही.
विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही ते दखल घेत नाहीत. तो खांब कोसळून कुणाचा जीव जावा याची वाट ते पाहताहेत का असा संतप्त प्रश्न गावकरी विचारत आहेत.खांब रहदारीच्या वाटेवर आहे रात्र दिवस वाहतूक चालूअसते.वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.हा धोकादायक विद्युत खांब बदलून त्या जागी नवा विद्युत खांब उभारण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा