संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१
जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश सातारा जिल्ह्यात 7 ऑक्टोबर पासून धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी
*सातारा जिल्ह्यातील 214 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित**137 जणांना दिला आज डिस्चार्ज*
युवक काँग्रेसच्या निवडी जाहीर : अध्यक्षपदी नरेंद्र पाटणकर तर उपाध्यक्षपदी उदयसिंह चव्हाण व जगदीश पाटील
श्री. पाटणकर हे दिवशी बुद्रक, श्री. पाटील हे सुपने, तर श्री. चव्हाण हे कुंभारगावचे राहणारे आहेत. अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सरचिटणीस- मयूरेश साळुंखे, मयूर वनवे, स्वप्नील पवार, सागर चव्हाण, तोफिक पटेल. चिटणीस- अक्षय घाडगे, निरंजन धस, सुभाष माने, रोहित चव्हाण, योगेश काकडे, मारुती शेलार. सदस्य- परशुराम पवार, रमेश शेलार, रमेश साळुंखे, जमीर डांगे, रोहित माने, विनोद घाडगे, सचिन साळुंखे, जयदीप कदम, तुषार कांबळे, अक्षय सुतार, प्रशांत पालकर. निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिंदुराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१
*सातारा जिल्ह्यातील : 207 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू**264 जणांना दिला आज डिस्चार्ज*
काळगाव : पवारवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियान उत्साहात साजरा
मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१
नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय
नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय
मुंबई, दि.२८ : नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे. कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.
*खा. रजनीताई पाटील यांचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून अभिनंदन*
तळमावले : मर्चंड सिंडिकेट ग्रामीण बिगरशेती सहकारी क्रेडिट संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१
*सातारा जिल्ह्यातील 147 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित* *493 जणांना दिला आज डिस्चार्ज*
रविवार, २६ सप्टेंबर, २०२१
कृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन -कृषी मंत्री दादाजी भुसे
शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१
मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर
डॉ. पाटील यांनी सांगितले की ही परीक्षा घेण्यासाठी न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार करण्यात आला होता. या कंपनीची निवड राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागा (माहिती तंत्रज्ञान) यांच्या एकवीस जानेवारी २०२१ रोजी ओएमआर व्हेंडौर पॅनेलची नियुक्ती करण्यात आली आहे. या पॅनेलमधील सर्व कंपन्यांच्या सक्षमता तपासणी साठी सर्वंकष चाचणी विभागाच्या वतीने घेण्यात आली होती. शासन नियुक्त पॅनेलमधील चाचणीत प्रथम आलेल्या न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस भरतीचे काम करण्यासाठी करारबद्ध केले होते. करारातील अटीनुसार आरोग्य विभागाने प्रश्न पत्रिका संच गोपनीय रित्या कंपनीस हस्तांतरण करणे एवढीच जबाबदारी विभागाची होती. भरती प्रक्रियेसाठी संकेतस्थळ विकसित करणे, ऑनलाईन अर्ज मागवणे, उमेदवारांना प्रवेशपत्र देणे, शाळा महाविद्यालये अधिग्रहित करुन बैठक व्यवस्था करणे, लेखी परीक्षा घेणे, गुणवत्ता यादी तयार करणे ही सर्व कामे कंपनीची होती. मात्र आरोग्य विभागाने सर्व सहकार्य करुन देखील न्यासा कम्युनिकेशन कंपनी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आणि बैठक व्यवस्था करण्यात अपयशी ठरली आहे. परीक्षेची पूर्व तयारी पूर्ण न झाल्याने कंपनीच्या संचालकांनी आज सायंकाळी सात वाजता परीक्षा घेण्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाली याची खात्री करुनच परीक्षेचे आयोजन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ही परीक्षा सर्व तांत्रिक बाबींची पूर्व तयारी करुन लवकरच घेण्यात येईल. परीक्षेची नियोजित तारीख सर्व उमेदवारांना विभागाचे संकेतस्थळ, ई-मेल, एसएमएस व्दारे कळविण्यात येईल, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय
७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय
आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन
मुंबई दि.नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.
पाटण : रानडुकराचे मांस विक्री प्रकरणी तिघांना अटक
पाटण : रानडुकराचे मांस विक्री प्रकरणी तिघांना अटक
पाटण : रानडुकराची शिकार करून डावरी (ता. पाटण) येथे मांस विकणाऱ्या तिघांवर वनाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दशरथ विष्णू मोहिते, विलास शामराव सत्रे व सोमनाथ संपत तिकुडवे (सर्व रा.डावरी, ता. पाटण) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित व्यक्ती डुकराचे मांस विकत असल्याची माहिती पाटणचे वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार यांना मिळाली. त्यानुसार डावरी गावच्या हद्दीत ''टॅक'' या स्थानिक नावाने प्रसिद्ध असलेल्या वस्तादाच्या विहिरीजवळ छापा टाकण्यात आला. एका झाडाखाली संशयित लोक डुकराचे मांस विक्री करताना आढळले.
त्यांना वनविभागातील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. संशयितांजवळ मांस तोडण्याचे तीन सत्तूर, पक्षी पकडण्याची जाळी हे साहित्य मिळाले. संशयितांवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ अन्वये गुन्हा नोंद करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार, वनपाल एस. बी. भाट, ए. डी. राऊत, वनरक्षक व्ही. एम. चौरे, बी. ए. माने, डी. बी. बर्गे, वनमजूर आर. व्ही. कदम यांच्या पथकाने केली.
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१
पाटण : धक्कादायक :एकतर्फी प्रेमातून घरात घुसून तरुणीचा खून
मुलीला काही कळायच्या आत आरोपीनं तिचं तोंड दाबलं आणि तिच्या गळ्यावरून धारदार चाकू फिरवला.थंड डोक्याने केलेल्या या हल्ल्यानंतर पीडित मुलगी घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर संशयित आरोपी अनिकेत मोरे (२०, रा. शिरंबे, कोरेगाव) स्वत: मल्हारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन हजर राहिला. तसेच त्याने संबंधित मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान त्याने मृत मुलीच्या आईची भेट घेऊन लग्नासाठी मागणी देखील घातली होती. पण मुलीच्या आईने लग्नासाठी नकार दिला होता. मुलीच्या आईने लग्नासाठी नकार दिल्याने आरोपीच्या मनात मुलीबद्दल आणि तिच्या आईबद्दल रोष वाढला होता. यातूनच आरोपीनं संबंधित अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केली आहे.
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१
तळमावले : विजय काळे आज सातारा आकाशवाणीवर
बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१
डाॅ.संदीप डाकवे यांचा 10 हजार कलाकृती भेटीचा टप्पा पूर्ण
सोमवार, २० सप्टेंबर, २०२१
इयत्ता बारावी परीक्षा निकलाबाबत विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत व अन्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 च्या मूल्यमापनासंदर्भात दाखल याचिका क्र.620/2021 बाबत सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी दि. 24/06/2021 रोजी निकाल दिला आहे. त्यानुसार परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर झाल्यानंतर या निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्याच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेशित केलेले आहे.
दूरदर्शनवरील मुलाखतीबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
जवानांमुळेच आपण सर्वजण सुरक्षित - नरेंद्र पाटील
पाटण तालुक्यातील 61 गावांना मिळणार रास्तभाव दुकानाचा परवाना
त्यासाठी 61 गावांमध्ये जाहीरनामे लावण्यात आले असून इच्छुक असणाऱ्या संस्थांनी 6 ऑक्टोबर 2021 अखेर तहसीलदार पाटण यांच्याकडे अर्ज करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
नव्याने रास्त भाव दुकानाचे परवाने मंजूर होणारी गावे -
चिटेघर, जाईचीवाडी, वन, आरल - कातवडी, आडुळ, चाफोली, जुंगटी, चोपदारवाडी, गिरेवाडी, शेडगेवाडी, येराडवाडी, पेठशिवापूर, किल्ले मोरगिरी, डोंगळेवाडी, गोकुळ तर्फ पाटण, काहिर, आंबेघर तर्फ मरळी, पाचगणी, आटोली, वाडी कोतावडे, बांधवट, विरेवाडी, माथनेवाडी, खराडवाडी, तोरणे, किसरुळे, मिरगाव, बाजे, गोषटवाडी, कामरगाव, गोवारे, मळा, पाथरपुंज, नाव, सुपुगडेवाडी, मुट्टलवाडी, चौगुलेवाडी (काळगाव) मस्करवाडी, ताईगडेवाडी, भिलारवाडी, वरेकरवाडी (कुंभारगाव) बोर्गेवाडी (कुंभारगाव) शिद्रुकवाडी (खळे), राहुडे, दुटाळवाडी, शितपवाडी, तामकडे, जोतिबाचीवाडी, चेवलेवाडी, नेरळे, पिंपळगाव, डोंगरोबाचीवाडी, तळीए, गोठणे, गोरेवाडी, घाटेवाडी, डागिष्टेवाडी, असवलेवाडी, पापर्डे बुद्रुक आदी गावांमध्ये नव्याने रास्त भाव दुकाने होणार आहेत. ही दुकाने प्राधान्याने ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत बचत गटासाठी आहेत. त्यासाठी जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. सदर गावांमधून इच्छुकांकडून अर्ज मागविले जात आहेत.
शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१
शेळकेवाडी : वाढदिनी जपली सामाजिक बांधिलकी : ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनंदा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१
सातारच्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेस राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाची मान्यता -खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश
पाटण तालुक्यात आज महालसीकरण
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१
डाॅ.संदीप डाकवे व राजेद्र कुंभार यांनी मानले जाहीर आभार
बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१
ढेबेवाडी : बनपुरीत देशी दारूचे 18 बॉक्स जप्त उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
ढेबेवाडी : बनपुरीत देशी दारूचे 18 बॉक्स जप्त उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
ढेबेवाडी प्रतिनिधी / मनोज सावंत
बनपुरी ता.पाटण दि.15 गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारू, ताडी व अवैध मद्य चोरटी वाहतुक वा वीक्री या वर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्यानुसार कराड विभागाच्या पथकाने बनपुरी ता.पाटण गावच्या हद्दीत सापळा रचून अवैध मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना बनपुरी येथे ताब्यात घेतले. या प्रकरणी बुधवार दि.15 केलेल्या कारवाईत एकूण एक ह्युंदाई असेंट चारचाकी वाहन व देशी दारूचे 18 बॉक्स असा सर्व मिळून ५ लाख १ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक शिरीष जंगम तसेच जवान भीमराव माळी,विनोद बनसोडे यांनी सहभाग नोंदवला यापुढे सदर कालावधीमध्ये अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे कराड विभागाचे उपनिरीक्षक श्री.शिरीष जंगम यांनी कुमजाई पर्व शी बोलताना सांगितले
मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१
वाझोली येथे माजी विध्यार्थी संघाची स्थापना
*शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्यासाठी 35 कोटी मंजूर*खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१
राज्यात १५ ऑक्टोबर पासून ऊसाचा गाळप हंगाम
१५ ऑक्टोबर पासून ऊसाचा गाळप हंगाम
मुंबई दि.१३ : राज्यात २०२१-२२ साठी ऊसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जे कारखाने १५ ऑक्टोबर २०२१ पूर्वी उसाचे गाळप सुरु करतील त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत, असा निर्णयही या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री विश्वजित कदम, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी गुप्ता, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र बँकेचे संचालक विद्याधर अनास्कर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, साखर संघाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
अभ्यासगटाच्या अहवालावर तत्काळ निर्णय घ्यावेत
केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एफआरपी निश्चित करण्यासाठी साखर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या अभ्यासगटाने आपला अहवाल आज शासनास सादर केला असून, त्यावर सहकार विभागाने हा अहवाल ऊस नियंत्रण मंडळाकडे सादर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावेत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी असेही बैठकीत निश्चित करण्यात आले. जे कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत आणि पूर्णत्वाने देत नाहीत अशा कारखान्यांकडे आगामी हंगामात गाळपासाठी ऊस द्यायचा किंवा नाही हे शेतकऱ्यांनी ठरवावे, यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या जाव्यात असेही बैठकीत निश्चित करण्यात आले.
राज्यातील १४६ साखर कारखान्यांनी एफएआरपीची १०० टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आल्यानंतर ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना पूर्णत्वाने दिली ते कारखाने सोडून इतर कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला. बँकांकडून मालतारण कर्जाची मिळणारी रक्कम कारखान्याने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, असेही निर्देशही बैठकीत देण्यात आले.
गाळप हंगाम २०२१-२२
गाळप हंगाम २०२१-२२ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपी दराप्रमाणे १० टक्के उताऱ्यासाठी २९०० रुपये प्रतिटन दर निश्चित करण्यात आला आहे. २०२१-२२ मध्ये राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र १२.३२ लाख हेक्टर असून ९७ टन प्रति हेक्टर उत्पादन अपेक्षित आहे. १०९६ लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज असून ११२ लाख टन साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या हंगामात अंदाजे १९३ साखर कारखाने सुरु राहतील.
इथेनॉल निर्मिती
राज्यात सहकारी आणि खासगी मिळून ११२ कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प राबविला जातो. व त्यातून २०६ कोटी लि. इथेनॉलची निर्मिती होते. केंद्र शासनाने शुगर, शुगर सिरप आणि बी-हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्याचे धोरण स्वीकारल्याने २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रणाचा लक्षांक पूर्णत्वाला जाईल असेही बैठकीत सांगण्यात आले.
ऊसाचे क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे
ऊस ठिबक सिंचनाखाली आणल्यास उत्पादन वाढते. ऊसाचे अधिकाधिक क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, यादृष्टीने विभागाने शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांच्यात जागृती निर्माण करावी असेही बैठकीत ठरले.
बैठकीत सहकारी साखर कारखान्यांच्यावतीने राज्य साखर संघाने केलेल्या मागण्यांची माहिती बैठकीत देण्यात आली. यावर बैठकीत सर्वंकष चर्चा करण्यात आली.
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१
*राज्याचे गृह(ग्रामीण)राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचेकडून*टोल नाक्यावर थांबून गणेश भक्तांची विचारपूस*
बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१
*रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल होणार* *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती ; जुना पूल मे अखेरीस पूर्ववत होणार.*
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१
*सातारा ; एकरकमी कर्ज परतफेड योजनेस 31 मार्च 2022 अखेर मुदतवाढ*
सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१
डाॅ.संदीप डाकवे यांची दुरदर्शन सहयाद्री वाहिनीवर मुलाखत
रविवार, ५ सप्टेंबर, २०२१
कोरोना संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज - ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत.
कोरोना संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज - ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत.
कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी!
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाने उद्घाटन झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या परिषदेत राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले आणि जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
… तर कोविड पसरण्याची शक्यता – डॉ. मेहुल मेहता
अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातील डॉ. मेहुल मेहता यांनी संभाव्य तिसरी लाट आणि त्यामागची कारणे शोधली पाहिजे असे सांगून आज कोरोना संपला असे आपल्याला वाटायला लागले म्हणून अनेक लोक मास्क वापरत नाहीत, सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळे मोठ्या संख्येने करायला लागले त्यातून कोविड पसरण्याची शक्यता आहे. अजूनही लस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. त्यातच विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा फैलाव वेगाने होतो आहे, डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आल्याचे सांगून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉ. मेहता यांनी केले.
प्रत्येकाने ‘जाणता मी, जबाबदार मी’ भूमिका घेण्याची गरज- डॉ. संजय ओक
संभाव्य लाटेची शक्यता गृहित धरून राज्य शासन, डॉक्टर्स, रुग्णालये यांनी तयारी सुरु केली आहे, मात्र या संपूर्ण प्रक्रियेत कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली. कोविडची विविध लक्षणे आढळली, काही रुग्णांना चव आणि वास येत नाही, पोटरीचे स्नायू आणि पाटदुखी वाढली, डायरिया, उलटी होण्याचे लक्षणे दिसले. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर ‘कोविड नाही ना?’ हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकाने आपल्या मनाला विचारणे आवश्यक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ नंतर ‘जाणता मी, जबाबदार मी’ ही भूमिका घेण्याची गरजही डॉ. ओक यांनी व्यक्त केली.
दुखणं अंगावर काढण्याची सवय महागात पडू शकते, यात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची असून आपल्या रुग्णांची केवळ स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लॅप्टो आदी आजारांची लक्षणे एकसारखीच असून एनएसवनएनएसटू बरोबरच मलेरिया, लॅप्टोच्या चाचण्यांसह कोविडसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचेही डॉ. ओक यांनी सांगितले. कोविड हे तीन आठवड्याचे दुखणे आहे, त्यातील दुसऱ्या आठवड्यातील शेवटचे दिवस हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तीन आठवडे काळजीपूर्वक विलगीकरणात अथवा रुग्णालयात राहून काळजी घेण्याची गरज आहे. कोविड झाल्यानंतर उपचार, विलगीकरण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आवश्यक असून हा रोग लपविण्याची कोणतीही आवश्यकता नाही, शासन दरबारी याची नोंद होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसचा फटका बसला त्याच्या निदानासाठी सिटी स्कॅनपेक्षा एमआरआय करणे आवश्यक असल्याचे सांगतानाच सध्या तरी कोविडपासून संरक्षणासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून मास्क घालणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे सांगण्याची वेळ आली आहे, असेही डॉ. ओक यांनी सांगितले.
प्रत्येक स्ट्रेनवर मास्क प्रभावी- डॉ. शशांक जोशी
मास्क घालून कोविडला घराच्या उंबरठ्याच्याबाहेरच ठेवणे हे आपले सर्वाचे आद्यकर्तव्य असल्याचे डॉ. शशांक जोशी यावेळी म्हणाले. कोरोनाच्या या पहिल्या, दुसऱ्या लाटेत आपल्याला हर्ड आणि हायब्रीड इम्युनिटी पहायला मिळाली. राज्य शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष पुरवल्यामुळे धारावीत परिस्थिती यशस्वीपणे हाताळता आली, दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये रोजची रुग्णसंख्या २० पेक्षा अधिक आढळले नाहीत हे केवळ हर्ड इम्युनिटीमुळे झाल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. कोविडची लक्षणे आढळली तरी विलगीकरणात राहून संपर्क तोडा, चाचणी करा, ऑक्सिजन दर, नाडीचे ठोके, ताप, आदींच्या नोंदी करा, ज्यांच्या संपर्कात आलात त्यांनाही चाचणी करायला सांगा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांशी डॉक्टरांनी बोलण्याचे आवाहन करतानाच मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून दुहेरी मास्क संरक्षणासाठी मजबूत ढाल असल्याचेही यावेळी डॉ. जोशी यांनी सांगितले.
लक्षणे दिसताच चाचणी करा- डॉ. राहुल पंडित
फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित म्हणाले की, कोविडने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, शिस्त लावली. एखाद्या गुरुसारखे कोविडने आपल्याला शिकवले आहे. नव्या लक्षणांकडे लक्ष ठेवतानाच हाय रिस्क फॅक्टरमधील रुग्णांना जपण्याचे आवाहन त्यांनी केले. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करतानाच रोज मास्क बदला आणि ओला झालेला मास्क कधीही लावू नका तो तात्काळ बदलण्याच्या सूचना देतानाच कोविडचे लक्षणे दिसली की वेळेत चाचण्या करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑक्सिजन प्रमाण ९३ पेक्षा कमी झाले असेल तर पोटावर झोपण्याचा सल्ला आम्ही देतो, त्याचे निश्चितच चांगले परिणाम बघायला मिळतात.
कोविडपश्चात जीवनशैली चांगली ठेवा- डॉ. अजित देसाई
डॉ. अजित देसाई कोविड पश्चात लक्षणे ही मुख्यतः ४ ते १२ आठवडे असतात, ही केवळ गंभीर रुग्णांमध्येच नाहीत तर साधारण आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा ही लक्षणे दिसतात. सहा महिन्यापर्यंत ही लक्षणे असली तरी ती दीर्घ काळची लक्षणे मानले जातात, थकवा, सांधेदुखी, श्वसनास त्रास, ताणतणाव, निद्रानाश, भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून तणावात जाणे, डोकेदुखी, छातीत वेदना आदी त्रास होतात. कोविड लक्षणांच्या काळात ईसीजीमध्ये अथवा टूडी इको मध्ये काही आढळल्यास त्यावर उपचार करणे खूप आवश्यक असते. ताण तणाव, चिंता असेल तेव्हा कुटुंबातील सदस्य, मित्रांबरोबर बोला त्यापेक्षाही अधिक गंभीर स्वरुपाचा तणाव असेल तर मानसोपचार तज्ज्ञांशी बोलण्याचा सल्ला देऊन कोविड पश्चात आपली जीवनशैली अधिकाधिक चांगली ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. देसाई यांनी केले.
पहिल्या दोन लाटांमध्ये मुलांमध्ये कमी संक्रमण- डॉ. सुहास प्रभू
बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणती काळजी घेतली पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि काही पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पहिल्या दोन लाटेमध्ये मुलांमध्ये कोविडचे कमी संक्रमण झाले. मुलांनी देखील संभाव्य धोका लक्षात घेता मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
ज्या मुलांमध्ये संक्रमण झाले तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते, त्यांच्यावर घरीही उपचार करू शकतो, रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत, गंभीर लक्षणे आढळल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहेत, मुलाबरोबर पालकापैकी एकाला या मुलांसाठीच्या कोविडसेंटरमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे असे सांगून या आजारामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ नये याकरिता त्यांच्याशी फोनवरुन अथवा इतर माध्यमांद्वारे संवाद साधणे अधिक गरजेचे आहे. शाळा सुरू होण्याअगोदर पुरेशी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रभू यांनी सांगितले. नवजात शिशु आणि आई यांची काळजी घेत असतानाच आईला जर कोविड असेल तर बाळाची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
*सावली प्रतिष्ठानचा शिक्षकदिनी ग्रंथालय उभारणीचा शुभारंभ*
शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१
*काळगाव ; कुठरे येथील शिक्षकांच्या कलेचे होतंय कौतुक*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...