मंगळवार, ३० जून, २०२०

सातारा ; 20 जणांना आज डिस्चार्ज ; 240 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर दोन कोरोना बाधितांचा आज मृत्यु

20 जणांना आज डिस्चार्ज ; 240 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर
 दोन कोरोना बाधितांचा आज मृत्यु
सातारा दि. 30 : विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 20 नागरिकांचा आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शेजवलवाडी ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये कराड तालुक्यातील सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, सुपने येथील 37 वर्षीय महिला, तुळसण येथील 54 वर्षीय पुरुष, 1 वर्षीय बालक, चचेगाव येथील 30 वर्षीय महिला 
जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, म्हाते येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे येथील 18 वर्षीय महिला, शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40, 56 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय बालक
माण तालुक्यातील खोकडे येथील 34 वर्षीय महिला
सातारा तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष, राजापुरी येथील 31 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालिका  यांचा समावेश आहे.
240 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 40, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 26, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 25, शिरवळ येथील 32, रायगाव येथील 25, पानमळेवाडी येथील 19, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 2 व पाटण येथील 4 असे एकूण 240 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने  एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दोन बाधितांचा मृत्यु
काल रात्री उशिरा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या शेजवलवाडी ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या दोघांना 10 दिवसापूर्वी श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे दाखल करण्यात आले होते.
▪️घेतलेले एकुण नमुने 13240
▪️एकूण बाधित 1044
▪️घरी सोडण्यात आलेले 740
▪️मृत्यु 45
▪️उपचारार्थ रुग्ण 259

             

तळमावले : गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून शिवसमर्थ वर कौतुकाची थाप

गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून शिवसमर्थ वर कौतुकाची थाप
तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रेडीट सोसायटी लि; तळमावले यांचेवर कौतुकाची थाप मारली आहे. 23 मार्च ला लाॅकडाऊन झाल्यानंतर संस्थेने केलेल्या सेवेला यानिमित्ताने ‘चार चाॅंद’ लागले आहेत. शिवसमर्थ च्या वतीने हा सन्मान संस्थेचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी स्वीकारला. प्रशस्तीपत्र व बुके देवून हा सन्मान झाला. यावेळी व्यासपीठावर खा.श्रीनिवास पाटील, आ.शशिकांत शिंदे, सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सातारा पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या या प्रशस्तीपत्रात म्हटले आहे की, सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. संपूर्ण जगात या साथीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. प्रशासनाचे खांद्याला खांदा लावून सतर्क नागरिकांनीही कोरोनाच्या लढयात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
आपण सातारा जिल्हा पोलीस दलात फेसशिल्ड पुरवले या स्वरुपात मदत केली आहे. आपल्या या सहकार्याबद्दल मी सातारा पोलीसांचे वतीने कृतज्ञता व्यक्त करते व आभार मानते.
कोरोना या विषाणूचे संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणेकरीता आपण आपले कर्तव्य पार पाडत आहात. भविष्यातही आपण आपले कर्तव्य अशाच तत्परतेने, उत्तमरीत्या व दृढ निश्चयाने पार पाडून सातारकर म्हणून जिल्हयाची प्रतिमा उंच कराल असा आम्हास पूर्ण विश्वास आहे. आपल्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...!
त्याचबरोबर यापूर्वी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश दिला आहे. महिला बचत गटांकडून बनवलेले मास्क ग्रामीण भागातील वाडयावस्त्यांवर वाटले आहेत. पोलीसांना फेसशिल्ड वाटप, कोरोना प्रतिबंधासाठी व्हिडीओ क्लिप, पोलीस पाटील, पत्रकारांसाठी जीवनावश्यक कीट इ. गोष्टींच्या माध्यमातून संस्थेने कोरोना विरुध्दच्या लढयात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शिवसमर्थ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 24 तास सेवा देण्याचाही प्रयत्न केला आहे.
तळमावले, ढेबेवाडी, कुंभारगांव या विभागातील सर्व एटीएम बंद असताना संस्थेने आपल्या एटीएमच्या माध्यमातून लोकांची होणारी गैरसोय थांबवली आहे. संस्थेच्या या विविध उपक्रमांचे जनमानसांत कौतुक होत आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या शाबासकीच्या थापेमुळे कोरोना कालावधीत संस्थेने दिलेल्या योगदानाचा गौरवच झाला आहे.

जिल्ह्यातील 14 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर145 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

जिल्ह्यातील 14 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर
145 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

सातारा दि. 30 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे उपचार घेत असलेल्या 14 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 60 वर्षीय महिला,
कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी येथील 40 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष , शिवडे येथील 36 वर्षीय पुरुष, तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 10 वर्षाचा मुलगा, विद्यानगर, सैदापूर येथील 26 वर्षीय महिला,मलकापूर येथील 26 वर्षीय पुरुष, नडशी येथील 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
145 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 
एन.सी.सी.एस., पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 145 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
तसेच 27 जून रोजी एन.सी.सी.एस. पुणे  यांनी कळविलेल्या रिपोर्टमधील 55 वर्षीय पुरुष हा गोडोली येथील असल्याचे कळविले होते, परंतु त्याचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे ता. मावळ असल्याने या बाधिताची नोंद जिल्ह्यातून वगळण्यात आली आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

गावांच्या विकासासाठी थेट ८० टक्के निधी .

गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. २९ : पंधराव्या वित्त आयोगामधून सन २०२०-२१ या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून राज्याला एकूण ५ हजार ८२७ कोटी रुपये इतका निधी मंजूर आहे. या निधीपैकी १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी पहिला हप्ता बेसिक ग्रँट (अनटाईड) म्हणून प्राप्त झाला आहे. या निधीचे वितरण ८० टक्के ग्रामपंचायत, १० टक्के पंचायत समिती आणि १० टक्के जिल्हा परिषद या प्रमाणात तिन्ही स्तरावर करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

गावांच्या विकासासाठी थेट ८० टक्के निधी .

चौदाव्या वित्त आयोगाचा कालावधी मागील वर्षी समाप्त झाला.आता चालू आर्थिक वर्षापासून पुढील ५ वर्षाच्या कालावधीसाठी पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामांसाठी निधी मिळणार आहे. या निधीपैकी ८० टक्के निधी हा थेट गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना वितरित केला जातो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रत्येकी १० टक्के निधी दिला जातो. गावांना मोठा निधी मिळत असल्याने यामुळे गावांमधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. पंधराव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीमधून राज्यातील सर्व गावांमध्ये चांगल्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी केंद्र शासनाकडून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला बेसिक ग्रँट (अनटाईड) व टाईड ग्रँट (Tied Grant) अशा दोन प्रकारच्या ग्रॅन्टच्या स्वरूपात ५० – ५० टक्के या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार बेसिक ग्रँट (अनटाईड) ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचारी पगार किंवा आस्थापना विषयक बाबी वगळून इतर स्थानिक गरजेनुसार आवश्यक बाबींवर वापरावयाची आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

वाढत्या वीज बीलांच्या तक्रारीची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून दखल

तक्रारींचे निवारण करण्याचे वीज कंपन्यांना निर्देश

मुंबई दि. २९ : वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहे.

महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्राचे नियमन करण्यासाठी विद्युत अधिनियम, 2003 अंतर्गत स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, राज्यातील वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांवर आकारावयाचे वीज दर नियम कांलातराने निश्चित करते. वीजेच्या वाढलेल्या देयकाविषयी ग्राहकांमध्ये असंतोष असल्याचे दिसून आल्यानंतर आयोगाने वीज कंपन्यांच्या विशेषत: जून, 2020 महिन्याच्या देयक आकारणी पद्धतीचा आढावा घेतला.

1 एप्रिल 2020 पासून सुधारित वीज दर कमी करण्यात आले आहेत. हे दर मागील वर्षाच्या तुलनेत लाक्षणिकरित्या कमी आहेत. या सुधारणेनंतर महाराष्ट्रातील सर्व निवासी ग्राहकांसह सर्व वर्गवारींसाठीच्या वीज दरात घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सुधारित वीज दर निर्गमित झाल्यानंतर, एप्रिल महिन्यानंतरच्या वीज वापरासाठी महिन्यामध्ये आकारण्यात आलेल्या देयकांसाठी इंधन समायोजन आकार (एफएसी) लावण्यात आलेले नाहीत. तसेच यापुढेही इंधन समायोजन आकार लागू नये याची उपाययोजना करण्यात आली आहे.

वीज दराचा आदेश कोविड 19 च्या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान निर्गमित झाल्यामुळे, वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे शक्य होण्यासाठी आणि ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यासाठी आयोगाने काही बाबतीत वीज कंपन्यांना परवानगी दिली. उदा. मीटरमधील नोंदी घेण्यासाठी ग्राहकांच्या इमारती/घरी न जाता मार्च ते मे या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान (ॲटोमॅटिक मीटर रिडिंगची सुविधा जेथे उपलब्ध आहे त्यांना वगळून) सरासरी वीज वापराच्या आधारावर वीज देयके आकारावीत.

लॉकडाउनच्या निर्बंधातील शिथिलतेनंतर, ज्या कालावधीसाठी निर्धारित तत्त्वावर देयक आकारले होते त्याचे समायोजन करुन, प्रत्यक्ष मीटरमधील नोंदीच्या आधारावर देयक देण्यास वीज कंपन्यानी सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्ष वीज वापराबरोबर सरासरी देयकाच्या समायोजनामुळे जून महिन्याचे वाढलेले देयक पाहून ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात  आयोगाने दि. 27 जून, 2020 रोजी सर्व चार वितरण परवानाधारकांच्या प्रमुखांची बैठक घेतली.  त्यात स्पष्ट झाले की, लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान, देयके मार्च 2020 च्या आधीच्या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापराच्या आधारावर आकारण्यात आली होती. त्यावेळी हिवाळा चालू असल्यामुळे वीज वापर नेहमीच कमी असतो आणि त्यामुळे सरासरी देयके कमी रकमेची होती. आताची देयके उन्हाळ्यातील असून यावेळी वीज वापर सामान्यतः जास्त असतो आणि देयके नेहमीच जास्त रकमेची असतात. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या प्रत्येक महिन्यासाठीच्या सरासरी देयक रकमेच्या समायोजनानंतर शिल्लक देय रकमेसह जास्त रकमेचे देयक आले, जे जूनमध्ये देण्यात आले आहे.

वीजेच्या देयक आकारणीत पारदर्शकता आणखी वाढवावी तसेच तक्रारींना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा उभारावी असे निर्देश आयोगाने दिले. गाऱ्हाणी प्राप्त झाल्यापासून एक दिवसाच्या आत त्याला प्रतिसाद द्यावा;  मीटरमधील नोंदी, लागू असलेला वीज दर, वीज दराच्या टप्प्यातील लाभ आणि मागील वर्षीच्या संबंधित महिन्याशी तुलना यानुसार ग्राहकांना त्यांच्या देयकातील वापरलेल्या युनिट्सच्या अचूकतेची स्वयं-तपासणी करण्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर देण्यात यावे; जेथे वीज देयक मार्च ते मे या कालावधीसाठीच्या सरासरी देयकाच्या दुप्पट आहे, अशा ग्राहकांना 3 हप्त्यात देयकाचा भरणा करण्याचा पर्याय देण्यात यावा. देयकांचा भरणा मासिक हप्त्यांमध्ये करण्याचा पर्याय देण्यासह, देयकासंबंधातील ग्राहकाच्या गाऱ्हाण्यांचे निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये असे आयोगाने निर्देश दिले. जर ग्राहकाचे वितरण परवानाधारकाच्या प्रतिसादाने समाधान झाले नाही तर, आयोगाच्या विनियमांमध्ये ठरवून देण्यात आल्यानुसार वैधानिक निवाडयासाठी त्यांना अंतर्गत गा-हाणे निवारण कक्ष, ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच आणि विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.

आयोग वीज देयकांच्या प्रश्नाबाबत लक्ष ठेवत असून कोणत्याही ग्राहकाची वितरण कंपनीकडून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे आश्वस्त केले आहे.

सातारा ; जिल्ह्यात आणखी 19 नागरिक कोरोनाबाधित

जिल्ह्यात आणखी 19 नागरिक कोरोनाबाधित
सातारा दि. 29 : विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 12 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून त्यातील 4 प्रवासी, 10 निकटसहवासित आणि 5 सारीचे रुग्ण आहेत.

जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय युवक, वय 42, 48, 43 व 55 वर्षीय महिला, बामणोली तर्फे कुडाळ येथील 46 वर्षीय पुरुष, आखेगणी येथील 16 वर्षीय युवक.,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 83 वर्षीय वृध्द, व 31 वर्षीय महिला.,

सातारा तालुक्यातील दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन क्वार्टर येथील 39 वर्षीय पुरुष, जिहे येथील 68 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय 2 पुरुष, क्षेत्र माहूली येथील 50 वर्षीय पुरुष.,

वाई तालुक्यातील धरमपुरी येथील 35 वर्षीय पुरुष व ब्राम्हणशाई  येथील 68 वर्षीय महिला.,

माण तालुक्यातील खडकी (पाटोळे) येथील 54 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सोमवार, २९ जून, २०२०

राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविला ; राज्य सरकारचे परिपत्रक जारी

राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविला ; राज्य सरकारचे परिपत्रक जारी

मुंबई : राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता ३० जून पर्यंत असणारा राज्यातील लॉकडाऊन येत्या ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे.राज्य सरकारने त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात असणा-या लॉकडाऊनची मुदत उद्या म्हणजेच ३० जून रोजी संपत आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन उठविणार नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले होते. त्यानुसार राज्यातील  लॉकडाऊन आता येत्या ३१ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. राज्यातील लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने आज जारी केले आहे.याबाबत अनलॉक-२ मध्ये कोणती शिथीलता देण्यात येणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.केंद्र सरकारने लॉकडाऊनबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही मात्र महाराष्ट्रातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक-२ बाबत केंद्र सरकारने नियमावली जाहीर केल्यानंतर राज्यातील नियमावली जाहीर केली जाईल.

राज्यात टप्प्या-टप्प्याने अनलॉकबाबत काही शिथीलता देण्यात येत आहे.कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील निर्बध कडक करण्यात आले आहेत.सध्या जिल्हाबंदी कायम असून,एसटी महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यातील जनेतशी संवाद साधताना ३० जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. राज्यात असणारे कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नसल्याने राज्यात लॉकडाउन कायम राहणार आहे.

या गोष्टी बंधनकारक

मास्क घालून तोंड झाकणे अनिवार्य
सोशल डिस्टन्सिंग – सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक
दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी

लग्नाला ५० पेक्षा जास्त पाहुणे नकोत तर अंत्ययात्रेला ५० पेक्षा जास्त माणसांची गर्दी चालणार नाही
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध
कार्यालयासाठी अतिरिक्त सूचना

शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे
कार्यालयात थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अनिवार्य
दोन शिफ्टच्या दरम्यान, दरवाज्यांसारख्या सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागा सॅनिटाईझ कराव्यात
दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी जमणार नाही, याची काळजी बाळगावी
मुंबई महापालिका आणि एमएमआर क्षेत्र, पुणे अंतर्गत येणाऱ्या सर्व महापालिका,सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये पुढील गोष्टीना मर्यादांसह मंजुरी

अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु राहणार
इतर दुकाने संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील. मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत उघडतील. मद्य दुकाने परवानगी असल्यास उघडतील (होम डिलिव्हरी किंवा प्रत्यक्ष विक्री)
आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स विक्री करण्यास मंजुरी
औद्योगिक कामे करण्यास मंजुरी
खाजगी आणि सार्वजनिक बांधकाम साईट, मान्सूनपूर्व कामे करण्यास मंजुरी
होम डिलिव्हरी रेस्टॉरंट/किचनला मान्यता
ऑनलाईन/दूरशिक्षण याला मान्यता
सरकारी कार्यालये (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता) १५ टक्के किंवा १५ कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
सर्व खासगी कार्यालये १० टक्के किंवा १० कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + २
दुचाकी – केवळ चालक
प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत
एमएमआर क्षेत्रा अंतर्गत आवश्यक काम आणि कार्यालयासाठी आंतरजिल्हा (मुंबई-ठाणे इत्यादी) प्रवास करण्यास मुभा. मात्र खरेदीसाठी जवळच्या मार्केटमध्ये जाणे अपेक्षित. अनावश्यक कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची मुभा नाही
लग्नासंबंधी कार्यक्रमासाठी मोकळ्या जागा, लॉन किंवा नॉन-एसी हॉल यांनाच मान्यता
सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी
वर्तमानपत्राची छपाई आणि वितरण मंजूर
शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी पेपर तपासणे किंवा निकाल जाहीर करणे या कामासाठी प्रवास करु शकतात
केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची मुभा
जिल्हांतर्गत बस सेवा ५० टक्के प्रवाशांसह मंजूर

*7 नागरिकांना आज दिला डिस्चार्ज ; एक मृत व्यक्तीसह 535 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

*7 नागरिकांना आज दिला डिस्चार्ज ; एक मृत व्यक्तीसह 535 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*  

सातारा दि. 28 : विविध रुग्णालय व कोरोना केंअर सेंटरमध्ये  उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या 7 नागरिकांना आज 10 दिवसानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये *मुंबई* चेबूर येथील 51 वर्षीय महिला
*जावली* तालुक्यातील गांजे यैथील 45 वर्षीय महिला
*कोरेगाव* तालुक्यातील पवारवाडी येथील  48 वर्षीय पुरुष, 38 व 21 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक   
*पाटण* तालुक्यातील धामणी येथील 21 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
*535 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 84, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 126, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 21, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 56, शिरवळ येथील 58, रायगाव येथील 25, पानमळेवाडी येथील 12, मायणी येथील 6, महाबळेश्वर येथील 20, पाटण येथील 67, दहिवडी येथील 33 असे एकूण 535  जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
*37 वर्षीय मृत पुरुषाचा संशियत म्हणून नमुना पाठविला तपासणीला* 
 आज दुपारी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेल्या जैतापूर रोड देगाव सातारा येथील 37 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कोविड संशयित म्हणून उपचार करतावेळेस त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

कुंभारगाव परिसरात माकडांचा हैदोस ;शेतकरी त्रस्त

कुंभारगाव (ता.पाटण) गेल्या काही दिवसापासून कुंभारगाव परिसरात वानरांनी हैदोस घातला आहे. ही वानरे पिकांचे व अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत, मात्र या वानरांची तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समृद्ध वनसंपदा लाभलेल्या पाटण तालुक्यात या परिसरात आता वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागला आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून परिसरात रानडुकरे, रानगवे, माकडे व वानरांनी रानात, शेतीत धुमाकूळ घालत लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. पूर्वी साधारणपणे माकड, वानर या जाती सर्रास जंगलात आढळत असत, मात्र गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात वानरांनी हैदोस घातला आहे.

कुंभारगाव,मान्याचीवाडी,बोरगेवाडी,चाळकेवाडी,जांभूळवाडी,चिखलेवाडी,मोरेवाडी,शेंडेवाडी आणि गलमेवाडी या परिसरातील शेतीमधील खास करून भुईमूग पिकाचे नुकसान ही वानरे करीत आहेत. मात्र या वानरांची तक्रार वनविभागाकडे करायची की  ग्रामपंचायतीकडे? ही समस्या निर्माण झाली आहे. वानरांचा उपद्रव रोखण्यासाठी वन खात्याने काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. वनखात्याने एकतर वानर पकड मोहीम राबवावी किंवा वानरना जंगलात परतवण्यासाठी उपाय योजावेत, अशी मागणी विभागातील शेतकऱ्याकडून होऊ लागली आहे.




मराठा क्रांती मोर्चा पुन्हा धडकणार


पुणे - मराठा समाज आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून योग्य प्रयत्न केले जात नाहीत. समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या मान्य करा, अन्यथा 9 ऑगस्टपासून मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन सुरू करेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची ऑनलाइन बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. प्रलंबित मागण्यांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. यावेळी वीरेंद्र पवार, विनोद पाटील, राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, दिलीप पाटील, विनोद साबळे, अंकुश कदम, करण गायकर, माउली पवार व इतर विविध जिल्ह्यांतील प्रमुख समन्वयकांची उपस्थिती होती.

समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारला पुन्हा निवेदन देण्यात येणार आहे.समाजाने मांडलेल्यांमध्ये प्रामुख्याने कोपर्डीच्या भगिनीला न्याय, सारथी संस्था, मराठा आरक्षणाबाबत दि. 7 जुलै रोजी होणाऱ्या कोर्ट सुनावणीत राज्य सरकारची भूमिका, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा आंदोलनामधील गुन्हे मागे घेणे, बंद पडलेली मराठा विद्यार्थ्यांची वसतिगृह पुन्हा सुरू करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.

सातारा ; जिल्ह्यात 39 नागरिकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 39 नागरिकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह

सातारा दि. 29: विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 39 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला
जावली तालुक्यातील रामवाडी येथील 27 व 48, 30 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, आखेगनी येथील 68 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, बिरामनेवाडी येथील  52 वर्षीय पुरुष
कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 45, 65 वर्षीय महिला 12 मुलगी, 20 वर्षीय युवक, 8 वर्षाचा मुलगा,  उब्रंज येथील 47 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षाचा मुलगा, 50 वर्षीय महिला,  56, 27, 23 वर्षीय पुरुष
पाटण तालुक्यातील सांघवड येथील 31 वर्षीय पुरुष 
फलटण तालुक्यातील जिंती येथील 44 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 26, 27 वर्षीय महिला, 9, 6, 4 वर्षाची मुलगी, 7 वर्षाचा मुलगा, अलगुडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष
वाई तालुक्यातील वाघजाईवाडी येथील 44 वर्षीय महिला, पसरणी येथील 47 वर्षीय महिला, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष
सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 53 वर्षीय पुरुष
कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी येथील 32 वर्षीय पुरुष
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

रविवार, २८ जून, २०२०

सातारा ; जिल्ह्यात 36 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर 191 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

जिल्ह्यात 36 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर 191 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह 
 

सातारा दि. 28: विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 36 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये कराड तालुक्यातील  खूबी येथील 19 वर्षीय युवक, रेठरे खु येथील 21 वर्षीय महिला, तारुख येथील 60 वर्षीय महिला
पाटण तालुक्यातील  सितापवाडी 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष
माण तालुक्यातील खांडेवाडी वारुडगड येथील 33 वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील येळीव येथील 76 वर्षीय महिला व 24, 26 वर्षीय पुरुष
कोरेगाव तालुक्यातील बनवडी 39 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 28 वर्षीय पुरुष, नागझरी येथील 28 वर्षीय पुरुष
जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, 22 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 18 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष 
सातारा तालुक्यातील गोडोली येथील 55 वर्षीय पुरुष,  जिहे येथील 50 वर्षीय महिला, चंदननगर कोडोली येथील 39 वर्षीय महिला, धावली  येथील 26 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 23 वर्षीय पुरुष
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 60 वर्षीय महिला, शिरवळ येथील शहाजी चौक येथील 20 व 42 वर्षीय पुरुष
वाई सह्याद्रीनगर  येथील 30 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
एक रुग्ण हा पुणे येथे स्थायिक असल्याने त्याची गणना जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत केलेली नाही.
191जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी 191 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

शनिवार, २७ जून, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील आणखी 19 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांची आज दिवसभरातील एकूण संख्या 47

जिल्ह्यातील आणखी 19 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह 
कोरोनाबाधितांची आज दिवसभरातील एकूण संख्या 47

सातारा दि. 27 : विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या कोरोनाबाधित 19रुग्णांमध्ये 13 पुरुष व 6 महिलांचा समावेश असून यात  मुंबई येथून प्रवास करुन आलेले  12 प्रवासी, 7 निकटसहवासित आहेत.  
बाधित रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील जखीणवाडी येथील 47 वर्षीय महिला,23 वर्षीय युवती, 52 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय युवक, लटकेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय युवक आणि 42 वर्षीय महिला व 21 वर्षीय युवती, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, खंडोबानगर (मलकापूर) येथील 8 वर्षीय बालक, वय 30 व 50 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 30 वर्षीय महिला.,
 
पाटण तालुक्यातील नवसरे येथील 42 वर्षीय पुरुष, गमेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष.,

खटाव तालुक्यातील खटाव येथील येथील 62 वर्षीय पुरुष.,

 माण तालुक्यातील म्हसवड येथील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सातारा; कोरोना चाचणीसाठी साताऱ्यात सुविधा उपलब्ध करून देणार; वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास गती देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोना चाचणीसाठी साताऱ्यात सुविधा उपलब्ध करून देणार; वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास गती देणार
- उपमुख्यमंत्री अजित पवार

▪️ शासकीय इमारतीच्या  देखभाल व दुरुस्तीसाठी निधी देणार
▪️ विकास आणि रोजगार निर्मितीसाठी तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करणार

सातारा दि. 27: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासन पूर्ण खबरदारी घेत आहे. कोरोना संदर्भात काम करणाऱ्या यंत्रणेला कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जात नाही. रुग्णांचा रिपोर्ट लवकरात लवकर मिळावा यासाठी सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोविड चाचणी केंद्र  सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयतील नियोजन भवनात विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेतला सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील,  खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
कोरोना बाधित रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटीलेटरच्या तसेच इत्यादी सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आलेली आहे. नागरिकांच्या मनातील कोरोनाची भितीही कमी झालेली आहे, परंतु  प्रत्येकाने मास्क वापरुन  व सुरक्षित अंतर ठेवूनच आपली काळजी घ्यावी  आणि शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. आज लॉकडाऊनला शंभर दिवस झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कुणीही उपाशी राहू नये यासाठी शासनामार्फत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला आहे यापुढेही धान्य देण्याची शासनाची तयारी आहे. 
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी देण्यात आलेली होती, परंतु आजपर्यंत या महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी मंत्रालयाकडे पाठवलेले तीन प्रस्ताव दाखवले आहेत. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेसंदर्भात बैठक घेण्यात येणार असून पुढील 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून या शासकीय महाविद्यालयालय उभारण्याच्या कामास गती देण्यात येईल. 
प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात शासकीय इमारती आहेत. यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आमदार फंडातून त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील 10 टक्के निधी इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला असता मागील वर्षी 28 टक्के धरणातील पाणीसाठा होता,आज   समाधानकारक 36 टक्के आहे. जिल्ह्यातील रस्ते हे वन विभागाच्या हद्दीतून जातात, खराब झालेल्या रस्त्यांच्या  दुरुस्तीबाबत  निर्णय जे  मंत्रालयस्तरावर असतील ते तिथे  तसेच स्थानिक पातळीवरील निर्णय पालकमंत्री व जिल्हाधिकारी घेतील. 
विकासाबरोबरच रोजगार निर्मिती होण्यासाठी भविष्याच्या परिस्थितीचा विचार करुन महाराष्ट्रात मोठे उद्योग कसे येतील याचे तज्ञांच्या सल्यानुसार नुसार दूरदर्शी आराखडा  तयार करण्यात येईल.
  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती दिली जाईल, जिल्हास्तरावरील प्रश्न पालकमंत्री व जिल्हाधिकारी बैठक घेऊन सोडवतील तर मंत्रालयस्तरावरीलही प्रश्न गतीने सोडविले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोना संकटकाळात नाविन्यता सोसायटीमार्फत ५२ कोटींहून अधिक मदत :कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मास्क, पीपीई किट्स वाटपापासून लाखो श्रमिकांसाठी केली जेवणाची व्यवस्था – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. २६ : कोरोना संकटकाळात कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने सीएसआर देणगी समन्वयाचे उत्कृष्ट काम करुन लाखो आपत्तीग्रस्तांना मोठी मदत मिळवून दिली आहे.

यासाठी सोसायटीमार्फत धैर्य मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत विविध कॉर्पोरेट्स आणि खाजगी देणगीदारांकडून सुमारे ५२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या मदत साहित्याची उभारणी आणि त्याचे गरजूंना वाटप करण्यात आले, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

आतापर्यंत मिळालेल्या मदत साहित्यात सुमारे ८ लाख सर्जिकल मास्क, ४६ व्हेंटिलेटर्स, ८५ हजार पीपीई किट्स, २ लाख २५ हजार एन ९५ मास्क, ३८ हजार लिटर सॅनिटायझर इत्यादी सामग्रीचा समावेश आहे.

त्याचबरोबर मागील तीन महिन्यांमध्ये नाविन्यता सोसायटीने ३५ लाखाहून अधिक लोकांना जेवण, १ लाख किराणा सामान किटस, १४ लाख सॅनिटरी पॅडची व्यवस्था केली आहे.

नाविन्यता सोसायटीमार्फत धैर्य मोहिमेमधून सीएसआर निधीअंतर्गत आवश्यक उपकरणे आणि अन्न वितरण खरेदीसाठी समन्वय करण्यात आला. मार्च २०२० मध्ये सोसायटीने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने जे. जे. हॉस्पिटलमध्ये कोविड – १९ चाचणी प्रयोगशाळेची स्थापना देखील केली आहे.

सर्जिकल मास्कपीपीई किट्ससॅनिटायझरचे वाटप

आतापर्यंत मिळालेली सर्जिकल मास्क, व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स, एन ९५ मास्क, सॅनिटायझर ही सामग्री हाफकीन संस्था, जे. जे. हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस दल, बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुख्य देणगीदारांमध्ये कॅस्ट्रॉल इंडिया, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, विप्रो फाउंडेशन, एचटी पारेख फाउंडेशन, नोव्हार्टिस इंडिया, फाइझर लि., डीएल शाह ट्रस्ट, गोदरेज ग्रुप, अमेरिकेअर्स, पेटीएम, रेकिट बेनस्कीसर इत्यादींचा समावेश आहे. यातून नाविन्यता सोसायटीला ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत उभारण्यात यश आले आहे.

३५ लाखापेक्षा अधिक लोकांना जेवण१ लाख किराणा सामान किट्स

वैद्यकीय उपकरणांव्यतिरिक्त नाविन्यता सोसायटीने स्थलांतरित मजूर, दैनंदिन मजुरी करणारे नागरिक, झोपडपट्टीवासीय, कंटेंनमेंट झोनमधील नागरिक तसेच फ्रंटलाइन कामगारांना मुबलक प्रमाणात अन्न पुरवण्याच्या कामातही योगदान दिले. मागील तीन महिन्यांमध्ये ३५ लाखापेक्षा अधिक लोकांना जेवण, १ लाख किराणा सामान किट्स, १४ लाखाहून अधिक सॅनिटरी पॅडची व्यवस्था केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, नवी मुंबई महानगरपालिका, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई पोलिस या क्षेत्रातील लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. सर नेस वाडिया फाऊंडेशन, युनिसेफ, डीएल शाह ट्रस्ट, बीसीजी ग्रुप, सीआयआय, टेस्टी बाइट्स, गोदरेज ग्रुप, क्रेडो फाऊंडेशन, प्रोजेक्ट मुंबई, सीएसीआर फाऊंडेशन, जायन्ट्स ग्रुप ऑफ भायखळा, श्री रेणुका शुगर्स लिमिटेड, अदानी ग्रुप यांसारख्या प्रमुख देणगीदार आणि भागीदारांचा समावेश आहे. यामाध्यमातून नाविन्यता सोसायटीला २२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत उभारण्यात यश आले आहे.

युनिसेफच्या जीवन रथ प्रकल्पाद्वारे स्थलांतरित कामगारांना मदत

युनिसेफद्वारे स्थलांतरित कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या जीवन रथ प्रकल्पासही नाविन्यता सोसायटीकडून सहकार्य करण्यात आले. जास्तीत जास्त स्थलांतरित लोकांपर्यंत पोहोचून त्यांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. वेगवेगळ्या रेल्वे स्थानक आणि टोलनाक्यांवर सुमारे १.५ कोटी रुपये किंमतीच्या मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. यात श्रमिक एक्स्प्रेस आणि राज्य परिवहन बसेसमधून प्रवास करणारे अतिथी कामगार आणि त्यांचे कुटुंबीयांना थेपला, शिरा, कुकीज, बिस्किटे, ताक, पाणी, औषधे आणि पादत्राणे इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.

सातारा ; जिल्ह्यात 28 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, 185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

जिल्ह्यात 28 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, 
185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा दि. 27 : विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 28 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून 185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या कोरोनाबाधित 28 रुग्णांमध्ये 21 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून यात  मुंबई, ठाणे, शाहजहा येथून प्रवास करुन आलेले  6 प्रवासी, 18 निकटसहवासित आणि 4 सारीचे रुग्ण आहेत.  
बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील कडेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, बावधन येथील 57 वर्षीय पुरुष.,

खटाव तालुक्यातील मायणी येथील 29 वर्षीय पुरुष.,

सातारा तालुक्यातील धावली(रोहोट) येथील 45 वर्षीय महिला, राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष.,

खंडाळा तालुक्यातील शिंदे वस्ती (लोणंद) येथील 38 वर्षीय महिला, आसवली येथील 27 वर्षीय पुरुष.,

पाटण तालुक्यातील उरुल येथील 60 वर्षीय पुरुष.,

कराड तालुक्यातील तारुख येथील वय 21, 22 वर्षीय युवक तसेच वय 27, 28 व 48 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 50 वर्षीय महिला,  चरेगाव येथील 4 वर्षीय बालक, वय 38 व 36 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील 75 वर्षीय पुरुष.,

कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष.,

जावळी तालुक्यातील रामवाडी येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, आखेगनी (रांजणी) येथील 42 वर्षीय पुरुष यांचा  समावेश आहे

राज्यात १जुलैपासून ‘कृषी संजीवनी सप्ताह’ कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

कृषिदिनी कृषिमंत्र्यांसह अधिकारी, शास्त्रज्ञ नवीन तंत्रज्ञान पोहोचविणार शेतकऱ्यांच्या बांधावर

मुंबई, दि. २६: राज्यात कृषि दिनानिमित्त ‘कृषी संजीवनी सप्ताह’ साजरा करण्यात येणार असून या काळात कृषिमंत्र्यांसह अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करीत दि.१ ते ७ जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी  दि.१ जुलै रोजी कृषिदिन साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सप्ताहात घ्यावयाच्या कार्यक्रमांबाबत नियोजन करण्यासाठी काल कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते त्यासाठी कृषि विभागातील अधिकारी – कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि कृषि विस्तार यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत कृषि विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्था यांनी संशोधित केलेल्या अद्ययावत कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. त्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश कृषिमंत्री श्री. भुसे यांनी दिले आहेत.

या सप्ताहांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दररोज किमान एका गावातील तर उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे आहे, असे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

या सप्ताहामध्ये गावात बैठक आयोजित करतानाच शेतकऱ्यांनी राबविलेल्या कृषिविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांनादेखील भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. एम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी मोहीम हाती घ्यावी. पुरस्कारप्राप्त, प्रयोगशील शेतकरी तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांचे तालुकास्तरीय कार्यक्रमात व्याख्यान आयोजित करावे, कृषि विषयक योजना, पतपुरवठा याबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती मोहिम हाती घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

वीज बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करा-ऊर्जामंत्री

मुंबई, दि. 26: वीज ग्राहकांच्या बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण करण्याचे स्पष्ट निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे आणि  महावितरणचे  संचालक(संचलन) दिनेशचंद्र साबू यांना दिले.

लॉकडाउनच्या काळातील एकत्रित वीज बिलामुळे ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम तातडीने दूर करण्यासाठी डॉ. राऊत यांनी सदर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. महावितरणच्या  https://billcal.mahadiscom.in/consumerbill  या लिंकवर ग्राहकांनी वीज बिल तपासून घ्यावे आणि शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून समस्येचे निवारण करावे असे आवाहन ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे. महावितरण वीज ग्राहकांचे समाधान करण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

यासोबतच, ग्रामीण व शहरी भागातील लोकप्रिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांचा सर्वसमावेशक स्वतंत्र व्हॉट्सएप ग्रुप उप विभागीय अधिकारी स्तरावर  तयार करून त्यावर वीज बिलाची संपूर्ण माहिती देऊन वीज विषयक समस्या/शंकांचे संपूर्ण समाधान करावे, त्यांचे सोबत वेबिनार आयोजित करून  संवाद साधावा असे त्यांनी सुचविले.

“शासन आपल्या दारी” या संकल्पनेनुसार, शहरी भागात महत्त्वाच्या/मोक्याच्या ठिकाणी तर ग्रामीण भागात आठवडी बाजाराच्या दिवशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बाजाराकरिता येत असतात, तेथील नजीकच्या हॉल/कार्यालयात सामाजिक अंतराचे पालन करून विशेष शिबीरे/ग्राहक मेळावे घेऊन वीज ग्राहकांचे समाधान करावे, तसेच तक्रारींचे निरसन करण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांबाबत विविध  प्रसारमाध्यमे, सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या आहेत.

महावितरण मुख्यालयाने या संदर्भात राज्यातील सर्व मुख्य अभियंत्यांना  पत्राद्वारे कळविले असून या माध्यमातून राज्यातील वीज ग्राहकांचे लवकरात लवकर समाधान होण्यास हातभार लागेल असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला

सातारा; लॉकडाऊनमधील वीजबील माप करा ; भारतीय मराठा संघाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

सातारा :दि.२६ लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या कालावधीत आलेलं  वीज बिल माफ करावं, अशी मागणी भारतीय मराठा संघाने पत्ररद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाशदादा पवार यांनी "कुमजाई पर्व"शी बोलताना दिली

राज्यात वीज बिलाबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लाॅकडाऊनच्या काळात तीन महिन्यातलं भरमसाठ बिल आलं आहे, त्यामुळे लोकांची नाराजी आहे. त्यामुळेच लाॅकडाऊनमध्ये तीन महिन्यात आलेलं वीज पूर्णपणे माफ करावं, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता घरी आहे. अनेक जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यामुळे दिवसाचे नऊ-दहा तास कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि तत्सम इलेक्ट्रिक उपकरणे चालू असतात. त्यातच उन्हाळ्यात पंखे आणि एसी यांचाही वापर दिवसभर होत असल्याने वीज बिल वाढले आहे.

आधीच कोरोनात रोजगाराचं संकट, त्यात वीज बिल जास्त आल्यानं अनेकांवर मोठं संकट ओढवलं आहे. लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे. शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचं बिल जास्त आलं आहे.

दुसरीकडे, विजेचा वापर झाला नसतानाही अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारले जात असल्याच्या तक्रारीही काही जण करत आहेत. त्यामुळे वीज बिल पाहूनच अनेकांना मोठा ‘शॉक’ बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली.

दरम्यान, जास्त वीज बिल आलेल्या ग्राहकांना महावितरणकडून बिलाचे हप्ते पाडून देण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.


शुक्रवार, २६ जून, २०२०

कराड येथे 3 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

कराड येथे 3 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
सातारा दि. 26 : कराड कृष्णा मेडीकल कॉलेज येथे उपचार घेणाऱ्या 3 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 42 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील  खटाव येथील 50 वर्षीय महिला व कराड तालुक्यातील खंडोबानगर, मलकापूर येथील 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

गुरुवार, २५ जून, २०२०

सरपंच, उपसरपंच मानधन भेटले नाही तर त्वरित नोंदणी करा

ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे आवाहन

मुंबई, दि. २५ : राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या  संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितर‍ित केली आहे.राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे.

यापैकी सरपंच व उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ व २५ हजार ४६७ आहे. २ हजार ०१९ सरपंच व २ हजार १९१ उपसरपंच यांची अद्यापही नोंदणी होणे बाकी आहे. यास्तव त्यांना अद्याप मानधन मिळालेले नाही. ज्या सरपंच व उपसरपंच यांनी अद्यापही संगणकीय प्रणालीवर नोंद केली नसेल अशा सर्व संबंधित ग्रामपंचायतींनी नोंदणी करण्याची प्रक्रिया (जसे आधार कार्ड क्रमांक, बॅंक खात्याचा तपशील इत्यादी बाबी)  त्वरेने पूर्ण करणे गरजेचे आहे.

तसेच मार्च २०२० पर्यंत नोंदणी झालेल्यांपैकी ३ हजार ८१४ सरपंचाचे व ४ हजार २८७ उपसरपंचाचे मानधन अदा करणे प्रलंबित असल्याचे दिसून येते. सर्व कार्यरत व पात्र असलेल्या सरपंच व उपसरपंचांचे मानधन तसेच मार्च २०२० पर्यंत प्रलंबित सर्व देयके अदा करणेबाबत १ जुलैपर्यंत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सर्व जिल्हा परिषदांना  दिल्या आहेत.

सरपंच व उपसरपंच यांचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत संगणक प्रणाली कार्यरत आहे. संबंधित ग्रामसेवकांमार्फत लॉगिन करून गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनंतर राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान कार्यालयामार्फत मानधन अदा करण्यात येते.

कुंभारगाव : IDBI बँकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात मनसे चे आंदोलन

कुंभारगाव:  दि. 25, गुरुवार सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुका यांच्या वतीने IDBI बैंक ब्रांच कुंभारगाव येतील कर्मचारी फिरंगे हे बाँकेच्या खातेदारांशी उद्दट पद्धतीने बोलने रागाने बोलने  खतेदाराना सहकार्यची कोणतीही गोष्ठ न करने  अश्या वारंवार तक्ररारी असल्यामुळे या कर्मचारी वेक्तिची बदली व्हावी या हेतुने निवेदन पत्र देऊन मनसे स्टाईल नी आंदोलन करण्यात आले या वेळी  तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे, कुंभारगाव विभाग अध्यक्ष दत्ता चाळके, मराठी कामगार सेना संपर्क प्रमुख श्री उमेश शंकर माने, आणासाहेब मोरे वाहतूक सेना पाठण तालुका अध्यक्ष पदाधिकारी कार्यकते, खातेदार, आणि मनसे सैनिक मोठ्या प्रमानात उपस्थित होते, या वेळी लॉकडाउन सोशल डिस्ट्रनचे नियम पाळून आंदलोन करण्यात आले, 7 दिवसच्या आता मधे यांच्यावर बदली व्हावी ही मागणी करण्यात आली आहे ,याची दखल बैंच मॅनेजर नि घ्यावी अन्यथा आम्ही सर्व मनसे स्टाईल नि तीव्र आंदोलन करेल असा हु इशारा देण्यात आला आहे आंदोलनात सहभागी झालेल्या मनसे सैनिक,खातेदार,पत्रकार बांधव  या सर्वचे आम्ही या आंदोलनाला  मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्या बदल सर्वाचे आभार, धन्यवाद,  जय मनसे ,
उमेश शंकर माने सातारा जिल्हा संपर्क प्रमुख मराठी कामगार सेना, ९८३३२२५६७३

बुधवार, २४ जून, २०२०

आज 2 जणांना सोडले घरी; 148 जणांचे नमुने पाठविले तपासणीलाओझरे येथील 75 वर्षीय बाधित पुरुषाचा उपाचारा दरम्यान मृत्यू

आज 2 जणांना सोडले घरी; 148 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
ओझरे येथील 75 वर्षीय बाधित  पुरुषाचा उपाचारा दरम्यान मृत्यू

सातारा दि. 23 : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल असलेल्या  स्टाफ नर्स, खिंडवाडी सातारा येथिल 44 वर्षीय महिला व कोविड केअर केंद्र खावली येथील दाखल असलेल्या निशिगंधा कॉलनी बारवकर नगर, सातारा येथील 42 वर्षीय पुरुष असे एकूण 2 रुग्णांना  आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
148 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातरा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 36, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 14, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 8, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 6, वाई  11, शिरवळ 13, पानमळेवाडी 3, दहिवडी 39 असे एकूण 148 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. 
उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू 
तसेच दि. 2 जून रोजी मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या ओझरे ता. जावली येथील 75 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. 

आर्वीचे वीर जवान अक्षय यादव यांच्या कुटुंबाची गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेट

आर्वीचे वीर जवान अक्षय यादव यांच्या कुटुंबाची  
गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेट
                                                                   
सातारा दि. 24 :  सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील आर्वी येथील वीर जवान अक्षय यादव यांचे मणिपू्र येथे  निधन झाले होते. त्यांच्यावर काल त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आर्वी येथे वीर जवान अक्षय यांच्या आई  छाया यादव यांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. 
  यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यादव कुटुंबाला राज्य शासनाच्या वतीने सर्वातोपरी मदत करण्यात येणार असून श्रीमती छाया यादव यांच्या घराबाबतचा निर्णय लवकर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, शिवसेना उपनेते प्रा.नितीन बानुगडे पाटील, कोरेगावच्या प्रातांधिकारी किर्ती नलवडे, कोरेगावच्या तहसिलदार रोहिणी शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी महामुनी,   जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर विजयकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, आर्वीच्या सरपंच सविता राऊत, माजी पंचायत समिती सदस्य विकास राऊत विस्ताराधिकारी सपना जाधव उपस्थित होते.

सातारा ; 5 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह तर 305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

सातारा ; 5 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह तर
  305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

सातारा दि. 24 : एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार कराड तालुक्यातील बनवडी   येथील 32 वर्षीय पुरुष, तारुख येथील 25 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील 49 वर्षीय महिला, बोंडरी येथील 34 वर्षीय पुरुष, सातारा येथील वाढे फाटा येथील 56 वर्षीय महिला असे एकूण 5 रुग्णांचा रिपोर्ट कोविड बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

  305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
                  
काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड  यांच्याकडून 305 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत ; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई, दि. २३ : लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी डॉ. राऊत म्हणाले, महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही.

जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच आहे. या वीजबिलाची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी महावितरणने विशेष लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.

त्यानंतरही काही शंका असल्यास ग्राहक आवश्यकतेनुसार https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरून वाढीव वीजबिलांची पडताळणी करू शकतात. तसेच महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेता येईल. तसेच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचे वीजबिल गेले असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली.

डॉ. राऊत म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीज बिल देण्यात आले. मात्र या कालावधीत महावितरणच्या आवाहनानुसार स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत.

आता जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित व अचूक बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. या बिलामध्ये ग्राहकांवर एका पैशाचाही भुर्दंड बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येत आहे, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आणि महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाने मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. २४ : अखंडित वीज उत्पादनाचे  कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे.

महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोताद्वारे कार्यरत असणारे कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक यांचा मृत्यूदेखील कोरोनामुळेच झाल्यास त्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे अनुदान सहाय्य पुरवण्यात येणार असल्याचे  राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याबाबत ऊर्जा विभाग गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

महानिर्मितीमध्ये तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान लागू असेल.       

ह्याकरिता, मृत्यूचे कारण हे  कोविड-१९ विषाणूशी संबंधित असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र  शासकीय/पालिका/महानगरपालिका/आयसीएमआर नोंदणीकृत खासगी रुग्णालये/प्रयोगशाळा यांच्याकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात आलेले असावे. सदर सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी कामावरील उपस्थितीबाबत अटी व शर्ती या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राहतील, असे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार - गृहमंत्री अनिल देशमुख


मुंबई
दि. २४ - सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे.

ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे.यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेतअसे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या  तक्रारी या प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.

ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचनासुद्धा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली..


मंगळवार, २३ जून, २०२०

गुणवत्तापूर्ण बि-बियाणे आणि खते मिळावे यासाठी कृषी विभाग दक्ष;खत विकणाऱ्यांनी साठा आणि दर याचे फलक दर्शनी भागात लावावेत - कृषिमंत्री दादासाहेब भुसे

गुणवत्तापूर्ण बि-बियाणे आणि खते मिळावे यासाठी कृषी विभाग दक्ष;
खत विकणाऱ्यांनी साठा आणि दर याचे फलक दर्शनी भागात लावावेत
                                                                            - कृषिमंत्री दादासाहेब भुसे
  सातारा दि. 23  सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते आणि बि - बियाणे मिळावे यासाठी शासन आग्रही असून यावर कृषी विभागाचे लक्ष आहे. प्रत्येक खत, बि - बियाणे विकणाऱ्या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात दररोज किती साठा आहे आणि दर काय आहेत ठळकपणे फलकावर लावावे अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिल्या 
      सातारा जिल्ह्यच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. महेश शिंदे,आ. प्रकाश आबिटकर,  जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील, कृषी विभागाचे कोल्हापूर विभागाचे सहसंचालक दशरथ तांबाळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत उपस्थित होते.
    शेतकऱ्यांना वर्षभर पुरेल एवढा युरियाचा साठा जिल्ह्याला मिळेल मात्र शेतकऱ्यांनी पीक जोमात येते म्हणून अधिक खताचा मारा करू नये, त्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे योग्य ते प्रमाण वापरून उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे असे सांगून  नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहन देत असल्याचे उदाहरणासह कृषी मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.
  सातारा जिल्यातील एक शेतकरी जिरेनियम या सुंगधी लागवड वनस्पतीची लागवड करतो याची माहिती खा. श्रीनिवास पाटील यांनी दिली आणि नैसर्गिक रंगाच्या शेतीला मोठा वाव आहे ही बाब आ. महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिली. या दोन्ही गोष्टी नाविन्यपूर्ण असून राज्याचा कृषिमंत्री म्हणून याबाबतीत काय करता येईल याचा सकारात्मक विचार करू असे यावेळी भुसे यांनी सांगितले.
  शहरातील विद्यार्थ्यांना शेती आणि शेतकरी याबाबत फक्त पुस्तकी माहिती असते.त्यांचे प्रत्यक्ष जीवन पाहता यावे म्हणून येणाऱ्या काळात त्यांच्या सहली शेतात घेऊन जाण्याबाबत विचार करत आहोत अशी माहिती कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी यावेळी दिली.
        यावेळी खा.श्रीनिवास पाटील यांनी काही सूचना केल्या तर आ.महेश शिंदे यांनीही कृषी विभागाचे काम उत्तम सुरु असल्याचे सांगून फुल शेती, हळद शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले. त्यावर शासन पातळीवर योग्य निर्णय घेतले जातील अशी ग्वाही कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी यावेळी दिली.
कृषी मंत्री पोहचले बांधावर
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात ग्राम बीजोत्पादन अंतर्गत उत्पादित सोयाबीन बियाणे पेरणी केलेले  उडतारे गावचे सुनील शंकर जगताप या शेतकऱ्याच्या  प्लॉटला कृषिमंत्री , खा.श्रीनिवास पाटील, मा.आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली.यावेळी टोकण पद्धतीने सरीवर सोयाबीन पेरणी केल्याने एकरी फक्त 15 किलो बियाणे लागत असल्याने उत्पादन खर्चात बचत  झाल्याचे  शेतकऱ्याने सांगितले.तसेच या पद्धतीने एकरी उत्पादन 20 क्विंटल  घेतल्याचे सांगितले.यावेळी सोयाबीन पिकाची उगवण 100 टक्के झालेली असल्याने कृषीमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, शेतकरी उपस्थित होते.

सातारा ; बरे झालेल्या 10 जणांना आज दिला डिस्चार्ज;218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा ; बरे झालेल्या 10 जणांना आज दिला डिस्चार्ज;218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
 सातारा दि. 23  : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून व कोरोना केअर सेंटर मधून 10 जणांना आज 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 यामध्ये जावली तालुक्यातील धोंडेवाडी येथील 51 वर्षीय महिला व 57 वर्षीय पुरुष.
   खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील 53 वर्षीय पुरुष, बोंबाळे येथील 29 वर्षीय पुरुष, निढळ येथील  24 वर्षीय महिला
   माण तालुक्यातील गोंदवले बु. येथील 63 वर्षीय महिला,
 कोरेगांव येथील 53 वर्षीय महिला व चोरगेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष.  
  सातारा येथील  निशिगंधा कॉलनी बारवकर नगर  येथील 14 व 17 वर्षीय युवती.
218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
 क्रातीसिंह नानापाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 85, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 38, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 1, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 17, शिरवळ येथील 9, रायगांव 15, पानमळेवाडी 19, मायणी 11, महाबळेश्वर 4, पाटण येथील 8 असे एकूण 218 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून, एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत. 
मृतकाची नोंद कोविड बाधितांमध्ये
 कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दि. 19 जून रोजी 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात घेतलेला नमुना पॉझिटिव्ह आला होता व त्याच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली नव्हती वरिष्ठांकडून सूचनेनुसार या मृत्यूची नोंद कोविड बाधित मृत्यू मध्ये करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 40 कोविड बाधित मृत्यू झाले आहेत असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. 

तळमावले ; मुख्यमंत्री कार्यालयाकडून डाॅ.संदीप डाकवे यांना आभाराचा मेल

मुख्यमंत्री कार्यालयाकडून डाॅ.संदीप डाकवे यांना आभाराचा मेल

तळमावले/वार्ताहर
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांना आभाराचा मेल पाठवण्यात आला आहे.
लाॅकडाऊनच्या काळात ‘एक कलाकृती कोरोनाविरुध्दच्या योद्यांसाठी’ हा उपक्रम पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून मिळालेला मोबदला थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये त्यांनी पाठवला. या उपक्रमाचे पैसे पाठवल्यानंतर डाकवे यांना आॅनलाईन सर्टीफिकेट देखील मिळाले होते. याची दखल सीएम कोविड फंड कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. यामध्ये Dear Sir, Thank you for the donation made towards chief Ministers Relief Fund- COVID 19. Regards, Accounts Officer, CMRF असे म्हटले आहे. या आभाराच्या मेलमुळे संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे खुश झाले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या फंडात दिलेल्या खारीच्या वाट्यााची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतल्यामुळे काम करण्यास आणखी ऊर्जा मिळाली असल्याचे मत डाकवे यांनी व्यक्त केले आहे.

सोमवार, २२ जून, २०२०

सातारा ; 20 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

20 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
  सातारा दि. 22  :  रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 यामध्ये जावली तालुक्यातील गांजे येथील 24 वर्षीय पुरुष.
  कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष व 24 वर्षीय  पुरुष.
पाटण येथील गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष. 
फलटण येथील रविवार पेठ येथील 3 वर्षीय बालक. 
खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचे बालक, म्हासूर्णे18 वर्षीय तरुणी.
सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 49 वर्षीय 2 महिला व 16 वर्षीय तरुण. 

खुशखबर ; कोरोनावर औषध आलं फक्त ₹ १०३/-

नवी दिल्ली | संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढत आहे. देशातील शेकडो शास्त्रज्ञ आणि तज्ञ कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना आतापर्यंत यश आलेले नाही. मात्र, आता या प्राणघातक व्हायरसबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूचे नवीन औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. आणि या औषधाच्या टॅबलेटसाठी तुम्हाला फक्त 103 रुपये द्यावे लागणार आहे.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटींगची मान्यता मिळाल्यानंतर, औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने कोरोना विषाणूमुळे ग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी अँटीवायरल औषध फॅव्हिपायरवीर 'फॅबीफ्लू' टॅबलेटची निर्मिती केली आहे.

" हे औषध विषाणूची लक्षणे चार दिवसात वेगाने कमी करते आणि शरीरात रेडिओलॉजिकल सुधार आणते. औषध निर्मात्याने म्हटले आहे की कोरोना व्हायरस पीडित व्यक्तींमध्ये फेव्हपीरवीर 88 टक्के वाढ दर्शविली आहे.

प्रिस्क्रिप्शनच्या आधारे हे औषध रुग्णाला दिवसातून दोनदा (प्रथम डोस) 1800 मिलीग्राम दिले जाईल आणि त्यानंतर दररोज 800 मिलीग्राम दोनदा दिले जाईल. ते तयार करणार्‍या कंपनीच्या म्हणण्यानुसार हे औषध रुग्णालये आणि मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. भारतात सुद्धा या औषधाला मंजूरी मिळाली असून मुंबईमधील एका कंपनीने शुक्रवारी सांगितले की या औषधाची निर्मिती व विक्री करण्यासाठी भारतीय कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीजीसीआय) परवानगी मिळाली आहे. कंपनीने म्हटले आहे की कोरोनावर उपचार करणारी फॅबीफ्लू ही पहिली फूड फेव्हपीरवीर औषध आहे, ज्यास मान्यता मिळाली आहे.

रविवार, २१ जून, २०२०

जेव्हा कृषिमंत्री सामान्य शेतकरी बनून खत विक्री दुकानात जातात तेव्हा...

औरंगाबाद: शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळतायेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे आज स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेले. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर कृषीमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला. औरंगाबाद येथील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी दिले.

खतांचा साठा मुबलक असतानाही जर दुकानदार शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा देतानाच गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांमध्ये अधिक प्रभावीपणे कारवाई करायची गरज असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

औरंगाबाद येथे युरिया मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज दुपारी औरंगाबाद शहराला अचानक भेट दिली. जिल्हा यंत्रणेला न कळवता ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर या दुकानात स्वत: कृषीमंत्री सामान्य शेतकरी म्हणून गेले. त्यांनी दुकानदाराकडे १० गोणी युरिया मागितला. त्यावर युरिया शिल्लक नसल्याचे दुकानदाराने सांगितले. १० ऐवजी पाच गोण्यांची मागणी केल्यावरही दुकानदाराने युरिया दिला नाही.

दुकानामध्ये शिल्लक साठ्याच्या फलकावर युरीया शिल्लक असल्याचे निदर्शनास आणून देतानाच स्टॉक रजिस्टरची मागणी कृषीमंत्र्यांनी केली. ते घरी असल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यानंतर कृषीमंत्र्यांनी जिल्हा कृषि अधीक्षकांना दुकानात बोलावून घेतले. युरिया शिल्लक असतानाही तो शेतकऱ्यांना दिला जात नाही यावर कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी तीव्र नाराजी दर्शविली. दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केल्यानंतर दुकानात युरीयाच्या १३८६ पिशव्या शिल्लक असल्याचे आढळून आले. या दुकानदारावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या प्रकाराने व्यथीत झालेल्या कृषीमंत्र्यांनी औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या आणि दुकानातूनच कृषी विभागाच्या सचिवांना दूरध्वनीकरून यंत्रणांनी अधिक प्रभावी कार्यवाही करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या. राज्यभरातील कृषी निविष्ठा दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे याबाबी खपवून घेतल्या जाणार नाही, अशा इशाराही कृषीमंत्र्यांनी दिला आहे.

ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा !

महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन


मुंबई, दि. २१ – सध्याच्या काळात बरेच ज्येष्ठ नागरिकसुद्धा बँकांचे व्यवहार, प्रत्यक्ष बँकेत जाऊन करण्यापेक्षा इंटरनेट बँकिंगद्वारे करणे पसंत करीत आहेत. ऑनलाईन बँकिंग व्यवहार करत असताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

ऑनलाइन आर्थिक व्यवहार सोबतच इंटरनेटचा वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत पण वाढ होत आहे. महाराष्ट्र सायबर सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करते की, आपण कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.

कोणत्याही अनोळखी लिंकवर तसेच कोणत्याही  संकेतस्थळावर (website) आपली व आपल्या बँक खात्यांची माहिती, डेबिट /क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये.

बरेच ज्येष्ठ नागरिक सध्या फेसबुकचा वापर करायला पण शिकत आहेत व आपल्या परिचयातील जुन्या व्यक्तींना फेसबुकवर शोधून add करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर स्वतःची सर्व माहिती देणे टाळावे तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फेसबुकवर friend request स्वीकारू नये. सायबर गुन्हेगारांच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक हे सर्वात सोपे टार्गेट असतात, त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी इंटरनेट बँकिंग व सोशल मीडिया वापरताना सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

तक्रार नोंदवा

जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन आर्थिक किंवा अन्य कोणत्या प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद करावी, तसेच या गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही (website) द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

सातारा ; पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी बचतगटांना तुर व खते वाटप

पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी बचतगटांना तुर व खते वाटप
सातारा दि. 21 : कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा विकास कार्यक्रमांतर्गत कृषी बचतगटांना तुर वाटप व बांधावर खते पोहोच वाटप राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राधान्य कुटुंबाचे 207 लाभार्थींना मोफत धान्य वाटपही करण्यात आले.
कोरेगाव तालुक्यातील मौजे साप येथे आयोजित केलेल्या कार्यकमास कोरेगाव तहसीलदार रोहिणी शिंदे,  राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, साप ग्रामपंचायतीच्या सरपंच शशिकला शेडगे, उपसरपंच नागेश अडसुळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे इतर सदस्य, ग्रामसेवक संतोष पाटील, मंडळाधिकारी श्री.सावंत, तलाठी देविदास जाधव, कृषी सहायक श्री भोसले आदींची उपस्थिती होती.

काळगाव ; शिवारात कोळपणीची धांदल; शिवार फुललाय माणसांनी

शिवारात कोळपणीची धांदल; शिवार फुललाय माणसांनी

 शिवारामध्ये भुईमुगाच्या पिकात कोळपणी करताना शेतकरी बांधव

तळमावले/वार्ताहर
यंदा विभागात वळीवाच्या पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे काळगांव विभागातील पेरण्या लांबल्या होत्या. त्यातच 2 जूनच्या दरम्यान निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्राला तडाखा दिला. त्या वादळामुळे दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस या विभागात झाला. त्यानंतर पाऊस गेल्याने लोकांनी युध्दपातळीवर भुईमूग, भात, सोयाबीन, मका इ. पीके पेरुन घेतली. सुमारे 80 टक्के पेरणी लोकांनी या काळात पूर्ण केली. दोन तीन दिवसाच्या पावसाच्या
उघडीपीच्या काळात ही पेरणी झाली. त्यानंतर पुन्हा सलग 4 ते 5 दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे पीके उगवण्यास पोषक असे वातावरण तयार झाले. 4-5 दिवस सलग पाऊस पडल्यानंतर कालपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शिवारात कोळपणीची एकच हातघाई उसळलेली दिसून येते. तसेच ज्यांची किरकोळ पेरणी राहून गेली आहे त्यांनी देखील ती पूर्ण करण्यासाठी गडबड करत आहेत.
ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात डोक्याने ओढणारा कोळप्याचा वापर जास्त प्रमाणात कोळपणीसाठी केला जात असे. या कोळप्याला दोन माणसांची आवश्यकता भासत असे. एक कोळपा ओढण्यासाठी आणि दुसरा तो कोळपा पुढे दाबण्यासाठी. परंतू सायकल कोळपा आल्यामुळे हे कोळपे हल्ली दिसेनासे झाले आहेत. सायकल कोळप्यामुळे एकच व्यक्ती पीकामध्ये कोळपू शकतो. त्यामुळे सर्वत्र सायकल कोळप्याने लोक पीके कोळपत असल्याचे दिसत आहे.
सध्या पीके कोळपण्यासाठी पोषक वातावरण आहे. आता कोळपल्यामुळे पुढे मोठया प्रमाणात येणाÚया गवताला प्रतिबंध घालता येतो. काळगांव विभागातील वाडया वस्त्यावर सध्या कोळपणीची एकच धांदल चालू असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या विभागात जास्त पाऊस असतो. त्यामुळे बहुतांशी लोक भाताचे पीक
घेतात. हे पीक करताना लावणीची पध्दत वापरली जाते. लावणीसाठी रोपे तयार करण्यासाठी बी टाकले जाते. त्यानंतर संबंधित वावरामध्ये नांगरले जाते. हे सुध्दा काम सध्या सुरु आहे. लावणीच्या पध्दतीमुळे शेतातील गवत कमी होते तसेच पीकाचे उत्पादन देखील जास्त येते. यामुळे अशा पध्दतीचे नांगरण्याचे काम सुध्दा मोठया प्रमाणात सुरु आहे.
एकंदरित संपूर्ण शिवार माणसांनी गजबजून गेला आहे. पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे सर्व लोक कामात व्यस्त आहेत.

पाऊस उघडल्यामुळे शिवारात सध्या एकच हातघाई सुरु आहे. कोळपणीच्या माध्यमातून पिकातील जास्तीत जास्त गवत काढण्यास मदत होत आहे. त्यामुळे भांगलणी करताना जास्त त्रास होत नाही. अजून एकदा कोळपणी झाली तर पीक चांगल्या पध्दतीने येण्यास मदत होईल.
- सौ.गयाबाई डाकवे, महिला शेतकरी







कोरोना संकटाचे भान ठेऊन,आरोग्य जपत गणेशोत्सव साजरा करूया - मुख्यमंत्री

मुंबई, दि. २० :
आगामी गणेशोत्सवासाठी मुंबईतील उत्सव मंडळांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा
 कोरोना विषाणूच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव कोविड-१९च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा. यंदाचा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा होत असला, तरी पुढील वर्षी मात्र गेल्यावर्षीच्या उत्सवापेक्षा अधिक उत्साहात आणि भव्य-दिव्य असा साजरा करण्याचे प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
मुंबई शहर जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी आज आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने व्हिसीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये आमदार अजय चौधरी, मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्या शासनाच्या प्रय़त्नांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी भूमिकाही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. मुंबईतील गणेश मंडळांची समाजाभिमुख उपक्रमात योगदान देण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात मंडळे आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य मेळावे, शिबिरे आदी उपक्रमांद्वारे यावर्षीही हिरिरीने पुढे राहतील, असा विश्वास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला, यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी गणेश मंडळांच्या या वैशिष्ट्यांचा पुनरूच्चार करतानाच, त्यांचे कौतुकही केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या स्वरुपावर मर्यादा येईल. त्यामुळे यंदा उत्सव मंडळांनी मूर्तींची उंची लहान ठेवण्याबाबत विचार करावा. प्रत्येक छोट्या – मोठ्या गोष्टींचे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांच्या अंगाने नियोजन करावे. उत्सव मंडपही लहान असावेत. सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याचे नियोजनही याठिकाणी करावे लागेल. विषाणूचे संकट टळल्यानंतर, पुढच्या वर्षी हाच गणेशोत्सव गतवर्षीच्या उत्सवाच्या कितीतर पट उत्साहाने साजरा करता येईल. हा विश्वास बाळगून यंदाचा उत्सव साजरा करूया.

चर्चेत सहभागी समितीचे पदाधिकारी तसेच सदस्यांनीही आरोग्य शिबारे, विषाणू प्रादुर्भावाबाबत जनजागृती तसेच वैद्यकीय सेवा-सुविधा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रमांचे नियोजन करू. मूर्तींच्या उंचीबाबत शासनाने  मार्गदर्शक सूचना दिल्यास, त्यांचे पालन केले जाईल. कोरोना विषाणू आणि आरोग्यविषयक आणि स्वच्छतेबाबत शासनस्तरावरून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केले जाईल, अशी भूमिका मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी मूर्तीची उंची, उत्सवाचे स्वरूप यांसह पारंपारिक विसर्जन मार्ग आणि गणेश विसर्जन व्यवस्था या अनुषंगानेही चर्चा झाली.

सातारा ; 14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह 
सातारा दि. 21  :  एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 14 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 यामध्ये फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी ( हिंगणगाव )  येथील  61 व  32 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय महिला.
 कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील 28, 20 व 44 वर्षीय महिला.
 खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील  35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष.
 माण तालुक्यातील खोकडे येथील 34 वर्षीय पुरुष.
 जावली तालुक्यातील  म्हातेखुर्द येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष.
 सातारा तालुक्यातील राजापूरी येथील 5 वर्षीय बालिका व 31 वर्षीय महिला

कोणत्या शहरात किती वाजता सूर्यग्रहण दिसणार?

मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 
आज (21 जून) रविवार संपूर्ण भारतातून दिसणार आहे. भारताच्या काही भागात ते कंकणाकृती दिसणार असून काही भागात ते खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी आणि सर्वात लहान रात्री ही खगोलीय घटना घडणार आहे. 
या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे जेथे महाभारत युद्ध झाले त्या कुरुक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

रविवारी सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी 12 वाजून 01 मिनिटांपासून 12 वाजून 02 मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. तर दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.

का आहे खास ?

संपूर्ण भारतातून दिसणारं सूर्यग्रहण हे अनेक कारणांनी खास मानलं जात आहे. विशेष म्हणजे दरवर्षी 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. यानतंर उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. तर जगभरात 21 जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. तसेच पुढची जवळपास अकरा वर्ष भारतातून कंकणाकृती ग्रहण दिसणार नाही.

कोणत्या शहरात किती वाजता सूर्यग्रहण दिसणार?

शहर - साधारण वेळ

  • मुंबई - सकाळी 10.01 ते दुपारी 1.28
  • पुणे - सकाळी 10.03 ते दुपारी 1.31
  • नाशिक - सकाळी 10.04 ते दुपारी 1.33
  • नागपूर - सकाळी 10.18 ते दुपारी 1.51
  • औरंगाबाद - सकाळी 10.07 ते दुपारी 1.37

सूर्यग्रहण कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी फिल्टर चष्मे, फिल्म आणि दुर्बिणीचा वापर करावा. फोटो काढताना किंवा दूर्बिणीतून सूर्यग्रहण पाहताना योग्य फिल्टरचा वापर करावा. हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलइस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथून दिसेल.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...