पुणे - मराठा समाज आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून योग्य प्रयत्न केले जात नाहीत. समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या मान्य करा, अन्यथा 9 ऑगस्टपासून मराठा समाज राज्यव्यापी आंदोलन सुरू करेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची ऑनलाइन बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. प्रलंबित मागण्यांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. यावेळी वीरेंद्र पवार, विनोद पाटील, राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, दिलीप पाटील, विनोद साबळे, अंकुश कदम, करण गायकर, माउली पवार व इतर विविध जिल्ह्यांतील प्रमुख समन्वयकांची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा