बुधवार, १८ मार्च, २०२०

संदीप डाकवे ‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ कोर्स मध्ये उत्तीर्ण


तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील संदीप डाकवे हे ‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ हा कोर्स यशस्वीरीत्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण  झाले आहेत. भारतीय प्राकृतिक चिकित्सालय दिल्ली व इंडियन बोर्ड आॅफ नॅचरोपॅथी, नवी दिल्ली मान्यताप्राप्त नेचरक्युअर इन्स्टिटयूट नाशिक मधून त्यांनी हा डिप्लोमा पूर्ण केला आहे.
‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ हा कोर्स पूर्ण केल्यामुळे ते ‘नॅचरोपॅथी तज्ञ’ म्हणून आपल्या नावासमोर ‘डाॅक्टर’ या पदवी चा उल्लेख करु शकणार आहेत. निसर्गोपचार ही पध्दती आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीप्रमाणेच शासनमान्य पध्दती आहे.
संदीप डाकवे यांनी यापूर्वी एटीडी, बी.ए.(इंग्रजी), एम.जे., ग्राफीक डिझायनिंग इ.पदव्या प्राप्त केल्या आहेत. दरम्यान, संदीप डाकवे यांनी आतापर्यंत सुमारे 183 विद्याथ्र्यांना मोफत शालेय साहित्य तसेच परिसरातील शाळांना लाखो रुपयांचे शैक्षणिक उठावाचे साहित्य दिले आहे. याशिवाय आपल्या कलेतून अनेक शाळांच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. अशा विविध माध्यमातून संदीप डाकवे यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.
संदीप डाकवे यांच्या सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना 4 वेळा पुरस्कार देवून गौरवले आहे.
‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ हा कोर्स पूर्ण केल्याबद्दल नेचरक्युअर इन्स्टिटयूटचे डाॅ.सुभाष भंडारी, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, जि.प.सदस्य आशीष आचरे, पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी संदीप डाकवे यांचे अभिनंदन केले आहे.

सातारा ;- जिल्हा परिषद विषय समिती सदस्यांच्या सर्व निवडी बिनविरोध


साताराजिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यपदी 21 जणांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या निवडीची घोषणा अर्थसंकल्पीय सभेत अध्यक्ष उदय कबुले यांनी केली.
सातारा जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलानंतर विषय समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.

मागील सभेत सदस्यांना निवडणूक कार्यक्रम वेळेत न पोहोचल्याने निवडीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अर्थसंकल्पीय सभेत या निवडी होणार होत्या. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे या निवडी बिनविरोध झाल्या. अध्यक्ष उदय कबुले यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मंगळवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब झाले होते.उदय कबुले यांनी अर्थसंकल्पीय सभेत या निवडीची घोषणा केली.

स्थायी समितीवर माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, दीपक पवार, जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीवर वनिता गोरे, कृषी समितीवर माजी शिक्षण सभापती राजेश पवार, अनंत तांबे, समाजकल्याण समितीवर प्रवीण ताटे, सौ. संगीता चव्हाण, शिक्षण समितीवर शिवरुपराजे खर्डेकर, वसंतराव मानकुमरे, बांधकाम समितीवर मनोज पवार, अर्थ समितीवर कविता जगदाळे, मनोज पवार, रेखा घार्गे, अंजना कदम, पशुसंवर्धन समितीवर सौ. जयश्री गिरी, वसंतराव मानकुमरे, आरोग्य समितीवर राजाभाऊ शेलार, राजेश पवार, राजाभाऊ जगदाळे, महिला व बालकल्याण समितीवर सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर सदस्यांनी अभिनंदनपर भाषणे केली. ज्येष्ठ सदस्य भीमराव पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जिल्हा परिषदेत राबवला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पाटण :- मुंबई -पुण्यातुन गावी येणाऱ्या गावकऱ्यांची नोंद करणार

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. दक्षतेचे उपाय म्हणून प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची नागरिकांनी कडक अंमलबजावणी करावी. पुणे-मुंबईहून गावात येणार्‍या लोकांची गावांतील पोलिस पाटलांकडे नोंद ठेवली जाणार असून त्यांची आरोग्य विभागाकडून दररोज तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
पुणे, मुंबईतून येणार्‍या लोकांचा कल वाढत आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधितांनी पोलिस पाटलांकडून 100 टक्के नाव नोंदणी करुन घ्यावी. आरोग्य विभागाकडून या लोकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पुणे, मुंबईहून आलेल्या व्यक्‍तींमध्ये साथरोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात जावून तपासणी करावी. होम कॉरंटाईन (स्थानबध्द) केलेल्या संशयितांच्या कुटुंबांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. इतर लोकांपेक्षा संशयितांच्या कुटुंबांचे हित समोर ठेवले आहे.'कोरोना' संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. लोकांचे सहकार्य मिळत असल्याचेही शेखर सिंह यांनी आवर्जून सांगितले.केंद्र व राज्य शासनाने आवाहन केल्याप्रमाणे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घरातून बाहेर पडावे. अन्यथा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळले पाहिजे. पर्यटन करणे नागरिकांनी टाळले पाहिजे. जिल्ह्यात पर्यटनासाठी येणार्‍या लोकांची गर्दी घटली आहे.

मंगळवार, १७ मार्च, २०२०

महाराष्ट्र :- राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया थांबवली

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत घोषणा केली आहे.
राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या १० ऑगस्ट २००५च्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे.

"चंद्रकांतदादा जरा जपून बोला नाहीतर"

नवी मुंबई | भाजप सत्तेत असताना मागची वर्षे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आता राष्ट्रवादीच्या गोटातून प्रत्युत्तर दिलं जात आहे. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना इशारा दिला आहे.

पवारसाहेबांबद्दल विधान करताना जरा जपून विधान करावं. प्रदेशाध्यक्ष म्हणून काहीही वेड्यासारखं बरळू नये. नाही तर तुम्हाला तुमची उंची काय आहे हे दाखवावं लागेल, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी पाटील यांना दिला आहे.

सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील काहीही बरळत सुटले आहेत.

सत्ता गेल्याचं सर्वात जास्त दुःख कोणाला झालं असेल तर ते चंद्रकांत पाटील यांना. कदाचित भविष्यातील मोठी संधी हुकल्याची त्यांना खंत असेल. त्यामुळे हल्ली काहीही वेड्यासारखे बरळत सुटले आहेत, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

पवारसाहेबांच्या बद्दल चंद्रकांत पाटील यांची गेल्या काही महिन्यांत सतत वेगवेगळी विधाने येत आहेत. एका बाजूला पवारांवर पीएचडी करायचं विधान करतात. एका बाजूला दुसरं काहीतरी विधान करतात. चंद्रकांत पाटलांना राजकारणाचा मागमूस आहे की नाही याची शंका यायला लागलीय. पवार साहेबांनी महाराष्ट्रात काय इतिहास घडवला हे तुम्ही पाहत होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे.

7 दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार नाही; सरकारने मोठा निर्णय टाळला


मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.पुढील सात दिवस सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला,' असं ट्वीट केलं होतं. मात्र त्यांनी नंतर ते ट्वीट डिलीट केलं

काल मंत्रालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे हे कळाल्यावर प्रशासनाने आज मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता 7 दिवस सुट्टी मिळणार आहे.

राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालये तसंच तहसीलदार कार्यालय तसंच विविध सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. दुसरीकडे मुंबईतची लाईफ लाईन लोकल देखील टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा विचार शासन करत आहेत.

दरम्यान, सगळ्या खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेततसंच येणाऱ्या काही दिवसांत अनावश्य गर्दी टाळण्यासाठी लोकांनी देखील अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे..

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हिंदुजा रुग्णालयातून या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आज या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ६४ वर्षाच्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटक, दिल्लीनंतर मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे.मुंबईत पहिला बळी गेल्याने आता महाराष्ट्रातील जनतेला आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. देशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. 

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात हा कोरोनाच्या रुग्णांची वाढ होतान दिसत आहे.

आठवड्याभरात कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. १०८ जण संशयित असून त्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. तर १०६३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...