बुधवार, १८ मार्च, २०२०

पाटण :- मुंबई -पुण्यातुन गावी येणाऱ्या गावकऱ्यांची नोंद करणार

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. दक्षतेचे उपाय म्हणून प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची नागरिकांनी कडक अंमलबजावणी करावी. पुणे-मुंबईहून गावात येणार्‍या लोकांची गावांतील पोलिस पाटलांकडे नोंद ठेवली जाणार असून त्यांची आरोग्य विभागाकडून दररोज तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
पुणे, मुंबईतून येणार्‍या लोकांचा कल वाढत आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधितांनी पोलिस पाटलांकडून 100 टक्के नाव नोंदणी करुन घ्यावी. आरोग्य विभागाकडून या लोकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पुणे, मुंबईहून आलेल्या व्यक्‍तींमध्ये साथरोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात जावून तपासणी करावी. होम कॉरंटाईन (स्थानबध्द) केलेल्या संशयितांच्या कुटुंबांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. इतर लोकांपेक्षा संशयितांच्या कुटुंबांचे हित समोर ठेवले आहे.'कोरोना' संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. लोकांचे सहकार्य मिळत असल्याचेही शेखर सिंह यांनी आवर्जून सांगितले.केंद्र व राज्य शासनाने आवाहन केल्याप्रमाणे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घरातून बाहेर पडावे. अन्यथा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळले पाहिजे. पर्यटन करणे नागरिकांनी टाळले पाहिजे. जिल्ह्यात पर्यटनासाठी येणार्‍या लोकांची गर्दी घटली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...