मंगळवार, १७ मार्च, २०२०

महाराष्ट्र :- राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया थांबवली

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत घोषणा केली आहे.
राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या १० ऑगस्ट २००५च्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...