बुधवार, १ जुलै, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित ;क्षेत्र माहुली येथील 3 जणांना डिस्चार्ज तर 293 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

जिल्ह्यातील 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित ;
क्षेत्र माहुली येथील 3 जणांना डिस्चार्ज तर 293 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 1:   जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित  10 व प्रवास करुन आलेले 2, आय.एल.आय (ILI) 2  असे एकूण 14 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित  आले आहे. तसेच आज 3 जणांना 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील बेलवडी येथील 63 वर्षीय पुरुष
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 75 वर्षीय महिला
माण तालुक्यातील काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, म्हसवड येथील 65, 50, 27  वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलगी 
वाई तालुक्यातील चिंधवली येथील 28 वर्षीय पुरुष, ओझर्डे येथील 39 वर्षीय महिला, कवठे येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष , सहयाद्रीनगर येथील 60 वर्षीय पुरुष व 39 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. 
3 जणांना आज डिस्चार्ज 
सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 47 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक व 19 वर्षाची युवती यांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
293 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथील 50, कृष्णा मेडिकल 61, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 70, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 30, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 2, वाई 5, रायगाव 44, पानमळेवाडी येथील 6, महाबळेश्वर 3, दहिवडी 22 असे एकूण 293 जणांच्या घशातील स्त्रावांचे  नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

घेतलेले एकुण नमुने  13533
एकूण बाधित 1107
घरी सोडण्यात आलेले 743
मृत्यु 46
उपचारार्थ रुग्ण 318

कुंभारगाव ;- "शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो" ;मुख्याध्यापिका सौ.मंगल मधुकर यादव

कुंभारगाव,(ता.पाटण) शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो, शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अखंड ज्ञानावर माझी श्रद्धा आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम शिक्षक करत असतो. शिक्षक म्हणजे ज्ञानाची विहीर व विद्यार्थी म्हणजे विहिरीबाहेर असलेला पोहरा आहे. ज्ञानाने विहीर भरलेली असेल तरच विद्यार्थ्यांच्या पोहऱ्यात ज्ञान मिळू शकेल, असे मत सेवानिवृत्त होताना श्री लक्ष्मीदेवी हायस्कूल, कुंभारगाव ता पाटण मुख्याधिपिका सौ मंगल मधुकर यादव मँडम यांनी व्यक्त केले.

यावेळी श्री.घोरपडे सर ,श्री. महाबळ सर, सौ. सावित्रा लोखंडे मँडम ,श्री.प्रा.सचिन पुजारी सर (के सी कॉलेज,तळमावले) , मा श्री विलास देसाई  (आरेवाडी ता कराड केंद्रप्रमुख ) या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले .प्रा. सचिन पुजारी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शिक्षकी पेशा हा उत्तम पेशा आहे. परंतु, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या मोहजालामुळे अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत. मुलांचे पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतील, तर शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक आहेत. फुलाला सुगंध मातीचा, गाईला सुगंध वासराचा, गवयाला सुगंध गाण्याचा त्याचप्रमाणे शिक्षकांना सुगंध विद्यार्थ्यांचा. नीतिमूल्याने परिपूर्ण असे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे ते म्हणाले.

यावेळी श्री मधुकर यादव सर (भवानी विदयामंदिर व ज्यु.कॉलेज,सातारा व मँडमचे पती), मा श्री शिवाजीराव यादव  (आरेवाडी माजी सरपंच),  मा.श्री.बसाप्पा पुजारी आप्पा (माजी नाईक, श्री वा.वि.तळमावले व मु पो कुंभारगाव ) कार्यक्रमास उपस्थित होते..  

कार्यक्रमाचे आभार विद्यालयातील शिक्षक श्री वसंत पवार सरांनी मानले.आदरणीय गुरुवर्य यादव उभयतांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या 

जिल्ह्यातील 48 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित

जिल्ह्यातील 48 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित 

सातारा दि. 1 (: काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 37, प्रवास करुन आलेले 5, सारी 5, आय.एल.आय (ILI) 1 असे एकूण  48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित  आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
            यामध्ये कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, रुक्मिणी नगर येथील 39 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22,54,32,40,35 वर्षीय महिला व 11 वर्षीय युवक व 60,44 वर्षीय पुरुष, तुळसन येथील 3 वर्षाची बालिका, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष, 23,45,70 वर्षीय महिला, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष. मलकापूर येथील 36, 34  वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवती. 
पाटण तालुक्यातील नवसरी येथील 15 व 17 वर्षीय युवक तसेच 36 वर्षीय महिला, पालेकर वाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सदा दाढोली येथील 11 व 29 वर्षीय महिला व 4 वर्षाची बालिका.  
सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 45 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 39 वर्षीय पुरुष.
माण तालुक्यातील खडकी पाटोळे येथील 62 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील निमसोड येथील 68 वर्षीय महिला, कन्नवडी मायणी येथील 75 वर्षीय् पुरुष, राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथील 8 वर्षीय बालिका.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 22,24,32,25 वर्षीय पुरुष व 19 व 49 वर्षीय महिला.
फलटण  तालुक्यातील कुरवली येथील 4 वर्षीय बालक, कोरेगाव येथील 5 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 43 वर्षीय पुरुष,  आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष.
जावळी तालुक्यातील मार्ली येथील 82 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

नोंदणीकृत वर्तमानपत्रांना पाच लाखांपर्यंत आर्थिक मदत द्या ; खा.राहुल शेवाळे

नोंदणीकृत वर्तमानपत्रांना पाच लाखांपर्यंत आर्थिक मदत द्या
मुंबई ; लॉकडाऊनमुळे वृत्तपत्र व्यवसायावरही आर्थिक संकट ओढवले. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने वृत्तपत्रांना 1 ते 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेवर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी लिहिले आहे की, देशभरातील सर्व भाषांमधील नोंदणीकृत दैनिके, पाक्षिके, नियतकालिके, अनियातकालिके, साप्ताहिके, मासिके यांना आर्थिक मदत करावी. त्यामुळे या वृत्तपत्र व्यावसायिकांचे मनोबल वाढून
 भविष्यात पुन्हा उभे राहण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल.

कोणत्या निकषांच्या आधारावर तुम्ही पत्रकारांच्या सेवा अचानक खंडित करीत आहात ;उच्च न्यायालयाचा वृत्तपत्र मालकांना सवाल


मुंबई; कोणत्या निकषांच्या आधारावर तुम्ही पत्रकारांच्या सेवा अचानक खंडित करीत आहात आणि त्यांच्या वेतनात बेकायदेशीरपणे कपात करीत आहात याचा खुलासा दोन आठवडय़ात लेखी स्वरुपात द्या, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्रातील वृत्तपत्र मालकांना विचारला आहे.

पत्रकारांच्या सेवा अवैधरित्या खंडित करण्याचा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर पत्रकार संघाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने हा प्रश्न विचारून वृत्तपत्र मालकांच्या वकिलांना निरुत्तर केले.

या प्रकरणात नेमके उत्तर घेऊन दोन आठवडय़ात पुढील सुनावणीसाठी उपस्थित व्हा, असे निर्देश खंडपीठाने यावेळी दिले. यावेळी युक्तिवाद करताना पत्रकार संघटनांच्या वतीने ऍड्. श्रीरंग भांडारकर यांनी वृत्तपत्र मालकांच्या गैरकृत्यांवर प्रकाश टाकला. त्यांना ऍड्. मनीष शुक्ल यांनी सहकार्य केले. यावेळी वृत्तपत्र मालकांच्या वतीने ऍड्. अनिल मार्डीकर आणि आर एम भांगडे, केंद्र सरकार च्या वतीने उल्हास औरंगाबादकर तर राज्य शासनाच्या कतीने सुमंत देवपुजारी यांनी युक्तिवाद केला.


कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाइन रोजगार मेळावे; २५ हजार ४७ उमेदवार व ११५ उद्योगांचा सहभाग, तर १ हजार २११ उमेदवारांची निवड – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

२५ हजार ४७ उमेदवार व ११५ उद्योगांचा सहभाग, तर १ हजार २११ उमेदवारांची निवड – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. 30 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या मोहीमेंतर्गत राज्यात आतापर्यंत एकूण 14 ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळावे झाले असून त्यास उद्योजक व उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन मेळाव्‍यांमध्‍ये एकूण 115 उद्योगांनी त्यांच्याकडे असलेली 12 हजार 322 रिक्‍तपदे अधिसूचित केली.

25 हजार 047 उमेदवारांनी ऑनलाईन भाग घेतला व त्यापैकी 1 हजार 211 उमेदवारांची निवड झाली असून इतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु आहे, अशी माहितीही मंत्री श्री.मलिक यांनी दिली.

कौशल्य विकास विभागाने बेरोजगार तरुणांना नोकरी आणि उद्योजकांना कुशल उमेदवार मिळवून देण्याच्या अनुषंगाने तयार केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा प्रभावीपणे वापर करून हे मेळावे घेतले गेले. पुणे, सातारा, औरंगाबाद, नागपूर, सांगली आणि ठाणे येथील जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयांनी प्रत्येकी 1 ऑनलाईन रोजगार मेळावा घेतला. नाशिक आणि यवतमाळ येथील कार्यालयांनी प्रत्येकी 2 तर उस्मानाबाद मॉडेल करिअर सेंटर यांनी 4 ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले.

मंत्री श्री.मलिक म्हणाले की, या ऑनलाईन मेळाव्यांमध्ये सर्व रोजगार इच्छूक व ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार संबंधित उद्योगांकडे मुलाखतींचे नियोजन करुन, संगणक प्रणालीद्वारे एसएमएस पाठवून अवगत करण्यात येते. तसेच त्यांच्या मुलाखती दूरध्वनी, व्हॉटस्ॲप, स्काईपद्वारे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष कंपनीमध्ये ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतल्या जातात. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व बाबींचे समन्वय कौशल्य विकास कार्यालयांमार्फत केले जाते. महास्वयंम वेबसाईट यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यापुढील काळातही ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍याबाबत कॅलेंडर तयार करण्‍यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

सर्व उमेदवार व उद्योग यांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचणी असल्यास आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री श्री.मलिक यांनी केले आहे.

सातारा; जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागूकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आदेश

सातारा जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आदेश

  सातारा दि. 30 : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात  लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून 31 जुलै 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.  याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी खालीलप्रमाणे जारी केले आहेत. 
ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो त्या ठिकाणी कंटेन्मेंट झेन जाहिर करण्याचे अधिकार इन्सिडंट कमांडर म्हणून संबंधित उपविभगीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. संबंधित कंटेन्मेंट झोन बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील  व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सूचित करतील. हा आदेश कंटेन्मेंट झोन वगळता  सातारा जिल्ह्यातील इतर क्षेत्राला हे आदेश लागू राहतील. तसेच कंटेन्मेंट झोन बाबत त्या त्या क्षेत्रातील इन्सिडंट कमांडर यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच कंटेन्मेंट झेन इनॲक्टीव्ह झल्यानंतर या क्षेत्रात हे आदेश  लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इन्सिडंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी हे त्या ठिकाणी नव्याने कंटेन्मेंट झोन जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबती प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सुचित करतील. 
खालील गोष्टींना सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिबंध राहील
सातारा जिल्ह्यातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक  सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात येत आहे. वय वर्ष 65 वरील व्यक्ती, persons with co morbidities, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्येच रहावे. त्यांना बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील. सर्व शाळा कॉलेज, शैक्षणिक संस्थ, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंन्स्टिट्युट या बंद राहतील. तथापि, शैक्षणिक संस्थांची कार्यालये (विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा) कर्मचारी यांना शिक्षकेत्तर कामाकरीता परवनागी देण्यात येत आहे. त्यामध्ये ई सामग्रीच्या विकासासह उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन व निकालाची घोषणा याचा समावेश राहील.  सर्व चित्रपट गृहे, जिम, व्यायमशाळा, सर्व मॉल व बाजारपेठ संकुल, स्विमींग पुल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. तथापि, सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत लग्नाशी संबधित मेळावे, समारंभ संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा Standard Operating Procedure नुसार चालू राहील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मानेरंजन शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. सर्व धर्मीक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. शॅापिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलीटी सर्व्हिसेस बंद राहतील. तथापि, सातारा जिल्ह्यातील रेस्टॉरंट यांना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडील 18 मे रोजीच्या आदेशातील अटी व शर्तीनुसार खद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी असेल. 
खाली बाबी जिल्ह्यामध्ये चालु राहतील
 वर प्रतिबंधीत केलेल्या (शासनाकडील दि. 31 मे च्या आदेशातील क्लॉज क्र. 8 ) सर्व बाबी  सोडून आणि whichare not explicitly prohibited or banned या सोडून इतर सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खाजगी आस्थापना चालु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रतिबंधित नसलेल्या कृती करण्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. क्रीडांगण, स्टेडियम  व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व समुह विरहीत सामाजिक अंतर ठेवून शारीरिक व्यायाम व इतर क्रिया  करण्यास परवानगी देण्यात येत आहे. Indoor stadium किंवा Indoor portion  मध्ये कोणत्याही गोष्टीस परवानगी नाही. सर्व वैयक्तीक व सार्वजनिक वाहतुकीस पुढीलप्रमाणे परवानगी राहील. दोन चाकी (फक्त चालक), तीन चाकी व चार चाकी (1+2 व्यक्ती). सुरक्षित शारिरीक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन , विहीत केलेल्या  प्रावासी क्षमतेच्या  50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये चालु राहतील. जर गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद  करावीत. 
व्यक्ती व वस्तुंच्या हालचालीबाबत विशेष सुचना
 सर्व प्राधिकारी यांनी मेडिकल प्रोफेशनल्स, नर्सेस आणि पॅरा मेडिकल स्टाफ, सॅनिटायझेशन पर्सनल आणि ॲम्ब्युलन्स यांना कोणत्याही प्रतिबंधाशिवाय राज्याअंतर्गत व राज्या बाहेर प्रवास करण्यास मान्यता द्यावी.  अंतर राज्य अंतर जिल्हा व्यक्तीच्या वाहतुकीस निर्बंध राहतील.  
 जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात आरोग्य सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील.. 
राष्ट्रीय व राज्य पातळीवर खालीलप्रमाणे कोरोना प्रतिबंध अपाययोजन करणे सर्वांसाठी बंधनकार राहील
 मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500/- रं. दंड आकारावा. सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500/- रु. दंड आकारावा. सातारा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेच्या ठिकाणी थुकण्यास मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु. दंडा आकारावा. जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधमानध्ये समसाजिक अंतरपाळणे बंधनकारक आहे. कोणत्याही करणासाठी मोठ्या सेख्येने लोकांनी एकत्र येणे  यावर प्रतिबंध राहील. लग्नाशी संबंधित मेळाव्यांमध्ये 50 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधितक्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगलकार्यालय, हॉल, सभगृह, घर व घराच्या परसरात 50 लोकांच्या मर्यादेत लग्नाशी  संबंधित मेळावे, समारंभ पवानगीबाबत शासनाकडी दि. 23 जूनचे पत्र व जिल्हाधिकारी यांच्या दि. 26 जूनच्या आदेशान्वये कार्यवाही करावी. तथापि, लोकांनी गर्दी होऊ नये म्हणून  संयोजकांनी काळजी घेणे गरजेचे राहील. अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 50 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणी दारु, पानर, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड आकरावा दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारावा तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे. वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्याता येत आहे (घरपोच वितरणासह). केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेलया अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडील दि. 27 जून मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण यांच्याकडील दि. 11 जून मधील आदेशानुसार अटी व शर्तीन्वये चालू ठेवण्यास परवानगी राहील. सातारा जिल्ह्यातील  इंधन पंप रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीतही चालु ठेवण्यास परवानगी आहे. तथापि, रात्री मालवाहतूकीची वाहने यांना इंधनपुरवठा करणे बंधनकारक राहील. शासनाने किंवा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट, सामान्य आदेशाद्वारे परवानगी देण्यात आलेली कृती करण्यास परवानगी राहील. 
 या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/- दंड आकारावा व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी. 
 शक्य असेल त्या ठिकाणी घरातून काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश, सॅनिटायझर, याची एंन्ट्री पाँईंट व एक्झिट पॉईंट वर व्यवस्था करावी.  कामाच्याठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे. सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलण्याचे वेळी, जेवणाच्या व इतर सुट्टीच्या वेळी, कामावर येतांना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. 
 कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला या आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करुन किंवा नवीन आदेश पारीत करुन या  आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी सातारा यांच्या पूर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही. 

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...