शनिवार, ५ जून, २०२१

राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु सातारा जिल्हा तिसऱ्या टप्प्यात

राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु सातारा जिल्हा तिसऱ्या टप्प्यात
मुंबई : दि.5 - राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात अनलॉक प्रक्रियेसाठी ५ टप्पे तयार करण्यात आले आहेत.शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये राज्यातील पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये राज्यातील पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात हे जिल्हे

नाशिक, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ 

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार

तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर 

चौथ्या टप्प्यातील जिल्हे

पुणे, रायगड


अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील

- मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद

- हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा. शनिवार आणि रविवार बंद राहतील.

- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू राहतील

- खासगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती

- इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील

- सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओमध्ये परवानगी

- सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी (सोमवार ते शुक्रवार)

-लग्न सोहळ्यास 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठकीस 50 टक्के उपस्थित

- कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी

- दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...