संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
रविवार, ३१ जानेवारी, २०२१
बचतीचे दालन म्हणजे शिवसमर्थ संस्था - बाबासोा थोरात
शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१
पाटण ; पाटण तालुक्यातील आरक्षण सोडत जाहीर
सातारा ; पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
भारतमाता प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - प्रा.अरुण घोडके
एसपी अजयकुमार बन्सल यांना 7000 वी कलाकृती भेट
बहुमत तुमचे सरपंच आमचा ! सरपंचपदाची लॉटरी कोणाला लागणार?
बहुमत तुमचे सरपंच आमचा ! सरपंचपदाची लॉटरी कोणाला लागणार?
तळमावले / प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सरपंचपदासाठी "धुमशान' सुरू झाले आहे. सरपंचपदाचे आरक्षण आज शुक्रवार (ता. 29) जाहीर होणार आहे. आपल्या गावाला कशा प्रकारचे आरक्षण पडणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. बहुमत असलेल्या गटाकडे जर आरक्षित उमेदवार नसेल तर सरपंच होणार विरोधी गटाचा हे मात्र नक्की त्यामुळे नवीन निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांसह पॅनेलप्रमुख व मतदारांमध्येही धाकधूक वाढली आहे.
यावर्षी ग्रामपंचायत निवडणुकांनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.काही ग्रामपंचायती मतदानापूर्वीच बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या.काही गावात निवडणूक झाली होती. निवडणूक झालेल्या गावांत निवडून आलेल्यांपैकी आरक्षण कसे पडणार? याबाबत अनिश्चितता असल्याने जास्त जागा निवडून आणणारेही सुद्धा गोंधळात सापडले आहेत, तर काही ठिकाणी काठावर बहुमत असले तरी सर्व आरक्षणाचे उमेदवार निवडून आलेले नाहीत. याची खरी गंमत होणार आहे. तर काही ठिकाणी बहुमत एका गटाकडे आणि सरपंच मात्र विरोधी गटाचा, असेही विरोधी चित्र रंगणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुका या पक्षीय पातळीवर न लढता त्या स्थानिक पातळीवर आघाड्या करूनच लढविल्या गेल्या असल्या तरी निकालानंतर मात्र त्याला पक्षीय तसेच तालुका पातळीवरील गटाचे स्वरूप आले आहे. तालुका पातळीवरील नेतेमंडळी व त्यांची समर्थक मंडळी "आमच्याच जास्त ग्रामपंचायती आल्या' असे ढोल वाजवत सांगत आहेत. त्यामुळे मूळ निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या मात्र दुपटीने वाढली आहे. आता सरपंचपदाचे आरक्षण असल्याने हा वाद आणखीन वाढणार आहे. त्यामुळे आरक्षणानंतरही हे फोडाफोडीचे व वादविवादाचे राजकारण याचा खेळ रंगणार असून, त्यातून वादही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावकारभाऱ्याच्या सत्तेसाठीच्या हालचाली गतिमान होणार आहेत.
तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. आता आरक्षणानंतर सरपंचपदाची निवडही खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडले जावे व गावच्या विकासासाठी प्रयत्न करावा, अशी माफक अपेक्षा मतदार व ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. एकूणच, या वेळेस बहुमतापेक्षा सरपंचपदाचे आरक्षणच पडणार "लय भारी' हेच खरे.
जीव टांगणीला !
निवडणुका म्हटले की, जय - पराजय आलाच. परंतु ग्रामपंचायत लढवणे म्हणजे खूपच कठीण काम आहे, याचा प्रत्यय भल्या-भल्यांना आला आहे. परंतु, 29 तारखेला आरक्षण सोडतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. आरक्षण काय पडणार? कोणत्या गटाला सरपंचपदाची लॉटरी लागणार? या कोलाहलाने व नवीन गाव कारभारी कोण होणार? या विचाराने नवनिर्वाचित सदस्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. सरपंच निवडीनंतर मात्र तालुका पातळीवरील नेत्यांचे दावे-प्रतिदावेही खोटे ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
पाटण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 234
अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 20, महिला 10, खुला 10,
अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1, महिला 0, खुला 1,
नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 63, महिला 32, खुला 31,
सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 150, महिला 75, खुला 75,
एकुण सरपंचांची पदे 234 आहेत
गुरुवार, २८ जानेवारी, २०२१
*सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी बँकांनी कार्यरत रहावे* *- खासदार श्रीनिवास पाटील*
*उत्साहाचा खळखळता झरा: प्रा. पी. डी. पाटील.*निवृत्ती? छेजगण्याची नवी आवृत्ती!!!
बुधवार, २७ जानेवारी, २०२१
तळमावले; आय फोन कंपनीचा चाळीस हजाराचा मोबाईल केला परत ; म्हणाले नाईकबा पावला
तळमावले; आय फोन कंपनीचा चाळीस हजाराचा मोबाईल केला परत ; म्हणाले नाईकबा पावला
तळमावले / प्रतिनिधी ;
सध्याच्या जगात घरातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागेल याचा नेम राहिला नाही, असं म्हटलं जातं. त्यातच सार्वजनिक ठिकाणी अनेकदा चोरीच्या घटनाही समोर येत असतात. मात्र दै. लोकमतचे तळमावले येथील पत्रकार पोपटराव माने यांनी प्रामाणिकपणाचं अनोखं उदाहरण समाजासमोर घालून दिलं आहे. त्यांनी 40 हजार रुपये किंमतीचा आय फोन कंपनीचा मोबाईल प्रामाणिकपणे परत केला.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की दि.25 रोजी पत्रकार पोपटराव माने हे आपल्या वैयक्तिक कामासाठी कराडला जात होते ते तळमावले येथील सार्थक पेट्रोलियम करपेवाडी येथे आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता त्यानां जमीनीवर मोबाईल सारखी दिसणारी वस्तू दिसली त्यांनी नीट लक्ष देऊन पाहिले तर आय फोन कंपनीचा मोबाईल होता.तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये चौकशी केली असता त्यापैकी कोणाचा मोबाईल नव्हता.मग त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचारी योगेश लाहीगडे,सुमित सुतार, आदित्य सकट, यांच्याकडे फोन देऊन ते आपल्या कामासाठी कराडला निघून गेले.ते कराडहुन परत आले असता त्यांनी चौकशी केली मोबाईल चे मालक रोहन शेलार फोन घेऊन जाण्यासाठी आले होते त्यावेळी रोहन शेलार यांनी सांगितले की आम्ही इचलकरंजीहुन बनपुरी येथील नाईकबा दर्शनासाठी आलो होतो दर्शन घेऊन परत घरी जाताना पेट्रोल पंपवर तेल भरण्यासाठी थांबलो त्यावेळी फोन पडला असावा.सदर फोन ची शहनिशा केल्यानंतर रोहन शेलार हेच मालक आहेत हे समजले त्यानंतर त्यांना फोन परत करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकार माने यांचे आभार मानले आणि म्हणले नाईकबा पावला
पाटण ; रस्ता सुरक्षा अभियानाबाबत सामुहिक जनजागृती
मंगळवार, २६ जानेवारी, २०२१
महिलांनी प्रगतीची कास धरून गाव विकासात पुढाकार घ्यावा - सरपंच विद्याताई मोरे
सोमवार, २५ जानेवारी, २०२१
अर्थसंकल्प ; कोणत्या वस्तूंची कस्टम ड्यूटी घटण्याची शक्यता?
अर्थसंकल्प ; कोणत्या वस्तूंची कस्टम ड्यूटी घटण्याची शक्यता?
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून पुढील आठवड्यात सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात अनेक वस्तूंवरील सीमा शुल्क म्हणजे कस्टम ड्यूटी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात फर्निचरचा कच्चा माल, तांब्याचं भंगार, काही रासायनिक द्रव्य, टेलीकॉम उपकरणं आणि रबरच्या उत्पादनांचा समावेश आहे. तसंच PTI च्या वृत्तानुसार पॉलिश केलेले हिरेस रबराचं सामान. चमड्याचे कपडे, दूरसंचार उपकरण आणि गालिचा अशा 20 प्रॉडक्ट्सच्या आयात शुल्कातही कपात केली जाऊ शकते.(Customs duties on many items are likely to be reduced in the Union Budget)
कोणत्या वस्तूंची कस्टम ड्यूटी घटण्याची शक्यता?
फर्निचरसाठी वापरलं जाणारं काही लाकूड आणि हार्डबोर्ड अशा वस्तूं सीमा शुल्कातून मुक्त केल्या जाऊ शकतात. तर मिळालेल्या माहितीनुसार आपल्या देशातून फर्निचरची निर्यात खूप कमी होते. तर चीन आणि व्हिएतनाम हे फर्निचरचे प्रमुख निर्यातदार देश आहेत. सरकार डांबर आणि तांब्यांच्या भंगारावरील सीमा शुल्कही कमी करण्याचा विचार करु शकतं. सरकारने स्वदेशी पुनर्निमाणाला चालना देण्यासाठी पावलं उचलली आहेत. एअर कंडीशनर आणि एलईडी लाईटसह अनेक क्षेत्रासाठी उत्पादन आधारित पुनर्निमाण योजना सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वर उल्लेख केलेल्या वस्तूंवरील सीमा शुल्क कमी केल्यास आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना मिळेल आणि स्वदेशी वस्तूंच्या निर्मितीत तेजी येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सातारा ; जिल्ह्यातील शाळांना 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी जिल्हादंडाधिकारी यांनी केले आदेश जारी
अवैध विक्री झालेल्या जमिनी होणार सरकारजमा - तहसिलदार आशा होळकर
तळमावले : ‘स्पंदन’ दिनदर्शिकेने ‘ईशिता’ला दिला मदतीचा हात
शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१
वेदनेतून काव्य जन्माला येते - सुनिती सु.र.
गुरुवार, २१ जानेवारी, २०२१
*सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट*
सरपंचपदाची कार्यवाही गेल्या डिसेंबरमध्येच केली जाणार होती. परंतु या प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे २१ जानेवारी नंतर म्हणजेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर आरक्षणाची प्रक्रिया राबविली जावी असे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे येत्या २८ तारखेला तालुका पातळीवर त्या-त्या ग्रामपंचायत निहाय आरक्षण पडणार आहे.
*दहावी-बारावीची परीक्षेची तारीख ठरली वाचा सविस्तर*
सातारा ; हिंगणी व बिदाल मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू रिपोर्टही निगेटिव्ह
सरपंचपदाचे आरक्षण इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात ; काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पॅनलप्रमुखांची वाढली डोकेदुखी .
सरपंचपदाचे आरक्षण इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात ; काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पॅनलप्रमुखांची वाढली डोकेदुखी .
सातारा दि.२१ सरपंचपदाचे आरक्षण आपल्याच पारड्यात पडावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर, गावात कोण होणार 'किंगमेकर' या चर्चेला उधाण आले आहे.
सातारा जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत ८७८ सरपंच निवडले जाणार आहेत. जिल्हाधिकारी थोड्याच दिवसांत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करतील. त्याआधी प्रत्येक तालुक्याला आरक्षणाचा कोटा कळीवण्यात येणार आहे.
आरक्षण सोडतीसाठी नवनिर्वाचित सदस्य तसेच पॅनलप्रमुखांची उपस्थिती असणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखीव असलेले आरक्षण या सोडतीत काढले जाणार आहे.
महिलांसाठी ५० टक्के आरक्षण राहणार आहे. तसेच इतर प्रवर्गांसाठी शासनाने जाहीर केलेल्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार ही सोडत घेतली जाणार आहे. प्रत्येक गावात आरक्षण सोडतीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे.
ज्या ठिकाणी काठावरचे बहुमत आहे अथवा आरक्षित जागा एकच निवडून आलेली आहे, त्याच्याशी पॅनलप्रमुख संधान साधून आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांची पळवापळवी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.अनेक ठिकाणी काठावर बहुमत प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या पॅनलप्रमुखांची चांगलीच पंचाईत झाली आहे.पॅनल सत्तेत आणण्यासाठी सदस्यांना बांधून ठेवण्याची डोकेदुखी त्यांच्या पाठीमागे लागल्याने त्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. त्यात सरपंच पदाचे आरक्षण काय निघेल, याकडेही त्यांच्या नजरा लागल्या असून, आरक्षणानानुसार आतापासूनच आकडेमोड सुरू झाली आहे. काही सदस्य फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना मंदिरासमोर नेऊन देवाच्या शपथा दिल्या जात आहेत.
बुधवार, २० जानेवारी, २०२१
ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा
ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा
मुंबई / प्रतिनिधी
मुंबई, दि. 20 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत आणि पद्धतीने खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात येते.त्यादृष्टीने उमेदवारांच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा ऐच्छिक स्वरूपाची आहे ; परंतु याद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने विहित मुदतीत खर्च सादर करणे बंधनकारक आहे.
निवडणूक खर्च सादर करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर निकाल देताना केली होती. त्यादृष्टीने ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’ उपयुक्त ठरत आहे. त्याचा वापर 2017 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. यात निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याबरोबरच मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्राचे ठिकाण शोधणे, उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातीला माहिती जाणून घेणे आदी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकांशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मतदार यादी बनविणे, मतदान केंद्रांचा नकाशा तयार करणे, महत्वाचे अहवाल सादर करणे, मतदानाची आकडेवारी देणे आदी सुविधा आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका लढविलेल्या 80 हजार उमेदवारांनीदेखील हे ॲप डाऊनलोड केले आहे, असेही श्री. मदान यांनी सांगितले.
सदर सप्ताह अंतर्गत १२ जानेवारीला सप्ताहाचा शुभारंभ ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो निरीक्षक श्री.संतोष पवार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कुठरे ; पवारवाडी ग्रामपंचायतीत श्रीराम पॅनेलची एकहाती सत्ता
पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार
कजुर्ले हर्या : साहेबराव वाफारे, सुनीता मुळे, जनाबाई आंधळे, भाऊसाहेब शिर्के, पंढरीनाथ उंडे, शांताबाई बर्डे, लहू धुळे, झुंबरबाई आंधळे, मिनीनाथ शिर्के, दुर्गा आंधळे, संजीवनी आंधळे.
कळस : निवृत्ती गाडगे, सविता गाडगे, दत्तात्रय गाडगे, विजया काणे, सविता गलांडे, भाऊसाहेब गाडगे, वैशाली येवले, राहुल येवले.
पाडळी दर्या : विजय खोसे, अर्चना खोसे, वैशाली जाधव, रामदास खोसे, सुरेखा खोसे, लता खोसे, मारुती खोसे.
जाधववाडी : योगिता राऊत, पुष्पा राऊत, राणी सोमवंशी, विठ्ठल जाधव, वैभव जाधव, उषा जाधव.
शेरी कासारे : सचिन मुळे, स्वाती मुळे, सुदाम मुळे, मनीषा वाघुले, वसंत पोखरकर, नंदा जाधव.
पठारवाडी : ऊर्मिला सुपेकर, मारुती पठारे, श्रद्धा पवार, भिका पठारे, दौलत सुपेकर, नंदा पवार, शंकर पठारे, सुरेखा पठारे, शारदा बोरगे.
कुरुंद : चेतन उबाळे, कैलास कोठावळे, शोभा खेमनर, अनिल कर्डीले, सुरेखा थोरात, कल्पना भोसले, गणेश मध्ये, प्रमिला शेंडगे, नंदा कारखिले.
हंगा : नीता रासकर, वनिता शिंदे, राजेंद्र दळवी, सविता नगरे, रूपाली दळवी, जगदीश साठे, सुलोचना लोंढे, राजेंद्र शिंदे, माया साळवे, मेघा नगरे, बाळू दळवी.
मालकूप : राहुल घागळे, सुभाष गांगुर्डे, रूपाली शिंदे, जयश्री शिंदे, संजय काळे, रेश्मा ठाणगे.
काळकूप : संगीता शिंदे, कमल अडसूळ, संदीप कदम, किसन शिंदे, किरण अडसूळ, महेंद्र सालके, रंजना खरमाळे, राजू कदम, ताराबाई कदम.
पानोली : प्रशांत साळवे, शिवाजी शिंदे, सुजाता गायकवाड, राजेंद्र गायकवाड, अनुसूया खामकर, मंगल जाधव, संदीप गाडेकर, मोहिनी भगत, बायसा काळोखे.
वडुले : संतोष गट, स्वाती निमोनकर, आशा भापकर, सुषमा कंद, शहाजी खामकर, आरती सोनवणे.
तिखोल : रोहिणी ठाणगे, रजिया इनामदार, भाऊसाहेब ठाणगे, उज्ज्वला ठाणगे, रेखा ठाणगे, राजू ठाणगे, शैला ठाणगे, योगिता कावरे, अनिल तांबडे.
पिंपरी पठार : मनीषा भोर, शीतल पागिरे, अनिल शिंदे, युवराज शिंदे, अर्चना तिकोने, वसंत शिंदे, आनंदाबाई शिंदे.
वेसदरे : बाळू रोकडे, संगीता जाधव, मंदाबाई ताठे, दीपक पडळकर, अनिल तिकोने, कविता तिकोने.
कासारे : शिवाजी निमसे, शैला धनवट, धोंडिभाऊ खरात, कमल दातीर, शंकर कासुटे.
सारोळा आडवाई : परशराम फंड, संगीता फंड, बाबाजी महांडुळे, कुंदा आबुज, दत्ता शिंदे, पूजा महांडुळे, कोमल महांडुळे.
म्हसोबा झाप : प्रकाश गाजरे, संगीता जाधव, सखूबाई हांडे, दादाभाऊ पवार, राणी वाळुंज, योगिता आहेर, गोविंद आंग्रे, पद्माबाई दुधवडे.
लोणी हवेली : अशोक कोल्हे, शिवाजी थोरे, सीमा कोल्हे, अमोल दुधाडे, संजीवनी दुधाडे, जान्हवी दुधाडे, शत्रुघ्न नवघणे, कोमल सोंडकर, सुषमा दुधाडे.
दरोडी : मंगल बेलोटे, गुलनाज मुजावर, शरद कड, सुमन पावडे, अनिल पावडे, बाबाजी चौगुले, जयश्री चौगुले, शिवाजी पावडे.
धोत्रे बुद्रुक : रोशनी रोडे, जालिंदर भांड, नीलम भांड, अश्विनी गांगुर्डे, योगिता राहीज, बाबासाहेब सासवडे, योगिता कसबे, परुबाई भांड, मच्छिद्र भांड.
ढोकी : बाबासाहेब धरम, संतोष धरम, ज्योती नऱ्हे, शिंधूबाई पवार, चंद्रभागा मोरे, कलिम पठाण, सुभद्रा नर्हे, बाळासाहेब नर्हे.
पाबळ : तुकाराम कवडे, अनुसूया गोरडे, विद्या कवडे, दादासाहेब पाडले, सुशीला कवडे, सोनाली कापसे, आशा कवडे.
हिवरे कोरडा : सुभाष माळी, सुदाम कोरडे, सपना अडसूळ, संतोष जराड, शकील शेख, रोहिणी वाळूज, ज्योती घागळे, मंगल अडसूळ, उज्ज्वला कोरडे.
बाभूळवाडे : प्रमोद खणकर, निशिगंधा बोरुडे, धनंजय जगदाळे, सविता जगदाळे, भावना जगदाळे, बाळू नवले, संदीप चिकने, रंजना जगदाळे, वैशाली जगदाळे.
वडगाव आमली : प्रशांत ढोणे, निर्मला जाधव, वनिता ढोणे, सुधीर पट्टेकर, अमोल पवार, मनीषा डेरे, आशा गायकवाड.
भांडगाव : उमेश खरमाळे, सुचिता उकडे, जनाबाई खरमाळे, अशोक खरमाळे, उज्ज्वला खरमाळे, प्रसाद शिंदे, शोभा पवार.
डिकसळ : भाऊसाहेब चौधरी, अलका शिंदे, कविता काकडे, साहेबराव चौधरी, आशा येवले, अजय सूर्यवंशी, लता शिंदे.
पोखरी : नामदेव करंजकर, बाळू शिंदे, झुंबरबाई पवार, सीताराम केदार, अनुसूया मधे, संगीता शेलार, अशोक खैरे, सविता मधे, हिराबाई पवार.
सावरगाव : इन्द्रवन माने, गंगाराम चिकने, वैशाली चिकणे, प्रदीप गुगळे, हिराबाई थोरात, नंदा शिंदे, रवींद्र गायखे, जयश्री गोडसे, सुरेखा मगर.
वासुंदे : शंकर बर्वे, रामदास झावरे, संजीवनी शिर्के, किशोर साठे, नभाबाई केदार, सुमन सैद, पोपट साळुंखे, छाया वाबळे, बाळासाहेब शिंदे, विमल झावरे, किसाबाई उगले.
राळेगणसिद्धी : जयसिंग मापारी, मंगल पठारे, मंगल मापारी, लाभेश औटी, अनिल मापारी, सुनीता गाजरे, धनंजय पोटे, स्नेहल फटागडे, मंगल उगले.
खडकवाडी : श्रीरंग रोकडे, अविता चिकणे, दत्तात्रय गायकवाड, अक्षय ढोकळे, अर्चना गगरे, धनंजय ढोकळे, नंदा माळी, नंदा हुलावळे, विकास रोकडे, शोभा शिंदे, अनिता रोकडे.
अक्कलवाडी : भाऊसाहेब नरवडे, मंदा ढोकळे, संगीता शिकारे, सीताराम नरवडे, विमल नरवडे, संपत शिकारे, सुनीता नरवडे.
वारणवाडी : अर्जुन पिंगळे, मंदा केदार, पुष्पा करंडे, संजय काशीद, संतोष मोरे, आशाबाई थोरात, जाणकू दुधवडे, रोशनी काशीद.
कातळवेढा : वैशाली भाईक, चंद्रभागा भाईक, पीयूष गाजरे, धनश्री खटाटे, मंगल पवार, संभाजी डोगरे, भाऊसाहेब डोगरे, दीपाली लामखडे.
दैठणे गुंजाळ : पांडुरंग गुंजाळ, उज्ज्वला आंग्रे, जयश्री जासूद, लता गुंजाळ, विलास गुंजाळ, मल्हारी गुंजाळ, विमल येवले, अनिता गुंजाळ, सचिन गुंजाळ.
तळमावले: स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह मोठ्या उत्साहाने संपन्न
थकीत वीजबिल भरा : नाहीतर वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे महावितरणचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश !
थकीत वीजबिल भरा : नाहीतर वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे महावितरणचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश !
मुंबई, दि. 19 : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर पर्याय उरलेला नाही.
डिसेंबरअखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औद्योगिक ग्राहकांकडे 8485 कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता व उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात खाजगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रितसर परवानगी घेऊन सप्टेंबर 2020 मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला. मात्र उर्जामंत्री डॉ राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणला निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही कठीण होत आहे.
ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही कारवाईचे संकेत दिले आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
मंगळवार, १९ जानेवारी, २०२१
काळगाव;- पंजाबराव देसाई यांची एकहाती सत्ता
सोमवार, १८ जानेवारी, २०२१
कुंभारगाव ; कुंभारगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्ताबदल
कुंभारगाव दि.18 (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीमध्ये मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) गटाचे समाजसेवक योगेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली 11 पैकी 7 जागा जिंकून कुंभारगावात सत्तातर केले आहे. विरोधी कुंभारगाव ग्रामविकास पॅनेलने चार जागांवर विजय मिळवला आहे.
पाटण तालुक्यातील अत्यंत संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या कुंभारगाव ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. शिवसेना व राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी चांगलीच टक्कर झाली होती यामध्ये मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या गटाने बाजी मारली आहे.
कुंभारगाव विकास आघाडीने वर्चस्व मिळवत सात जागा जिंकल्या.
कुंभारगाव विकास आघाडीचे विजयी उमेदवार
श्री.हणमंत आकाराम कांबळे,सौ.वैशाली संजय गुरव,सौ.सारिका योगेश पाटणकर,राजेंद्र मोहनराव चव्हाण, बाळकृष्ण शिबे, सौ.शीतल जयवंत बुरशे, धनाजी रामचंद्र बोरगे,
कुंभारगाव ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार -नंदकुमार नामदेव खटावकर,महादेव मारुती वरेकर,सौ.रेखा सचिन कळत्रे,सौ.प्रतील उमेश घाडगे
कुंभारगाव विकास आघाडीचे नेतृत्व योगेश पाटणकर,भगवानराव पाटील, राजेंद्र चव्हाण, संपतराव चव्हाण, यांनी केले. तर विरोधी कुंभारगाव ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व संजय देसाई, डॉ.दिलीप चव्हाण यांनी केले. निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष व्यक्त केला.
पाटण ; तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई गाटची सरशी
पाटण ; तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई गाटची सरशी
पाटण दि.18 तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनने भरारी घेतली आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींत शंभुराज देसाई गाटची सरशी झाली आहे. तर पाटणकरांची पिछेहाट झाली आहे.
पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गटाच्या पॅनेलने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. तर सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाची पिछेहाट झाली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या स्थानिक गटाने 41 ग्रामपंचातींवर वर्चस्व मिळवित सत्ता मिळविली आहे.तर विरोधी गटाची केवळ 20 ग्रामपंचायतीत सत्ता आली आहे. पाटण तालुक्यात 107 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामध्ये 35 ग्रामपंचायती बिनविरोध आल्या. प्रत्यक्षात 72 ग्रामपंचायतीत निवडणूक झाली.
ग्रामपंचायतींचे निकाल
गृहमंत्री शंभूराज देसाई (शिवसेना) गट - 41, पाटणकर गट - 20, महाविकास आघाडी - 2, राष्ट्रवादी - भाजप - 1, राष्ट्रीय काँग्रेस - 1, समान - 7
मंत्री शंभूराज देसाई गट - मुळगाव, कोकिसरे, गोकुळ तर्फ पाटण- सत्तांतर, पेठ शिवापूर, चोपडी, त्रिपुडी - सत्तांतर, शिंदेवाडी, सोनवडे, वाटोळे - सत्तांतर, हुंबरळी- सत्तांतर, चोपदारवाडी, मणदुरे, आंबळे, वाडीकोतावडे, धावडे, दिवशी खुर्द-सत्तांतर, कातवडी- सत्तांतर, मुंद्रुळहवेली-सत्तांतर, ठोमसे-सत्तांतर, कसणी, कोरीवळे-सत्तांतर, बाचोली, मुरुड- सत्तांतर, चव्हाणवाडी, मस्करवाडी, बोडकेवाडी, मालोशी-सत्तांतर, मोरेवाडी, उमरकांचन-सत्तांतर, बाबंवडे, जानुगडेवाडी, पवारवाडी, शिद्रुकवाडी, धामणी- सत्तांतर, काढणे, काळगाव, हावळेवाडी, मानेवाडी - सत्तांतर, खोनोली, निगडे, चव्हाणवाडी (धामणी)
पाटणकर गट - काळोली, मेंढेघर, तामकडे, नेचल, सुळेवाडी-सत्तांतर, मेंढोशी, चिटेघर, साखरी, डोंगळेवाडी, टोळेवाडी, नावडी- सत्तांतर, सोनायचीवाडी, शिंगणवाडी- सत्तांतर, पापर्डे-सत्तांतर, कोचरेवाडी, केळोली, कुटरे, चिखलेवाडी, करपेवाडी - सत्तांतर कामरगाव.
राष्ट्रीय काँग्रेस - कुंभारगाव, राष्ट्रवादी - भाजप तारळे.
समान - पाठवडे, काहीर, पिपंळोशी, सुपगडेवाडी, चाफोली, कवडेवाडी, बोंद्री.
महाविकास आघाडी - गुढे, खळे.
बुधवार, १३ जानेवारी, २०२१
‘दख्खनचा राजा जोतिबा’ च्या सेटवर शिवसमर्थ दिनदर्शिकेचे प्रकाशन
सोमवार, ११ जानेवारी, २०२१
मराठा आरक्षणसंदर्भात आज नवी दिल्लीत वकिलांची बैठक
मराठा आरक्षणसंदर्भात आज नवी दिल्लीत वकिलांची बैठक
मुंबई, दि. 11 : सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज, 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.आज सायंकाळी 5 वाजता नवीन महाराष्ट्र सदनमध्ये होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज व शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या पाच खाजगी वकिलांच्या समितीचे सदस्यदेखील या बैठकीत ऑनलाईन सहभागी होणार आहेत.मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते.
रविवार, १० जानेवारी, २०२१
गुटखा विकताय सावधान ; होईल दहा वर्षाची शिक्षा
महाराष्ट्र राज्यात, सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने व जनहित लक्षात घेता गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थावर 2012 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून अन्नसुरक्षा आयुक्त यांनी बंदी घातलेली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या सेवन करण्यामुळे मुख कर्करोग तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्याधी निर्माण होतात हे वैज्ञानिक संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. त्या अनुषंगाने विविध संशोधन झालेले असून, त्यांनी प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपरमध्ये यांचा विस्तृत प्रमाणावर उल्लेख केलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थांच्या उत्पादन/ वाहतूक/ विक्री/ साठा/ वितरण यावर बंदी घालण्यात आलेली आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 त्याचबरोबर भारतीय दंड संहिता कलम 188 व 328 यांचा समावेश होऊन आरोपीविरुद्ध संबंधित न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्यात येत होती. मात्र या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी तसेच नगर व धुळे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी त्यांच्याविरूद्ध लावण्यात येणाऱ्या भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व 328 च्या संदर्भात उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केल्या होत्या. त्यांचा एकत्रित निकाल मार्च 2016 मध्ये घोषित झाला. उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी याच फक्त उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर लागू होतात असे नमूद केले.
या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र अभिमत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी बरोबर भारतीय दंड संहितेच्या तरतुदी लागू होतात असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने देऊन, सर्व तेरा याचिका रिमांड बॅक केल्या व त्याची पुन्हा सुनावणी होऊन उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी 15 ऑक्टोबर 2020 रोजी निकाल घोषित केला की, अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेच्या कलम 188 लागू होते. तथापि न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरुद्ध डॉ. शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन व पाठपुरावा केला व राज्य सरकार तर्फे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन सोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व त्यासोबत कलम 328 हे आरोपीविरुद्ध लावणे आवश्यक आहे असे सर्वोच्च न्यायालयात सरकारी अभियोक्ता श्रीयुत चिटणीस ,पाटील यांच्या मार्फत स्वतंत्र अभिमत याचिका नोव्हेंबर 2020 मध्ये दाखल केल्या, त्यावर मा. सर्वोच्च न्यायालयाने, औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाच्या आदेशाला दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी स्थगिती दिलेली आहे.
ही कार्यवाही अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय त्याचबरोबर विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे औरंगाबादचे उपसचिव श्री. चव्हाण, सहसचिव श्री. कदम, सरकारी अभियोक्ता श्रीयुत यावलकर (खंडपीठ, औरंगाबाद) सहआयुक्त आढाव, यांचे मार्गदर्शनाखाली सह आयुक्त औरंगाबाद विभाग श्री .वंजारी, सहाय्यक आयुक्त नांदेड, श्री. बोराळकर, अन्न सुरक्षा अधिकारी औरंगाबाद फरीद सिद्दिकी यांनी पूर्ण केली.
शनिवार, ९ जानेवारी, २०२१
पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डाॅ.संदीप डाकवे यांचा 9 जानेवारी हा वाढदिवस. महाराष्ट्रातील प्रसिध्द वक्ते आणि विचारवंत डाॅ.यशवंत पाटणे यांनी त्यांच्याविषयी लिहलेला हा लेख...
शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१
छायाचित्रकार अनिल देसाई यांचा विशेष गौरव
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...