जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरीही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.राज्य सरकारने विधिमंडळात याबाबतचे विधेयक संमत केले. मात्र उमेदवाराला निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. यामुळे राज्यातल्या पंधराशे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्यांना राखीव जागांवरच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
गुरुवार, १२ मार्च, २०२०
ग्रामपंचायत ;- निवडणुकीचा अर्ज भरताना आता जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही एक वर्षांची मुदत
मुंबई ;- ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरताना आता जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. याबाबतचे विधेयक विधीमंडळात मंजूर करण्यात आले आहे. निवडून आल्यावर एक वर्षानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निवडणूक लविणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जात पडताळणी करणे खूपच धावपळीचे ठरत होते. तसेच उमेदवारी अर्जबाद होत होता. त्यामुळे आता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला वर्षभरात हे प्रमाणपत्र देण्यासाठी वेळ मिळणार आहे. AD
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*
पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक *पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा