संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, ४ जून, २०२१
*सातारा : प्रत्येक गावाने कोरोनामुक्त गाव योजनेत सहभागी व्हावे, आपले गाव कोरोनामुक्त करावे*- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*
*सातारा जिल्ह्यातील 1588 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 43 बाधितांचा मृत्यू**836 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
तळमावले : डाॅ.संदीप डाकवें ची ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ ने घेतली तिसर्यांदा दखल
अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी -खा.श्रीनिवास पाटील
शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे : खा श्रीनिवास पाटील
गुरुवार, ३ जून, २०२१
अनलॉक महाराष्ट्र : तत्वत: मान्यता अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील :विजय वडेट्टीवारांचा यू-टर्न
विजय वडेट्टीवारांचा यू-टर्न
आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, 'गफलत वगैरे काहीही नाही. बैठकीमध्ये ५ टप्पे ठरवण्यात आलेले आहेत. त्याला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. ज्या भागातील जनतेने सहकार्य केले, त्या भागातला लॉकडाउन या प्रक्रियेने कमी करायचा हे धोरण आपण ठरविलेले आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. या एकूण पॉझिटिव्हिटी रेट किंवा ऑक्सिजन बेडच्या ऑक्युपन्सीच्या आधारावर हा निर्णय घेण्याचं ठरलं आहे. याला तत्वत: मान्यता मिळाली आहे. यात टप्प्याटप्प्याने लॉकडाउन काढायचा याचा अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील', असे स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
राज्य सरकारने काय दिले होते स्पष्टीकरण ?
'कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत', असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहेत.
निर्णय अद्याप विचाराधीन !
ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन ५ टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी दर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे जाहीर करण्यात येतील.
अधिकृत निर्णय नंतर कळवला जाईल !
राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'राज्यात अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव अद्याप विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन त्याबाबतच्या अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते पुढे शासननिर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात येईल.'
राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मोठी बातमी उद्यापासून होणार राज्यात अनलॉकच्या नव्या नियमांची अंमलबजावणी
राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मोठी बातमी उद्यापासून होणार राज्यात अनलॉकच्या नव्या नियमांची अंमलबजावणी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन काही जिल्ह्यांमध्ये शिथील करण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी एक निकष लावण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट (बाधित होण्याचा दर) ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे तेथे लॉकडाऊन हटविण्यात आला आहे. तशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
हा आहे निकष
ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे
ऑक्सिजनचे बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे
हे सुरू होणार
मॉल्स, हॉटेल्स, दुकाने पुर्वीप्रमाणेच सुरू होतील
क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅक, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्णपणे सुरू होतील
चित्रपट गृहे, मल्टीप्लेक्स सुरू होतील
चित्रपट शुटींगला परवानगी
सार्वजनिक कार्यक्रम व लग्न सोहळ्यांना मान्यता
जमावबंदी राहणार नाही
जीम सुरू होणार
एसटीची सेवा १०० टक्के क्षमतेने
-
एकूण ४ टप्प्यात अनलॉक
पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के, ऑक्सिजन बेड्स २५ टक्क्यांपेक्षा कमी टक्के भरलेले)
दुसऱ्या टप्प्यात ५ जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के, ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्के भरलेले)
तिसऱ्या टप्प्यात १० जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट ५ ते १० टक्के, ऑक्सिजन बेड्स ४० टक्के भरलेले)
चौथ्या टप्प्यात २ जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट १० ते २० टक्के, ऑक्सिजन बेड्स ६० टक्के भरलेले)
-
पहिल्या टप्प्यात हे जिल्हे
नाशिक, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ (संपूर्ण अनलॉक)
दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे
अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार ( अंशतः निर्बंध शिथिल)
तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे
अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर ( अंशतः निर्बंध शिथिल)
चौथ्या टप्प्यातील जिल्हे
पुणे, रायगड ( अंशतः निर्बंध शिथिल)
*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.
= कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...