मंगळवार, २५ मे, २०२१

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पी एच सी च्या डॉक्टरांची घेतली आढावा बैठक*

 *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पी एच सी च्या डॉक्टरांची घेतली आढावा बैठक* 
कराड /वार्ताहर
 कराड दि.25: कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांची आढावा बैठक कराड येथील विश्रामगृह येथे घेतली. यावेळी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, उपजिल्हा रुग्णालय कराड चे अधीक्षक डॉ प्रकाश शिंदे आदींच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यावेळी उपस्थित होते यांच्यासह या बैठकीला मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे आदी यावेळी उपस्थित होते. 

हि आढावा बैठक कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने घेतली गेली होती. या बैठकीत आ. चव्हाण यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्यांच्या केंद्रातील अडचणी समजून घेतल्या तसेच सद्य सुरु असलेले लसीकरण, कोरोना रुग्णांची तपासणी यांचा आढावा घेत कोरोना होऊन बरे झालेल्यांचे नोंदणी करून त्यांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे यावेळी आ. चव्हाण यांनी सांगितले.  यासाठी "पोस्ट कोविड" विभाग व्यवस्था प्रत्येक पी एच सी सेंटर मध्ये करणे आवश्यक असल्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच आ. चव्हाण यांनी या मिटिंग मध्ये सर्व डॉक्टरांना पुढे सूचना दिल्या कि, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रकारे आरोग्य व्यवस्थेने काळजी घेतली होती ती यंत्रणा किंवा व्यवस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिसली नाही कोरोना गेल्याचे समजून सर्व यंत्रणा शांत झाल्याने दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली ती अवस्था तिसऱ्या लाटेत होऊ नये यासाठी आधीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे आ. चव्हाण यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होत असल्याचे तत्ज्ञांचे मत आहे ते विचारात घेऊन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र सुसज्ज बेडची व वार्ड ची व्यवस्था करून ठेवणे गरजेचे आहे. तसेच ज्या व्यवस्था गरजेच्या आहेत तसेच ज्या गोष्टींची, यंत्रणेची आत्ता गरज जाणवली ती तिसऱ्या लाटेत उद्भवू नये यासाठी एक अहवाल व मागणी पत्र शासनाकडे तात्काळ पाठवावा अश्या सूचना आ. चव्हाण यांनी आजच्या आढावा बैठकीत दिल्या. 
------------------------------------------------------

*सातारा जिल्ह्यातील2364 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील2364 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 25 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2364 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 66 (7045), कराड 302 (21082), खंडाळा 228 (9721), खटाव 359 (14373), कोरेगांव 133 (13302),माण 192 (10484), महाबळेश्वर 11 (3900), पाटण 54 (6243), फलटण 562 (21679), सातारा 316 (33549), वाई 116 (11151 ) व इतर 25 (977) असे आज अखेर  एकूण 153506 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 4(162), कराड 6 (608), खंडाळा 2 (126), खटाव 7 (388), कोरेगांव 1(300), माण 2(197), महाबळेश्वर 0(42), पाटण 1 (151), फलटण 0(242), सातारा 8 (979), वाई 2 (294) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3489 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

‘शिवसमर्थ’ने जपली बांधिलकी; कोवीड सेंटरला वाॅटर प्युरिफायर भेट

‘शिवसमर्थ’ने जपली बांधिलकी; कोवीड सेंटरला वाॅटर प्युरिफायर भेट

तळमावले/वार्ताहर
ढेबेवाडी येथील कोविड केअर सेंटरला वाॅटर प्युरिफायर भेट देवून शिवसमर्थ ने सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी पाटणचे तहसिलदार योगेश टोम्पे, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, शिवसमर्थ सोसायटीचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, ‘प्रहार संघटनेच्या’ विद्याताई कारंडे, सेंटरमधील डाॅक्टर, नर्सेस व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शिवसमर्थ ने आर्थिक सेवा देत असताना सामाजिक बांधिलकीही तळमळीने जोपासली आहे. यापूर्वी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेने कोवीड-19 च्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश दिला आहे. महिला बचत गटांकडून बनवलेले मास्क ग्रामीण भागातील वाडयावस्त्यांवर वाटले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी व्हिडीओ क्लिप, तसेच पत्रकार, पोलीस पाटील यांना जीवनावश्यक वस्तू असलेले कीट दिले आहेत. या माध्यमातून संस्थेने कोरोना विरुध्दच्या लढयात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शिवसमर्थ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 24 तास सेवा देण्याचाही प्रयत्न गेली 10 वर्षे संस्था करत आहेत.
तळमावले, ढेबेवाडी, कुंभारगांव या विभागातील संस्थेने तळमावले येथून गेली 3 वर्षे एटीएम सेवा देवून लोकांची होणारी गैरसोय थांबवली आहे. संस्थेच्या या विविध उपक्रमांचे जनमानसांत कौतुक होत आहे. कोविड केअर सेंटर ला वाॅटर प्युरिफायर भेट दिल्याबद्दल मान्यवरांनी शिवसमर्थचे आभार मानले आहेत.

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश 

मुंबई, : गौण खनिजाचे अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची आज बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तिन्ही जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.

बांधकाम व्यावसायिकांची तपासणी करा !

मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी किती गौण खनिज वापरले.किती बाहेर विकले. यासंदर्भात तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.

कोट्यवधींचा महसूल बुडतोय

गौण खनिजाच्या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतोय. महसूल यंत्रणेने योग्य वसुली केली तर राज्याच्या तिजोरीत काही प्रमाणात का होईना हातभार लागेल. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.

सोमवार, २४ मे, २०२१

*सातारा :बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु**जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी केले आदेश जारी*

*सातारा :बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु*
*जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी केले आदेश जारी*

सातारा दि. 24 : सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, सहकारी बँका दि. 22 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तथापी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 25 मे 2021 रोजीपासून 1 जून रोजीच्या सकाळी 7 पर्यंत या कालावधीत फक्त एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटरशी संबंधित बँकांचे कामकाज कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच बँकांचे सर्व उर्वरित कामकाज पूर्णपणे बंद राहील याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत.

*सातारा :खरीप हंगामासाठीच्या कर्जाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा*- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*

*सातारा :खरीप हंगामासाठीच्या कर्जाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा*

- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन*

सातारा दि. 24 : या अडचणीच्या काळात खरीप हंगामात बँकांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पिक कर्ज वाटप करुन  सर्वसमान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम बॅकांनी करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.
येथील नियोजन भवनात खरीप हंगाम 2021 पीक कर्ज पुरवठा, शेती विद्युत पंप व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.
खरीप हंगाम 2021 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची मागणी केली आहे, अशा शेतकऱ्यांचे कर्जाची प्रकरणे मंजूर करावेत, अशा सूचना करुन, तौक्ते वादळामुळे विद्युत वितरण कंपनीचे विद्युत पोल पडले आहेत ते तात्काळ दुरुस्त करुन गावांमधील खंडीत झालेला विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरु करावा.

*तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आरोग्य यंत्रणेनी सज्ज रहावे*

 तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने तशी तयारी करावी. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज रहावे. तसेच ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत, घाबरुन त्यांचा मृत्यु ह्दय विकाराने झाला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग झाल्यास न घाबरता वेळेत औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
   शेतकऱ्यांचे शेती विद्युत पंप वीज कनेक्शन प्रलंबीत आहे, अशा प्रलंबीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर विज कनेक्शन द्यावे. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा करावा. तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे या अनुषंगाने लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या.
 खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.
 जिल्हा अग्रणी बॅकेने तयार केलेल्या 9 हजार 275 कोटीच्या वार्षिक पतआराखडा पुस्तिकेचे प्रकाशनही  मान्यवरांच्या हस्ते या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक, प्रकाश आष्टेकर, अधीक्षक अभियंता गौतम गाकयावाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील, यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

*सातारा जिल्ह्यातील : 2648 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 31 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील : 2648 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 31 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 24 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2648 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 31 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 47 (6979), कराड 182 (20880), खंडाळा 362(9493), खटाव 566(14014), कोरेगांव 212(13169),माण 207(20292), महाबळेश्वर 39 (3889), पाटण 109(6189), फलटण 515 (21162), सातारा 311 (33333), वाई 84 (11035 ) व इतर 14 (952) असे आज अखेर  एकूण 151387 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 5(158), कराड 3(602), खंडाळा 0 (124), खटाव 8 (381), कोरेगांव 4(299), माण 0(195), महाबळेश्वर 0(42), पाटण 0 (150), फलटण 1(242), सातारा 7 (971), वाई 3 (292) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3456 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.

          = कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...