सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होणार आणि कोणाचा ‘गेम’ वाजणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क रंगत असतानाच अखेर २० मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड पार पडली आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.
सुरुवातीला सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता स्थापन होईल, असे स्पष्ट चित्र दिसत होते. मात्र शेवटच्या क्षणी घडलेल्या राजकीय घडामोडींनी सर्व गणिते कोलमडली आणि भाजपने अनपेक्षितरीत्या बाजी मारत जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलवले.
या निवडीत भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर राजू भोसले यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. या निकालामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांना जबर धक्का बसला आहे.
दरम्यान, या विजयाचा आनंद तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
या वेळी भारतीय जनता पार्टी पाटण तालुका अध्यक्ष मा. गणेशजी यादव, बनपुरी ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, तालुका उपाध्यक्ष बाबा मोकाशी, कामगार मोर्चा अध्यक्ष ओमकार माने, सरचिटणीस संतोष देसाई, दिव्यांग आघाडी अध्यक्ष गणेश पाटील, धनाजी मोहिते, दरबार हॉटेलचे मालक महेंद्र कांबळे, भगवान माने तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निकालामुळे सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर मोठा प्रभाव पडणार असून पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा