प्रा. कु. तेजश्री जाधव यांची ‘कृषी अधिकारीपदी निवड.
दौलतनगर : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या प्रतिष्ठेच्या परीक्षेत यांनी घवघवीत यश संपादन करत ‘कृषी अधिकारी’ (Agriculture Officer) पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय यशामुळे दौलतनगर परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या सध्या येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल (अध्यक्ष, मोरणा शिक्षण संस्था) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी प्रा. जाधव यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या भावी प्रशासकीय वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
तसेच, चे चेअरमन , युवा नेते व , तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाच्या वतीनेही त्यांचे कौतुक करण्यात आले.
या गौरवास्पद यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य , सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्रा. तेजश्री जाधव यांच्या या यशामुळे महाविद्यालय व संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रेरणादायी वाटचाल
ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे हे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. परिश्रम, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत व्यक्त होत आहे.
प्रा. कु. तेजश्री जाधव यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा