महिंदमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा भव्य शुभारंभ!विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावाचा कायापालट!
महिंद (ता. पाटण) | साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी :
काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले (ता. पाटण, जि. सातारा) येथील शैक्षणिक वर्ष २०२५–२६ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा प्रथम पुष्प उद्घाटन कार्यक्रम आज मौजे महिंद येथे मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी मा. बापूसो सावंत सर (विकास समिती सदस्य, के.सी. कॉलेज तळमावले व उपाध्यक्ष, माजी विद्यार्थी मंडळ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. पांडुरंग नलवडे (व्हा. चेरअमन, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मरळी) यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे मॅडम होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व कॉलेजचा ‘झेप’ अंक देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे मा. बापूसो सावंत सर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थी हा समाजपरिवर्तनाचा केंद्रबिंदू असून राष्ट्रीय सेवा योजना ही व्यक्तिमत्त्व विकासाची प्रभावी चळवळ आहे. NSS मुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, नेतृत्वगुण व सेवाभाव निर्माण होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
उद्घाटक मा. पांडुरंग नलवडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य “Not Me, But You” हे संपूर्ण आयुष्य समृद्ध करणारे असल्याचे सांगितले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव, ग्रामविकास, आरोग्य व साक्षरता अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य NSS च्या माध्यमातून घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रा.से.यो.मुळे ग्रामविकासाचा इतिहास घडला – प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे
अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे मॅडम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वांग खोऱ्यातील ग्रामपंचायतींचा कसा कायापालट झाला, याचा सविस्तर इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. NSS हे केवळ शिबिर नसून समाजाशी जोडणारी जीवनशाळा असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास श्री.शिवाजीराव शेवाळे (उपाध्यक्ष, लो. बा. दे. कामगार सोसायटी), श्री विकास गिरीगोसावी (माजी संचालक, लो. बा. दे. सह. साखर कारखाना, मरळी),श्री सुरेश सपकाळ (शिवसेना, पाटण उपतालुका प्रमुख),सौ. नंदा शेडगे (सरपंच, महिंद),
सौ. माया साळुंखे (सदस्य, महिंद ग्रामपंचायत),
श्री प्रवीण शेडगे (उपसरपंच, महिंद),
श्री प्रल्हाद साळुंखे (माजी चेअरमन),
श्री रमेश मोरे (सरपंच, साईकडे),श्री चंद्रकांत कदम,
प्रा. डॉ. संभाजी नाईक,प्रा. विलास शेंडगे,
प्रा. डॉ. दादासो जाधव,प्रा. चंद्रकांत पुटवाड,
प्रा. महेंद्र काजारी,तसेच गणेश सोनवले (शिपाई) आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. महेश चव्हाण सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. ज्योती उर्फ मनिषा पाटील मॅडम यांनी केले.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून महिंद गावात विविध सामाजिक, स्वच्छता व विकासात्मक उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा