सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०

*सातारा ; जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु*

*सातारा ; जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु*
 
 सातारा दि.30 : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

  *सातारा तालुक्यातील*   सातारा 3, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, दिव्यनगरी 1, विकासनगर 2, शाहुपूरी 1, भाग्यलक्ष्मी कॉलनी 1, सदाशिव पेठ 1, कृष्णानगर 1, सैदापूर 2, काशिळ 1, एकंबे 1, वंदन 1, विसावानाका 2, कोंडवे 2, कोडोली 1, शाहुनगर 1, शिवथर 2, वाढेफाटा 1, पाडळी 1, धनवडवाडी 1,
 *फलटण तालुक्यातील* शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, कोळकी 1, लक्ष्मीनगर 2, विद्यानगर 1, साखरवाडी 3, पिंपळवाडी 2,  वाघोशी 1, मिरेवाडी 1, खामगाव 3, सुरवडी 1, रेवडी 1, होळ 1, कुंटे 1,  फडतरवाडी 1, विढणी 3, हिंगणगाव 1, ढवळेवाडी 1,
          *खटाव तालुक्यातील* खटाव 1, वडुज 1, नांदोशी 1,
           *माण  तालुक्यातील* पाणवन 7, जाशी 2,
           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 2,सुरली 1, 
  *जावली तालुक्यातील* मेढा 1, ओझरे 1,
*वाई तालुक्यातील* सिध्दनाथवाडी 1, फुलेनगर 3, दत्तनगर 2, पसरणी 3, बावधन 1, सोनगिरवाडी 1,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 2,
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1,
बाहेरील जिल्ह्यातील जांब (पुणे) 1,
   *5 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  वाढे ता. सतारा येथील 67 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये चिंचणेर ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, विहापुर ता. कडेगांव जि. सांगली येथील 70 वर्षीय पुरुष, आणे ता. कराड येथील 60 वर्षीय महिला व रात्री उशीरा कळविलेले कोळकी ता. फलटण येथील 52 वर्षीय पुरुष  अशा एकूण  5 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -248107*
*एकूण बाधित -51147*  
*घरी सोडण्यात आलेले -48380*  
*मृत्यू -1718* 
 *उपचारार्थ रुग्ण-1049*

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

तळमावले ; शशिकांत भिंगारदेवेला खुणावतोय ‘टीव्ही’चा पडदा

तळमावले ; शशिकांत भिंगारदेवेला खुणावतोय ‘टीव्ही’चा पडदा

तळमावले/संदीप डाकवे
टीव्हीच्या पडद्यावर आपण एकदा तरी चमकावे असे स्वप्न कित्येकांचे असते. असेच एक सोनेरी स्वप्न पाटण तालुक्यातील आचरेवाडी शांतीनगर येथील युवक पाहत आहे. काही अंशी त्याचे हे स्वप्न पुर्ण झाले तरी यशाला अजून गवसणी घालण्याचे ध्येय त्याने बाळगले आहे. त्यासाठी तो प्रचंड मेहनत देखील करत आहे. शशिकांत तानाजी भिंगारदेवे असे या युवकाचे नाव आहे.
‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या सुप्रसिध्द मालिकेत शशिकांत याने छोटेखानी भूमिका साकारुन महाराष्ट्रातल्या  घराघरात आपली कला पोहोचवली आहे.
वडिलांचा जनावरे देण्या-घेण्याचा व्यवसाय. घरात सात ते आठ खाणारी तोंडे असे असतानादेखील आपल्या स्वप्न पाहण्यासाठी शशिकांतने जीवतोड मेहनत केली आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणलेल्या शशिकांत यांनी डी.एड, बी.एड या पदव्या मिळवत आपल्या कुटूंबाला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. हे करताना आपली कलेविषयी असलेली आवड देखील तितक्याच तन्मयतेने जपली आहे.
‘‘लहानपणी बॅंड मध्ये ढोल उचलण्याचे काम करायचो. त्यानंतर हळूहळू गायनाचे काम करु लागलो. मी गायलेली गाणी लोकांना खूप आवडत. माझ्या कलेची हौस मी अशा पध्दतीने पूर्ण करत असे. कालांतराने काॅलेज पूर्ण झाल्यानंतर अभिनयाचे वेड वाढले गेले. लेखनाचा छंद ही मोठया आवडीने जपला. मी लिहलेल्या लेखनाला राज्यस्तरावर पारितोषिकदेखील मिळाले आहे.’’ असे शशिकांत बोलताना म्हणाला.
आतापर्यंत शशिकांत ने ‘उंडगा’ ही शाॅर्टफिल्म, दान, लाईफ ब्लाॅक या मध्ये काम केले आहे. तर  ‘लागीर झालं जी’, ‘विठू माऊली’, ‘लक्ष्य’ या मालिकांत छोटेखानी भूमिका साकारल्या आहेत. सन 2000 मध्ये गोरेगांव येथे राज्यस्तरीय समई नृत्यात प्रथम पारितोषिक पटकावले आहे. अभिनयासाठी तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर पारितोषिके मिळवली आहेत. जिल्हा परिषद रायगड च्या वतीने त्याचा सत्कार झाला आहे.
रायगड जिल्हयातील म्हसब तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शशिकांत भिंगारदेवे ज्ञानदानाचे पवित्र काम प्रामाणिकपणे करत आहेत. आपल्या कलेला अजूनही म्हणावा तशी संधी मिळाली नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे.
भविष्यात प्रामाणिक मेहनत, योग्य मार्गदर्शन यातून टीव्हीच्या पडद्यावर झळकण्याचे स्वप्न शशिकांत नक्की साकारतील यात कोणतीही शंका नाही. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा..!

फोटो;-
‘विठू माऊली’ व ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील दृश्यांत शशिकांत भिंगारदेवे

*सातारा ; जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु*

*सातारा ; जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु*

 सातारा दि.29 : जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 135नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *सातारा तालुक्यातील* सातारा4,जारेवाडी 1,बोरगाव 1,बोरखळ 4,खामगाव 1,लिंब 3,शाहुनगर 2,वनवासवाडी 1, पोगरवाडी1, गोडोली 2,  सदरबाजार 1,गुरुवार पेठ 1, नेले किडगाव1,
*कराड तालुक्यातील*कराड 4,कर्वे 2,शामगाव 1,विंग 1,कोलेवाडी 1,येळगाव1,सैदापूर1, कोरेगाव2,आटके1, मलकापूर 2,  हेळगाव 1,वडोली 1,औड 1,  
 *पाटण तालुक्यातील* बेलवडे खु 1, 
*फलटण तालुक्यातील* फलटण 6, सांगवी 1,कोळकी 1,ढवळेवाडी 1,तारगांव 2,मुरुम 2 साखरवाडी 7, पिंपळवाडी 1,फडतरवाडी 1,तीरकवाडी 1, गुणवरे 2, गोळीबारमैदान 2, सुरवडी 2, हिंगणगाव 1, विढणी 1, मलटण 1, खराडेवाडी 1, 
*खटाव तालुक्यातील* खटाव 12, फडतरवाडी 1,ललगुण 1,
           *माण  तालुक्यातील* धनगरवाडी 1, दहिवडी 1,कुळकजाई 1, म्हसवड 5,मार्डी 1,पानवन1,गोंदवले 1,झाशी 1, 
           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2,सुर्ली 1,एकसळ 1,
  *जावली तालुक्यातील*  सायगाव 1,
           *महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी1,
*वाई तालुक्यातील*, दत्तनगर 1, कडेगाव 3,सिध्दनाथ 1,ओझर्डे 6,
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 3,मिरजे 1, शिरवळ 2,
*इतर*1, नरवणे 1,गोळेवाडी 2,हिंगणगाव 1,मिरेवाडी 4,
 बाहेरील जिल्ह्यातील कासेगाव 1, 
 *3 बाधितांचा मृत्यु*
 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वाठार बुद्रुक ता.खंडाळा येथील 55 वर्षीय महिला,
उंब्रज ता.कराड  येथील 85 वर्षीय महिला,बिदाल ता.माण येथील 73 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -247329*
*एकूण बाधित -51059*  
*घरी सोडण्यात आलेले -48292*  
*मृत्यू -1713* 
 *उपचारार्थ रुग्ण- 1054* 
                                                                       0000

उरण : 1985 सालाचा व्यापारी जहाज वाहतूक कायदा रद्द नवीन कायद्यासाठी मागवल्या सूचना

उरण : बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने व्यापारी जहाज वाहतूक कायदा १९८५ आणि १८३८ किनारी जहाज कायदा रद्द करून सार्वजनिक सल्लामसलतीसाठी व्यापारी जहाज वाहतूक विधेयक २०२० चा मसुदा प्रसारित केला आहे. दोन्ही कायदे रद्द करण्यामागे नवा कायदा स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे.

व्यापारी जहाज वाहतूक विधेयक २०२० चा मसुदा हा भारतीय नौवहन उद्योगात अमेरिका, जपान, यूके, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित राष्ट्रांमधील उत्तमोत्तम पद्धतींचा अवलंब करून सागरी व्यवसाय क्षेत्राचा विकास करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आला आहे. भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेचे सर्व आधुनिक संकेत आणि नियम या नव्या २०२० कायद्याच्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.जहाजांची सुरक्षितता आणि संरक्षण, समुद्रावर जीवनाचे संरक्षण, सागरी प्रदूषणाला आळा, सागरी प्रवासातील उत्तरदायित्व व भरपाई यांची तरतूद आणि आंतरराष्ट्रीय संकेत पाळून सर्वसमावेशक स्वीकाराची हमी यासाठी पुरेशा तरतुदीही केलेल्या आहेत.

या तरतुदींमुळे अनेक फायदे मिळणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन-कायद्यानुसार भारतीय जहाजांना सर्वसामान्य व्यापार परवाना घेण्याची आवश्यकता भासणार नाही. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार व नोंदणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धत, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक परवाने, प्रमाणपत्रे आणि पेमेंट यासोबतच इलेक्ट्रॉनिक करार, रेकॉर्डस् आणि लॉग बुक्सना वैधानिक अधिकृत मान्यता मिळणार आहे. माल नेण्याच्या क्षमतेत वाढ आणि जहाजाला व्यापारी मिळकत म्हणून मान्यता, जहाजाच्या मालकी हक्कासंबंधीच्या पात्रता निकषांना शिथिलता देऊन जहाजाची मालकी मूळ कंपनीला हस्तांतरित करण्यासाठी (बेअरबोट चार्टर कम डिमाईस) नोंदणी या तरतुदींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अधिक संधी निर्माण होणार आहेत. भारतात बँकेबल शिपिंग कार्यक्षेत्र आणि अडचणींच्या परिस्थितीला अटकाव प्रस्तावित विधेयक हे सागरी घटनांसाठी तत्काळ प्रतिसाद निर्धारित करण्यासाठी हा नवा कायदा पहिल्यावहिल्या अधिकृत चौकटीला आकार देणारा ठरणार आहे. या तरतुदी प्रतिसाद यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीची सुविधा देत एखादी दुर्घटना वा इतर आपत्ती यापासून संरक्षण मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा दावाही संबंधित मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

काम सोडून दिलेल्या जहाजावरील खलाश्यांचे पुनर्वसन करण्याची तरतूद या नव्या कायद्यात सुधारणा केली आहे. तसेच जहाजावरील खलाशांचे पुनर्वसन, जहाजांची सुरक्षा, निर्णय आणि दाव्यांच्या अंदाजाचे बळकटीकरण करणेही शक्य होणार आहे. समुद्रात जहाजाच्या टकरीच्या घटनांचा तपास आणि निवाडा यासंबंधीचे दाव्यांना बळकटी येण्यासाठी, उच्च न्यायालयाकडून मूल्यांकनकर्त्यांना प्रत्येक जहाजाच्या दोषाचे मापन करण्याची मुभा देण्याची सोय या नव्या कायद्याच्या मसुद्यात केली आहे.

मसुद्यावर जनतेकडून मागविल्या २४ डिसेंबरपर्यंत इमेलद्वारे सूचना

भारत हे सक्रिय अंमलबजावणी कार्यक्षेत्र बनणार आहे. त्यामुळे असुरक्षित तसेच समुद्रात जीविताला धोका उत्पन्न करणाऱ्या जहाजांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालकांना देण्याचे आणि ते ताब्यात घेण्याच्या आदेशावर अपील करण्याचे अधिकार कायद्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. व्यापारी जहाज वाहतूक कायदा १९८५ आणि १८३८ किनारी जहाज कायदा रद्द करून सार्वजनिक सल्लामसलतीसाठी व्यापारी जहाज वाहतूक विधेयक २०२० चा मसुदा प्रसारित केला आहे. . नागरिकांना त्यांच्या सूचना msbill2020@gmail.com या इमेल आयडीवर २४ डिसेंबर २०२० पर्यंत पाठवता येतील.

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

सातारा : जिल्ह्यात 1 ते 31 डिसेंबर कालावधीत क्षय रोग आणि कुष्ठ रोग रुग्ण शोध मोहिमलोकप्रतिनिधींसह नागरिकांचा सहभाग घेऊन मोहिम प्रभावीपणे राबवावी - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा : जिल्ह्यात 1 ते 31 डिसेंबर कालावधीत क्षय रोग आणि कुष्ठ रोग रुग्ण शोध मोहिम
लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा सहभाग घेऊन मोहिम प्रभावीपणे राबवावी
            - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

 सातारा दि. 28 : सामाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान राज्यामध्ये दि. 1 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत राबविण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. त्यांच्या सुचनेप्रमाणे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिमेत लोकप्रतिनधींसह व नागरिकांचा सहभाग घेऊन ही मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
  या विषयी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून रुग्णांचे लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. रोगशास्त्रीय अभ्यासानुसार दोन्ही आजारांचे रुग्ण निदान व उपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णांना या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो व सहवासातील इतर लोकांनाही या रोगांची लागण होण्याचा धोका संभवतो. म्हणून समाजातील सर्व क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन लवकरात लवकर निदाननिश्चिती नंतर  औषधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी सामाजातील कुष्ठ रुग्ण व क्षय रुग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान राज्यामध्ये  1 ते 31 डिसेंबर 2020 याकालावधीत राबविण्यात येणार आहे.
            या मोहिमेसाठी समाजाचा लोकसहभाग महत्वाचा असून, यासाठी आपल्या जिल्ह्यातील   खासदार, आमदार व इतर लोक प्रतिनिधी या अभियानामध्ये सक्रिय सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत. या सर्वांच्या सहभागामुळे  सक्रिय क्षयरुगण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहिम यशस्वी होईल, असा विश्वासही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.
                            

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

*सातारा ; जिल्ह्यातील 226 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु*

*सातारा ; जिल्ह्यातील 226 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु*
 
 सातारा दि.27 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 226 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *सातारा तालुक्यातील* सातारा 3, गोडोली 1, अहिरे कॉलनी सातारा 1, खेड 2, शाहुनगर 4, शाहुपुरी 1,   गुरुवार पेठ 1, गुरसाळे 1, सुर्ली 1, संगमनगर सातारा 1, कृष्णानगर 1, कोंडवे 1,  शिवथर 9, देगाव 1, पिंरवाडी 1, पोगरवाडी 1, मानगाव 1, जारेवाडी 2, तरडगाव 1, 

*कराड तालुक्यातील* कराड 1 शनिवार पेठ 2,, गोळेश्वर 1, वाठार 1, विंग 1,  किवळ 3, उंब्रज 1,मलकापूर 7, वाखन 1, आगाशिवनगर 1, ओगलेवाडी 1,सैदापूर 1, शेरे 1,कुसुर 1,   

*पाटण तालुक्यातील* मल्हार पेठ 1, मानेगाव 1,  

*फलटण तालुक्यातील* फलटण 1, बुधवार पेठ 1, लक्ष्मीनगर 2, मलटण 1, सगुनामाता नगर 1, साखरवाडी 8, धुळदेव 4, गोखळी 1, वडजल 1, पिंपळवाडी 2, मुरुम 1, ठाकुरकी 1, नांदल 4, पाडेगाव 1, मिरेवाडी 2, तांबवे 2, ब्राम्हण गल्ली फलटण 1, स्वामी विवेकानंदनगर 1, तडवळे 1, मिरगाव 1, मारवाड पेठ फलटण 3, सुरवडी 1,    
*खटाव तालुक्यातील* खटाव 5, निमसोड 1, वडूज 3, विखळे 1,पुसेगाव 1, ललगुण 1, मायणी 2, विखळे 1, शेनवडी1, 
           *माण  तालुक्यातील* तोंडले 1,  तुपेवाडी 5, दहिवडी 5, विरळी 1, बिदाल 4, बीजवडी 1,म्हसवड 8, धामणी 3, गोलेवाडी 1, देवापूर 5, वाकी 1, गोंदवले बु 7, पनव 5, महिमानगड 2, राणंद 4, विरकरवाडी 7,        
           *कोरेगाव तालुक्यातील*एकसळ 1, बोधेवाडी 1, कोरेगाव 2,  
  *जावली तालुक्यातील* मेढा 2, गावडी 1, आनेवाडी 1, 
*वाई तालुक्यातील* काडेगाव 1, दत्तनगर 1, 
*खंडाळा तालुक्यातील* खेड 1, लोणंद 6,  शिरवळ 6, लोणंद 3, शिंदेवाडी 1, भादे 1, खंडाळा 3,  
*इतर* 6, जाखीनवाडी 1, वडगाव 1, पाडळी 2, भादवडे 1, स्वरुपखानवाडी 1, 
 बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 1, कारुंडे जि. सोलापूर 1, माळशिरस 1, कडेगाव 1, 
 *3 बाधितांचा मृत्यु*
 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पुसेगाव ता. खटाव येथील 82 पुरुष, कंकातरे मायणी ता. खटाव येथील 65 वर्षीय महिला, विखळे ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -244404*
*एकूण बाधित -50755*  
*घरी सोडण्यात आलेले -48078*  
*मृत्यू -1706* 
 *उपचारार्थ रुग्ण-971* 

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार पोलिसांचा सन्मान●रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद●पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे गौरवोद्गार

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान करणार पोलिसांचा सन्मान
●रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद
●पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे गौरवोद्गार
सातारा / प्रतिनिधी
सातारा ; कोरोनापासून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कार्य करणारे पोलीस दल. या पोलीस दलात दर महिना उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस बंधू भगिनींना "पोलिसमॅन ऑफ द मंथ" हा पुरस्कार देऊन पोलीस डिपार्टमेंट गौरव करते. त्याच पोलीस जवानांचा सन्मान रयतेचे स्वराज प्रतिष्ठानला करण्याची इच्छा आहे तरी त्यास परवानगी मागणारे  पत्र पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्षा- अश्विनी महांगडे यांनी दिले.
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली.यावेळी संतोष पवार, परवेझ लाड यांनी प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या कामाची त्यांना माहिती दिली. पोलिसांमुळे कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सदकार्य केले ते पोलिसांनीच. आपण घरात सण साजरे करतो आणि पोलीस मात्र आपल्या रक्षणासाठी घराबाहेर असतात. आपण सगळे कोरोना या महामारीपासून वाचण्यासाठी घरात बसलेलो तेव्हाही पोलीस आपल्यासाठी घराबाहेर होते. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य मधील सर्व सदस्य हे कायम पोलीस बंधू- भगिनींचा आदर करत आले आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे पोलीस डिपार्टमेंट कडून जाहीर होणाऱ्या "पोलिसमॅन ऑफ द मंथ" या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या पोलीस बंधू- भगिनींचा सन्मान करणार आहेत, असा मनोदय व्यक्त करत तसे पत्र दिले. तर कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे. त्यासाठी कोरोनाच्या काळात ऑनलाइन जनजागृती शिबीर आयोजित केले ज्यात आतापर्यंत १०० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती सांगताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे,असे गौरवोद्गार काढले.
फोटो:पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना पोलिसांचा सन्मान करण्याचे पत्र देताना रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे,संतोष पवार, परवेझ लाड

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

प्रार्थना, धार्मिक स्थळांच्या ठिकाणच्या गर्दीला तिथल्या व्यवस्थापणाने मास्क आणि सुरक्षित अंतर राखण्याचा आग्रह करावा - जिल्हाधिकारी शेखर सिंहशाळा प्रमुखांनी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी लक्ष घालावे

प्रार्थना, धार्मिक स्थळांच्या ठिकाणच्या गर्दीला तिथल्या व्यवस्थापणाने मास्क आणि सुरक्षित अंतर राखण्याचा आग्रह करावा
         - जिल्हाधिकारी शेखर सिंह

शाळा प्रमुखांनी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी लक्ष घालावे
सातारा दि.25 :  राज्य शासनाने प्रार्थना / धार्मिक स्थळे उघडण्यास मान्यता दिली आहे. आता ते स्थळे खुली झाली आहेत. या धार्मिक  स्थळांमध्ये गर्दी दिसत आहे ही गर्दी होणार नाही याची दक्षता देवस्थान प्रमुख, ट्रस्टने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
शासनाने धार्मिक स्थळे खुली केलेली आहेत, परंतु काही धार्मिक स्थळांमध्ये शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन केले जात नाही. धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन धार्मिक स्थळांमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाने मास्कचा वापर केला पाहिजे, गर्दी होणार नाही याची खरबदारी घेऊन सुरक्षित अंतर राखले पाहिजे त्याचबरोबर धार्मिक स्थळाचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. धार्मिक स्थळांमधून कोरोना संसर्ग वाढू नये हा प्रशासनाचा हेतू आहे. धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होणार नाही याची जबाबदारी संबंधित ट्रस्टची, तेथील प्रमुखांची असणार आहे तरी धार्मिक स्थळांच्या ट्रस्टनी, प्रमुखांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

शाळा प्रमुखांनी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी लक्ष घालावे

राज्य शासनाच्या सुचनेनुसार 23 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील 9, 10, 11 व 12 वीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील 10 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोनाची टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये जे पॉझिटिव्ह आढळले आहेत अशांना कामावर न येण्याचे सांगितले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. जे निगेटिव्ह  आहेत असे शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी हजर झाले आहेत.
आता शाळा सुरु झाल्या आहेत विद्यार्थ्यांनीही शासनाने दिलेले नियम पाळले पाहिजे हे नियम आपल्या हिताचे असून यामध्ये तुम्ही मास्कचा योग्य तो वापर, शाळेमध्ये गप्पा मारताना सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे गप्पा मारताना मास्क घालूनच गप्पा माराव्यात आणि वारंवार हात धुतले पाहिजे. सध्या तरी कोरोनावर कोणतेही औषध नसून या नियमांचे तंतोतंत पालन करणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.
शाळा प्रमुखांनीही शाळेमध्ये गर्दी होणार नाही याची खरबदारी घेऊन वर्ग खोल्यांचे शौचालयाचे सॅनिटायझर करुन घ्यावे. विद्यार्थी आणि शिक्षक 100 टक्के मास्कचा वापर करतील याची जबाबदारी संबंधित शाळेची राहिल.  विद्यार्थी आजारी असल्यास त्यांनी शाळेत जावू नये आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी. पूर्णपणे बरे झाल्यानंतर शाळेत जावे. 9, 10, 11 व 12 मध्ये शिक्षक असणारे विद्यार्थी मास्कचा योग्य वापर, सुरक्षित अंतर ठेवून गप्पा व वारंवार हात धुतील असा विश्वासही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला आहे.

तळमावले ; सायकलवरून तो शोधतोय जगण्याची ‘वाट’

तळमावले ; सायकलवरून तो शोधतोय जगण्याची ‘वाट’
तळमावले/प्रतिनीधी
तळमावले ता.पाटण ; पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज 56 किमी.चा प्रवास सायकलवरुन करतोय.56 किमी.रपेट करत दिवसभर हमालीचे काम करत आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न गणेश मराठे करतोय.23 मार्चला संपूर्ण देश लाॅकडाउन झाला.अनेकांची स्वप्ने धुळीला मिळाली.रोजगाराविना अनेक जणांचे संसार उघडयावर आले.अशा संकटात पाटण तालुक्यातील पाचुपतेवाडी गुढे येथील गणेश सापडला आहे.आपल्या कुटूंबाच्या उपजीवीकेसाठी शाळेनंतर मुंबईची वाट धरणारा गणेश लाॅकडाउन झाल्यानंतर गावी आला.आई-वडील,पत्नी,लहान मुलगी यांची जबाबदारी गणेशवर आली.लाॅकडाउनमुळे परिसरात कोणताही उद्योगधंदा नसल्यामुळे कराड सारख्या ठिकाणी त्याला कामधंदा स्विकारावा लागला.लाॅकडाउनमुळे सर्व प्रवासाची साधने बंद होती? काम तर करायला हवे? पण येण्या जाण्याचा प्रश्न होता? पण म्हणतात ना अडचणीतून मार्ग काढतो तोच जीवनात यशस्वी होतो.गणेशने देखील प्रवासाचा बाब न करता थेट सायकलवरच टांग मारली आणि कराड येथे कामावर हजर झाला.तब्बल 56 किमी.च्या सायकल प्रवासाने संपूर्ण शरीर थकून जाते तेवढयाच उत्साहाने आपले काम त्याने आजअखेर सुरू ठेवले आहे.
संकटातूनही जीवनाची वाट शोधणाऱ्या गणेशला या निमित्ताने सलाम ठोकावा वाटतो.गणेश हा कामाबरोबरच इतर सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी असतो.आपल्या ध्येयाच्या आड परिस्थिती,वय,शिक्षण आड येवू न देता कुटूंबाची जबाबदारी स्विकारणाऱ्या गणेशचे समाजातून व विभागातून कौतुक होत आहे.इतर अडचणी सांगून गप्प राहणाऱ्या तरूणांनी गणेषचा आदर्श डोळयासमोर घ्यायला हवा.  कोणतेही काम कमी नसते आणि प्रत्येक कामाविषयी प्रेम करण्यासही गणेश शिकवतो.

सातारा ; जिल्ह्यातील 248 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 12 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 248 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 12  बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.25 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 248 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  12  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

  सातारा तालुक्यातील सातारा 9, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, रविवार पेठ 2, गुरुवार पेठ 2, केसरकर पेठ 1, संभाजीनगर 1, सदरबझार 2, करंजे पेठ 3, शाहुपुरी 1, शाहुनगर 2, सैदापूर 1, दौलतनगर 1, संगमनगर 2, वनवासवाडी 1,  पाडळी 2, लिंबाचीवाडी 1, विलासपूर सातारा 2, शेरेवाडी 1, कारंडी 1, अंगापूर 1, कुंभारगाव 1, पंताचा गोट सातारा 1, गडकर आळी 1, अतित 2, गोवे 2, लिंब 1,  नागठाणे 1, चिंचणेर वंदन 1, शिवथर 1, क्षेत्र माहुली 2, 

कराड तालुक्यातील कराड 4, शुक्रवार पेठ 1, उंब्रज 1,  विद्यानगर 2, कडेपूर 1, कोर्टी 1, सुर्ली 1, शेरे 1, वाडोळी निलेश्वर 1, मलकापूर 1,  रेठरे बु 1, नांदगाव 1,  सोनकिरे 1, 

पाटण तालुक्यातील किळे मोरगिरी 1, मरळी 2, मुद्रुळकोळे 1, 

 फलटण तालुक्यातील फलटण 1,  जिंती 1, सस्तेफाटा 1, साखरवाडी 2, रावडी बु 1, लक्ष्मीनगर 2, पिंपळगाव 1, वाखरी 1, निंभोरे 1, काशिदवाडी 3, कोळकी 4,  तरडगाव 2, सावडी 1, पिंपळवाडी 8, सांगवी 1, रिंग रोड फलटण 2, कापडगाव 1, मिरडेवाडी 1, 

 खटाव तालुक्यातील वडूज 2, कातळगेवाडी 1, मायणी 4, पुसेगाव 1, होळीचागाव 1, दातेवाडी 1, खटाव 1, 
           माण  तालुक्यातील दहिवडी 5, गोंदवले बु 4, पळशी 1, इंजबाव 2, म्हसवड 5, शिंगणापूर 1, देवापूर 1, विरळी 5, धामणी 5, देवापूर 1, गोंदवले खु 7, बोडके 1, 
           कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7,  कुमटे 1, खेड 2, आसगाव 1, रहिमतपूर 3, शिरंबे 1, बीचुकले 3, भाडळे 5,आर्वी 1, एकसळ 1, शिरढोण 3, गोगावलेवाडी 1,घाडगेवाडी 1, चांदवली 1, दुघी 1, साप 1,     
   जावली तालुक्यातील डांगरेघर 1,
वाई तालुक्यातील गंगापुरी 2, वाई 1, यशवंतनगर 2, रामढोहआळी 4, सदाशिवनगर 3, 
खंडाळा तालुक्यातील मिर्जे 1, भादे 5, लोणंद 5, शिरवळ 7, खंडाळा 8, बावडा 5,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 2, भिलार 1, 
*इतर*3, धोंडेवाडी 1, शिंदेवाडी 1, पनव 1, 
 बाहेरील जिल्ह्यातील अकलुज 1, पुणे 1, पनवेल 1, माळशिरस 1,  
   12 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये आरफळ ता. सातारा येथील 88 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 65 वर्षीय महिला. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये शुक्रवार पेठ ता. सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, शिरंबे ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, म्हसवे  वर्ये ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, संभाजीनगर ता. खंडाळा येथील 85 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले कोळकी ता. फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, संत भानुदास नगर ता. फलटण येथील 81 वर्षीय पुरुष, सांगवी ता. जावळी येथील 68 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष अशा एकूण 12 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
एकूण नमुने -240813
एकूण बाधित -50351  
घरी सोडण्यात आलेले -47386  
मृत्यू -1699 
 उपचारार्थ रुग्ण-1266 
0000

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

मुंबईतील पाणीकपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार -मुख्यमंत्री

मुंबईतील पाणीकपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार -मुख्यमंत्री

मुंबई, दि. २३ : मुंबईत मे व जून महिन्यातील पाणीकपात टाळण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिले. वर्षा या शासकीय निवासस्थानी 200 एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,  मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची प्रमुख  उपस्थिती होती.मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पावसाळ्याच्या सुरुवातीला सातत्याने पाऊस उशिरा येत असल्याने मे व जून महिन्यामध्ये मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात करावी लागते. हे टाळण्यासाठी समुद्रातील खारे पाणी गोडे केल्यास मुंबईतील नागरिकांना पाणी कपातीचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. जगात अनेक देशांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे, तर काही देशांमध्ये अशा प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरणार असल्याने प्रकल्पासाठी करण्यात येणारी कार्यवाही पुढे सुरु ठेवण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध असणार आहे. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी लागणार आहे. मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतात. मनोरी येथे शासनाचा भूखंड उपलब्ध आहे तसेच रस्तेही उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विनाव्यत्यय पूर्ण होऊन मुंबईच्या नागरिकांना कपातीविना नियमित पाणीपुरवठा होणार आहे.

 

मनोरी येथे 25 ते 30 एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून 200 एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात क्षमता वाढविण्यासाठी सोयीस्कर आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारत: अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असून प्रकल्पासाठी अंदाजे १६०० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.निर्मिती खर्च ३ ते ४ पैसे प्रतिलिटर इतका खर्च येणार असल्याचे मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादरीकरणात सांगितले.

 

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

निसर्गाचे वातावरण अनुभवण्यासाठी ‘झुंजूमुंजू’ कवितासंग्रह अवश्य वाचा

निसर्गाचे वातावरण अनुभवण्यासाठी ‘झुंजूमुंजू’ कवितासंग्रह अवश्य वाचा

  मुंबई ; अंधेरी येथील कवयित्री दिपाली साळवी यांचा ‘झुंजूमुंजू’ हा दुसरा कविता संग्रह. नुकताच वाचनात आला. पहिला कविता संग्रह शंभर नंबरी हा वाचकांच्या पसंतीस पडला आहे. या कविता संग्रहाच्या प्रसंगी मी उपस्थित होतो हे मी माझे भाग्य समजतो. दै.नवाकाळ व इतर दैनिके, दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके यामधून दिपाली साळवी यांच्या कविता प्रसिध्द झालेल्या आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी ‘झुंजूमुजू’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. हा ‘झुंजूमुंजू’ कवितासंग्रह निसर्गावर आधारित आहे. तो ‘झुंजूमुंजू’ हा नावाप्रमाणे भल्या पहाटेच्या अतिशय आनंददायी वातावरणातील सकाळच्या प्रहरापासून ते संध्याकाळ आणि रात्रीच्या प्रहरापर्यंत ज्या-ज्या वेळेनुसार निसर्गावर सुचलेल्या निसर्गातील झाडे-वेली, कळी, पाने-फुले दवबिंदुचे थेंब, आकर्षक विविध रंगी फुले, फुलपाखरे, कोकीळ ह्या सर्वांवर आधारित कविता वाचावयास मिळतात. अगदी गावाकडच्या घरापासून ते संध्याकाळची दिवेलागण आकाशातील चंद्रमा पर्यंत जे कवयित्रीला अनुभवायला मिळाले. त्याचे तिने अगदी छान शब्दात वर्णन केले आहे. यातील कविता वाचल्यावर आपणास गावाकडची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कविता वाचकांना नक्कीच आनंद देतील.असे मनापासून वाटते.

     झुंजूमुंजू, पहाट, सूर्यबिंब, निसर्गाचे नंदनवन, फुल, कळी, पाऊस, पहाटेचे स्वप्न, झाड आणि पाणी, स्वप्नसुंदरी, काव्यपरी, फुलपाखरू, बालपणीचा काळ सुखाचा, गावाकडचे घर, मानवा एवढे करून बघ, चंद्रमा, पाऊस  गाणे, चांदोबा चांदोबा यासारख्या कविता वाचल्यावर बालपणीच्या आठवणीने अगदी मन प्रसन्न होऊन त्या बालपणीच्या दुनियेत पुन्हा गेल्यासारखे वाटते.
संतोष प्रकाशन ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अतिशय सुंदर असे हे कवितासंग्रहाचे पुस्तक आहे. निसर्गाचे वातावरण अनुभवण्यासाठी ‘झुंजूमुंजू’ कवितासंग्रह अवश्य वाचा.

- लेखन: डाॅ.संदीप डाकवे

 

खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शिवसमर्थ दिवाळी अंकाचे प्रकाशन

खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शिवसमर्थ दिवाळी अंकाचे प्रकाशन

तळमावले/वार्ताहर
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते साप्ताहिक शिवसमर्थ च्या 12 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन दिमाखदारपणे पार पडले. यावेळी अंकांचे उपसंपादक डाॅ.संदीप डाकवे, प्राचार्य सुनील ढेंबरे सर, जीवन काटेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 11 वर्षे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित केला जात आहे. या दिवाळी अंकांत नामवंत साहित्यिकांबरोबरच नवोदित लेखक कवी यांच्या साहित्याचाही समावेश केला जातो. आर्थिक सेवा देत असताना साहित्यिक चळवळीत शिवसमर्थ संस्था व परिवार योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.
यापूर्वी शिवसमर्थ च्या प्रथम दिवाळी अंकातील कथा इ.6 वी च्या बालभारतीच्या अभ्यासक्रमात घेतली आहे. सन 2010 मध्ये दिवाळी अंकावर दै.नवाकाळ मध्ये प्रथम पानावर अग्रलेख छापून आला होता. सन 2011 रोजी अक्षररंग यांच्या वतीने दिवाळी अंकाला राज्यस्तरीय दिवाळी अंक पुरस्कार मिळाला आहे. सन 2012 ते 2015 या कालावधीत आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्यावतीने उत्कृष्ट मांडणी पुरस्कार मिळाला आहे. तर गतवर्षी मराठी वृत्तपत्रलेखक संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने शिवसमर्थ अंकाचा गौरव झाला आहे.
साप्ताहिकाच्या माध्यमातून विभागातील समस्या, अडचणी शासनासमोर मांडण्याचे काम केले जात आहे. अशा या दर्जेदार दिवाळी अंकाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी कौतुक करत भावी वाटचालीस षुभेच्छा दिल्या आहेत.

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

महाराष्ट्र पुन्हा होणार लॉकडाऊन ?

महाराष्ट्र पुन्हा होणार लॉकडाऊन ?
पुणे : दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ''काही दिवसांत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुढील आठ-दहा दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल,'' असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

तळमावले ; पत्रकार हरीष पाटणे यांना डाॅ. संदीप डाकवे यांचेकडून 6000 वे स्केच भेट

तळमावले ; पत्रकार हरीष पाटणे यांना डाॅ. संदीप डाकवे यांचेकडून 6000 वे स्केच भेट
तळमावले/वार्ताहर
शालेय वयापासून चित्रकलेचा छंद जोपासलेल्या अष्टपैलू चित्रकार, पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी आजपर्यंत अनेक दिग्गज व्यक्तिांना त्यांची व्यक्तिचित्रे, शब्दचित्रे, अक्षरचित्रे, अक्षरगणेशा चित्रे भेट दिली आहेत. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै.पुढारीचे वृत्तसंपादक हरीष पाटणे यांना त्यांनी दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर नुकतेच त्यांचे रेखाचित्र दिले. त्यांनी भेट दिलेले हे 6000 वे रेखाचित्र आहे. एका पत्रकाराकडून दुसÚया पत्रकाराला दिलेली ही आगळीवेगळी भेट आहे असेच मानावे लागेल.
चित्रकलेचा छंद जोपासत डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून गरजूंना लाखो रुपयांची मदत करत सामाजिक बांधिलकीही जपली आहे. अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांना डाॅ.डाकवे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या मोहात पाडले आहे. सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडे डाॅ.संदीप यांची कला पोहोचली आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या कलेचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांचंी तब्बल 83 रेखाचित्रे, गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या 54 भावमुद्रा साकारत रेखाटनामधील वेगळेपण जपले आहे. भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील, इंद्रजित देशमुख, अपर्णाताई रामतीर्थकर, कर्नल हितेश चोरगे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज व नामवंत सेलिबिटी यांना त्यांची रेखाचित्रे डाॅ.संदीप डाकवे यांनी भेट दिली आहेत.
ठिपक्यातून- नावातून-शब्दातून-अक्षरातून चित्रे, मोरपिसावर संत तुकाराम, खडूतून अष्टविनायक, जाळीदार पिंपळपानावर श्रीगणेश, पोट्रेट रांगोळी, पेपर कटींग आर्ट, अक्षरगणेश, बोलक्या भिंती, वारीचे मोठे पोस्टर, भिंतीवर वारीचे चित्र, एक दिवा जवानांसाठी चित्र, थर्मोकोल अक्षर कटींग, आपटयाच्या पानातून शुभेच्छा संदेश, छत्रीवर-मास्कवर समाजप्रबोधनपर संदेश, फलकलेखन, मोठी भित्तीपत्रिका, हस्तलिखिते अशा कलेच्या विविध माध्यमातून काम करत त्यांनी आपले वेगळेपण नेहमी जपले आहे.
नुकतेच त्यांनी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांना त्यांचे स्केच दिले त्यांनी दिलेले हे 6000 वे स्केच आहे. हरीष पाटणे यांनी देखील डाॅ.संदीप डाकवे यांच्या या उपक्रमाचे, राबवत असलेल्या कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

चैकटीत: आता लक्ष लिम्का बुक आॅफ रेकाॅर्ड व गिनीज बुक आॅफ रेकाॅर्ड: डाॅ.संदीप डाकवे
100 वे चित्र अभिनेते भरत जाधव, 200 वे चित्र अनाथांची माय सिंधूताई सपकाळ, 300 वे चित्र खासदार श्रीनिवास पाटील,  500 वे चित्र उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील, 1000 वे चित्र समाजसेवक डाॅ.प्रकाश आमटे, 2000 वे चित्र अभिनेते सुबोध भावे, 3000 वे चित्र महंत स्वामी आबानंदगिरीजी महाराज, 5000 वे चित्र पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते तर 6000 वे चित्र हरीष पाटणे यांना दिले आहे. चित्रे भेट दिलेल्या उपक्रमांची नोंद इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये दोनदा तर हायरेेंज बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये एकदा झाली आहे. भविष्यात लिम्का बुक आॅफ रेकाॅर्ड व गिनीज बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये या उपक्रमाची नोंद होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्रकार व पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले आहे.

*सातारा जिल्ह्यातील 166 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;3 बाधितांचा मृत्यु**20 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 19 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

*सातारा जिल्ह्यातील 166 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;3 बाधितांचा मृत्यु*
*20 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 19 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
 
 सातारा दि.22 : जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 166 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *सातारा तालुक्यातील*  सातारा 3, रविवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, यादोगोपाळ पेठ 2, शाहुपूरी 1, शाहुनगर 2, रामाचागोट 3, करंजे 2, देगांव 1, गोडोली 2, संभाजीनगर 1, आर्वी 2, नागठाणे 3, मोरेवाडी 1, किडगांव 1, सासपाडे 1, कळंभे 1,सायगांव 1,
*कराड तालुक्यातील*  कराड 4, शुक्रवार पेठ 1, मलकापूर 1, उंब्रज 3,सुरली 1, वारुंजी 1, रुक्मीणीनगर 1, ओगलेवाडी 1, मसूर 1, किवळ 1, कलवडे 2, विद्यानगर 3,रेठरे बु. 2,कार्वेनाका 1,सैदापुर 1, आगाशीवनगर 1, चचेगांव 1,
          *पाटण तालुक्यातील* पाटण 1, बनपुरी 1, डेरवण 1, शिबेवाडी 1, ऐनाचीवाडी 1,
         *फलटण तालुक्यातील* लक्ष्मीनगर 2, गारपीरवाडी 1, राजुरी 5, अंदरुड 2,मुरुम 1,साखरवाडी 4, हिंगणगाव 1, कोळकी 2, तडवळे 1, धुळदेव 2,
          *खटाव तालुक्यातील* खटाव 2, कातरखटाव 3, वडुज 8, दातेवाडी 1, डांभेवाडी 2,जाखणगाव 1, सिध्देश्वर कुरोली 1,पुसेगांव 1, म्हासुर्णे 3, वांझोळी 2, बोंबाळे 1, बुध 1, 
           *माण  तालुक्यातील* राणंद 2, गोंदवले खु. 2, म्हसवड 4,देवपुर 1, मार्डी 1, पळशी 2, दहिवडी 2, बिजवडी 2, लोधवडे 1,   
           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 3, रहिमतपूर 6, वाठार कि. 1, सुरले 1, भादळे 1, खेड 1, कुमठे 1, एकसळ 1, वाठार स्टे. 1, एकंबे 1, ब्रम्हपुरी 1
  *जावली तालुक्यातील* सांगवी 4,
*वाई तालुक्यातील* वाई 2, उडतरे 1, रविवार पेठ 1, सह्याद्रीनगर 1, भुईंज 1,  
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, शिरवळ 2, लोणंद 3, नायगांव 1, भादे 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 3,
*इतर* पिपलवाडी 2, 
 
  *3 बाधितांचा मृत्यु*

 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  खटाव येथील 55 वर्षीय पुरुष व विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बिदाल ता. माण येथील 83 वर्षीय पुरष, बुधव ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, अशा एकूण  3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*20 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 19 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 20 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 19 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *19  जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 2 व  फलटण येथील 17, असे एकूण 19 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमुने -233425*
*एकूण बाधित -49732*  
*घरी सोडण्यात आलेले -47053*  
*मृत्यू -1681* 
 *उपचारार्थ रुग्ण-998* 
0000

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन घेणार निर्णय.- शिक्षणमंत्री

शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन घेणार निर्णय.- शिक्षणमंत्री
मुंबई, दि. २० : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे.कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

सातारा ; कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी ; नागरिकांनी सूचनाचे पालन करावे, अन्यथा कारवाई करणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा ; कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी ; नागरिकांनी सूचनाचे पालन करावे, अन्यथा कारवाई करणार
       - जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा दि.20  कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे तज्ञ सांगत आहेत. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यात धडक मोहिम पोलीस, नगर परिषद आणि विविध विभागांमार्फत राबविण्यात येणार आहेत. मोहिमेंतर्गत जे नागरिक, दुकानदार शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार नाहीत अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
 काही दुकानांमध्ये आजही गर्दी दिसत असून सुरक्षित अंतराचे पालन केले जात नाहीत अशी दुकाने 7 दिवस बंद करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. दुकानदारांनी आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच मास्क असल्यासच ग्राहकांना दुकानात प्रवेश देण्यात यावा तसेच दुकानात सुरक्षित अंतराचे पालन होईल याची देखील खबरदारी घ्यावी.
 कोरोना बाधिताच्या संसर्गात आलेले नागरिक टेस्टींग करण्यास विरोध करत आहेत खरबदारीचे उपाय म्हणून आरोग्य विभागाची टीम टेस्टींगसाठी आल्यास त्यांना विरोध करु नये संसर्ग पसरु नये म्हणून जिल्हा प्रशासन योग्य ती खरबदारी घेत आहे. यापुर्वी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य केले त्याचप्रमाणेही सहकार्य करावे. तसेच जे नागरिक बाधिताच्या संपर्कात आले आहेत त्यांनी पुढे येऊन आरोग्य विभागाशी संपर्क साधून आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी ही टेस्ट मोफत करण्यात येते. 
 कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात कमी आढळत असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही. कुणीही गैरसमजुतीमध्ये राहू नये. लस यायला आणखीन काही महिने लागतील लस आली तरी ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्याससही वेळ लागेल प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व हाताची स्वच्छता वारंवार केली पाहिजे. कुणी बाधिताच्या संपर्कात आल्यास त्यांनी तात्काळ आपली टेस्ट करुन घ्यावी तसेच आरोग्य यंत्रणा घरी आल्यास त्यांना सहकार्य करावे आपल्या बरोबर आपल्या आजुबाजुच्या वयोदृद्धांचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सातारा ; जिल्ह्यातील 107 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;11 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 107 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;11 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.20 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 107 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 3, राधिका रोड 1, करंजे 1, शाहुपुरी 2,  कृष्णानगर 4,   शाहुपरी 1,  तामाजाईनगर 1, सत्वशिलनगर 1, संभाजीनगर 1,   देगाव फाटा 1, शेरेवाडी 1, देगाव 1, पाडळी 1,  

कराड तालुक्यातील यशवंतनगर 1,  विद्यानगर 1, निगडी 1, जाखीनवाडी 1, ओंड 2, काले 2,   

पाटण तालुक्यातील पाटण 2,मुद्रुळकोळे 2, आंबले 2,  

 फलटण तालुक्यातील फलटण 2, लक्ष्मीनगर 2,मिरेवाडी 1, दारेचीवाडी 1, साखरवाडी 6, सुरवडी 1, तरडगाव 1    

 खटाव तालुक्यातील खटाव 2, दारुज 1,वेटने 1, म्हासुर्णे 1, कातरखटाव 1,  
          माण  तालुक्यातील बोराटेवाडी 1, गोंदवले बु 1, राणंद 2, मलवडी 1, गोंदवले खु 2,  
          कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, रहिमतपूर 9, दुधी 1, वाठार 1, सातारा रोड 1, कटापूर 1,अंभेरी 1, वाठार किरोली 1, अपशिंगे 1,एकसळ 1, कुमठे 1   
          जावली तालुक्यातील रायगाव 1, बीबवी 1, सांगवी कुडाळ 1,   
वाई तालुक्यातील रामढोह 1, आसले 2, भुईंज 1, 
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, नायगाव 1, 
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2, 
इतर 2 फडतरवाडी 1, रावडी 1,पिंपळवाडी 1, मुरुम 1,  
बाहेरील जिल्ह्यातील पेठ 1, पुणे 1,  
  11 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये धारपुडी ता. खटाव येथील 47 वर्षीय महिला, संगमनगर ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, अैनाचीवाडी ता. पाटण येथील 80 वर्षीय पुरुष, केंजळ ता. जावली येथील 80 वर्षीय पुरुष, वावरहिरे ता. माण येथील 51 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पर्यंती ता. माण 80 वर्षीय पुरुष, बोरखळ ता. सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ ता. सातारा येथील 56 वर्षीय पुरुष. रात्री उशिरा कळविलेले खेड ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, कोडोली ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 68 वर्षीय पुरुष अशा एकूण  11 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -225674
एकूण बाधित -49404  
घरी सोडण्यात आलेले -46654  
मृत्यू -1670 
 उपचारार्थ रुग्ण-1080

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

सातारा - जिल्ह्यातील 246 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;6 बाधितांचा मृत्यु

जिल्ह्यातील 246 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;6 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.19 : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 246 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 6 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

      सातारा तालुक्यातील सातारा 11, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, सदाशिव पेठ 1, चिंमणपुरा पेठ 1, व्यंकटपुरा पेठ 1,यादोगोपाळ पेठ 1,  सदरबझार 2, रामाचा गोट 1, कृष्णानगर 1, संभाजीनगर 2, विकासनगर 1, शाहुनगर 2, विसावा नाका 1,  कोडोली 1, गारपिरवाडी 1, वाखनवाडी 2, चिंचणेर 1,  विहे 1, खेड 2, करंजे 6, शिवथर 1, हिरापुर 1, देगाव 1,सैदापूर 1, दौलतनगर 2, भरतगाववाडी 1, वर्ये 1, वांगल 1,    

         कराड तालुक्यातील कराड 6,खराडे 1, वाघोली 1, मलकापूर 3, उंब्रज 1, आने 1, मसूर 2, वडगाव हवेली 4, मुंढे 1, पाल 1, 
पाटण तालुक्यातील पाटण 3, म्हावशी 1,  
        फलटण तालुक्यातील फलटण 2,मंगळवार पेठ 1, मेटकरी कॉलनी 3  शिवाजीनगर 1,  सुरवडी 1, तातवडा 1, वडले 1, विढणी 1, कोळकी 1, लक्ष्मीनगर फलटण 3, साखरवाडी 4, शेरेचीवाडी 7, तरडगाव 2, साखरवाडी 3,सुरवडी 1, चौधरवाडी 1, वडजल 2, कुरवली खु 1, धुळदेव 1, मिरेवाडी 1, 
         खटाव तालुक्यातील वडूज 10, वाकलवाडी 1, भुरकवाडी 1, कुरोली 1, ललगुण 6,  
          माण  तालुक्यातील बिदाल 1, दहिवडी 1, महिमानगड 1, म्हसवड 5, ढाकणी 1,    
          कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर 5, आर्वी 1, भोसे 1, जळगाव 1,न्हावी 1, वाठार 4,सुर्ली 4, रुई 1, ल्हासुर्णे 1, वाठार किरोली 11, बीचुकले 1    
          जावली तालुक्यातील मेढा 2, कुडाळ 1, मामुर्डी 4, नंदगाणे 1, सासपडे 1, सांगवी 1,  गंजे 1,  कुसुंबी 2,  दुंड 4, कुसंबी 1,आगलावेवाडी 20, सायगाव 1, करंजे 5
वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, भुईंज 1, कुंभारवाडी 1, 
खंडाळा तालुक्यातीलशिरवळ 1, खंडाळा 4, लोणंद 1,   
महाबळेश्वर तालुक्यातील राजापुरी 1, 
इतर 5, येनकुळ 1, गोरेगाव 1, वांजोळी 1, पानव 2,  
बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 1, बीड 1, 
  6 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  फलटण येथील 55 वर्षीय पुरुष, भुर्कावाडी ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये दहिवडी ता. माण येथील 43 वर्षीय पुरुष, पुळकोटी ता. माण येथील 75 वर्षीय महिला, बिदाल ता. माण येथील 68 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले सोमनाथआळी ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष अशा एकूण 6 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
एकूण नमुने -224033
एकूण बाधित -49297  
घरी सोडण्यात आलेले -45791  
मृत्यू -1659 
 उपचारार्थ रुग्ण-1847 

मराठा आरक्षण ; घटनापीठ स्थापनेसाठी राज्य सरकारचा चौथा अर्ज

मराठा आरक्षण ; घटनापीठ स्थापनेसाठी राज्य सरकारचा चौथा  अर्ज

मुंबई, दि. १८ : मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, याकरिता राज्य सरकारने चौथ्यांदा आपला अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला.

 नवी दिल्लीतील सरकारी वकील अॅड. सचिन पाटील यांनी हा अर्ज दाखल केला. राज्य सरकारने २० सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला अंतरिम आदेश स्थगित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या अर्जावर सुनावणी घेण्यासाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करणारा पहिला अर्ज ७ ऑक्टोबर, दुसरा अर्ज २८ ऑक्टोबर, तिसरा अर्ज २ नोव्हेंबर तर चौथा अर्ज १८ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आला.यापूर्वी २ नोव्हेंबरला मराठा आरक्षण प्रकरणी राज्य शासनाचे वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमक्ष तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकता विषद केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना केली होती. त्यावेळी या अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सूचित करण्यात आले होते. परंतु, अद्याप यासंदर्भात निर्णय झालेला नसल्याने राज्य शासनाने चौथ्यांदा अर्ज सादर केला आहे.

 

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 94 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;7 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 94 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;7 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.18 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
      सातारा तालुक्यातील सातारा 1, व्यंकटपुरा पेठ 1, सदरबझार 1, केसरकर पेठ 1, शाहुपुरी 1,  संभाजीनगर 1, गणेश नगर 1,  सासपडे 3, पाटखळ माथा 1, 
         कराड तालुक्यातील ओंड 1, कर्वे 2, रेठरे 1,  कोरेगाव 1, येळगाव 1, तळबीड 2, चोरे रोड कराड 2, आटके 4,  
         पाटण तालुक्यातील पाटण 1,कोयना नगर 1,  
        फलटण तालुक्यातील फलटण 2, दत्तनगर 1, बीबी 1, मुळीकवाडी 1, शेरेवाडी 1, निंभोरे 3, विढणी 1, आदरुड 1, शेरेचीवाडी 1, साखरवाडी 1, जाधवाडी 1, सुरुवडी 2,     
         खटाव तालुक्यातील खटाव 1,  पुसेगाव 5, बहुकरवाडी 1, वेटणे 3, राजापुर 1, चोराडे 1, निमसोड 1,   
          माण  तालुक्यातील दहिवडी 5, किरकसाल 1, पळशी 1, 
          कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली 4, नांदवड 1,किन्हई 1,आर्वी 1,सुर्ली 1, करंखोप 1, रहिमतपूर 2,चिलेवाडी 1, पिंपोडे बु 1,
          जावली तालुक्यातील भणंग 2, 
वाई तालुक्यातील दत्तनगर 1, कवटे 2, परखंदी 1, पांडे 2, सायगाव 1, सिद्ध्दनाथवाडी 2,भुईंज 1,  
खंडाळा तालुक्यातील तांबवे 1,  
इतर 3,गोरेगाव 1, झाशी 1, 
  7 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  रोहोत ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, आर्वी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये झरे ता. आटपाडी जि. सांगली येथील 69 वर्षीय पुरुष, अंबरवाडी ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, बिदाल ता. माण येथील 52 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले विठ्ठलवाडी ता. वाई येथील 79 वर्षीय पुरुष, नंदगाने ता. जावली येथील 62 वर्षीय महिला  अशा एकूण 7 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
एकूण नमुने -221761
एकूण बाधित -49051  
घरी सोडण्यात आलेले -44974  
मृत्यू -1653 
उपचारार्थ रुग्ण-2424

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 65 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 65 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्युसातारा दि.17 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 65 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 7,बुधवार पेठ 1, सदरबझार 1, ढोणे कॉलनी सातारा 1, करंजे 1, सर्वोदय कॉलनी 1, रविवार पेठ सातारा 4, एमआयडीसी सातारा 2, दिव्यनगरी 1, धावडशी 1, लिंब 1, कारंडी 1, शिवडी 1, लिंबाचीवाडी 1,

कराड तालुक्यातीलकराड 6, वडगाव 1, घारेवाडी 1, मलकापूर 3, कोयना वसाहत 1, विंग 1, .

पाटण तालुक्यातील पाटण 2, विहे 1, मोरगिरी 1, म्हावशी 1 .

फलटण तालुक्यातील साखरवाडी 2, .

खटाव तालुक्यातील पुसेगाव 2, वडूज 1, .
माण तालुक्यातील राणंद 1, .
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, .
जावली तालुक्यातील अखाडे 1, भणंग 1, बामणोली 1, केळघर 1, .
वाई तालुक्यातीलवाई 1, कवटे 1, .
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, खंडाळा 4, .
इतर नंदगाणे 3, .
3 बाधितांचा मृत्यु .
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दिव्यनगरी ता.

"दिलखुलास" कार्यक्रमात राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आज मुलाखत

"दिलखुलास" कार्यक्रमात राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आज मुलाखतमुंबई, दि. १६ – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘विकासाभिमुख निर्णय ‘ या विषयावर गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आणि पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. १७ व बुधवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या ॲपवर याच वेळेत ही मुलाखत ऐकता येईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

कुंभारगाव : सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर मोरेवाडी येथे आज केली घटस्थापना

कुंभारगाव : सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर मोरेवाडी येथे आज केली घटस्थापना

तळमावले / वार्ताहर

मोरेवाडी कुंभारगाव ता.पाटण येथील ग्रामदैवत सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर मोरेवाडी ता.पाटण आज (ता. 16) घटस्थापना करण्यात आली. आजपासून उपवासाला सुरुवात झाली उपवास काळातील 12 दिवस देवाला पोषाखाद्वारे वेगवेगळे रूप दिले जाते. बलिप्रतिपदा, दीपवाली पाडव्याला मंदिरामध्ये घटस्थापना करून उपवासाची सुरुवात होते व एकादशीला दि.26 नोव्हेंबर रोजी उपवासाची सांगता होणार आहे. अशी माहिती श्री.दिलीप घाडगे यांनी दिली.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात ते आठ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मंदिरे बंद आहेत; परंतु राज्य सरकारने आजपासून (साेमवार) मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली आहे.योगायोगाने आज श्री.सिद्धनाथ मंदिरात घटस्थापना करण्यात आली. सात महिन्यांपासून बंद असणारे मंदिर आज दिवाळी पाडव्याला उघडून घटस्थापना झाल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

अखेर मुहूर्त भेटला राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरे आणि प्रार्थनस्थळे या दिवशी उघडणार !

मुंबई दि.14.अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरे आणि प्रार्थनस्थळे उघडण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. मात्र भाविकांना यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हाट्सअप आणि ब्लॉगचा वापर - कृषिमंत्री दादाजी भुसे

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हाट्सअप आणि ब्लॉगचा वापर - कृषिमंत्री दादाजी भुसे

मुबई,  : राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाटसॲप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी येथे सांगितले.

 

राज्यात सुमारे ९ कोटी ३७ लाख मोबाईलधारक असल्याची बाब लक्षात घेवून कृषी विस्तार कार्यामध्ये ह्या बाबींचा फायदा होवू शकतो हे लक्षात घेऊन व्हॉटसॲपव्दारे कृषी विषयक योजना व अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची  सुविधा तयार करण्यात आली आहे.मातीत राबविणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आता ब्लॉग आणि व्हाटस्ॲपचा वापर करण्यात येत आहे.

 

मोबाईलवरून ८०१०५५०८७० या व्हाटस्ॲप क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’  शब्द टाईप करून पाठविणाऱ्या व्यक्तीस स्वागत संदेश प्राप्त होतो. ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द (की वर्डस् ) दिले आहेत. ते टाईप करून या व्हाटस्ॲप क्रमांकावर पाठविल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळते.सध्या या उपक्रमात कृषी विभागाच्या जवळपास २७ योजनांचा समावेश केला असून त्यात कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचाही समावेश करून त्यांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

 

विभागामार्फत योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी krushi-vibhag.blogspot.com हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे कृषी योजनेची व्याप्ती, लाभार्थी, निकष अनुदान व अर्ज कुठे करावा याबाबत माहिती देण्यात आली आहे.

*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत**जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर* *व्हिडीओग्राफी मध्ये कुंभारगावचे अनिल उत्तमराव देसाई यांच्या टीमने पटकवला द्वितीय क्रमांक*

*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत*
*जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर* 

*व्हिडीओग्राफी मध्ये कुंभारगावचे अनिल उत्तमराव देसाई यांच्या टीमने पटकवला द्वितीय क्रमांक*


फोटो ; शाॅर्ट फिल्म मधील एक दृश्य

सातारा :  माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये
कुंभारगांव (ता.पाटण) येथील श्री.अनिल उत्तमराव देसाई व त्यांचे सहकारी यांनी कोरोनाविषयी जनजागृती करणारी एक शाॅर्टफिल्म तयार केली होती. कोरोनाविषयक जनजागृती करण्याचे, कोरोनाची अनाठायी भिती लोकांच्या मनातून काढण्याचे काम ही शाॅर्टफिल्म करत आहे. शासनाच्या माझे कुटूंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यासाठी ही शाॅर्टफिल्म तयार केली. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या शाॅर्टफिल्म मध्ये रोगाची काळजी न करता स्वतःची काळजी घेतल्यास काही होत नाही असे दर्शवण्यात आले आहे  
ही शॉर्टफिल्म  सातारा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या व्हिडीओग्राफी स्पर्धांत पाठवण्यात आली होती यामध्ये प्रथम क्रमांक राकेश फासे, द्वितीय क्रमांक अनिल उत्तमराव देसाई, (कुंभारगाव )तृतीय क्रमांक वेदांतिका सपकाळ यांनी पटकवला आहे.
देसाई यांच्या या शाॅर्टफिल्म चे लेखन दिलीपराज चव्हाण(उंब्रज) यांनी केले आहे. तसेच अनिल देसाई, अशोक मोरे, महेश चाळके व पोपट चाळके यांनी कलावंत म्हणून काम केले आहे. तर कॅमेरामन म्हणून शंभूराज अनिल देसाई, युवराज लोटळे यांनी काम पाहिले आहे. या फिल्मसाठी ग्रामपंचायत कुंभारगांव, प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले मधील डाॅ.उमेश गोंजारी सर्व आरोग्य कर्मचारी आशा सेविका यांचे तसेच दै.कृष्णाकाठचे संपादक श्री.चंद्रकांत चव्हाण, डाॅ.संदीप डाकवे,प्रा. रमेश गुरव,राजेंद्र पुजारी,यांचे सहकार्य लाभले आहे.अनिल देसाई हे व्यवसायाने फोटोग्राफर आहेत. त्यांना कलावंताविषयी विशेष आदर आहे. त्यांनी विविध मालिकांच्या सेटवर जावून अनेक नामवंत कलावंतांना भेटी
घेतल्या आहेत. यामुळे आपणही काहीतरी करावे अशी इच्छा त्यांच्या मनात बरेच दिवस होती. ती इच्छा त्यांनी या शाॅर्टफिल्म च्या माध्यमातून पूर्ण केली या शाॅर्टफिल्मला सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व परिसरातून कौतुक होत आहे.

सर्व गटातील विजेते पुढीलप्रमाणे

वकृत्व स्पर्धा शालेय गट : प्रथम क्रमांक सानिका  बाबर चाफळ ता. पाटण, द्वितीय क्रमांक सिमरन   भोसले सायगाव ता. जावली तृतीय क्रमांक समीक्षा धायगुडे खंडाळा. महाविद्यालयीन गट प्रथम क्रमांक गौरी  शिंदे खंडाळा, द्वितीय क्रमांक सानिका घोळवे सातारा रोड ता. कोरेगाव, तृतीय क्रमांक श्रेया कणसे मायणी ता. खटाव. खुला प्रथक क्रमांक गट मनीष शिंदे वाई, द्वितीय क्रमांक अनुपमेय जाधव पाटण, तृतीय क्रमांक पुरुषोत्तम माने महाबळेश्वर.

 गीत गायन स्पर्धा : शालेय गट प्रथक क्रमांक सार्थक जाधव शिरवळ ता. खंडाळा, द्वितीय क्रमांक ओंकार कांबळे कराड, तृतीय क्रमांक वैष्णवी माने लिंब ता. सातारा. महाविद्यालय गट प्रथक क्रमांक सलोनी चौगुले सातारा, आकांक्षा इंदलकर शिरवळ ता. खंडाळा, तृतीय क्रमांक स्नेहा आंधळकर खटाव. खुला गट प्रथम क्रमांक अनुपमना दाभाडे मेढा ता. जावली, द्वितीय क्रमांक भारती पेठकर लोहाटे ता. वाई, तृतीय क्रमांक मिलिंद कांबळे विहे - नं 2 ता. पाटण.

 नाटीका स्पर्धा : शालेय  गट प्रथक क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हई ता. कोरेगाव, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोकाशी वस्ती ता. खंडाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकिव ता. जावली. महाविद्यालय गट प्रथम क्रमांक  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय खंडाळा. खुला गट प्रथक क्रमांक राजेंद्र खाडे व मित्रमंडळ माण.

 एकपात्री अभिनय स्पर्धा : शालेय गट प्रथम क्रमांक पूर्वा भोसले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हई ता. कोरेगाव, द्वितीय क्रमांक चंदना देशमुख गुरुवर्य गणपतराव काळगे विद्यालय मोरमांजरवाडी ता. खटाव, तृतीय क्रमांक संचिता बेलोशे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळघर ता. जावली. महाविद्यालयीन गट संचित भोसले महाराजा सयाजीराव विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सातारा, द्वितीय क्रमांक सिद्धी ढमाळ परमपुज्य बापुजी साळुंखे विद्यालय आसवली ता. खंडाळा, तृतीय क्रमांक मुस्कान सय्यद चं.व. पाटील विद्यालय सातारा रोड ता. कोरेगाव. खुला गट प्रथक क्रमांक अमितकुमार शेलार, ज्ञा.प्रा. शाळा कृष्णानगर ता. सातारा, द्वितीय क्रमांक अतुल नानोटकर जिल्हा परिषद शाळा सायगाव ता. जावली, तृतीय क्रमांक प्रवीण शीलवंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळई ता. माण.

 निबंध स्पर्धा : शालेय गट प्रथम क्रमांक  साई फडतरे छ.शिवाजी हायस्कूल वडूज, द्वितीय क्रमांक पृथ्वीराज रसाळ जिल्हा परिषद शाळा खर्शी ता. जावली, तृतीय क्रमांक आदिती चोरट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसगाव ता. सातारा. महाविद्यालय गट प्रथम क्रमांक श्रुती बर्गे शिवाजी महाविद्यालय मसूर ता. कराड, द्वितीय क्रमांक स्वरांजली पुंडेकर कात्रेश्वर महाविद्यालय कातरखटाव ता. खटाव, तृतीय क्रमांक सुश्मिता कलाल क्रांती विद्यालय सावली ता. जावली.

 प्रश्न मंजुषा स्पर्धा : शालेय गट प्रथम क्रमांक चंदना देशमुख, गु,ग, काळंगे विद्यालय मोळ ता. खटाव, द्वितीय क्रमांक अभिषेक जाधव म.स. विद्यालय सातारा, तृतीय क्रमांक सिमरन भोसले लोहिया विद्यालय सायगाव ता. जावली. महाविद्यालय गट प्रथम क्रमांक देवता पोतेकर म.स. विद्यालय व ज्यु . कॉ. सातारा, द्वितीय क्रमांक ऋतुजा साळुंखे हु.प. विद्या. व ज्यु कॉलेज वडूज ता. खटाव, तृतीय क्रमांक  मनीषा होवाळ न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज  अंदोरी ता. खंडाळा

 पोस्टर/रांगोळी स्पर्धा : शालेय गट प्रथम क्रमांक यशस्वी साळुंखे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार बु ता. खंडाळा, द्वितीय क्रमांक साक्षी भोसले नवचैतन्य हायस्कूल गोंदवले ता. माण, तृतीय क्रमांक पायल भोसले म. गांधी विद्यालय उंब्रज ता. कराड.

 भित्तीचित्रे व घोषवाक्य स्पर्धा : शालेय गट भाग्यश्री कोळीक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुखेड ता. खंडाळा, द्वितीय क्रमांक निरज जाधव मेरु विद्यामंदिर वाघेश्वर ता. जावली, तृतीय क्रमांक अथर्व पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरफळ ता. सातारा.
 फोटो स्पर्धा : प्रथक क्रमांक जावेद खान, द्वितीय क्रमांक मंगेश चिकणे तृतीय क्रमांक गणेश गुरव.

तळमावले ; डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटल्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या 54 भावमुद्रा

तळमावले ; डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटल्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या 54 भावमुद्रातळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या तब्बल 54 विविध भावमुद्रा रेखाटून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे. यंदा कोविड-19 च्या पाश्र्वभूमीवर ना.देसाई हे वाढदिवस साजरा करणार नाहीत. परंतू त्यांच्यावर प्रेम करणारे डाॅ.संदीप डाकवे यांनी त्यांची विविध भावमुद्रा रेखाटून त्याचे प्रदर्शन भरवणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे. याची नोंद इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड कडे होण्यासाठी डाॅ.डाकवे यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे.

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

सातारा ;जिल्ह्यातील 149 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु

सातारा ;जिल्ह्यातील 149 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु

सातारा दि.13 : जिल्ह्यात काल गुरुवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 149 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 2, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, करंजे 5, यादोगोपाळ पेठ 2, गोडोली 1, विलासपूर 1, विकासनगर 2, क्षेत्र माहुली 1, आसनगाव 1, शाहुपुरी 4, देगाव 1,वडगाव 1, बोते 1, मुळीकवाडी 1, पळशी 1, वेळेकामटी 1, मोळाचा ओढा सातारा 3, जिहे 1, सदरे खुर्द 1, वेण्णानगर 1, राजसपुरा पेठ सातारा 2, कृष्णानगर सातारा 1, वेतने 2, गोजेगाव 1, .
कराड तालुक्यातील कराड 4, आगाशिवनगर 2, इंदावली 1, बेलवडे 1, सुपने 2, .
पाटण तालुक्यातील बादेवाडी 2, हेळगाव 1,दिवशी 1, धामणी 1, .

फलटण तालुक्यातील नरसोबानगर 1, खुंटे 1, जाधववाडी 1, उपळे 1,मलटण 1, ब्राम्हण गल्ली 1, आसु 1, शेरेचीवाडी 1, होळ 1, सुरवडी 2, .
खटाव तालुक्यातील मायणी 2, खटाव 1, लांडेवाडी 1, पिंपरी 1, बुध 1, वडूज 6, सिंहगडवाडी 1, पुसेगाव 5, भुरकवाडी 1, .
माण तालुक्यातील म्हसवड 3, कुक्कुडवाड 1, निढळ 1, बिदाल 2, वडगाव 2, राणंद 2, .
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, लक्ष्मीनगर 1, वर्णे 1, चिलेवाडी 2,रहिमतपूर 11, .
जावली तालुक्यातील मेढा 1, बामणोली 1, .
वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1, सुरुर 1, वेळे 2, पाचवड 1, व्याजवाडी 1, धर्मपुरी 2, नव्याचीवाडी 1, बावधन 1, .
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1, .
इतर 1, शिंदेघर 14, मामुर्डी 1, .
बाहेरी जिल्ह्यातील पुणे 2, पिंपरी 1, .
* 5 बाधितांचा मृत्यु* .
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये देगाव ता.

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीजेची भेट : महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीजेची भेट : महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 12 : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहोचवणे तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे; त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.राज्यात 93 हजार 348 अंगणवाडी सेविका, 88 हजार 353 अंगणवाडी मदतनीस व 11 हजार 341 मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2 हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे.यासाठी 38 कोटी 61 लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.

 

मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असताना दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचविला. स्थलांतरित मजूरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला.

 

कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जाऊन महत्त्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा शासनाला अभिमान आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असेही मंत्री अॅड.ठाकूर म्हणाल्या.


खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा -कृषीमंत्री दादाजी भुसे

खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा -कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 12 : खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा. त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

कृषी विभागातील विषयनिहाय आढावा बैठक नुकतीच कृषीमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्यासह राज्यातील संचालक, सर्व विभागीय कृषी सहसंचालक उपस्थित होते.या बैठकीत ‘विकेल ते पिकेल’ अभियान, कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना करणे याबाबतचा आढावा घेण्यात आला.राज्यात मोठ्या प्रमाणात अन्न प्रक्रिया उद्योग सुरू असून त्यांचा तपशील विभागाकडे असणे आवश्यक आहे.

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

*अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी ना नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची पुनर्नियुक्ती करावी-पाटण तालुक्यातील मराठा समाज आक्रमक*

*अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी ना नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची पुनर्नियुक्ती करावी-पाटण तालुक्यातील मराठा समाज आक्रमक*

पाटण / वार्ताहर
दि.12 पाटण :राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी ना नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेबांची पुनर्नियुक्ती करावी यासाठी पाटण तालुक्यातील महामंडळाचे लाभार्थी तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने आज पाटण येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले,
साहेबांची नियुक्ती रद्द केल्याने पाटण तालुक्यात मराठा समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे, साहेबांची मराठा समाजाविषयी असणारी तळमळ व त्यांची महामंडळाचे अध्यक्ष असताना केलेल्या प्रामाणिक कामाची पद्धत बघता या पदावर राज्य शासनाने त्यांची सन्मानाने नियुक्ती करावी यासंबंधीची मागणी पाटण तालुक्यातून होत आहे .

तळमावले ; काटेकर परिवाराचा आकाश कंदील करतोय जनजागृती

तळमावले ; काटेकर परिवाराचा आकाश कंदील करतोय जनजागृती

तळमावले/वार्ताहर
ता. पाटण : अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणून दिपावलीकडे पाहिले जाते. हा सण सर्वत्र मोठया उत्साहात साजरा होता. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात.उंच जागी आकाश कंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. घराघरात फराळाची रेलचेल पाहायला मिळते. पावसाळा संपून नवीन पीके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य व्दादशी ते कार्तिक शुध्द व्दितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे आॅक्टोंबर नोव्हेंबर दरम्यान येत असतो.

सातारा ; जिल्ह्यातील 175 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 175 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

सातारा दि.12 : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 175 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1, मंगळवार पेठ 5, रविवार पेठ 1, लोहार गल्ली सातारा 1, सदरबझार 2, शाहुपुरी 4, कोडोली 2, संभाजीनगर 1, गोजेगाव 3, कळंबे 2, दिव्यनगरी सातारा 3, गोवे 1, कोंढवे 1, मोरेगाव 1, वर्णे 3, वेणेगाव 1, यादोगोपाळ पेठ सातारा 1, चोराडे 1, .
कराड तालुक्यातील कराड 4, पोटले 2, कोर्टी 1, मलकापूर 2, कोयना वसाहत 2, उंब्रज 1, कोळे 6, सुरली 1, .
पाटण तालुक्यातील तारळे 6, .
फलटण तालुक्यातील महतपुरा पेठ 1, कसबा पेठ 1, लक्ष्मीनगर 2, खामगाव 4, मुरुम 1, वेळोशी 1, काळज 1,सुरवडी 2,हिंगणगाव 2, .
खटाव तालुक्यातील गोरेगाव 1, मायणी 1, काटेवाडी 3, राजापुर 1, वडूज 10, गुरसाळे 1, औंध 2, पुसेगाव 2,दारुज 5, पुसेसावळी 1, म्हासुर्णे 4,मायणी 1, .
माण तालुक्यातील म्हसवड 8, दहिवडी 1,पळशी 1,गोंदवले खुर्द 1, बिदाल 2, .
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 8, हिवरे 1, रहिमतपूर 7, चिमणगाव 1,पिंपरी 1, आर्वी 2, ल्हासुर्णे 1, सातारा रोड 1, .
जावली तालुक्यातील कुडाळ 5, मेढा 3, बामणोली 2, रायगाव 3, .
वाई तालुक्यातील रविवार पेठ 3,वेळे 1, कनुर 1, .
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, विंग 1, झगलवाडी 1, .
*इतर*2, पिंपळवाडी 1, शिंदेघर 7,शिंगणवाडी 1, विठ्ठलवाडी 3, .
3 बाधितांचा मृत्यु .
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कर्वे ता.

राज्यात 19 नोव्हेंबरपासून ‘कौमी एकता सप्ताह’

राज्यात 19 नोव्हेंबरपासून ‘कौमी एकता सप्ताह’ 

सामाजिक सौहार्द वाढविण्याच्या दृष्टीने सहभागी होण्याचे मंत्री नवाब मलिक यांचे आवाहन

मुंबई, दि. 11 : राज्यात येत्या 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान ‘कौमी एकता सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी घेत विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सामाजिक सौहार्द वाढविण्याच्या दृष्टीने सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री  नवाब मलिक यांनी केले आहे.

 

या सप्ताहांतर्गत गुरूवार 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जाईल.यामध्ये  धर्मनिरपेक्षता, जातीयवाद विरोध व अहिंसा यावर भर देणाऱ्या सभा, चर्चासत्रे व परिसंवादाचे ऑनलाईन किंवा वेबिनारद्वारे आयोजन करण्यात येईल. शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवस साजरा केला जाईल. अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमावर भर देण्यात यावा, तसेच कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षी मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

शनिवार 21 नोव्हेंबर रोजी भाषिक सुसंवाद दिवस साजरा करण्यात येईल. भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेच्या वारशाचा परिचय करुन देण्याच्या दृष्टीने ऑनलाईन किंवा वेबिनारद्वारे विशेष वाङमयीन कार्यक्रम व कवी संमेलने आयोजित करण्यात येतील. रविवार 22 नोव्हेंबर रोजी दुर्बल घटक दिवस साजरा करण्यात येईल. यामध्ये 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीमधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने ऑनलाईन किंवा वेबिनार आयोजित करण्यात येतील. सोमवार 23 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक एकता दिवस साजरा करण्यात येणार आहे. भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि सांस्कृतिक संरक्षण व एकात्मतेसंबंधीची भारतीय परंपरा सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. मंगळवार 24 नोव्हेंबर हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येईल. भारतीय समाजातील महिलांचे महत्त्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. बुधवार 25 नोव्हेंबर हा जोपासना दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देणारे मेळावे व कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. सर्व कार्यक्रम आयोजित करताना केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-19 च्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घ्यावयाची आहे. राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व कार्यालयातून ही शपथ घेण्याचा कार्यक्रम राबविण्यात यावा. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागेवर उभे राहून किंवा प्रांगणात सामाजिक अंतर ठेवून शपथ घ्यावी. तसेच भित्तीपत्रके, फलक यांच्यावर ठसठशीत असे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिकचिन्ह प्रदर्शित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळा बंद असल्याने तेथे यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तसेच स्वयंसेवी संस्थांनी करावयाचे कार्यक्रम त्यांच्या सोयीने करण्याची त्यांना मोकळीक आहे.

 

याबरोबरच केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने कौमी एकता सप्ताहामध्ये ‘सांप्रदायिक सदभावना मोहीम निधी संकलन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. 25 नोव्हेंबर, 2020 रोजी ‘ध्वजदिन साजरा’ करण्यात येणार आहे. ध्वजदिनाचा निधी संकलित करण्याकरिता व संकलित केलेला निधी राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्याकडे सुपूर्द करण्याकरिता अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...