सोमवार, १६ मार्च, २०२०

जेव्हा कुणीच नसतं तेव्हा फक्त शरद पवारच असतात

मुंबई :- सोशल मीडियावरील 'कोरोना'विषयक अफवांमुळे राज्यातील पोल्ट्री उद्योग मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी श्री. पवार यांनी पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रश्नी श्री. पवार पुढील आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची असोसिएशनच्या शिष्टमंडळाशी भेट घडवून आणणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे सचिव उद्धव अहिरे यांनी दिली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये नुकतीच पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आमदार रोहित पवार तसेच श्री.पवार यांची असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन समस्यांबाबत चर्चा केली. २००६ मध्ये बर्ड फ्लूने मोठे थैमान घातले होते. त्या वेळी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीतून केंद्र व राज्य सरकारने मदत दिली होती. अशाच मदतीची आता अपेक्षा आहे. 
बर्ड फ्लूच्या धर्तीवर पोल्ट्री व्यावसायिकांना मदत करण्यासाठी समिती स्थापन करावी, पोल्ट्री व्यावसायिकांवरील आपत्ती ही राष्ट्रीय असल्याने अनुदानातील भार उचलावा, अशी विनंती या वेळी करण्यात आली. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष सी.वसंतकुमार, उपाध्यक्ष श्रीकृष्ण गांगुर्डे, राजेंद्र थोरात, नबाजी काळभोर, पांडुरंग सांडभोर, डॉ. प्रसन्न पेडगावकर, श्‍याम भगत आदी चर्चेत सहभागी झाले होते
  • प्रमुख मागण्या :
  • सरकारने प्रतिपक्षी १०० रुपये नुकसानभरपाई अनुदान द्यावे.
  • वीजबिले माफ करण्यात यावीत.
  • शालेय मध्यान्ह भोजनात अंडी समाविष्ट करण्यात यावी.
  • ग्रामपंचायत स्तरावरील व्यवसायाचा कर माफ करण्यात यावा.
  • राज्य शासनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसायास अर्थसहाय्य करणाऱ्या आर्थिक संस्थांना खेळत्या भांडवलाचे पुनर्गठन करून दीर्घकालीन भांडवली कर्जमध्ये करून एक वर्षाचा अधिस्थगन कालावधी द्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...