संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१
तळमावले : जनसहकार निधी लिमिटेड संस्थेला खा. श्रीनिवासजी पाटील यांची सदिच्छा भेट
राज्य सरकारची नवी नियमावली :लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा.
राज्य सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सांगतानाच हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
काय आहेत नवे निर्बंध?
1. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी
2. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
3. अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
4. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू
5. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा
6. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.
गर्दी टाळा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केलं.
गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१
*सातारा : हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे निर्देश*
सातारा : हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे निर्देशसातारा दि. 30 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे जे नागरिक पालन करीत नाहीत अशांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. जे हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
कोविड -19 प्रादुर्भाव नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील खासगी आस्थापनांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जे खासगी आस्थापना नियमांचे पालन करणार नाही अशांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
पोलीस विभागाने ज्या ठिकाणी विवाह व सार्वजनिक समारंभ होत आहे तेथे भेट देवून तपासणी करावी. नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश देण्यात यावा. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आत्तापासून सर्व साधन सामुग्री व आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
धक्कादायक! ढेबेवाडी : 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, गळा दाबून केला खून आरोपी गजाआड
बुधवार, २९ डिसेंबर, २०२१
*सातारा : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोकसभा मतदारसंघातील गावांसाठी 9 कोटीचा निधी मंजूर*
सातारा :बोगस डॉक्टरांचे दवाखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करा-जिल्हाधिकारी शेखर सिंह
*सातारा : 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सोमवार व शुक्रवार लसीकरण होणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह*
सातारा : 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सोमवार व शुक्रवार लसीकरण होणार
- जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा दि. 29 : येत्या 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ही लस सर्व प्राथामिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दर सोमवार व शुक्रवार या दोन्ही वारी लसीकरण होणार आहे. या लसीकरणाचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील युवक-युवतींना कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या लसीकरणापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी पालक, शाळा व महाविद्यालय व्यवस्थापकांनी जबाबदारी घ्यावी.
ओमिक्रॉन या संसर्गाबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. घराच्या बाहेर पडताना प्रत्येक नागरिकांने मास्कचा वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. ज्या खासगी आस्थापना शासनाने व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहेत अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. भविष्यात कारवाईला गती देण्यात येणार आहे.
ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत लसीचा एकही डोस घेतला नाही अशांनी प्राधान्याने पहिला डोस घ्यावा. तसेच ज्यांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेतला नाही अशांनीही दुसरा डोस घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...