शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

तळमावले : जनसहकार निधी लिमिटेड संस्थेला खा. श्रीनिवासजी पाटील यांची सदिच्छा भेट

तळमावले : जनसहकार निधी लिमिटेड संस्थेला खा. श्रीनिवासजी पाटील यांची सदिच्छा भेट 
तळमावले : दि.31 रोजी सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवासजी पाटील यांनी जनसहकार निधी लिमिटेड तळमावले ला सदिच्छ भेट दिली.यावेळी संस्थेच्या कामाची विस्तृत माहिती घेत संस्थेतील ठेवी व योजनांचा आढावा घेतला यावेळी संस्थेच्या सर्व संचालक,सल्लागार व सेवक वर्ग यांच्याशी चर्चा केली
आणि त्यांच्या कामाची सुस्ती केली. 

या भेटीदरम्यान विभागातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, व्यापारी वर्ग व विभागातील इतर मान्यवर व उपस्थितांची आपल्या परिसरातील विकासकामाची निवेदने घेऊन ती पूर्ण करण्याचे आश्वासन खा.श्रीनिवास पाटील साहेबांनी दिले व सर्व कार्यकर्ते यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच मौजे काढणे गावचे विद्यमान सरपंच श्री.सुरज चक्के यांचा केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मौजे ग्रामपंचायत चिखलेवाडी(कुंभारगाव), करपेवाडी, मानेगाव, काढणे, तळमावले, मोरेवाडी(कुठरे), वाझोली येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य सरकारची नवी नियमावली :लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा.

राज्य सरकारची नवी नियमावली :लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव  पुन्हा एकदा वाढतोय. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.तर राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून  30 डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

राज्य सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सांगतानाच हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

काय आहेत नवे निर्बंध?

1. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी

2. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

3. अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

4. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू

5. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा

6. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.

गर्दी टाळा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केलं.

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

*सातारा : हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे निर्देश*

सातारा : हॉटेल, रेस्टॉरंट  नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे निर्देश

सातारा दि. 30  :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे जे नागरिक पालन करीत नाहीत अशांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर  हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. जे हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर पोलीस विभागाने  कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

कोविड -19 प्रादुर्भाव नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या  बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 जिल्ह्यातील खासगी आस्थापनांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जे खासगी आस्थापना नियमांचे पालन करणार नाही अशांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.

 

  पोलीस विभागाने ज्या ठिकाणी विवाह  व सार्वजनिक समारंभ होत आहे तेथे भेट देवून तपासणी करावी. नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश देण्यात यावा.  तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आत्तापासून सर्व साधन सामुग्री व आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.  

धक्कादायक! ढेबेवाडी : 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, गळा दाबून केला खून आरोपी गजाआड

ढेबेवाडी :धक्कादायक! 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, गळा दाबून केला खून आरोपी गजाआड
प्रतिनिधी :दीपक सुर्वे
ढेबेवाडी :ता. पाटण येथील सुतारवाडी ( रुवले) येथे काल, बुधवार दि.29 रोजी दुपारच्या सुमारास सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला.तिचा मृतदेह जवळच असलेल्या डोंगरातील ओढ्यात टाकून देण्यात आला होता. आज, गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ढेबेवाडी पोलिसांनी आरोपीच्या  अटक केली आहे. संतोष थोरात (वय .48 रा. रुवले) असे आरोपीचे नाव आहे. ढेबेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष थोरात याने काल, बुधवारी दुपारी अल्पवयीन मुलीस सोबत घेऊन रानात वैरण आणण्यासाठी नेले होते.हा नराधम तिच्या ओळखीचा असल्याने मुलगी त्याच्याबरोबर रानात गेली तेथे गेल्यावर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला .आणि  नरड्यावर पाय देऊन त्याने तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह डोंगरातील ओढ्यात टाकून तो घरी आला. सायंकाळी घरातील लोकांनी मुलगी घरी आली नाही, म्हणून शोधाशोध केली. मात्र ती सापडली नाही. ग्रामस्थांनी परिसरात शोध घेऊनही ती  सापडली नाही. म्हणून ढेबेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना संतोष थोरात याच्या हालचाली संशयास्पद  वाटल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी गावातील नथुराम सुतार यांनी घरावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता आरोपी त्या अल्पवयीन मुलीला घेवून गेल्याचे दिसून आल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला. त्यानंतर मुलीला ज्या ठिकाणी मारुन टाकले होते ते ठिकाण दाखवले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी कराड येथील रुग्णालयात पाठवला होता 
शवविच्छेदन झाल्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आज दुपारी 3 वाजता पार्थिवावर अंतिमसंस्कार  करण्यात आले . या घटनेने गावात तणावाचे वातावरण आहे.
घटनास्थळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई,जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपअधीक्षक रणजित पाटील यांनी भेट देवून तपासकामी पोलिसांना सूचना दिल्या.

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

*सातारा : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोकसभा मतदारसंघातील गावांसाठी 9 कोटीचा निधी मंजूर*

*जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील गावांसाठी 9 कोटीचा निधी मंजूर*

कराड: प्रतिनिधी
 खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन 2021- 22 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील गावांसाठी 9 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारात्मक पुर्नजोडणी करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती येणार आहे. 
    कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारात्मक पुर्नजोडणी करण्याच्या कामासाठी 24 लाख 71 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याच पध्दतीच्या कामानुसार अंबवडे ( संमत) कोरेगाव येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 44 लाख 8 हजार,
      सातारा तालुक्यातील  खोडद येथील योजनेसाठी 29 लाख 86 हजार, चिंचनेर (सं) निंब येथील योजनेसाठी 59 लाख 85 हजार, बोरगाव येथील योजनेसाठी 1 कोटी 63 लाख 9 हजार,
     कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथील योजनेसाठी 1 कोटी 11 लाख 44 हजार, हेळगाव येथील योजनेसाठी 1 कोटी 21 लाख 15 हजार, कामथी येथील योजनेसाठी 40 लाख 67 हजार, शामगाव येथील योजनेसाठी 42 लाख 4 हजार, शेळकेवाडी (म्हासोली) येथील योजनेसाठी 24 लाख 98 हजार, शिंदेवाडी (विंग) योजनेसाठी 24 लाख 95 हजार, भवानवाडी येथील योजनेसाठी 23 लाख, पाचुंद येथील योजनेसाठी 23 लाख 65 हजार, 
    पाटण तालुक्यातील नुने येथील योजनेसाठी 1 कोटी 15 लाख 93 हजार, कुठरे येथील योजनेसाठी 24 लाख 66 हजार, बहुले येथील योजनेसाठी 24 लाख 21 हजार, चाळकेवाडी येथील योजनेसाठी 18 लाख 63 हजार, कळकेवाडी येथील योजनेसाठी 15 लाख 91 हजार, घोटील वरचे येथील योजनेसाठी 24 लाख 68 हजार, लुगडेवाडी येथील योजनेसाठी 23 लाख 73 हजार, आंबळे येथील योजनेसाठी 20 लाख 95 हजार असा भरीव निधी मंजूर झाल्याने  नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सातारा :बोगस डॉक्टरांचे दवाखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करा-जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा :बोगस डॉक्टरांचे दवाखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करा-जिल्हाधिकारी शेखर सिंह 
सातारा दि. 29 : अनधिकृत वैद्यकीय व्यावसायीक प्रतिबंधक व कार्यवाही समितीची सभा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली.

या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिथुन पवार यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

बोगस वैद्यकीय व्यवसायीकांनी औषधे दिल्यामुळे रुग्णांचे शारिरीक नुकसान होऊ शकते. काही रुग्णांना कायमचे दिव्यांगत्व येते. तर अनेकदा रुग्णांना प्राण गमवावा लागतो. तरी शहरी व ग्रामीण भागातील बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या यावेळी केल्या.

*सातारा : 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सोमवार व शुक्रवार लसीकरण होणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह*

सातारा : 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सोमवार व शुक्रवार लसीकरण होणार

       - जिल्हाधिकारी शेखर सिंह 

 सातारा दि. 29 :   येत्या 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ही लस सर्व प्राथामिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय या ठिकाणी  दर सोमवार व शुक्रवार या दोन्ही वारी लसीकरण होणार आहे. या लसीकरणाचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

 

  सातारा जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील युवक-युवतींना कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या लसीकरणापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी पालक, शाळा व महाविद्यालय व्यवस्थापकांनी जबाबदारी घ्यावी.

 

   ओमिक्रॉन या संसर्गाबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. घराच्या बाहेर पडताना प्रत्येक नागरिकांने मास्कचा वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. ज्या खासगी आस्थापना शासनाने व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहेत अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. भविष्यात कारवाईला गती देण्यात येणार आहे.

 ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत लसीचा एकही डोस घेतला नाही अशांनी प्राधान्याने पहिला डोस घ्यावा. तसेच ज्यांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेतला नाही अशांनीही दुसरा डोस घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...