रविवार, २ जानेवारी, २०२२

*कराड : शहरातील नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण*

 *कराड : शहरातील नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण* 
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास भेट दिली. 

 *कराड:* माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली व या प्रकल्पाची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून घेतली. यावेळी स्वच्छता दूतांचा सत्कार करण्यात आला तसेच या सर्वांशी आ. चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, राहुल चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, आमिर कटापुरे, झाकीर पठाण, भास्कर देवकर, विजय मुठेकर, अशोकराव पाटील आदीसह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

 *यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* शहरासाठी कचरा व्यवस्थापन हि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. शहराच्या दृष्टीने चांगले आरोग्य राहावे यासाठी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट, शहरासाठी स्वच्छ २४ तास पिण्याचे पाणी, यासह सांडपाणी नदीला न सोडता त्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा उपयुक्त असा वापर करणे महत्वाचे आहे. शहराच्या महत्वाच्या बाबीसाठी याआधी सुद्धा मोठा निधी आणला होता आता सुद्धा आणला जाईल. 

कचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक यांत्रिकी पद्धतीने होण्यासाठी तसेच शहरातील महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुख्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा त्यानुसार शासनस्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असेही यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

------------------------------------------------

*एकनाथ गायकवाड फाऊंडेशन च्या माध्यमातून घोगाव गावाला मिळणार पिण्यासाठी शुध्द पाणी*

*एकनाथ  गायकवाड  फाऊंडेशन  च्या माध्यमातून  घोगाव गावाला  मिळणार  पिण्यासाठी शुध्द पाणी* 
कराड प्रतिनिधी : महाराष्ट् राज्याच्या  शालेय शिक्षणमंञी ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्या आशिँवादाने व  घोगाव गावचे सुपुञ भिमराव धुळप (पञकार) यांच्या  विशेष प्रयत्नातून जल शुध्ददीकरण मशीन  कामाचा शुभारंभ लोकनेते स्वर्गीय एकनाथ गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी १ जानेवारीला मौजे घोगाव श्री बाळसिद्ध मंदिर येते संपन्न  झाला.एकनाथ गायकवाड  फाऊंडेशन  यांच्या सौजन्याने  या  लोकांच्या  आरोग्याच्या दृष्टीने  गरजेच्या असणाऱ्या या  कामासाठी 2 लाख 85 हजार रुपये निधी  उपलब्ध झाला यामुळे गावातील नागरिकांना   शुध्द  पिण्याचे पाणी मिळणार आहे. लोकांनी  समाधान व्यक्त  केले.यावेळी स्वर्गीय गायकवाड यांच्या घोगाव गावी भेटी दिल्याच्या आठवणी काढण्यात आल्या. व वर्षाताई सुद्धा वडिलांचा वारसा जयंतीदिनी पाण्याच्या पुण्याच्या कामाने कार्यरत केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचेही आभार मानले.  यावेळी  कार्यक्रमासाठी   कराड दक्षिण  काॕग्रेस चे प्रवक्ते  पै.तानाजी चवरे (आप्पा) पं,सं.सदस्य ,काशिनाथ कारंडे  घोगाव गावच्या सरपंच सौ.सीमा पाटील,उपसरपंच निवास शेवाळे,आणि सदस्य,पोलिस पाटील शिवाजी पाटील, समाजसेवक एकनाथ तांबवेकर, संजय भावके,नानासो भावके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक.ग्रामसेवक शिवाजी जाधव यांनी केले तर आभार नानासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केले.

शनिवार, १ जानेवारी, २०२२

कराड : येळगाव व गोटेवाडी बंधा-यांच्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना दिलासा भूसंपादन मोबदल्यापोटी 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी वर्ग खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

येळगाव व गोटेवाडी बंधा-यांच्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना दिलासा भूसंपादन मोबदल्यापोटी 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी वर्ग खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश
कराड : प्रतिनिधी 
    खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथील बंधा-यांच्या भूसंपादन मोबदल्यापोटी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी सातारा विभागाकडे वर्ग केला आहे. हा निधी मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथे जलसंधारण विभागाकडून सुमारे 38 हेक्टर हद्दीत जमिन भूसंपादन करून बंधारा बांधला आहे. यासाठी स्थानिक शेतक-यांची जमिन संपादित करण्यात आली असून भूसंपादित शेतक-यांसाठी निधीही मंजूर करण्यात आले असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. सन 2010 ला सुरूवात झालेला हा प्रकल्प 2014 साली ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण झाला आहे. मात्र संबंधित भूसंपादित शेतक-यांना अद्याप त्याचा मोबदला मिळालेला नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी होती. यासंदर्भात संबंधित शेतक-यांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन हा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली होती. 
    या मागणीची तात्काळ दखल घेत खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि महाराष्ट्र जलसंधारण विभागाचे कार्यकारी संचालक सुनिल कुशिरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून शेतक-यांना हा मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली होती. तर खा.श्रीनिवास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येळगावचे सरंपच मन्सुर इनामदार, गोटेवाडीचे सरपंच डाॅ.विलासराव आमले, येळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन साळुंखे, पत्रकार बाळकृष्ण कुंभार, सुरेश पाटील व सर्जेराव शेवाळे यांनी सुनिल कुशिरे यांची भेट घेतली होती. भेटीदरम्यान मोबदल्यापोटी निधी संदर्भात व तलावाच्या अनुशंगाने अन्य प्रलंबित समस्या बाबत निवेदन देण्यात आले होते. खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून सदर शेतक-यांना मोबदल्यापोटी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2 कोटी 33 लाख 37 हजार 661 रूपयाचा धनादेश मंजूर झाल्याचे सुनिल कुशिरे यांनी खा.पाटील यांच्या कार्यालयास कळविले आहे. हा निधी वर्ग झाल्याने येळगाव व गोटेवाडी बंधा-यांच्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल संबंधित शेतक-यांनी खा.श्रीनिवास पाटील यांचे आभार मानले आहेत.

तळमावले :मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती संस्थेच्या दिनदर्शिकीचे प्रकाशन

तळमावले :मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती संस्थेच्या दिनदर्शिकीचे प्रकाशन

तळमावले दि.1 सरत्या वर्षाला निरोप देत आता २०२२ या नव्या वर्षासाठी सारं जग सज्ज झालं आहे.  कोरोनाच्या  संकटामुळे गेली दोन वर्ष  फारच वेगळ्या पद्धतीने सगळ्यांनाच जगावं लागलं. त्यामुळे आता २०२२ च्या पहिल्या दिवशी  या नव्या वर्षात हे संकट दूर होऊन नव्या वर्षाच्या आगमनाची सुरुवात चांगली व्हावी या पार्श्वभूमीवर   तळमावले  येथील मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती संस्थेच्या माध्यमातून नवीन वर्षावर दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.   

           या वेळी संस्थापक अध्यक्ष अनिल शिंदे साहेब चेअरमन ज्ञानदेव जाधव ,व्हा.चेअरमन सर्जेराव नलवडे,,संचालक डॉ चंद्रकांत बोत्रे,प्रकाश देसाई, प्रकाश करपे,गणेश कोळेकर,अनिल माने,सुरेश देसाई,बाबासो तडाखे,लक्ष्मण मत्रे,अंजना सुर्वे,रामचंद्र कदम,ओंकार शिंदे,संस्थेचे  व्यवस्थापक दिलीप गुंझाळकर,उपव्यवस्थापक शरद शिंदे व आदी सेवक वर्ग उपस्थित होते.

मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणानिर्णय तात्काळ अंमलात आणण्याच्या प्रशासनाला सूचना

मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

निर्णय तात्काळ अंमलात आणण्याच्या प्रशासनाला सूचना

मुंबई दि 1: नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.

या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सुविधा देतांना आपल्याला मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकासकामांमध्ये मोलाचे योगदान देतो. कष्टकऱ्यांच्या घामातून ही मुंबई उभारली आहे हे आम्ही विसरता काम नये. 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करणे हे महत्त्वाचे वचन पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे दिवसरात्र पालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन मुंबईतील विकासकामांची पाहणी करतात असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

कुठरे : श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

कुठरे : श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

कुठरे ता.पाटण दिनांक ३० रोजी पवारवाडी कुठरे  येथे श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने येणाऱ्या नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
  पवारवाडी गावातील सर्व महिला,सौभाग्यवती यांच्या हस्ते प्रकाशन करून आम्ही एक आगळावेगळा आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पवार घराण्याची महती, माहिती आणि व्याप्ती समस्त जनसमुदायास सांगण्याचं काम श्रीमंत राजे पवार घराण्याचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.श्री. अविनाश पवार यांनी केले.
       यावेळी बोलताना म्हणाले की या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आम्ही महिलांना जो मान सन्मान दिला त्यामुळे समस्त महिलावर्ग आनंदी होता. फक्त सामाजिक कार्यक्रमातच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांना मान सन्मान देऊन त्यांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान नेहमी आग्रही असेल अशी ग्वाही दिली.
यावेळी संदिप पवार व ग्रामपंचायत सदस्य अंकुश पाटिल  उपस्थीत होते. 
     या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल समस्त पवार परिवाराचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

तळमावले: मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शे.सह. क्रेडिट संस्था मर्या;तळमावले संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

तळमावले: मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शे.सह. क्रेडिट संस्था मर्या;तळमावले संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
तळमावले : मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शे.सह. क्रेडिट संस्था मर्या;तळमावले संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन पाटणचे सहाय्यक निबंधक  मा.श्री.संभाजीराव नलवडे यांच्या उपस्थितीत व संस्थेचे संस्थापक मा.श्री.अनिल निवृत्ती शिंदे(साहेब)यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन पदी मा.श्री.ज्ञानदेव श्रीपती जाधव व व्हा.चेअरमन पदी मा.श्री.सर्जेराव शंकर नलवडे यांची निवड करण्यात आली.
       नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये मा.श्री.शिवराम बापूराव पवार(मामा),मा.श्री.डॉ.चंद्रकांत केशव बोत्रे,मा.श्री.अनिल रामचंद्र माने,मा.श्री.प्रकाश शामराव देसाई,मा.श्री.सुरेश बाबुराव देसाई, मा.श्री.राजेश शंकर करपे,मा.श्री.शिवाजी भाऊसो देसाई,मा.श्री.जितेंद्र जगन्नाथ कोळेकर,मा.श्री.लक्ष्मण मारुती मत्रे,मा.श्री.सचिन अधिकराव तडाखे,मा.श्री.बाबासो बाबुराव जाधव,सौ.सुजाता रामचंद्र मोरे,सौ.कल्पना शांताराम जाधव यांचा समावेश करण्यात आला.
        नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सहाय्यक निबंधक मा.श्री.संभाजीराव नलवडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.नलवडे साहेबांनी सर्व संचालकांना शुभेच्छा दिल्या.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...