सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

एडीबी अर्थसहाय्य योजनेतून मल्हारपेठ मसूर मायणी राज्यमार्गासाठी 480 कोटींचा निधी मंजूर. मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश.

.


 

दौलतनगर दि.18: पाटण विधानसभा मतदारसंघातून सुरु होणारा मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 वाहतूकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून मुंबई पुणे बेंगलोर आशियाई महामार्ग व विजापूर कराड चिपळूण गुहाघर राष्ट्रीय महामार्ग या दोन महामार्गांना जोडणाऱ्या या  राज्यमार्गावर दैनंदिन वाहतूक मोठया प्रमाणांत सुरु असते. या राज्य मार्गावरील पंढरपूर ते मायणी या रस्त्याचे काम पुर्ण झाले असून मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर मधील लांबीतील रस्ता खराब झाल्याने दळण वळणाची मोठी गैरसोय होत होती. मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर या राज्य मार्गाचे मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आग्रही विनंती  करत या रस्त्याचे कामाला निधी मंजूर होण्यासाठी गेली दिड वर्ष सातत्याने पाठपुरावा करत होते.त्यानुसार मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून 480 कोटी  रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

                   सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातून सुरु होणारा मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक 143 आहे. सदर रस्ता मुंबई पुणे बेंगलोर आशियाई महामार्ग व विजापूर कराड चिपळूण गुहाघर राष्ट्रीय महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा तसेच सातारा,सांगली व सोलापूर या तिन्ही जिल्हयातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर साखर कारखाने व इतर महत्त्वाचे उद्योगधंदे तसेच मोठया लोकसंख्येची मुख्य बाजारपेठा असलेली गावे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणांत वाहतूक वर्दळ असते. दरम्यान या रस्त्याचे मार्गावरील मायणी ते पंढरपूर या सोलापूर जिल्हयातील लांबीचे काम नुकतेच पूर्ण झालेले असून सातारा जिल्हयातील मल्हारपेठ ते मायणी ही 60 किलोमिटर लांबी खराब झालेली असल्याने या मार्गावरुन ये-जा करताना वाहनधारकांसह प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर या राज्य मार्गाचे मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी गत दिड वर्षापासून आग्रहाची विनंती केलेली होती. त्यानुसार मल्हारपेठ पंढरपूर या मार्गावरील  मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर खराब लांबीचे सविस्तर सर्वेक्षण (DPR) तयार करण्यात येऊन मल्हारपेठ ते मायणी या रस्त्याचे लांबीचे 480 कोटी किंमतीचे अंदाजपत्रक मंजूरी साठी सादर करण्यात आल्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे ना.शंभूराज देसाई यांनी गत दिड वर्षापासून पाठपुरावा करत होते. त्यानुसार मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे लांबीची सुधारणा करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून 480 कोटी  रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून  मल्हारपेठ ते मायणी या खराब लांबीचे नुतनीकरण झाल्यानंतर मल्हारपेठ ते पंढरपूर ही सलग लांबी वाहतुकीसाठी सोईची होणार आहे.दरम्यान एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून मंजूर मल्हारपेठ उंब्रज मसूर मायणी पंढरपूर हा राज्य मार्ग क्रमाक 143 मधील मल्हारपेठ ते मायणी या 60 किलोमिटर रस्त्याचे मंजूर 480 कोटी  रुपयांचे कामाची निविदा प्रक्रिया तातडीने करण्यात येऊन मंजूर असलेले काम लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजूंना २१ लाख १५ हजाराची मदत.


 


कराड, प्रतिनिधी : नेहमीच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष देणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदारसंघातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यासाठी शिफारस केली होती. आ. चव्हाण यांच्या शिफारशीनुसार २१ लाख १५ हजार रुपयांची गरजूंना मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई येथून याबाबतचे पत्र आ. चव्हाण यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.

सदरच्या पत्रात म्हंटले आहे की, १ जुलै २०२२ ते १ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत व्हावी. अशी शिफारस असणारे पत्र मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आ. चव्हाण यांना दिले होते. गरजू रुग्णांची यादी व त्याप्रमाणे २१ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आ. चव्हाण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहेत. त्यांनी गावोगावी विकासाचा निधी पोहचवत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवली आहे. विकासाबरोबर ते मतदरसंघातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याकडे गतवर्षी गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत व्हावी, याकरिता विनंती केली होती. सदरच्या गरजू रुग्णांची यादी जोडत आ. चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीसाठी शिफारस केली होती.

यावर नुकतेच ना. शिंदे यांनी २१ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याचे आ. चव्हाण यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. हा निधी प्राप्त झाल्याने गरजूंना मोलाची मदत होणार आहे.

 

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, टोल फ्री १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू करण्याची योजनांची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाची या निमित्ताने आठवण झाल्याचे सांगता येईल.


मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटींचा निधी मंजूर.

 

माहे डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटींचा निधी मंजूर.

 


साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व

दौलतनगर दि.12: पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे व पूलांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती.सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील  राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

               प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे मोठे प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे या रस्त्यांवरुन  प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. या राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे तसेच बाचोली व खळे येथील पुलांचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती. 

                                                                 साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व

त्यानुसार नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-58 कि.मी. 14/00 ते 17/00 ची सुधारणा करणे (भाग- दिवशी घाट) 02 कोटी, बनपुरी अंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन  रस्ता प्रजिमा 125 कि.मी. 0/00 ते 13/00 (भाग कि.मी.7/00 ते 10/00 - जौंजाळवाडी ते  अंबवडेफाटा) ची रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी, चरेगांव चाफळ दाढोली महाबळवाडी येरफळे त्रिपुडी चोपडी बेलवडे आंब्रुळे कुसरुंड नाटोशी रस्ता प्रजिमा 53 कि.मी. 40/00 ते 42/00  ची सुधारणा 03 कोटी, 

                                                                          साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व

मानेगांव ते कुंभारगाव गलमेवाडी रस्ता प्रजिमा 56 कि.मी. 3/00 ते  6/700 (कुंभारगांव ते  गलमेवाडी) ची सुधारणा 02 कोटी, भोसगांव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि.मी.0/00 ते 22/500 (भाग कि.मी.12/00 ते 17/00-(कारळे ते तामिणे ) ची  रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी, बनपूरी आंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन रस्ता प्रजिमा 131 कि.मी.6/500 ते 11/500 ची सुधारणा 02 कोटी, चरेगाव चाफळ रस्ता प्रजिमा 53 कि.मी.12/00 ते 15/300 मध्ये घाट लांबीतील सुधारणा 02 कोटी, चरेगाव चाफळ रस्ता प्रजिमा 53 कि.मी.5/600 ते 12/00 भाग चाफळ ते दाढोली रस्त्याची सुधारणा 2.50 कोटी,  

                                                                               साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व   


कोंजवडे भुडकेवाडी वरची केळेवाडी प्रजिमा 129 कि.मी.5/00 ते 10/00 मध्ये सुधारणा 02 कोटी, काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी प्रजिमा 134 कि.मी.04/00 ते 7/00 मध्ये रुंदीरकरणासह सुधारणा 2.50 कोटी, मल्हारपेठ मंद्रुळहवेली पानस्करवाडी जमदाडवाडी नवसरवाडी प्रजिमा 133 कि.मी.0/00 ते 2/00 भाग मल्हारपेठ ते जमदाडवाडी रस्त्याची सुधारणा 2 कोटी,

                                                                               साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व

 

 रामा 04 ते वराडे भोळेवाडी ते रामा 136 ते साकुर्डी तांबवे सुपने जुनी पाडळी गावठाण ते वारुंजी ते रामा 136 रस्ता प्रजिमा 79 व किमी 16/500 ते 19/00 भाग सुपने पूल ते जुनी पाडळी ची सुधारणा 2 कोटी, मल्हारपेठ पंढरपूर रस्ता रामा 143 कि.मी.02/600 ते 6/00, 9/00 ते 1/800 भाग ऊरुल फाटा ते भोळेवाडी फाटा व कळंत्रेवाडी फाटा ते उंब्रज ची सुधारणा   02 कोटी, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता रामा 398 कि.मी.4/00 ते 5/00 व 18/00 ते 24/00 भाग बिबी ते देवघर फाटा व जळवखिंड ते मरळोशी ची सुधारणा 02 कोटी, 

                                                                              साप्ताहिक वृत्तपत्र कुमजाई पर्व

 

प्रजिमा-55 ते  बाचोली पोहोच  रस्ता  ग्रामा. 289 वर बाचोली येथे वांग नदीवर मोठा पुल 05 कोटी,खळे पोहोच रस्ता ग्रा.मा.  323 वर    कि.मी. 0/800   येथे खळे गावाजवळ  वांग नदीवर  मोठा पुल 05 कोटी या कामांना सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील  राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात ८ कोटी ७० लाख ६९ हजाराचा निधी मंजूर.

 आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात ८ कोटी ७० लाख ६९ हजाराचा निधी मंजूर.




 कराड : जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना २०२३ - २४ मधून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ८ कोटी ७० लाख ६९ हजार इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून आ. चव्हाण यांनी मतदरसंघातील
समतोल राखला आहे. अशी माहिती आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयातून प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली.

प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हंटले आहे की, केंद्रीय पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री, राज्यसभा व लोकसभेचे खासदार असल्यापासून सातारा आणि कराड परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना हजारो कोटी रुपयांचा निधी आणत मतदारसंघाचा कायापालट केला.

गेली नऊ वर्षे आ. चव्हाण कराड दक्षिणचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या नऊ वर्षातही त्यांनी विकासाची प्रक्रिया निरंतर चालू ठेवली आहे. जिल्हा नियोजन समितीकडे चालू आर्थिक वर्षात आ. चव्हाण यांनी विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. या मागणीनुसार मतदारसंघात मंजूर झालेली विकासकामे व कंसात मंजूर निधी पुढीलप्रमाणे ; नागरी सुविधा 2023-24 अंतर्गत वडगाव हवेली येथे १५ लाख रुपये,
कार्वे (१० लाख). डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत आणे (१२ लाख), भरेवाडी (५ लाख), लटकेवाडी (५ लाख), शेवाळेवाडी - येवती (१० लाख), राज्य विद्युत वितरण कंपनीकडून येरवळे (८ लाख ८८ हजार), विंग (८ लाख १७ हजार), पोतले (१२ लाख ४९ हजार), कार्वे (२ लाख ६० हजार), कार्वे (१ लाख ७५ हजार) कोळे (५ लाख २१ हजार)


प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे दुरुस्ती 2023-24 अंतर्गत कापील (५ लाख), कोडोली (५ लाख), कार्वे (५ लाख), अंगणवाडी इमारत दुरुस्ती 2023-24 अंतर्गत काले - 83  (१ लाख), काले - 84 (१ लाख), खुबी - 110 (१ लाख), येणपे - 321 (१ लाख), शेवाळवाडी - 49 (१ लाख), टाळगाव नवीनसाठी (१ लाख), काजारवाडी - मिनी (१ लाख), माटेकरवाडी - 161 (१ लाख), बांदेकरवाडी - 15 (१ लाख), म्हासोली - 163 (१ लाख), शेवाळवाडी - येवती (१ लाख), शेवाळवाडी - म्हासोली (१ लाख), घराळवाडी - 50 (१ लाख), काटेकरवाडी 106 (१ लाख), जनसुविधा 2023-24 अंतर्गत वारुंजी (७ लाख), गोटे (७ लाख), मुंढे (७ लाख), घारेवाडी (७ लाख), आणे (७ लाख), येरवळे (७ लाख), संजयनगर - शेरे (७ लाख), रेठरे बुद्रुक (७ लाख), रेठरे खुर्द (७ लाख)
नारायणवाडी (७ लाख), जुजारवाडी (७ लाख), शिंदेवाडी - विंग (७ लाख), नांदगाव (६ लाख)


3054 सन 2023-24 अंतर्गत रेठरे खुर्द (२० लाख), वारुंजी (३५ लाख), घराळवाडी (२० लाख), घोगाव (२५ लाख), कासारशिरंबे (२० लाख), मुळीकवाडी - गोटेवाडी (२० लाख), 5054 सन 2023-24 अंतर्गत वहागाव - घोणशी - कोपर्डे हवेली - पार्ले बनवडी रस्ता सुधारणा करणे (५० लाख), येवती - घराळवाडी - मस्करवाडी - चव्हाणवाडी - धामणी - डाकेवाडी - निवी रस्ता ते कराड हद्द सुधारणा करणे (४० लाख)

क वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत आटके (१० लाख), विशेष घटक साकव कार्यक्रम अंतर्गत कोळे (३९ लाख १७ हजार), सर्वसाधारण साकव कार्यक्रम अंतर्गत बांदेकरवाडी - सवादे (५९ लाख ७२ हजार) जिल्हा परिषद शाळा खोल्या दुरुस्ती अंतर्गत म्हासोली (३ लाख), कोळे (३ लाख), जिल्हा परिषद नवीन शाळा खोली बांधणे अंतर्गत मंजूर कामे गोटे (११ लाख ८२ हजार), वहागाव (११ लाख ८२ हजार)

साठवण बंधारा बांधणे अंतर्गत सवादे (५० लाख ५८ हजार), तुळसण - सवादे (४६ लाख ७० हजार), सवादे - गट नं. 273 (३३ लाख ६४ हजार), सवादे - शेरी (३९ लाख ४६ हजार), सवादे येथे साठवण बंधारा (२० लाख ८ हजार), पवारवाडी - नांदगांव (२७ लाख १४ हजार), स्मार्ट आरोग्य केंद्र, कोळे (७० लाख) अशा आठ कोटी ७० लाख ६९ हजार रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.

---------------------------


 नुकताच आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड विमानतळासाठी २२१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कराड शहरालगत चौपदरी रस्त्यांचे जाळे, भूकंप संशोधन केंद्र, आरटीओ ऑफिस या लक्षवेधी कामांच्या माध्यमातून आ. चव्हाण यांनी सुमारे २ हजार कोटी पर्यंतचा निधी आणला आहे. तर नुकताच विमानतळासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कराडच्या विकासासाठी आणखी उपयुक्त ठरणार आहे, हे नक्की .
-------------------------------

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कार्वे गावासाठी ४ कोटी २२ लाखाचा निधी*

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कार्वे गावासाठी ४ कोटी २२ लाखाचा निधी* 

 कराड :माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून तसेच कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत कार्वे गावातील गोपाळनगर व वाढीव वस्तीसाठी ३ लाख लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली असून ४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला आहे. याबाबतचे मंजुरी पत्र कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात, ग्रामपंचायत सदस्य सागर देसाई, अभिजीत वायदंडे, विठ्ठल हुलवान आदींनी ग्रामस्थांच्या वतीने आ. चव्हाण यांच्याकडून स्वीकारले. यावेळी युवानेते इंद्रजित चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर उपस्थित होते. कार्वे गावच्या पिण्याच्या पाणी योजनेसाठी इतका भरघोस निधी मंजूर केल्याबद्द्ल माजी सरपंच वैभव थोरात व ग्रामपंचायत सदस्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले. 

कार्वे गावासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१३-१४ साली पेयजल योजना मंजूर झालेली होती. या योजनेचा विस्तार संपूर्ण गावामध्ये १६ कि.मी. इतका असून वॉर्ड क्र. ४ मध्ये पाण्याची टाकी २.५० लाख लिटर व वॉर्ड क्र. ५ मध्ये पाण्याची टाकी १.६५ लाख लिटर एवढी क्षमता आहे. तसेच त्यानंतर गोपाळनगर व आसपासच्या वस्तीसाठी ३ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व योजना मंजूर होणे आवश्यक असल्याने हि योजना मंजूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता व हि योजना गावासाठी अत्यंत महत्वाची असल्याने कार्वे गावच्या वस्त्यासाठी ४ कोटी २२ लाखांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.  या माध्यमातून कार्वे गावच्या आसपासच्या वस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून पाणी योजना लवकरच पूर्ण होऊन स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार 24 बाय 7 योजनेतून मिळणार आहे.

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

पाटण - हॉटेल सुस्वाद म्हावशी फाटा येथे उद्या मोफत ध्यान कार्यशाळेचे आयोजन.

पाटण -  हॉटेल सुस्वाद म्हावशी फाटा येथे उद्या मोफत ध्यान कार्यशाळेचे आयोजन.


पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन आणि सौ. सुनंदा इंगवले व कुसुम दीक्षित  यांच्या वतीने मोफत ध्यान कार्यशाळा उद्या रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सुस्वाद  हॉटेल म्हावशी  फाटा पाटण येथे होणार आहे.
या कार्यशाळेत पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशनचे सी.विजयकुमार मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा सकाळी 10.00 ते 4.00 वाजेपर्यंत  असणार आहे, तरी पाटण व परिसरातील नागरिकांनी या ध्यान कार्यशाळा लाभ घ्यावा अशी माहिती सौ.कुसुम दीक्षित यांनी दिली. 

ध्यानाचे फायदे

भावनिक स्थिरता आणि सुसंवाद: ध्यान केल्याने आंतरिक शुद्धी होते आणि मानसिक स्तरावर पोषण मिळते. ज्या ज्या वेळी आपल्या भावना उफाळून येतात, आपल्याला मानसिक अस्थिरता वाटते, भावनांचा अतिरेक होतो, त्या त्या वेळी मन शांत करण्यास ध्यान मदत करते.

समस्त सृष्टीशी  सुसंगती: जेव्हा तुम्ही ध्यान करता त्यावेळी तुमचे मन आकाशाची विशालता, शांतता आणि आनंदाने भरून जाते आणि ह्याच गोष्टी तुम्ही वातावरणात पसरवता व सृष्टीमध्ये सुसंगती निर्माण करता.

आत्मविकास: रोजच्या आयुष्यात जर आपण ध्यानाला जागा दिली तर आत्म्याचा विकास  होते, व हळूहळू विकसित आणि शुद्ध चेतना म्हणजे काय याचा अनुभव होतो.

जेव्हा आत्मा विकसीत आणि विशाल होते त्यावेळी आयुष्यातील क्षोभ अगदी नगण्य होऊन जातो. राग आणि निराशा ह्या भावना क्षणिक होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.

वैयक्तिक परिवर्तन: ध्यान हे तुमच्यात खरेखुरे वैयक्तिक परिवर्तन आणू शकते. स्वत: विषयी ज्यावेळी तुम्हाला अधिक समजायला लागते त्यावेळी स्वाभाविकपणे आयुष्याचे रहस्य, विश्वाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. आणि मग "आयुष्याचा अर्थ काय? आयुष्याचा हेतू काय? विश्व म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? वगैरे वगैरे असे प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतात.

ज्यावेळी हे प्रश्न तुमच्या मनात यायला लागतील त्यावेळी हे नक्की समजा की तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. हे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. ह्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या पुस्तकात वगैरे मिळणार नाहीत. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता तुमचे जीवन एका उच्च स्तरावर गेलेले पहाल.असे या ध्यान कार्यशाळेचे फायदे आहेत.

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३

कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनींचा सर्वंकष आढावा घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


कोयना प्रकल्पग्रस्तांना सात जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या जमीन वाटपाचा सर्वंकष आढावा घेण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. तसेच या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित विविध मागण्या, विशेषतः रायगड जिल्ह्यात पुनर्वसन झालेल्या २२ गावांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करावी असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशीत केले.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार महेंद्र थोरवे तसेच महसूल, मदत व पुनर्वसन व विविध विभागांचे सचिव, वरिष्ठधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त, शेतकरी आदी उपस्थित होते.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती या बैठकीत देण्यात आली. या आदेशानुसार प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कोकण व पुणे तसेच जिल्हाधिकारी सातारा, रायगड, पुणे, ठाणे आणि सोलापूर यांचा या समितीत सदस्य म्हणून समावेश आहे. या समितीची उद्या बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कोयना प्रकल्पग्रस्तांना आजवर वाटप झालेल्या जमिनींचा सर्वंकष आढावा घेण्यात यावा. प्रकल्पग्रस्तांच्या पात्र अपात्र याबाबतची पडताळणी केली जावी. जेणेकरून अजूनही जमीन न मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करता येईल. सातही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांनी मदत व पुनर्वसन विभागाला अहवाल द्यावा. काही प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींवर त्या विना वापर असूनही त्यांचा सातबारा बंद झालेला असेल तर त्या परत देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील खोपोली तालुक्यात कोयना प्रकल्पग्रस्तांच्या २२ गावांचे पुनर्वसन केले आहे. पण त्यांना अजूनही नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी मदत व पुनर्वसन विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

तत्पूर्वी, बैठकीत सातारा जिल्ह्यातील तापोळा (ता. महाबळेश्वर) येथील जिल्हा परिषदेच्या बोटी व बार्जद्वारे जलवाहतूक करणाऱ्या १४ कामगारांच्या सेवेबद्दल चर्चा झाली. यात या कामगारांना मदत व पुनर्वसन विभागाने सेवेत सामावून घेण्यासाठी यापूर्वीच्या सूचनांनुसार कार्यवाही केल्याची माहिती देण्यात आली.

 

 

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...