संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
सोमवार, ३ मे, २०२१
*सातारा जिल्ह्यातील :2502 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू*
रविवार, २ मे, २०२१
*सातारा जिल्ह्यातील : 2217 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 44 बाधितांचा मृत्यू*
*कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी हेल्पलाईन सेंटर ला भेट देऊन कामाच्या पद्धतीची माहिती घेतली व युवकच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र देशात अग्रेसर पण आद्यप आव्हाने संपलेली नाहीत - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्र देशात अग्रेसर पण आद्यप आव्हाने संपलेली नाहीत - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणनवी दिल्ली, दि.१ :- भारताच्या उत्पन्नात महाराष्ट्राचे सर्वात जास्त म्हणजे पंधरा टक्के योगदान आहे. इथले सहकार प्रारूप देशाने स्वीकारले आहे. मराठी जनतेला इतिहासात संस्कृत, कला याचा प्रदीर्घ आणि समृद्ध वारसा लाभला आहे. परंतु, महाराष्ट्रासमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत यावर मात केल्यास पुढील वाटचाल सुकर होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 39 वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘महाराष्ट्राची 60 वर्षातील जडणघडण आणि आव्हाने’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की, सामाजिक प्रबोधनाची सुरुवात महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाली होती. ब्रिटिश राजवटीतसुद्धा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक सुधारणांना गती देणाऱ्या अनेक चळवळी सुरू झाल्या. सामाजिक प्रबोधनाची सुरवात संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या लेखणी आणि कीर्तनातून केली.
महाराष्ट्र देशात अग्रेसर
श्री. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राचे सहकार प्रारूप देशातील अनेक राज्यांनी स्वीकारले. बँका, शिक्षण संस्था, शेतीमालावर प्रक्रिया करणारे सहकारी कारखाने, दूध डेअरीसारखे उद्योग, सूतगिरणी, कृषिमाल खरेदी-विक्री करणाऱ्या संस्था असा विविध क्षेत्रात राज्य अग्रेसर ठरले आहे. 1972 च्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्राने रोजगार हमी योजना सुरू केली. पुढे मनरेगाच्या स्वरूपात देशात कायदा झाला.
महाराष्ट्राची पुरोगामी धोरणे
महिलांना केंद्रस्थानी मानून अनेक योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. नोकरीत 30 टक्के आरक्षण तर स्थानिक निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षण महाराष्ट्राने दिलेले आहे. वर्ष २०१३ मध्ये जादूटोणा व अघोरी प्रथा विरोधी कायदा तर 2016 मध्ये सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा करून महाराष्ट्राने आपली पुरोगामी विचारसरणी अधोरेखित केली आहे. दादासाहेब फाळके यांच्यासारखे चित्रपटसृष्टीचे जनक महाराष्ट्रात झाले. वैज्ञानिक संशोधनामध्ये होमी भाभा यांनी भारतात अणू विज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली. भाभा अनुसंधान केंद्र असेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे सर्व महाराष्ट्रात आहे. पुण्यामध्ये अनेक शिक्षण संस्था व संशोधन केंद्रे आहेत. मागील काही दशकात महाराष्ट्रातील प्रमुख शहरात औद्योगिक वसाहती, सेवा क्षेत्र. महामार्ग, टोलेजंग इमारती, मल्टिप्लेक्स, पंचतारांकित हॉटेल, यामुळे राज्यात समृद्धी निर्माण झाल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रासमोरील आव्हाने
आज महाराष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत. कोरोना महामारीमुळे सर्वच संदर्भ बदलले आहेत. येणाऱ्या काळात आर्थिक धोरण आखून राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत त्याचे लाभ कसे पोहोचतील हे ठरवण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे.
एका बाजूला समृद्धी दिसून येत असताना दुसऱ्या बाजूला पाणीटंचाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कमी प्रमाणात रोजगार निर्मिती, कुपोषण, बकाल शहरे, वाढत्या झोपडपट्ट्या आणि त्याच्या पुनर्विकासाचा प्रश्न, नागरी सुविधा, घनकचरा व्यवस्थापन ही नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. राज्याचे तीन चतुर्थांश उत्पन्न हे मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, रायगड या जिल्ह्यातून येतं. यामुळे मराठवाडा, विदर्भ, खान्देश कोकण, उत्तर महाराष्ट्र यामध्ये अन्यायाची भावना आहे. या असमतोल विकासामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री चव्हाण पुढे म्हणाले, आपल्या राज्यात युवा मनुष्य बळ, समाधानकारक पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा, गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था, जोडीला इंग्रजी भाषा आणि गणित यांच्या आधारे महाराष्ट्राने नॉलेज एकॉनोमीकडे वाटचाल करायला सुरुवात केली पाहिजे. त्यांनी सार्वजनिक शिक्षण व आरोग्य यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आवश्यक असल्याचेही सांगितले.
तीन प्रमुख आव्हाने…
वाढते व अनियोजित नागरीकरण, शाश्वत शेती व युवकांची वाढती बेरोजगारी ही तीन सर्वात मोठी आव्हाने महाराष्ट्रासमोर असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी आणि कालव्याऐवजी जलवाहिनीद्वारे जल वितरण करावे असा सल्लाही त्यांनी दिला.
आयात-निर्यात करण्यावर भर देताना त्यांनी शेतकरी निर्मित कंपन्या जिल्ह्या- जिल्ह्यामध्ये सुरु होण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारने कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
रोजगार वाढविण्यासाठी महाराष्ट्रात नवीन उद्योग आकृष्ट करण्यामध्ये कमी पडतो आणि यात मूलभूत संशोधन व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आदिवासी भागातील कुपोषण या विषयावरही भाष्य केले. श्री. चव्हाण यांनी नव्या पिढीला आणि नव्या राजकर्त्यांना महाराष्ट्रात प्रचंड मोठी संधी असल्याचे सांगितले. त्यांनी कोरोनानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे आव्हान नवे नेतृत्व नक्कीच पेलू शकेल, असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.
शनिवार, १ मे, २०२१
*सातारा जिल्ह्यातील 2383 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*
कंत्राटी वैद्यकीय अधिका ऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार
नवी दिल्ली : महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत आज माजी श्री.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे व्याख्यान
नवी दिल्ली : महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत आज माजी श्री.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे व्याख्यान
नवी दिल्ली दि ०१ : माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण हे आज १ मे या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत “महाराष्ट्राची ६० वर्षातील जडणघडण आणि आव्हाने” या विषयावर ३९ वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला १ मे रोजी ६१ वर्ष पूर्ण होत आहेत आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने परिचय केंद्राने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु केली आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण हे आपले विचार मांडणार आहेत.
समाज माध्यमांद्वारे व्याख्यानाचे प्रसारण
आज शनिवार दि १ मे २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राच्या खालील लिंक वर थेट प्रसारित होईल.
थेट प्रसारण येथे पाहा
ट्विटर
https://twitter.com/MahaGovtMic
https://twitter.com/micnewdelhi
https://twitter.com/MahaMicHindi
यू ट्यूब
https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi
फेसबुक
https://facebook.com/micnewdelhi
कू(Koo)
मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार
ढेबेवाडी प्रतिनिधी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
