नवी मुंबई :-
पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून राष्ट्रवादीत परतणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने त्यांना सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादीला जास्त जागेची अपेक्षा आहे. ही अपेक्षा शिवसेनेला पूर्ण करणे शक्य होणार नसल्याने 'मविआ'तून शिवसेना बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, शहरात दोन दुर्बल पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र एकत्र लढण्याच्या मनस्थितीत आहेत. काँग्रेसने २७, तर राष्ट्रवादीने ४० जागांची मागणी केली आहे. त्यामुळे शिल्लक ४४ जागा घेऊन शिवसेना ही निवडणूक लढविणार नाही. कमीत कमी ८० जागांची शिवसेनेची मागणी आहे.
होळीनंतर निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे
नवोदित मतदारांची राष्ट्रवादीला पसंती
चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदार संघातील नवोदित उमेदवारांनी चांगली मते मिळविलेली आहेत. ४० प्रभागांत राष्ट्रवादीला चांगली मते मिळालेली आहेत. त्यावर पक्षाचा दावा आहे. केवळ दोन नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला प्रभाग संख्या वाढवावी लागणार असून पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी चिरंजीवाला निवडणूक उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीतील आयारामांची संख्या वाढणार असल्याने त्यांची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रभाग वाटप झाल्यानंतर शिल्लक प्रभागात निवडणूक लढविण्याची शिवसेनेची इच्छा नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी ही निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. शिवसेनेची स्वबळावर चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेनेते प्रवेश घेणाऱ्या नगरसेवकांची संख्या वाढत असल्याने हा आत्मविश्वास वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा