परवडणाऱया घरांबाबत शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहनिर्माणमंत्री यांनी एसआरए, म्हाडा पुनर्विकास, पंतप्रधान विकास योजनेतील घरांच्या पुनर्विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. सरकारने विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एसईझेड) उद्योजकांना जमीन दिली. ज्या हेतूसाठी जमिनी दिली त्या हेतूने जमिनीचा वापर झालेला नाही. अशा जमिनी ताब्यात घेऊन त्यावर परवडणारी घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. मुंबईकरांची निवड लक्षात घेऊन या जमिनीवर पाच लाख घरे उभी राहू शकतात, असे आव्हाड यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांच्या सदनिका हस्तांतरित न केल्यास फौजदारी कारवाई
प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या सदनिकांबाबत नियम शिथिल करून विकासकांनी गैरफायदा घेतला. आता येत्या 30 दिवसांत प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेल्या सदनिका विकासकांनी सरकारला हस्तांतरित कराव्यात, अन्यथा त्यांनी फौजदारी कारवाईला तयार राहावे, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.
म्हाडा, एसआरए, गावठाणांचा रखडलेला पुनर्विकास वेगाने पूर्ण करा
मुंबईत अनेक एसआरए योजना रखडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे गावठाणे तसेच म्हाडाच्या पुनर्विकासाबातच्या अटींमध्ये शिथिलता आणल्यास येथील विकासालाही चालना मिळेल. म्हाडा इमारतींच्या दुरुस्तीसाठी वाढीव रक्कम देण्यात यावी, एसआरएतील रखडणाऱया परवानग्यांसाठी एकछत्री यंत्रणा निर्माण करून पुनर्विकासाला चालना द्यावी अशी मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात केली.
परिशिष्ट-2 मुळे एसआरए प्रकल्प रखडले - प्रकाश फातर्पेकर
शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी चेंबूर खारदेव नगर घाटला गाव येथील 3 के प्रकल्पामध्ये विकासक परिशिष्ट-2 मिळत नसल्याचे कारण देत आहेत. महापालिकेकडून अपुऱया कर्मचाऱयांचे कारण पुढे केले जाते. यामुळे प्रकल्प रखडल्याची बाब सभागृहासमोर आणली. यासंदर्भात आश्वासन देताना जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए कार्यालय इमारतीत एकखिडकी योजना करून परिशिष्ट-2 90 दिवसांत तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा