महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ातील महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांना आपले पाककौशल्य जनतेसमोर मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, 'श्री राधा फाऊंडेशन'च्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. कोकण, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या प्रांतातील पदार्थांची चव या खाद्य महोत्सवातून खवय्यांना चाखता येणार आहे. यानिमित्ताने तिन्ही दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर, 'श्री राधा फाऊंडेशन'च्या अध्यक्षा कामिनी शेवाळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकारही उपस्थित राहणार आहेत.
विविध कार्यक्रमांची रेलचेल
21 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता 'थाळी महाराष्ट्राची' महोत्सवाचे उद्घाटन होईल. या दिवशी 'सप्तरंग संस्कृतीचे' या संगीतमय नृत्याविष्काराचे आयोजन केले आहे. शनिवारी 'जल्लोष महाराष्ट्रा'चा आणि रविवारी 'जागर मराठी संस्कृती'चा या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा