लोकसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ते माढाचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुक झाली. या सर्व परिस्थितीत सातारा जिल्हा कॉंग्रेसची वाटचाल ही जिल्हाध्यक्षाविनाच राहिली. त्यानंतर राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडी झाल्या. शेवटी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले.
मागील एक दोन महिन्यांत पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष निवडीबाबत आढावा घेतला होता. या सर्व बैठकांतील चर्चेनुसार कोरेगाव किंवा कऱ्हाडचाच जिल्हाध्यक्ष होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, सर्वांना धक्का देत खटाव तालुक्यातील पुसेगावचे नेते डॉ. सुरेश जाधव यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून आज प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र राज्य सरचिटणीस गणेश पाटील यांनी श्री. जाधव यांना पाठविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा