माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले की सकाळी वूहानला अश्विनी पाटील यांच्याशी बोललो. आज सरकार वायुसेनेचे सी-१३० विमान चीनमध्ये अजून अडकलेल्या सुमारे ९० भारतीयांना परत आणण्यासाठी पाठवित आहे. काही अडचणींमुळे अजून विमान पोहोचले नाही. दूतावासाने सर्वांना निघण्यासाठी तयार रहावयाला सांगितले आहे.मी संपर्कात आहे.
चीनमधील वुहान प्रांतात अडकलेल्या साताऱ्याची विवाहिता आश्विनी पाटील त्यांच्याशी व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची नेमकी समस्या जाणून घेतली होती. तसेच त्यांना भारतात परत आणण्यासाठी ते स्वत: परराष्ट्र व्यवहार मंत्री तसेच भारताचे चीनमधील राजदुत यांच्याशी संपर्क करून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. आमदार श्री. चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परराष्ट्र मंत्रालय येथे पत्रव्यवहार करून पाटील यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या हालचाली कराव्यात, अशी मागणी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा