संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
सोमवार, ३१ मे, २०२१
सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन 15 जून 2021 पर्यंत वाढविला
*सातारा जिल्ह्यातील 1872 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 35 बाधितांचा मृत्यू*
*कोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे**कोरोनामुक्त गावाचा संकल्प करावा**मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन**कोरोनामुक्त गाव करणाऱ्या सरपंचांचे केले कौतूक*
रविवार, ३० मे, २०२१
मुंबई : राज्यात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय काही नियमांत शिथिलता येणार
महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला
कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे. लस आली असली तरी सर्व लोकसंख्येला दोन डोस देण्यापर्यंत कालावधी जाणार आहे. तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती आहे. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. सर्व जिल्ह्यांत तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
कोरोनाच्या लाटेत अनेक बालकं अनाथ झाली
सर्व जिल्हे कोरोनामुक्त झाली तर राज्य कोरोनामुक्त होणार
कोरोनामुक्त गाव राज्य सरकारची नवी मोहिम
कोरोनामुक्त गाव ही मोहीम आपल्याला आजपासून राबवायची आहे
जर हे सरपंच आपले गाव कोरोनामुक्त करु शकतात तर इतर का नाही
दक्षिण सोलापूर येथील सुद्धा कोमलताई यांनी आपलं गाव कोरोनामुक्त केलं आहे
हिवरे बाजार, घाटणे ही गावे कोरोनामुक्त झाली
हिवरे बाजार हे कोरोनामुक्त झालं आहे
घरे कोरोनामुक्त झाली तर गाव कोरोनामुक्त होणार
प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं तर मी, माझं घर कोरोनामुक्त ठेवणार
शहरी भागांत कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आहे ग्रामीण भागात थोडा प्रादुर्भाव आहे
आपण सहकार्य केलं नसतं तर कोविडची दुसरी लाट थोपवता आली नसती, हा लढा अजूनही सुरू आहे
लॉकाडाऊन असला तरी अर्थचक्र सुरू राहिलं पाहिजे
शिक्षण सुरूच ठेवायचं आहे, ऑनलाईन ठेवायचं की आणखी काही करायचं
शिक्षण क्षेत्रात काही क्रांतिकारी निर्णय घेण्याची गरज
देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं
बारावीच्या परीक्षेबाबत केंद्राने धोरण ठरवायला हवं
मी परीक्षेच्या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे
दहावीचा निर्णय आम्ही घेतला बारावीच्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेणार आहोत
परीक्षांच्या संदर्भात संपूर्ण देशभात शैक्षणिक धोरण एक असावं
कोविड प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी महाराष्ट्राची
साधारणत: सव्वादोन कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे
येत्या काळात लसीकरणाचा वेग वाढवणार
वयोमानाप्रमाणे म्हटलं तर कदाचित तिसरी लाट बालकांत येऊ शकते
पहिली लाट वयोवृद्द, दुसरी लाट तरुणांत आली होती
कोविड विरुद्धचं युद्ध आपण नक्कीच जिंकू शकतो
कोविड- नॉन कोविड ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे
स्टेरॉईडमुळे म्युकरमायकोसिसचं प्रमाण वाढलं
पावसाळ्यात साथीचे रोग रोखण्याची गरज
पावसाळ्यात साधीचे आजार आहेतच आणि त्यात कोरोनाचं संकट आहे
राज्यात म्युकरमायकोसिसचे 3 हजार रुग्ण
उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करावा लागला होता आणि नंतर तोही कमी पडला
राज्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता 1200 मेट्रिक टन इतकी
राज्याला दरदिवशी 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागत होती
ऑक्सिजन आता अवघ्या काही तासांसाठी राहिला आहे असे फोन मधल्या काळात येत होते आणि यामुळे घाम फुटत होता, प्रशासनाचे धाबे दणाणत होते
दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे
तिसरी लाट संपूर्णपणे आपल्या वागण्यावर अवलंबून असेल
रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणे आवश्यक
रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनची आवश्यकता सुद्धा वाढली
तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे
ग्रामीण भागात रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसत आहे
राज्यातील काही जिल्हे असे आहेत तेथे रुग्ण संख्या हलकीशी वाढताना दिसत आहे आणि ती गोष्ट काळजीची आहे
कडक लॉकडाऊन नाही पण निर्बंध कायम राहणार
कडक लॉकडाऊन केलेला नाहीये, निर्बंध लागू आहेत
बाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे
यावेळी रिकव्हरी रेट हा खूपच दिलासादेणारा आहे
साधारणत: 17 सप्टेंबर 2020 रोजी 24 हजारांच्या आसपास रुग्ण होते तर 26 मे 2021 रोजी 24 हजारांच्या आसपास रुग्ण संख्या होती म्हणजेच गेल्या लाटेतील सर्वोच्च रुग्ण संख्ये पेक्षा आता कुठे रुग्णसंख्या कमी होत आहे
यावेळीचं संकट हे सणासुदीच्या आधी आलं आहे
आज राज्यात 18 हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद झाली
पण नाईलाजाने आपल्या जीवाच्या काळजीपोटी हे काम करावं लागतं
निर्बंध लादावे लागतात, त्याच्या सारखं वाईट काम कुठलं असेल असं मला वाटत नाही
फेरिवाल्यांसाठी सुद्धा 52 कोटींचा निधी आतापर्यंत दिला आहे
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी 154 कोटी 95 लाखांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला
कोरोनाच्या लढाईत आपण ज्या काही घोषणा केल्या त्यात अन्न पुरवठा वितरण, शिवभोजन थाळी मोफत दिलं
भूकंप रोधक घरांची निर्मिती करावी लागणार, अंडरग्राऊंड वीज कनेक्शन करावे लागणार
किनारपट्टीच्या भागात ठोस उपाययोजना कराव्या लागणार
लवकरच नुकसानग्रस्तांना मदत देण्यात येणार
वादळामुळे नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली आहे
तौैत्के चक्रीवादळाच्या दरम्यान प्रशासनाने चांगलं काम केलं
मी कोकणाचा धावता दौरा केला
वादळ्याच्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून होतो
अनेक ठिकाणी घरांचे नुकसान, वीज पुरवठा खंडित झाला होता
तौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं
कोरोनाच्या संकटात जिद्दीनं आणि निश्चयाने बंधने पाळली त्याबद्दल धन्यवाद
साधारणत: महिन्याभरातनंतर आपल्याशी संवाद साधत आहेराज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 5 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. त्यानंतर सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्य सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा 31 मे 2021 पर्यंत पुन्हा निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला.
*सातारा जिल्ह्यातील 1990 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू*
तळमावले :-इथं घडतंय माणुसकीच दर्शन ! वाढदिवसानिमित्त कोरोना सेंटर मध्ये अंडी आणि दूध वाटप
तळमावले :-इथं घडतंय माणुसकीच दर्शन ! वाढदिवसानिमित्त कोरोना सेंटर मध्ये अंडी आणि दूध वाटप
तळमावले -दि.30.संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोना संकट उभं ठाकलं आहे. यात अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहीजण या आजारात माणुसकीचं दर्शन घडविताना दिसत आहेत.शेंडेवाडी (कुंभारगाव) ता.पाटण येथील पोलीस पाटील व आदर्श संस्कार कॉम्पुटर इन्स्टिट्यूट तळमावले चे संचालक संतोष पवार सर यांनी आपला वाढदिवस ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथील कोरोना वार्ड मधील रुग्णांना अंडी व दुध वाटप करून साजरा केला त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.याप्रसंगी डॉ.अश्विनी देसाई अधिपरीचारक अमित निकम कुंभारगावचे पोलीस पाटील अमित शिंदे प्रेस फोटोग्राफर अनिल देसाई कोव्हिड हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते
शनिवार, २९ मे, २०२१
*आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा**आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत* *मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करुन सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येणार*
शुक्रवार, २८ मे, २०२१
ढेबेवाडी : फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअर घेतया खाकी वर्दीतील जनतेच्या सेवकांची काळजी
मुंबई :अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण :जूनअखेर लागणार निकाल
मुंबई :अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण :जूनअखेर लागणार निकाल
मुंबई, दि. २८ : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जून अखेरीस लावण्याचे नियोजन असून अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सामाईक प्रवेश परिक्षा (CET) घेण्यात येईल, ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
जून अखेर लागेल निकाल
मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे.त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रा.गायकवाड यांनी केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे धोरण तयार करताना विभागातील तज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे २४ बैठकांद्वारे चर्चा केली आहे.
सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्यासमोर अनेक आव्हाने आली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अध्यापनासाठी विविध उपक्रम केलेले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च २०२१ पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे इयत्ता
दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी, पालक, परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही प्राथमिकता ठेवून राज्य मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना निश्चित केली असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्ष २०२०–२१ साठी इयत्ता दहावी परीक्षेच्या अंतिम निकालाचे निकष असे
- विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
- विद्यार्थ्यांचे दहावीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण
- विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण (इयत्ता नववी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व इयत्ता दहावी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश)
हे मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोरोना पूर्व काळातील (सामान्य परिस्थितीमधील) संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या इयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (नववीचा) निकाल कोरोनापूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर सदर निकालाची नोंद आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांनी कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे, असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.
पुनर्परीक्षा आणि श्रेणीसुधार
पुनर्परीक्षार्थी ( Repeater Student), खाजगी ( फॉर्म नं. १७), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजने (Class Improvement) अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील. राज्यातील इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार आम्ही हे धोरण तयार करताना केला आहे.
अकरावी परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा
विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या इयत्ता दहावी निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) सीईटी घेणार असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. एकूण १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व ओएमआर पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
ढेबेवाडी पोलिसांनी वसूल केला लाखाच्या वर रुपयांचा दंड
![]() |
फोटो:अनिल देसाई {कुंभारगाव} |
ढेबेवाडी दि.28: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना मास्क बंधनकारक केला आहे मात्र अनेकजण नियम तोडतात अशा नागरिकांवर ढेबेवाडी पोलिसांनी कारवाई करून १ लाखाचा दंड वसूल केला आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी परिसरात ठीकठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करत कारवाई करून सुमारे १ लाखाच्या वर दंड वसूल केला आहे तो पण फक्त ४० दिवसात १५ एप्रिल पासून आज दि.२७ मे पर्यंत आज जमा झालेली १ लाख ३०० रु.संबधित ग्रामपंचायतीना पोलिस ठाण्यात सपुर्द करण्यात आली यामध्ये सर्वाधिक तळमावले ग्रामपंचायतीला ४९,३००/-तर मुन्द्रूळकोळे ग्रामपंचायतीला ३६,५००/- आणि ढेबेवाडी ग्रामपंचायतीला १४,५००/- असे सर्व मिळून १ लाख ३०० रु.संबधित ग्रामपंचायतीच्या सरपंच याच्याकडे सुपर्द करण्यात आला या कारवाईत अजय माने आणि संदेश लादे ट्राँफीक हावलदार होमगार्ड व इतर पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे
-----------------------------------------------------------------------------------------------
संचारबंदी चालू झाल्यापासून दररोज कारवाई सुरु आहे जनतेच्या हितासाठी आम्ही हि मोहीम राबवत आहोत नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी अत्यावश्य सेवे व्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये नियमाचे उल्लघन करणाऱ्या नागरिकावर कारवाई केली जाईल :-सहा.पो.निरीक्षक श्री संतोष पवार
*सातारा जिल्ह्यातील : 2528 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 30 बाधितांचा मृत्यू*
गुरुवार, २७ मे, २०२१
कुंभारगाव : चिखलेवाडीतील ग्रामस्थांचा सुटकेचा निःश्वास !
"वापर आणि काढून टाका!"बी ए एम एस. डॉक्टरांसाठीचे धोरण कायमस्वरूपी बदलून तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय करण्याची शासनाला मागणी.
*सातारा ; कोरोनाबाधित रुग्णाकडून विविध हॉस्पिटलकडून 20 लाखापेक्षा अधिकचे बिल ; रक्कम परत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*
*सातारा जिल्ह्यातील 2675 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*
बुधवार, २६ मे, २०२१
*सातारा जिल्ह्यातील :2156 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 40 बाधितांचा मृत्यू*
मंगळवार, २५ मे, २०२१
आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून २५ टक्के निधी कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी
आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून २५ टक्के निधी कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी
मुंबई, दि. २५ : राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्या माध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या 60 हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे श्री. टोपे यांनी संगितले.
मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे 2245 रुग्ण आहेत. या आजारावर उपचारासाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन वापरले जात असून त्याची किंमत जास्त आहे. केंद्र शासनाकडून या इंजेक्शन वाटपाचे नियंत्रण केले जात आहे. मात्र महाराष्ट्रात हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली असून त्यामाध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यात 60 हजार व्हायल्स उपलब्ध होतील.
ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा पुरवठा केंद्र शासनाकडून होत असून रुग्णसंख्येनुसार जिल्ह्यांना त्याचे वाटप केले जात आहे. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची अद्ययावत माहिती आयडीएसपी या पोर्टलवर दिली जाईल याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
म्युकरमायकोसीस या आजाराला महाराष्ट्र शासनाने नोटीफाईबल डिसीस म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्यासाठी राज्यभरात 131 रुग्णालये नोटफाईड करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या राज्यात सुमारे 2200 रुग्णांपैकी 1007 रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीसचे काही रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांसाठीच्या उपचारासाठी जे दर निश्चित करण्यात आले आहेत ते म्युकरमायकोसीसच्या रुग्णांना लागू करून त्यानुसार उपचार व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड ॲण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सुमारे 70 हजाराच्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत.
राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझीटिव्हीटी दरापेक्षा १८ जिल्ह्यांतील पॉझीटिव्हीटी दर जास्त आहे तेथे होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) ऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणावर भर द्यावा. ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
*सातारा : हॉटेल व रेस्टॉरंटची सेवा पूर्णत: बंद**सुधारीत आदेश जारी*
*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पी एच सी च्या डॉक्टरांची घेतली आढावा बैठक*
*सातारा जिल्ह्यातील2364 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*
‘शिवसमर्थ’ने जपली बांधिलकी; कोवीड सेंटरला वाॅटर प्युरिफायर भेट
अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश
अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश
मुंबई, : गौण खनिजाचे अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची आज बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तिन्ही जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.
बांधकाम व्यावसायिकांची तपासणी करा !
मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी किती गौण खनिज वापरले.किती बाहेर विकले. यासंदर्भात तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.
कोट्यवधींचा महसूल बुडतोय
गौण खनिजाच्या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतोय. महसूल यंत्रणेने योग्य वसुली केली तर राज्याच्या तिजोरीत काही प्रमाणात का होईना हातभार लागेल. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.
सोमवार, २४ मे, २०२१
*सातारा :बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु**जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी केले आदेश जारी*
*सातारा :खरीप हंगामासाठीच्या कर्जाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा*- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*
*सातारा जिल्ह्यातील : 2648 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 31 बाधितांचा मृत्यू*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...