*सातारा : डोंगरीभागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान, तीन दिवसात प्रस्ताव करा गृहराज्यमंत्री यांच्या तालुका प्रशासनाला सूचना*
सातारा दि. 18 : गेल्या दोन तीन दिवसांपासून सातारा जिल्यातातील डोंगरी भागातील गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या तीन दिवसांत पंचनामे करुन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करा अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शुभूराज देसाई यांनी केल्या.
पाटण तालुक्यातील अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध गावांची पहाणी गृह राज्यमंत्री श्री .देसई यांनी केली. यावेळी त्यांनी सुचना केल्या. या पहाणी प्रसंगी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार योगेश्वर टोणपे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दशरथ काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे, रस्ते, पूल व शेतीचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्याचे पंचनामे कृषी विभाग, महसुल विभाग व ग्रामसेवक यांनी तात्काळ पंचनामे करुन एकत्रित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करावा. प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत शासनाच्या निदर्शनास आणला जाईल. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी व अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणार असल्याचेही प्रयत्न श्री. शंभूराज देसाई यांनी पहाणी दरम्यान सांगितले.
साहेब प्रस्ताव कुठे व कसा करायचा , आमचा गावात माजी वाडी आहे त्यात पावसात खुप हाल होतात , रास्ता पक्का नाही , त्यामुळे पावसात रास्ता खुप चिखलाचा होता ,नीट चालता नाही येत , घसरून पडलो तर हाड वाकडी होतील , गेले कित्येक वर्षे असाच रास्ता आहे ,कोणी दखल नाही घेत , किती तरी निवेदन दिली पण काही फायदा नाही होत, तेवढे रस्त्याचे काम बगा साहेब ,खुप उपकार होतील ।
उत्तर द्याहटवासाहेब प्रस्ताव कुठे व कसा करायचा , आमचा गावात माजी वाडी आहे त्यात पावसात खुप हाल होतात , रास्ता पक्का नाही , त्यामुळे पावसात रास्ता खुप चिखलाचा होता ,नीट चालता नाही येत , घसरून पडलो तर हाड वाकडी होतील , गेले कित्येक वर्षे असाच रास्ता आहे ,कोणी दखल नाही घेत , किती तरी निवेदन दिली पण काही फायदा नाही होत, तेवढे रस्त्याचे काम बगा साहेब ,खुप उपकार होतील ।
उत्तर द्याहटवासाहेब मी सळवे गावातील रहिवासी आहे गेली कित्येक वर्ष आम्हाला रस्त्याविना प्रवास करावा लागतो सळवे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर ससेवाडी नावाची वाडी आहे या वाडीत मी राहतो
उत्तर द्याहटवातुमी जर पावसाळी परिस्थिती बघितली तर अतिशय भयानक आहे आम्हाला जीव मुटीत धरून पाण्यातून प्रवास करावा लागतो गुडघाभर चिखलातून प्रवास करावा लागतो ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे ना रस्त्याची आहे किती वेळेस पाठपुरावा करून कसली ही मदत केली जात नाही तरी कृपया आपणास विनंती आहे कि आमचा आमच्या या गोष्टीचा पाठपुरावा करावा
प्रवीण मातने 8850804775