बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

कुंभारगाव ; "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेला आजपासून सुरवात

कुंभारगाव: दि.15: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यासाठी त्यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिम राबवण्याबाबत सांगितलं. १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जात आहे. 
याच मोहिमेअंतर्गत कुंभारगाव (ता.पाटण) येेथे आज सुरुवात करण्यात आली "माझं कुटुंब  माझी जबाबदारी"  या कार्यक्रमाचे  उदघाटन प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले अर्तगंत कुंभारगाव येथे करण्यात आले याप्रसंगी जबाबदारी ची शपथ घेण्यात आली . यावेळी मा.सौ.सीमा मोरे पंचायत समिती सदस्य  तसेच डाॅ.गोंजारी सर वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रियांका काळे वैद्यकीय अधिकारी तळमावले प्रशासक श्री.आरबाळे साहेब तसेच आरोग्य कर्मचारी आरोग्य सहाय्यक  जे.एफ.पावरा आरोग्य सेवक रोहित भोकरे आणि व्ही.जी.फाळके आरोग्य सेविका ए.एम.कांबळे  व ग्रामसेवक श्री.अनिल जाधव ,पोलीस पाटील प्रवीण मोरे,अमित शिंदे व महादेव वरेकर, ग्रामपंचायत कर्मचारी,आशा सेविका  अंगणवाडी सेविका  ग्रामस्थ आदींच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

सातारा जिल्ह्यातील 6 लाख 80 हजार घरापर्यंत पोचणारी " माझे कुटुंब माझी जबाबदारी " ही महत्वाकांक्षी मोहीम आहे 

या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महिन्यात दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी आरोग्य पथकाची एक टीम जाणार आहे. मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी  'ब्लॅक बेल्ट' म्हणून करावा. सदा सर्वदा मास्क लावावा. शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. 

ग्रामस्थांनी किमान सोपे उपाय केले तरी ते स्वतःला तसेच त्यांच्या आसपासच्या अनेकांना कोरोना संकटापासून दूर ठेवू शकतात असे  डाॅ.गोंजारी यांनी यावेळी सांगितले. आरोग्य विभागाने ग्रामस्थांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी निवडक सोपे उपाय सांगितले आहेत.

  1. घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने मास्कद्वारे नाक-तोंड झाकून घ्यावे
  2. साबण वा लिक्विड सोप आणि पाण्याचा वापर करुन हात धुवा नंतर रुमालाने अथवा टॉवेलने कोरडे करुन घ्या. अथवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन घ्या. स्वच्छ हातांवर ग्लोव्हज घाला. नाक-तोंड मास्कने झाकून घ्या. नंतर घराबाहेर पडा.
  3. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिका यांनी घराबाहेर पडणे टाळावे
  4. दोन नागरिकांनी एकमेकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर राखावे
  5. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तूला अथवा भिंत, रेलिंग, कठडा, जिना, दरवाजाची बेल यांना स्पर्श करणे टाळा. आवश्यकतेनुसार स्पर्श केल्यास लगेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.
  6. शक्यतो हातात एक कागद बाळगा आणि त्या कागदाने आवश्यक त्या वस्तूंना स्पर्श करा. नंतर तो कागद कचराकुंडीत टाकून द्या.
  7. बाहेरून घरी परतताच कुठेही स्पर्श करण्याआधी हात-पाय, चेहरा, मानेचा भाग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि रुमालाने अथवा टॉवेलने कोरडे करुन घ्या. अथवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन घ्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...