श्री गडीकर यांनी साताऱ्याचा कार्यभार घेतल्यापासून जिल्हा रुग्णालय दिशाहीन झाले होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्यात धुसपूस वाढली होती. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यात गट तट निर्माण झाले होते. परिणामी रुग्णालयाच्या कामावर त्याचा परिणाम होत होता.
याबाबत गडीकरांना सामाजिक व राजकीय संघटनांनी तसेच साताऱ्यातील माध्यमांनी जागे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याविरोधात अनेकदा तक्रारींचा पाऊस पडला होता. त्या सर्व तक्रारींची दखल घेत राज्याच्या आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी कराड येथील बैठकीत बदलीचे आदेश काढून त्यांची उचलबांगडी केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा