संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
सोमवार, ३० डिसेंबर, २०१९
मुंबईकरांचं आता तरी भलं होणार का ? एकट्या मुंबईतून ५ कॅबिनेट मंत्री!
मंत्रिमंडळ विस्तारात तब्बल ३६ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. विधानभवनाच्या प्रांगणात हा शपथविधी होता. या ३६ मंत्र्यांमध्ये तब्बल २६ मंत्री कॅबिनेट दर्जाचे असून १० मंत्री हे राज्यमंत्री दर्जाचे आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्र्यांची एकूण संख्या ४३वर गेली आहे. याआधी मुख्यमंत्र्यांसोबत एकूण ६ मंत्र्यांचे शपथविधी झाले होते. आता त्यात ३६ मंत्र्यांची भर पडली आहे. मात्र, मुंबईकरांसाठी यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकूण ५ कॅबिनेट मंत्री हे मुंबईचे आहेत. शिवाय मुंबईचं उपनगर असलेल्या ठाण्यातून जितेंद्र आव्हाड हे कॅबिनेट मंत्री झाले आहेत.त्यामुळे मुंबईकरांसाठी एकूण ६ मंत्री आता थेट राज्याच्या कॅबिनेटमध्ये काम करताना दिसणार आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराबद्दल संदीप डाकवे यांचा माने परिवाराकडून सन्मान*
तळमावले/प्रतिनिधी : माणसाच्या आयुष्यातील ७५ वे वर्ष म्हणजेच अमृतमहोत्सव हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. या आनंदाला सामाजिक कृतज्...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा