जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वास हे गुण विद्यार्थ्यांच्याकडे असणे आवश्यक - मा.श्री.पी.एल केंडे.
पाटण - जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वास हे गुण विद्यार्थ्यांच्याकडे असणे आवश्यक आहे , तरच आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी हा टिकून राहणार आहे, असे मत शिक्षक पालक सह विचार दरम्यान मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी. एल. केंडे सर यांनी व्यक्त केले.
यावेळी इ.5 वी व इ.8 वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली होती.
या सहविचार सभेचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम सर यांनी केले , यावेळी स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख कु.मणेर एस एस.यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी या पालक सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते, शेवटी या पालक सभेचे आभार विद्यालयातील वरीष्ठ शिक्षक श्री.डोंगरे एस.एल.सर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा