कराड / वार्ताहर
शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथील प्रा. सुरेश यादव यांनी श्री स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित सातारा विभागीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. कोरोणा पूर्वीचे जग आणि कोरोना नंतरचे जग हा त्यांच्या वक्तृत्वाचा विषय होता. त्यांची विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या त्यांच्या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगीताई गावडे, सहसचिव (प्रशासन) डॉ. युवराज भोसले, सहसचिव (अर्थ) राजेंद्र शेजवळ, प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ) सतीश घाटगे तसेच सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा