मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

वसा दुर्गस्वच्छतेचा!: जय स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र नगर मानखुर्द ’ या संस्थेने २९डिसेंबर रोजी शिवनेरी गडावर साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला.

वसा दुर्गस्वच्छतेचा!

महाराष्ट्र म्हणजे गड-किल्ल्यांची भूमी! या वीरभूमीची शान असलेल्या सह्याद्रीच्या रांगेत असंख्य किल्ले उभे राहिले. सातवाहन काळापासून शिवकाळापर्यंत असंख्य किल्ल्यांनी महाराष्ट्राचा इतिहास प्रेरणादायी केला. हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र आज या साऱ्या ठेव्याला घाण, कचऱ्याचा वेढा पडला आहे. गडांवरचे हे अराजक दूर करण्याचा निश्चय ‘जय स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र नगर मानखुर्द ’ या संस्थेने केला आणि २९डिसेंबर रोजी शिवनेरी गडावर साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला.
शिवनेरी किल्ल्यावर चार ते पाच तास झालेल्या या साफ-सफाईत प्लास्टिकच्या पिशव्या, पाकिटे, बाटल्या गोळा करण्यात आल्या. या  किल्ल्यावर अशी सहा ते सात पोती कचरा जमा करण्यात आला. या कचऱ्यात मद्याच्या बाटल्यांचे प्रमाण मोठे होते. हा कचरा गोळा करण्यात युवक पुढाकार घेत असताना ही घाण करण्यातही गडावर जाणारे तरुणच आघाडीवर असल्याची खंत या संस्थेचे संस्थापक दत्तात्रय डोगळे अध्यक्ष बबन सुर्वे यांनी व्यक्त केली. 
जय स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र नगर मानखुर्द ही संस्था गेली ७ वर्षे हा उपक्रम राबवित आहे ह्या व्यतिरिक्त :मेडिकल कॅम्प , सौंस्कृतिक कार्यक्रम , मुलांना वह्या व पेन वाटप , हुशार विद्यार्थ्यांनचा सन्मान चिन्ह देऊन  गौरव करण्यात येतो, डस्सबिन वाटप , वृक्ष रोपन असे उपक्रम . किल्यावर राबविण्यात येतात . प्रत्येक वर्षी वेगवेगळा गड उपक्रमासाठी निवडला जातो .अशी माहिती संस्थापक। दत्तात्रय डोगळे यांनी दिली 
राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाने गड-किल्ल्यांचे जतन करण्यास आम्ही असमर्थ असल्याची कबुली न्यायालयात दिली असतानाच, शिवप्रेमाने भारावलेल्या तरुणाईच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...