कै सखाराम बापू कचरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रा.ब. काळे जीवन शिक्षण मंदिर सातारा यांचा सहावा स्मृतिदिन कोणतेही धार्मिक विधी न करता छ.शाहू बोर्डिंग शाखा नंबर १ येथील निराश्रित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मिष्ठान्न स्नेहभोजन देऊन वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचा नवोपक्रम श्री बाळासाहेब कचरे व परिवाराने केला.कर्मवीरांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेल्या परिसरात आपल्या वडिलांनी सेवा पूर्ण केली.याची जाण व त्याच परिसरात त्यांच्या स्मृती जागवून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या समवेत सहावा स्मृतिदिन अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला.या प्रसंगी बाळासाहेब कचरे सर यांनी आपले वडील व कर्मवीर आण्णा यांच्यातील प्रसंगांना उजाळा दिला.धार्मिकता व कर्मकांडांना बगल देत असे समाजउपयाेगी उपक्रम साजरे व्हावेत.या प्रसंगी कचरे कुटूंबीय व मैत्रीच्या झाडाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराबद्दल संदीप डाकवे यांचा माने परिवाराकडून सन्मान*
तळमावले/प्रतिनिधी : माणसाच्या आयुष्यातील ७५ वे वर्ष म्हणजेच अमृतमहोत्सव हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. या आनंदाला सामाजिक कृतज्...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा