सातारा दि.3 साताऱ्यात नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावर पहाटे 6 च्या सुमारास भीषण अपघात झालायं.वॅगनार गाडीने थांबलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जातयं. या अपघातात नाना साळुंखे आणि लक्ष्मी साळुंखे या जोडप्याचा मृत्यू झाला असून मुलगी माधुरी साळुंखेसह 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मच्छिंद्र जाधव वय 40, तनुजा जाधव वय 35 आणि कनिष्क जाधव वय 4 हे या अपघातात गंभीर जखमी झालेयं.
अपघातात ढेबेवाडी येथील नाना साळुंखे आणि लक्ष्मी साळुंखे या जोडप्याचा मृत्यू
साळुंखे कुटुंबीय मुंबईहून आपल्या ढेबेवाडी या गावी जात असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. नागठाणे चौकात आणि रस्त्याच्या कडेला वाहने लावली जातात त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. या ठिकाणी नेहमी वर्दळ असल्या कारणाने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे .पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा