शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

कराड : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य अंगीकृत करता आले पाहिजे-सारंग पाटील

कराड : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य अंगीकृत करता आले पाहिजे-सारंग पाटील
कराड: प्रतिनिधी
उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष व श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.
    कराड येथे श्रीनिवास पाटील फाउंडेशन व सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 'कर हर मैदान फतेह' या व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य कार्यशाळा संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने, फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ.रचना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
    सारंग पाटील म्हणाले, कॉलेजमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यातील स्वप्ने पाहत असतो. मात्र उत्तम करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य अंगीकृत करता आले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांचे अंतिम शिक्षण नसून ते एका व्यावसायिक क्षेत्राच्या प्रारंभ असला पाहिजे. नोकरी व व्यवसाय करत असताना आपण इतरांसोबत कसा संवाद करतो यावर प्रामुख्याने अनन्यसाधारण महत्व दिले जाते. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी आपण एक चांगली व्यक्ती होणे महत्वाचे आहे. आपण व्यवसायाकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहतो. श्रीमंत व्हावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, त्याद्वारेच आपण सुखी व आनंदी होतो असा ठाम विश्वास असतो. परंतु विद्यार्थ्यांची श्रीमंती पैशांपेक्षा त्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी आपली कामे स्वतः करावीत, दिवसभर मेहनत करावी म्हणजे रात्री शांत झोप लागते, आपले कार्य एवढे उठावदार पाहिजे की, आपली अनुपस्थिती इतरांना जाणविली पाहिजे. समाजाने आपले कौतुक व गौरव केला पाहिजे, समाजाला आपल्या कर्तृत्वाबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आपले जीवन स्वतःच्या आनंदासाठी जगावे, आपल्या दुःखाबद्दल सहानुभूती न मागता इतरांचे दुःख हलके केले पाहिजे तोच व्यक्ती ख-या अर्थाने श्रीमंत असतो.
    दरम्यान सौ.रचना पाटील यांनी त्यांच्या व्यक्तिमत्व विकास, मानसोपचार, मनुष्यबळ विकास क्षेत्रातील गेल्या 25 वर्षाच्या अनुभवाच्या आधारे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी लागणारी संभाषण कौशल्ये, अभिव्यक्ती याबाबत त्यांनी अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या.
     कार्यशाळेस प्रा.नेताजी सुर्यवंशी, डॉ.रामचंद्र व्हनबट्टे, डॉ.कोमल कुंदप, डॉ.प्राजक्ता निकम, महाविद्यालयाचे अन्य प्राधापाक, कर्मचारीवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...