नाना पटोले, नितीन राऊत,सुनिल केदार हे काल दिल्ली दौऱ्यावर होते.
विधानसभा अध्यक्षांबाबत हायकमांड जो काही निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील, असं यावेळी नाना पटोलेंनी सांगितलंय. विधानसभा अध्यक्षपदासाठी
भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव आघाडीवर असलं, तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचे नेते होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची जागा रिक्त झालीय. काँग्रेसचे नेते वेणूगोपाल आणि एच. के. पाटील यांच्यासोबत काल एक भेट झाली असून बाळासाहेब थोरात,अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही पटोलेंनी सांगितलंय. त्यामुळं अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा