मण्याचीवाडी ते चाळकेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर असलेला साकव पुलाचा भराव वाहून गेल्याने चाळकेवाडीला जाणारी वाहतूक बंद झाली आहे दुसऱ्या बाजूला पण तीच आवस्था झाली आहे मान्याच्यावाडीतून चाळकेवाडीला जाणारा रास्ता सुद्धा पुराच्या पाण्याने उध्वस्त झाल्यामुळे चाळकेवाडीची वाहतूक ठप्प झाली आहे तेथे असणारा विधुत पोल सुध्दा धोकादायक झाला आहे तेथून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
संबंधित रस्त्याची सरकारी अधिकारी पाहणी करून गेले आहेत त्यावर कारवाई कधी होते हे पाहावे लागेल . प्रशासनाने ताबडतोब संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी चाळकेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा