सोमवार, १४ जून, २०२१

कुंभारगाव :सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी यांच्याकडून ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन

कुंभारगाव :सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी यांच्याकडून ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन 



पाटण:  येथील सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी (कुंभारगाव) या ग्रुपच्या वतीने दि.12 जून ते 30 जूनच्या दरम्यान  निशुल्क ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद आहेत त्यामुळे मुले अभ्यास कसा करायचा हेच विसरून गेले आहेत की काय आशा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे, हाच धागा पकडून सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी (ता.पाटण) यांनी कुंभारगाव विभाग मर्यादित ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

यामध्ये गट नंबर 1 मध्ये - 5 ते 7 वी पर्यंत विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या विद्यार्थ्यांना निबंधासाठी खालील विषय दिले आहेत.

१) स्वच्छतेचे महत्व २) माझी आई ३) माझा आवडता सण ४) झाडे लावा, पर्यावरण वाचवा.  

( निबंध ५० ते ६० ओळीत असावा)

गट नंबर 2 मध्ये - 8 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना विषय आहेत.

१) जागतिक पर्यावरण समस्या २) प्रदूषण एक समस्या ३) कोरोना व लॉकडाऊन ४) ऑनलाईन शिक्षण पद्धती, संधी व समस्या. 

(निबंध ७० ते ९० ओळींचा असावा )

!! "स्पर्धेतील बक्षिसे" !! 

गट नंबर 1 -5 ते  7 वी 

प्रथम बक्षीस - ५०१ रुपये व प्रमाणपत्र. 

द्वितीय बक्षीस - ३०१ रुपये व प्रमाणपत्र. 

तृतीय बक्षीस* - २०१ रुपये व प्रमाणपत्र. 


या गटातील सर्व स्पर्धकांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती आपण लिहलेल्या निबंधाचा फोटो काढून पाठवावा.

 श्री. शंकर सिताराम मोरे.९३२४२४२४७०

 श्री. लक्ष्मण परशराम वरेकर ८६५२७७९०६३

 श्री. उत्तम शिवाजी मोरे ९७६९१२१४८४   

श्री. रवींद्र बंडू काटे ७०२१११८७४७ 

 श्री. विश्वास बबन चिखले.९९६७९४०३५५

गट नंबर 2 - ८ ते १० वी


प्रथम बक्षीस- ७०१ रुपये व प्रमाणपत्र.

द्वितीय बक्षीस - ५०१ रुपये व प्रमाणपत्र. 

तृतीय बक्षीस - ३०१ रुपये व प्रमाणपत्र


या गटातील सर्व स्पर्धकांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती आपण लिहलेल्या निबंधाचा फोटो काढून पाठवावा.


श्री. सुरेश रामचंद्र चिखले. (गुरुजी) ९३०९१३५०३८

 श्री. युवराज रघुनाथ धोत्रे.८१०८८३३७७८

 श्री. ऋषिकेश तात्यासो बोत्रे.९९२०६९५८२८ 

श्री. विश्वनाथ राजाराम चिखले.७०२०५४०१२७

श्री.अभिजीत भानुदास मोरे  ९८१९०९८३७२

 (टीप : विद्यार्थ्यांनी आपले निबंध 12 जून ते 30 जून यादरम्यान पाठवायचे आहेत)


स्पर्धेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांनी संपूर्ण नांव, पत्ता, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो व शाळाचे नांव आपल्या प्रवेशिके सोबत द्यायचे आहे. अंतिम तारखे नंतर तज्ञ शिक्षकांकडून निबंधाचे परीक्षण करुन निकाल जाहीर केला जाणार आहे. व विजेत्या स्पर्धकांचे सत्कार व अभिनंदन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत सहभाग घ्यावा अशी विनंती सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी यांच्यातर्फे प्रा. सुरेश यादव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...