काळगाव :"मरणाने केली सुटका,स्मशानभूमीने छळले आहे. लोहरवाडीत स्मशानभूमीच नाही
प्रतिनिधी /मनोज सावंत
लोहारवाडी परिसरात एखादी दुःखद घटना घडल्यास अंत्यविधीदरम्यान पावसाळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने उघड्यावर अंत्यविधी उरकून घ्यावा लागतो आहे.काळगाव परिसरात गेले काही दिवस पावसाची संततधार चालू आहे दरम्यान लोहारवाडीतील एका 53 वार्षिय महिलेचा हृदयविकाराने निधन झाले यावेळी ग्रामस्थांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला की भर पावसात अंत्यविधी कसा करावा अखेर यावर तोडगा निघाला गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन तात्पुरते बांबूच्या साह्याने शेड करून त्यावर पत्राची पाने टाकून अंत्यविधी उरकून घेतला पण पुढे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.येथील ग्रामस्थांनी आपली व्यथा संबंधित प्रशासनाकडे मांडूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासनाविरोधात येथे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.प्रशासनाने ताबडतोब नवीन स्मशानभूमीची व्यवस्था करावी, जेणेकरून निदान अंत्यविधीदरम्यान तरी यातना सहन कराव्या लागणार नाहीत, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमीच्या कामाचा प्रस्ताव दिला आहे थोड्याच दिवसात मंजुरी मिळेल - पंजाबराव देसाई (प.स.सदस्य काळगाव)
फक्त अशवासन नको कार्यहवे
उत्तर द्याहटवा