मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीवरील प्रभुत्व कमी झाल्याने आणि मला डावलल्याने मी शिवसेना सोडली - नरेंद्र पाटील
सातारा | महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीवरील प्रभुत्व कमी झाल.मला मोकळ्या मनाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करावं म्हणून मी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला.माथाडी कामगार संघटनेच्या संघटनेची मीटिंग असो किंवा मराठा आरक्षण संदर्भाचा विषय असो यातून मला जाणीवपूर्वक डावलले जात होते, असे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून बदलून एकनाथ शिंदेंना आणा अशी माझी भूमिका होती,मला जाणीवपूर्वक शिवसेनेकडून डावलण्यात येत होतं,त्यामुळे माझी घुसमट होत होती.त्यामुळेच मी भाजपात प्रवेश केला आहे असा खुलासा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा